महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कन्नूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.
कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे.
बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे.
आसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला जाण्यासठी प्रथम सीलचरला जावे लागते. तेथून पुढे बसने जावे लागते.
पूर्वीच्या काळी थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्र्वर सोलापुरात होऊन गेले. सिद्धारामेश्र्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट (६८) शिवलिंगांची स्थापना करून येथील धार्मिक माहात्म्य वाढवले. आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली. याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे व येथेच सिद्धरामेश्र्वर यांची शिवयोग समाधी आहे. तळ्याच्या मध्यभागी हे शिवमंदिर असल्याने देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागात असलेला आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८९२ मध्ये सुरु झालेले या वास्तूचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. सुलतान मोहमंद आगाखान यांनी आगाखान पॅलेस बांधले.
भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल.
डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.
भंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात.
Copyright © 2025 | Marathisrushti