महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जवळील कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या ठिकाणाला सर्व धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.
कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे.
जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स व लिटीगॉन्स हे प्राणी याच संग्रहालयात जन्मास घातले गेले.
कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.
मध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.
व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे सर्वाधिक उंच म्हणून ओळखले जाते.
उस्मानाबाद जिल्ह्यात रेगूर या भागात अतिशय सुपीक माती आढळते. लाव्हाच्या संचयनातून तयार झाल्याने तिला लाव्हा रसाची काळी मृदा असेही म्हटले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायत पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
तेव्हा पुण्याची लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजीपाला आणि फळांचा बाजार शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या ‘क्रॉफर्ड मार्केटच्या’ धर्तीवर पुणे शहरातही बंदिस्त मंडई बांधावी, असा विचार करुन १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला गेला.
नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी अख्यायिका आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले असून प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti