(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.

  • कल्पेट्टा

    ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.

  • अहमदनगर जिल्हा

    जी ईश्‍वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्‍वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.

  • ऐतिहासिक सातारा शहर

    सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराभोवती असलेल्या सात टेकडयांमुळेच या शहराला सातारा असे नाव पडलेले आहे. हे शहर मराठी साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे.

  • मावली टिफीन रिम्स MTR

    खवैय्या बंगलोरला गेला व एमटीआर मध्ये नाश्ता जेवण्यास गेला नाही असे होत नाही. १९२४ साली स्थापना झालेल्या या उपहारगृहातील इडली, दोसे कॉफी आदिंची चव राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून अनेक मोठमो:्या नेत्यांनी चाखली आहे.

  • जामनेरची केळी आणि संत्री

    जामनेर हे जलगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर कापूस, केळी आणि संत्री यांकरिता प्रसिध्द असून, जळगावपासून अवघ्या ३७ किलोमीटरवर आहे.

    औरंगाबाद बुरहानपूर महामार्गावरील या शहरापासून जगप्रसिध्द अजंठा लेणी २९ किलोमीटरवर आहेत. तसेच वेरुळ लेणी १३० किलोमीटरवर आहेत.

    येथील रामवनही प्रसिध्द आहे.

  • गोंदिया जिल्ह्याचा इतिहास:

    राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते.

  • ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

  • कुंभकोणम

    कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते.

  • वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर रिसोड

    रिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.