महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली.
लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.
पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१९४५ मध्ये हो-चि-मिन्ह यांनी डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. हनोई हे शहर राजधानीचे असले तरी हो-चि-मिन्ह सिटी हे सर्वात मोठे शहर आहे.
सोशालिस्ट रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात १३वा क्रमांक लागतो.
इ.स. १८०२ मध्ये जिआ लाँग यांनी हा प्रदेश प्रथम दत्तक घेतला.
१९७५ मध्ये झालेल्या अंतर्गत युध्दात उत्तर व्हिएतनाम विजयी झाले. त्यानंतर व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आला.
कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई.
कोयना धरण जलसंधारणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने १९५६ साली कोयना धरणाच्या कामाला प्रारंभ केला.
१९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्णत्वास आले.
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाची उंची १०३.९ मी व लांबी ८०७.१ मी एवढी आहे.
हे देशातील प्रमुख धरण मानले जाते
बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे,त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो.
सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील भात हे प्रमुख पीक आहे. सावंतवाडी, कुडाळ, मालवण व कणकवली ह्या तालुक्यांत भाताचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच नाचणी,वरई, कुळीथ ही सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत.
मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti