महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
चिकमंगळूर हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे शहर असून मलयगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर इथल्या कॉफीमळ्यासाठी प्रसिध्द आहे. चिकमंगळूर हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. मंगलोर विमानतळ आहे. रेल्वे व रस्ते मार्गाने हे शहर देशाशी जोडलेले आहे.
पर्यटकांचे आवडते शहर
चिकमगला उरु या कन्नड शब्दापासून चिकमंगळूर हे नाव पडलेले आहे. याचा अर्थ मोठ्या मुलीचे शहर असा होतो. उन्हाळ्यातही इथले हवामान आल्हाददायक असल्याने पर्यटकही इथे मोठ्या संख्येने येतात. सुप्रसिध्द हेबे धबधबा इथून जवळ आहे.
नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.
परभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व नृसिंह सहकारी साखर कारखाने असुन,येथे प्रभावती सूत गिरणी,जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग, डाळमील, खताचा कारखाना व सिमेंटचे खांब बनवण्याचे कारखाने ही आहेत.
तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे.
हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून ४ साखर कारखाने आहेत.
ग्रीसमधील मेटेओराची निर्मिती १४व्या शतकात करण्यात आली आहे. मेटेओरा हे त्याच्या वैशिष्टपूर्ण उभारणीसाठी प्रसिध्द आहे. ३७३ मीटर उंच सुळक्यावर त्याची उभारणी करण्यात आली आहे.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते.
भारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत मोलाची आहे. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून महाराष्ट्राने मुंबई स्वत:कडे मिळवली.
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti