महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोव्याचा भाग हा कोकण रेल्वेत समाविष्ट होतो.
डोंगर, दर्याखोर्या यामुळे हा रेल्वे मार्ग काढण्यात अडचणी होत्या.
अखेर १९९६ ला रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे.
पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.
मध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.
जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.
जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठे रोझ गार्डन पंजाबमधील चंदीगढ शहरात आहे.
चंदीगडच्या सेक्टर १६ मध्ये झाकीर रोझ गार्डन आहे. या गार्डनमुळे गुलाबांचे शहर म्हणून चंदीगडची ओळख आहे.
लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे.
४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना अभयारण्याचा समावेश आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti