महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुलगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असे मानतात. वत्सगुल्म, वंशगुल्म, वासिम वगैरे नावांचाही उल्लेख इतिहासात सापडतो.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
हनुमान जंक्शन हे शहर आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. या शहरातील हनुमान मंदिराजवळ चार महामार्ग एकमेकांना ठेवतात, म्हणूनच या शहराला ‘हनुमान जंक्शन’ असे अनोखे नाव प्राप्त झालेले आहे
अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे.
लिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे.

हरियाणा हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले प्राचीन शहर आहे. कौरव-पांडवांचे युध्द येथेच झाल्याचे दाखले धर्मग्रंथात आहेत.
इ.स. पूर्व ३१०२ वर्षांपूर्वी राजा कुरु यांनी हे शहर वसविल्याची नोंद आहे.
येथील युध्दात कौरवांना पराभव पत्करावा लागला होता. येथेच गीतेचे प्रकटीकरण झाले होते.
सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो.
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.
अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti