महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे.
तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे.
ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.
वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर बनविले.
देशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.
मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात.
शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti