महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जिल्ह्यात सातारा, कर्हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे.
बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात. मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील जिल्ह्यात बोलल्या जातात.
विलुप्पुरम हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो.
जपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे.
१७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.
पुणे हे पेशवाईपासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत पुणे शहराच्या आसपास किमान डझनभर बागा होत्या. त्यातील काही आजही आहेत तर काहींची फक्त नावेच शिल्लक आहेत.
वेल्लूर हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. पलार नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर वेगवेगळ्या काळात चोल, विजयनगर, राष्ट्रकुट तसेच ब्रिटिश यांची सत्ता होती.
जळकोट हे लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक छोटे शहर आहे. या शहरातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तीन हिरव्यागार डोंगरांनी हे शहर वेढलेले असून हिवाळ्यात व पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते.
सेंट लुसिया (इंग्लिश: Saint Lucia; फ्रेंच: Sainte-Lucie) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस मार्टिनिक, दक्षिणेस सेंट व्हिन्सेंट तर आग्नेयेस बार्बाडोस ही बेटे आहेत. कॅस्ट्रीझ ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे.
गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या पेटीत ठेवलेली मूळ गणेश मूर्ती आहे. ही मूळ मूर्ती म्हणजेच 'लक्ष्मी गणेश' आहे. ती पिवळ्या संगमरवराची असून तिच्याही बाजूस ऋद्धि सिद्धी व लक्ष लाभ (पुत्र) असून ती कोरिव व अती लहान आहे. ही मूर्ती सन १७०० च्या सुमारास परशुरामांनी लंबोदरानंद स्वामीना ध्यानधारणेसाठी दिली अशी कथा आहे. परशुरामांच्या सांगण्यानुसार तिची पुजा केली जात नाही. पूजेची मोठी मूर्ती बडोद्याचे सावकार मैराळ यांच्याकडून आणली आहे. येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे.
या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे.
कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते; रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे. अलिबाग धरमतर एस. टी. नेही कनकेश्वरला जाता येते.
कनकेश्वर मंदिराची माहिती देणारा हा एक व्हिडिओ बघा...
पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
Copyright © 2025 | Marathisrushti