महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबईला मोठा सागरीकिनारा लाभला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटीचे मिलार्ड यांनी १९२३ मध्ये मत्स्य संशोधन केंद्राची संकल्पना मांडली डी.बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून १०८ फूट लांब व ९४ फूट रुंद अशी इमारत उभी राहिली.
आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.
पृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.
डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.
फौनल हे आफ्रिकेतील सर्वात मोठे संरक्षित जंगल आहे.
मुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेल्या राणीच्या बागेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. इ.स.१८६१ मध्ये हे उद्यान तयार करण्यात आले असून, ते देशातील जुने प्राणिसंग्रहालय आहे
पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात.
महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्याचे भागभांडवल असते.
रत्नागिरी हे कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. येथील किल्ला प्रसिध्द असून, तो विजापूरच्या आदिलशहाने बांधलेला आहे.
देशाच्या पश्विम किनार्यावर वसलेले या शहरातील बंदर प्रसिध्द आहे. येथील थिबा पॅलेस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेले पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ प्रेक्षणीय आहे.
गोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti