महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे,त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो.
महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.
आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट उंचीवर हे शहर असून धनसिरी नावाच्या नदीच्या किनार्यावर ते वसलेले आहे.
गोलाघाट शहरातील साहित्यिक इतिहास -
गोलाघाट साहित्य सभा ही आसाम साहित्य सभेची सर्वांत जुनी शाखा असून, १९१८ साली तिची स्थापना झालेली आहे. अनेक नामवंत साहित्यिक या सभेचे सभासद आहेत. या शहरात राज्यातील सर्वात जुने रेल्वेस्थानक असून, देशाच्या स्वतंत्र्यसंग्रामात येथील अनेक देशभक्तांनी योगदान दिले आहे.
हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.
उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो.
भातशेतीनंतर उरलेला पेंढा शेतकरी उडवी (ढीग) करून जपून ठेवतात. या पेंढ्याला आंबा पॅकींगसाठी मागणी असते. स्थानिक बाजारापासून सातासमुद्रापारही हा हापूस जातो. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी शेतकरी आंबा विक्रीसाठी बसलेले असतात. रत्नागिरीकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनात किंवा एसटीमध्ये हापूसची पेटी या दिवसात दिसतेच.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
जपान (En-us-Japan.ogg उच्चार (सहाय्य·माहिती))(जपानी- 日本) हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानी भाषेत “जपान” या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा (日本) (कांजी = चिनी / जपानी भाषेचे वर्ण) अर्थ “सूर्य उगम” असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.
संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.
मुंबई येथे प्रसिध्द आहे. या म्युझिअमसह कावसजी जहांगीर हॉल व गेट वे ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय ब्रिटीश वास्तुविशारदा जॉर्ज विटेट यांना जाते. या वास्तू पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत.
जगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti