(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • p-1758-Chandrapur-Tadoba

    ताडोबा व्याघ्र अभयारण्य, चंद्रपूर

    ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्हा चंद्रपूर येथे ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे.

    मुळच्या आदिवासी लोकांचा देव तारु आणि अंधारी नदी यामुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. बांबू ( गवत ), साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे ‘Land of the Tiger’ म्हणून ओळखले जाते.

    ताडोबा अभयारण्यातील मोठ्या प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते. या अभयारण्यात ४५ प्रकारचे सस्तन प्राणी ( Mammals ); २८० प्रकारचे पक्षी (Birds) ; ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes) ; २६ प्रकारचे कोळी (Spider) आणि ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptites) आढळतात.

  • माड्र्यू खोरे

    अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.

  • वाशिम जिल्हा

    वाशिम या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एका भागास जैन धर्मियांची काशी म्हटले जाते.

  • लातूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    स्वातंत्र्यपूर्व काळात होती लोकमान्य टिळक यांनी १८९१ मध्ये लातूर येथे सूत गिरणी सुरू केली होती. पुढे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, देवणी, अहमदपूर व मुरूड या ठिकाणी छोटे-मोठे उद्योग चालतात. उदगीर येथील दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.

  • रिला मठ

    बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली.

  • जुन्नर येथील महाजनांचा गणपती

    जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.

  • ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.

  • गंजगोलाई

    महाराष्ट्रातील लातूर शहराच्या हृदयस्थानी गंजगोलाई ही वर्तुळाकार बाजारपेठ आहे. तत्कालीन संरचनाकर फय्याजुद्दीन यांनी इ.स.१९१७ मध्ये या बाजारपेठेची स्थापना केली आहे. सोन्याच्या दागिण्यांसह बूट आणि विविध चैनींच्या वस्तूंची दुकाने या दोनमजली बाजारपेठेत आहेत. १६ रस्ते या बाजारपेठेला थेट मिळतात.

  • सिद्दीची राजधानी मुरुड-जंजिरा

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे तालुक्याचे ठिकाण आहे. १७ व्या शतकात व त्यानंतर सिद्दीच्या राजधानीचे शहर होते.