(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • परभणी जिल्ह्याचा इतिहास

    अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.

  • मोनार्च राखीव उद्यान

    मोनार्च राखीव उद्यान

    मेक्सिकोमधील मोनार्च राखीव उद्यानात फुलपाकरांच्या हजारो जाती आढळतात.

  • सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

    सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

    उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.

  • उल्लुरु

    ऑस्ट्रेलियातील उलुरु हा अखंड दगडाचा खांब असून याचा घेर सुमारे ९.४ कि.मी. इतका आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.

  • सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

    सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

    ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते.

  • चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास

    प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.

  • आर्मेनिया

    आर्मेनिया

    आर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    कळंब – कळंब हे या जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.अंतरावर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे.

  • मुंबईतील जुहू बीच

    मुंबईतील जुहू बीच

    जुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे.