महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता.
इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.
पंजाब राज्यातील अमृतसर शहरात जालियानवाला बाग आहे.
इंग्रजांच्या रौलेक्ट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर १३ एप्रिल १९१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. इंग्रज अधिकारी जनरल डायरच्या आदेशावरुन अचानक झालेल्या गोळीबारात एक हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. येथील विहिरीत १२० शव आढळले होते.
मालेगाव हे वाशिम जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील मालनेश्वर नावाचे महादेव मंदिर प्रसिद्ध असून, इ.स. ९१२ मध्ये बांधलेले हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्रेक्षणीय आहे.
इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत.
संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे.
इरिट्रिया हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
पँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत मोलाची आहे. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून महाराष्ट्राने मुंबई स्वत:कडे मिळवली.
जगप्रसिध्द अजंठा लेणी – सोयगांव तालुक्यात औरंगाबादपासून सुमारे १०० कि.मी अंतरावरील अजिंठा येथे जगप्रसिद्ध कोरीव लेणी आहेत. ही लेणी रंगीत भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे एकूण तीस लेणी असून, इ.स. पूर्व २०० ते इ.स. ६५० या काळादरम्यान ही लेणी खोदली गेली आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti