महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ठाणे जिल्ह्याचा इतिहास हा साधारणपणे चार टप्प्यांमध्ये विभागला जातो. पुरातन काळ-प्रागैतिहासिक काळापासून ते इ.स. १३०० पर्यंत, मुस्लीम राजवटीचा काळ (इ.स. १३०० ते १६६०), मराठ्यांचा काळ (इ.स.१६६०-१८००) व ब्रिटिश काळ (इ.स. १८८०- १९४७). प्राचीन काळापासून येथील सोपारा, कल्याण, ठाणे व संजन ही बंदरे महत्त्वाची आहेत. बौद्ध लिखाणांप्रमाणे सोपारा हे राजधानीचे शहर होते व गौतम बुध्दांच्या काळात व्यापाराचेही प्रमुख ठिकाण होते.
विदर्भातील अमरावती शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे.
रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर. श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
दक्षिण पश्चिम कर्नाटकातील मंगलोर हे एक प्रमुख शहर आहे. हे शहर नेञावती व गुरपूर या नद्यांच्या मधोमध वसलेले असून ,अरबी समुद्रावरचे एक मोठे बंदर आहे.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे.
अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.
उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti