महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
गणेशदुर्ग किल्ला – कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. तेथे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी १८४४ साली बांधलेले गणेशमंदिर असून याच मंदिरात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात बैठक झाली होती.
साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर शहरात सेल्युलर जेल आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना येथे बंदी म्हणून ठेवण्यात येत असे.
माजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे.
अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अर्थात स्वातंत्र्य देवतेचा.. आकर्षक पुतळा उभारण्यात आला आहे.
दक्षिण कोरिया हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना अशा तीन योजनांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे सध्या अंमलबजावणी केली जात आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा स्थित असून महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे.आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागात असणार्या लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ७,१५७ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी, उत्तर व पूर्वेस नांदेड, पूर्वेस व आग्नेयेस बिदर (कर्नाटक), दक्षिण व पश्र्चिमेला उस्मानाबाद, वायव्येला बीड हे जिल्हे लातूरला जोडून आहेत.
श्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti