महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.
राज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे.
गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.
थायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย, राच्च आनाचक थाय, अर्थ: राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.
अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.
डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून ते “महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी” म्हनून ख्यातनाम आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात.
म्यानमारमधील यांगून येथिल श्वेडेगॉन पॅगोडा किंवा गोल्डन पॅगोडा हा २५०० वर्षे जुना आहे. सहाव्या ते दहाव्या शतकात याची उभारणी झाली आहे.
बिदर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला कर्नाटकाचा मुकूट असेही म्हणतात.
बिदर शहराला बहामनी काळापासूनच इतिहास आहे. येथील महमूद गवान अरेबिक विद्यापीठ, बिदरचा ऐतिहासिक किल्ला, पापनाश शिवमंदिर, नानक जिरासाहेब गुरुव्दारा, सिध्दारुढ मठ, रंगीत महाल, हजरत खलिउल्लाहची चौखडी ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.
बिदरच्या जवळून वाहणार्या मंजिरा नदीतून या शहराला पाणीपुरवठा केला जातो. देशातील सर्वात स्वच्छ २२ शहराच्या यादीत बिदरचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ९ आणि २१८ या शहराजवळून जातात.
ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके होत.
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढल्यामुळे येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडेल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ऍट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे,हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti