महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
वाशिम या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एका भागास जैन धर्मियांची काशी म्हटले जाते.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे.
एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून या विद्यापीठास एकूण १३६ महाविद्यालये संलग्न आहेत.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले. पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.
ग्वातेमालाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.
ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून स्पेनच्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक हुकुमशहांनी सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.
मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. यांचे चरित्र गणेश भक्तांनी अवश्य वाचावे.) मोरया गोसावींनी इस. १६५५ मध्ये येथेच जिवंत समाधी घेतली.
संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे.
चेन्नई हे तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे शहर असून, दक्षिणेतील मोठे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. चेन्नई हे देशातील पाचवे मोठे शहर असून, तिसरे मोठे बंदर आहे.
मुंबादेवी याच देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई असे नाव पडले. या देवीचे मंदिर मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईत आहे.
श्री बाबुलनाथ मंदिर मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ मंदिर तेथील शंकराच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti