महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदर्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत.
कोयना धरण जलसंधारणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने १९५६ साली कोयना धरणाच्या कामाला प्रारंभ केला.
१९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्णत्वास आले.
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाची उंची १०३.९ मी व लांबी ८०७.१ मी एवढी आहे.
हे देशातील प्रमुख धरण मानले जाते
मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत.
धुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली.
लेबेनॉनचे प्रजासत्ताक हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
ग्वातेमालाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.
ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून स्पेनच्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक हुकुमशहांनी सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.
विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.
भंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात.
Copyright © 2025 | Marathisrushti