महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटीश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.
कोकण विकासाच्या ४० कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या ३२ व्या कलमानुसार दापोली येथे १ नोव्हेंबर १९९६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे.
हवाई बेटावरील हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी असून याचा लावारस ७५ हजार क्युबिक किलोमीटरपर्यंत पसरला आहे. संशोधकांच्या मते हा ज्वालामुखी ७ लाख वर्षे जुना असावा असे मानतात.
लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत.
लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते.
सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.
अर्मेनियामधील हॅगपट आणि सानाहीन या ख्रिश्चन मठांची स्थापना १० ते १३ व्या शतकादरम्यान झाली आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti