महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जळकोट हे लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक छोटे शहर आहे. या शहरातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तीन हिरव्यागार डोंगरांनी हे शहर वेढलेले असून हिवाळ्यात व पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते.
संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेल्या यक्षगान या नृत्यप्रकाराचे अंकोला हे माहेरघर आहे. त्याचबरोबर येथील सुग्गी हा नृत्यप्रकारही कर्नाटकात विशेष प्रसिध्द असून, प्रत्येक वर्षी बुध्दपौर्णिमेला येथे बांदीहब्ब नावाचा वार्षिक महोत्सव असतो. तो प्रेक्षणीय असतो.
या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात.
घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन् त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बर्याचशा ठिकाणी नागरी भागातील माणसांची पावले पोहोचलेली नाहीत.
नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट. इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले.
मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे.
ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले.
चीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.
हासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.
गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.
Copyright © 2025 | Marathisrushti