महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे.
नांदगावचा सिद्धीविनायक हे स्वयंभू दैवत ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी स्थापले हे एक जागृत व नवसाला पावणारे दैवत मानले जाते. हे मंदिर चौदाव्या शतकापासून प्रख्यात असून भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी येथील भेटीच्या वेळी या इतिहास प्रसिद्ध दैवताचे दर्शन घेतले होते.
चेन्नई हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर असून, येथील संगीत महोत्सवात शेकडो कलाकार आपली कला सादर करतात. भरतनाट्यम या प्रसिध्द नृत्यप्रकाराचे हे एकमहत्त्वाचे केंद्र आहे.
मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक असून १८९९-१९०० या काळात हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.
अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट लेक चर्च हे सर्वांत मोठे एलडीएस चर्च आहे. या चर्चचे बांधकाम पूर्ण करण्यास सुमारे ४० वर्षे लागली.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे.
कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली
हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
Copyright © 2025 | Marathisrushti