महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे.
डोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात.
ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते.
अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रिलायन्स विमानतळ विकासक प्रा.लि. ला १५ वर्षांच्या भाडे कराराने विकास, सुधारणा, कार्यान्वयन, व्यवस्थापन व देखरेख करण्यासाठी नोव्हेंबर २००९ पासून नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती ही पाच विमानतळे दिलेली आहेत.
प्राचीन काळापासून भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे आहेत.येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.
कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले
नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.
हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
कारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti