महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.
आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट उंचीवर हे शहर असून धनसिरी नावाच्या नदीच्या किनार्यावर ते वसलेले आहे.
गोलाघाट शहरातील साहित्यिक इतिहास -
गोलाघाट साहित्य सभा ही आसाम साहित्य सभेची सर्वांत जुनी शाखा असून, १९१८ साली तिची स्थापना झालेली आहे. अनेक नामवंत साहित्यिक या सभेचे सभासद आहेत. या शहरात राज्यातील सर्वात जुने रेल्वेस्थानक असून, देशाच्या स्वतंत्र्यसंग्रामात येथील अनेक देशभक्तांनी योगदान दिले आहे.
आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे.
आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांदरम्यान असलेल्या अँडोराला इ.स. ८०३ मध्ये चेरीमेन्गे याने मुस्लिमांपासून मुक्त केले. १२७८ मध्ये अँडोरावर अर्जेलचे बिशप व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांचे संयुक्त शासन होते. ही शासनपध्दती १९९३ पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर अँडोराच्या मतदारांनी निवडलेल्या अँडोरियन जनरल कौन्सिलकडे सत्ता हस्तांतरित करण्यात आली. मेंढीपालन हा या देशाचा मुख्य व्यवसाय असून, राष्ट्रीय अर्थकारण या व्यवसायावरच अवलंबून आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : आंदोरा ला व्हेया
अधिकृत भाषा : कातालान
राष्ट्रीय चलन : युरो
देश : अॅंडोरा
राजधानी : अॅंडोरा ला वेला
चलन : युरोपियन युरो
Country : Andorra
Capital city : Andorra la Vella
Currency : European euro
Calling code : 376
Country Domain : .ad
( Source : Wikipedia )
औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे
ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.
फिलिपाईन्स हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
चिकमंगळूर हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे शहर असून मलयगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर इथल्या कॉफीमळ्यासाठी प्रसिध्द आहे. चिकमंगळूर हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. मंगलोर विमानतळ आहे. रेल्वे व रस्ते मार्गाने हे शहर देशाशी जोडलेले आहे.
पर्यटकांचे आवडते शहर
चिकमगला उरु या कन्नड शब्दापासून चिकमंगळूर हे नाव पडलेले आहे. याचा अर्थ मोठ्या मुलीचे शहर असा होतो. उन्हाळ्यातही इथले हवामान आल्हाददायक असल्याने पर्यटकही इथे मोठ्या संख्येने येतात. सुप्रसिध्द हेबे धबधबा इथून जवळ आहे.
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
कोयना धरण जलसंधारणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने १९५६ साली कोयना धरणाच्या कामाला प्रारंभ केला.
१९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्णत्वास आले.
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाची उंची १०३.९ मी व लांबी ८०७.१ मी एवढी आहे.
हे देशातील प्रमुख धरण मानले जाते
Copyright © 2025 | Marathisrushti