महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.
गॅबनचे प्रजासत्ताक हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला काँगोचे प्रजासत्ताक, ईशान्येला इक्वेटोरियल गिनी व उत्तरेला कामेरून हे देश, तर पश्चिमेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. लिब्रेव्हिल ही गॅबनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
संग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो.
भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले.
पुडुकोट्टई हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. वेलार नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून, तिरुचिरापल्लीपासून ५५ किलोमीटरवर आहे.
भारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.
सापांचे प्रदर्शन केरळ राज्यातील कन्नूर शहरात प्रसिद्ध सर्प उद्यान आहे. येथे प्रत्येक तासाला सापांचे प्रदर्शन भरविण्यात येते.
सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.
गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात.
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.
Copyright © 2025 | Marathisrushti