महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो.
आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.
अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.
बोर अभयारण्य हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तेरे खोलची खाडी हे राज्याचे अगदी दक्षिणेकडील टोक असून,या खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्ये जोडली गेली आहेत. मुंबई-पणजी-कोची (म्हणजेच मुंबई – गोवा) हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ या जिल्ह्यातून गेला आहे.
कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे.
येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. येथील पेशवेकालीन बालाजी मंदिर व त्याजवळील देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. ३०० वर्षांचे जुने असे हे बालाजी मंदिर आहे.
शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.
जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे.
येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर प्रसिध्द आहेत. या शहरात मराठीसोबतच अहिराणी बोलीही बोलली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे. निवती किल्ल्यावरुन मालवण ते वेंगुर्ले असा किनारा दृष्टीपथात येत असल्यामुळे खूप दूर अंतरापर्यंत टेहाळणी करण्यासाठी निवती किल्ला महत्त्वाचा होता.
नागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti