महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे
मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
मध्येप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने ४ पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इटियाडोह धरण व नवेगाव राष्टीय उद्यान या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड.
कन्नूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत.
मंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता.
अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.
सतत ओला व कोरडा ॠतू आलटून पालटून असणा-या व २००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. ही मृदा दक्षिण महाराष्ट्रातील कोकण परिसरात, कोल्हापूरचा प. भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात आढळते. ही मृदा फळबागांसाठी उपयुक्त आहे.
लोह, जस्त व अॅल्युमिनीअमचे प्रमाण अधिक असल्याने या मृदेचा रंग लाल असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti