आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर्स तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्गाला मारहाण होण्याचे प्रकार अलीकडील काळात खूप वाढले आहेत. या घटना बहुधा सरकारी इस्पितळाच्या संदर्भातच असतात. अशी एखादी घटना घडली की लगेच त्या इस्पितळात असतील नसतील तेवढे सगळे कर्मचारी काम बंद आंदोलन करतात.
ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.
लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही.
सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.
महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अतिशय स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे बोलले जाते. सिंचन योजनांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, असे लक्षात येताच आपल्याच सरकारच्या कामकाजावर श्वेतपत्रिका काढण्याचे त्यांनी ठरविले आहे. गेल्या दहा वर्षांत सिंचन योजनांवर खर्च झालेले ७० हजार कोटी नेमके कुठे गेले, असा प्रश्न त्यांना पडला आहे. असाच प्रश्न टोलच्या संदर्भातही उपस्थित होऊ पाहत आहे. राज्यात बीओटी तत्त्वावर बांधलेल्या रस्त्यांसाठी एकूण किती खर्च आला असता आणि बीओटीमध्ये तो किती मंजूर करण्यात आला; बी.ओ.टी. कंत्राटदाराने त्यापैकी किती वसूल केला आणि अजून किती वसूल होणे अपेक्षित आहे, याची समग्र माहिती त्यांनी राज्यातील जनतेसमोर श्वेतपत्रिकेद्वारे ठेवावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ
एकीकडे कमालीचे क्रौर्य, अतिशय दुष्टपणा! तर दुसरीकडे मानवतेचा, माणुसकीचा अथांग सागर ! दोन अगदी विरुध्ध टोकांच्या मनोवृत्ती ! आणि त्याचे होणारे नकारात्मक व सकारात्मक परिणाम ! केवळ एक महिन्याच्या अंतराने या दोन्हीचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली पुण्यातील एका महिलेला, एका गृहिणीला. त्या गृहिणीचे नांव आहे सौ.वर्षा जयकुमार परांजपे.
सप्टेंबर महिन्यात वर्षा ताईना युरुपमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यांची ही युरोप ट्रीप जरा हटके होती . या ट्रीपमध्ये नेहमीची स्थळे न पाहता काही वेगळी स्थळे पाहायला मिळाली . या मध्ये त्यांच्या लक्षात राहिले ते 'क्राकौव ' हे शहर !
दुसरया महायुध्धामध्ये जर्मनीच्या हिटलरने ज्यू लोकांसाठी ज्या छळ छावण्या किंवा कॉन्संत्रेषण कॅम्पस उभे केले होते त्यातील सर्वात मोठा कॅम्प या शहरात होता . येथे हजोरो ज्यू वंशीय लोकांना धाक दाखवून, कपट मार्गाने, प्रलोभने दाखवून आणले गेले. तिथे त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला . मानवतेला काळिमा फासणारे निर्घृण अत्याचार करण्यात आले . अनेक महिलांच्या , मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले. आणि हे कमी पडले कि काय म्हणून हजारो ज्यूंची ग्यास चेम्बरमध्ये घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या मृत व्यक्तींच्या अनेक वस्तू -जसे ब्यागा, बूट , चप्पल ,कपडे, कागदपत्रे , फोटो, स्त्रियांचे कापलेले केस, अवयव - या वस्तू पुरावे म्हणून जपून ठेवलेले आहेत. हे सगळे बघून, माणूस क्रूरपणा मध्ये , दुष्टपणा मध्ये, निर्दय पणामध्ये किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे बघून वर्षाताई पार हादरून गेल्या. त्यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला. माणूस हा एक क्रूर आणि दुष्ट प्राणी आहे. आणि अशा या दुष्ट प्राणाच्या कुळात आपला जन्म झाला याची त्यांना लाज वाटली आणि त्यांची मान शरमेने खाली गेली.
त्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांना आनंदवनला भेट देण्याची संधी मिळाली.तेथे त्यांना दिसला तो माणुसकीचा, प्रेमाचा, मानवतेचा अथांग सागर. समाजाने हाकून दिलेल्या, वाळीत टाकलेल्या कुष्ठ रोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे व त्यांच्या परिवाराने जे कष्ट घेतले आहेत व तेथे नंदनवन निर्माण केले आहे ते बघून त्या स्मिमित झाल्या. तिथे त्यांना दिसला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, दया, त्याग आणि आत्मसम्मान ! एक साधी माणुसकी काय चमत्कार करू शकते हे त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळाले. हे बघून मनुष्य हा नुसताच दुष्ट प्राणी नसून तो प्रेमळ व सहृदयी प्राणी पण आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यांचा माणसावरील उडालेला विश्वास परत बसला. आणि अशा या प्रेमळ प्राण्याच्या वंशात आपला जन्म झाला या बद्दल त्यांना अभिमान वाटला. हा एका परीने माणुसकीने कृरपनावर मिळवलेला विजयच आहे असे त्यांचे मत आहे.
क्रूरपणा आणि माणुसकी यांच्या लढाईत नेहमी मानुसकीचाच विजय होत आला आहे. जर्मनीचा हिटलर सर्व सत्ताधीश होता. त्याच्याकडे सत्ता होती,संपत्ती होती, सैन्य होते. पण आज तो विस्मृतीच्या मागे गेला आहे. आज त्याची आठवण पण होत नाही. आणि झालीच तर त्याच्या दुष्टपणामुळे होते. त्या उलट बाबा आमटे एका सामान्य घरातून आलेले. ना त्याच्याकडे कोठल्या सत्तेचे बळ किंवा संपत्तीचे पाठबळ! ते कुठ्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते कि मंत्री, खासदार, आमदार नव्हते. कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा सहकारी ब्यांकेचे अध्यक्ष नव्हते. उच्च सरकारी अधिकारी नव्हते कि कुठल्या खाजगी उद्योग समूहाचे MD किंवा CEO नव्हते. पण ते दीर्घकाळ लक्षात राहतील ते त्यांच्या कार्यामुळे. वर्षा ताई यांच्या लक्षात नेमकी हीच गोष्ट आली आहे. आपले सर्व साधू संत, सर्व धर्म ग्रंथ, रामायण महाभारतासारख्या कथा, भगवत गीता, बायबल, कुराण पण हेच सांगत आले आहेत.
माणसांवर दोन मार्गांनी विजय मिळविता येतो! क्रूरपणा करून, दुष्टपणा करून, निर्दयपणे, लांड्या -लबाड्या करून, सत्तेचा दुरुपयोग करून माणसांवर विजय मिळविता येतो. पण हा विजय फार काळ टिकत नसतो. तो अल्पजीवी असतो. या पद्धतीने विजय मिळविणारी माणसे फार काळ लोकांच्या लक्षात राहत नाहीत. अशी माणसे लवकरच विस्मृतीच्या पडद्याआड जातात.लोकांना त्यांची आठवण सुध्धा येत नाही!
माणुसकीने, मानवतेने, प्रेमाने, आपुलकीने, त्यागाने, इतरांचा सन्मान करून पण माणसे जोडता येतात. या पद्धतीने मिळविलेला विजय हा दीर्घकाळ टिकणारा असतो. लोकांना अशा माणसांची नेहमी आठवण येत असते.
आपण कसे वागायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवायचे असते. निर्दयपणा करून व दुष्टपणा करून अल्प कालीन टिकणारा विजय मिळवायचा? कि माणुसकीने व प्रेमाने वागून दीर्घकाळ टिकणारा विजय मिळवायचा? आपल्या मृत्युनंतर लोकांनी आपल्याला काही तासातच विसरून जावे? का निदान काही दिवस तरी आपले नाव लोकांनी लक्ष्यात ठेवावे ? तुम्हाला काय हवे हे तुम्हीच ठरवायचे! बिकौस द चोइस इस युअर्स!
उल्हास हरी जोशी
May 17, 2011
‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते.
प्रकाशन दिनांक :- 10/10/2004
कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti