(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • यथा प्रजा तथा राजा!

    र्ीपूर्वीच्या काळात एखाद्या राज्याची ओळख त्या राज्याच्या राजावरून ठरायची. राजा नीातिवान, धर्मपरायण असेल तर प्रजाही नीतिवान, धर्मपरायण असायची आणि तशीच त्या राज्याची ओळख असायची. राज्य कसे आहे, हे राजा कसा आहे यावरून ठरायचे.

  • मेक इन इंडिया, स्थलांतर आणि भारतातील सरकारी कंपन्या !!!!

    ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी शोधायलाच हवे.एकेकाळी या दोन्ही कंपन्या ''उत्तम'' या सदरात मोडत होत्या.पण या कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण लक्षणीय घसरण्याचे कारण काय ? सरकारी अनास्था आणि खासगी कंपन्यांचे भले करण्याची मागील सरकारची परंपरा पुढे चालत राहणार असेल तर संपूर्ण देशाचेच खासगीकरण होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असेच म्हणावे लागेल.एकेकाळी या देशात ऐअर इंडिया हि कंपनी अत्यंत अभिमानाची कंपनी होती.सरकारनी हि कंपनी चालवायला घेतली आणि या कंपनीचा पद्धतशीर ऱ्हास सुरु झाला.ऐअर इंडिया कधीही बंद पडेल अशी परिस्थिती कोणी आणली ? सरकारी कंपन्यां वर संचालकांची नेमणूक कशी होते हे नव्याने सांगायला नको.

    ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका आणलेल्या रशिया मध्ये याच openness आणि restructuring चा परिणाम चांगला झाला हे सर्वांना माहित आहेच पण कुठलीही गोष्ट देशात लागू करताना लोकांच्या फायद्या पेक्षा संधी साधू लोकांचा फायदा आधीक होतो यासाठी राजकीय आत्मबल फार महत्वाचे आहे.मोदी सरकारने हे आत्मबल जनतेला दाखवून देणे गरजेचे आहे.नाहीतर भा ज पा चे नुकसान होईलच पण देशात न भूतो न भविष्यति इतका गोंधळ उडेल.

    विरोधी पक्षांचा वकूब चांगला नसेल तर त्यांना चागल्या कामात खीळ घालायला आवडते पण चागले काम करून दाखवता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.मेक इन इंडिया करताना ग्रामीण भागापासून सुरवात करावी हि मागणी लावून धरली पाहिजे.

    ग्रामीण रोजगार , शेती, ग्रामीण भागातील infrastructure हे कमालीचे मागासलेले असताना मेक इन इंडिया मध्ये ग्रामीण भागाकडे खूप मोठा निधी वळवला पाहिजे स्थलांतर थाबले तर प्रश्न कमी होतात हे जागतिक सत्य आहे.ग्रामीण भागातून स्थलांतर थाबले नाही तर उद्या आकाशात जरी शहरे बांधली तरी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत .

    मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी ची सुरवात ग्रामीण विकासा पासून करा अख्खा देश "स्मार्ट" बनेल .

    -- चिंतामणी कारखानीस

  • डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?

    लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्‍या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ?

    मला तर वाटत फक्त डेटींगचा आनंद उपभोगलेला असतो. सध्या बहुसंख्य तरुण- तरुणी आपला जोडीदार स्वतः शोधण्यासाठी, मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना हवा तसा जोडीदार जवळ्पास सहज नाही सापडला की ही लोक या लग्न जुळविणार्‍या मंडळांची, संस्थांची अथवा वेबसाईटची मदत घेतात. पालकही आपला वेळ आणि इगो सांभाळण्यासाठी व आपल्या नातेवाईकंची मदत घेण्यापेक्षा हे सोयीचे आहे म्ह्णून लग्न जुळविणार्‍या या माध्यमांची मदत घेतात. या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी लग्नासाठी इच्छुक तरुण- तरुणींची भेट घडवून आणली जाते ज्यामुळे विषमलिंगी व्यक्तीच्या सहवासासाठी आसुसलेली ही लोक या माध्यमातून तो सहवास मिळवून आनांदी होतात, मग तो सहवास आणखी व्यक्तींकडून मिळविण्याची हुक्की त्यांच्या मनात निर्माण होते. त्यामुळेच या अशा लोकांची लग्न जुळवणे या माध्यमांना वर्षानुवर्षे शक्य होत नाही. पण त्यातही त्यांचे नुकसान होत नाही उलट फायदाच होतो त्यामुळे ते ही या गोष्टीकडे सोयिस्करपणे कानाडोळा करतात.

    लग्न जुळविणार्‍या माध्यमातून तरूण- तरुणी चर्चेसाठी भेटतात तेंव्हा त्यांच्यात चर्चा होतात, गप्पा- गोष्टी होतात तेव्हा आजची ओपन माईंडेड असलेली पिढी समोरच्यासमोर कोणताही आडपडदा न ठेवता आपलं हृद्य अगदी खोलून ठेवते. त्यांच्या या मोकळेपणाचा फायदा घेणारेही कमी नसतात. त्यामुळे लग्नासाठीची बोलणी राहतात बाजूला आणि एक वेगळ्याप्रकारचे नातेसंबंध निर्माण व्हायला सुरूवात होते. हे नातेसंबंध नैतिकतेच्या सिमा ओलांडण्यापलिकडेही जाऊ शकतात. एकमेकांना समजून घेण्याच्या नावाखाली सहा-सहा महिने मोबाईल, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कींग साईट्सच्या माध्यमातून चॅटींग करत राहतात अगदी मोकळेपणाने खुलेआम. सहा-महिन्याच्या चॅटींग – डेटींग नंतर पत्रिका जुळत नाही, विचार जुळत नाही अथवा लाईफ स्टाईल जुळत नाही अशी फालतू कारणे देऊन हा कार्याक्रम आटोपता घेतला जातो. पालकांना वाटत राहत आपल्या मुलांची लग्ने जुळत नाही पण मुळात त्यांच्या त्या मुलांना लग्न जुळविण्यात फारसा रस नसतो त्यांना रस असतो त्या माध्यमातून मिळणार्‍या डेटींगचा आनंद घेण्यात.

    सर्वच लग्न जुळविणारी मंडळे, संस्था, वेबसाईट्स लग्न जुळविण्याचा फक्त व्यावसाय करतात असं नाही म्ह्णता येणार पण काय असतं सुक्या बरोबर कधी- कधी ओलं ही जळत. लग्न जुळण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला आपल्या बद्दल किती माहिती द्यावी याचाही विचार व्हायला हवा. लग्न जुळविणार्‍या माध्यमांचाही ते ज्यांची लग्ने जुळवत आहेत त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष असायला हवे कारण मनापासून लग्न करण्यास इच्छुक असणार्‍या तरूण- तरूणींच्या मनावर या विनाकारण मिळालेल्या नकाराचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लग्न जुळविण्यासाठी किती भेटींची गरज आहे हे अगोदरच निश्चित करायला हवे. फालतू कारणे देऊन जर कोणी लग्नासाठी नकार देत असेल तर अशांना बाजुला सारायला हवे.

    लग्न जुळविणारी मंडळे, संस्था, वेबसाईट्स, लोकांना सहाय्यकच होत आहेत. पण त्यांना ही सामाजिक भान असायला हवे बदलत्या परिस्थितीचा आणि मानसिकतेचा विचार करता सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी काही ठोस पावले उचलायला हवीत. नाहीतर काही दिवसांनी त्यांनाच प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही की आपली ही लग्न जुळविणारी माध्यमे डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?

    -- निलेश बामणे,

    202 / बी, जलधारा एस.आर.ए.गृहनिर्माण संस्था मर्यादीत, ओमकार डेव्हलपर्स, गणेश मंदीर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.

    मो. 8652065375

  • वर्तमानकाळ म्हणजे काय?

    जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्‍या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे.

  • अधिवेशन उत्तरासाठी,मोर्चाकरिता नव्हे !

    नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून संपले. दरवर्षीची परंपरा याही वर्षी पाळल्या गेली. विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा वार्षिक सोहळा यापलीकडे नागपूर अधिवेशनाला आता महत्त्व उरलेले नाही.

  • मानसिक विकृतीचे लक्षण…!

    राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे.

  • एकांत आणि आकांत

    अनुबंध म्हणू की पाश

    इच्छाच त्या हताश

    कच्च्याच वासनांचा

    पिकल्याविना विनाश

  • कलंक ‘गुन्हेगारीचा’ झडो..!

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    …. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना निलंबित केले वा उमेदवारीच दिली नाही, किंव्हा जनतेने अशाना निवडूनच दिले नाही तर सुंठीवाचून खोकला जाईल. पण, ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात’ अशी मानसिकता सर्वांचीच झाली असेल तर राजकारणाला लागलेला गुन्हेगारीचा कलंक दूर होईल कसा?

  • महागडा गरीब देश!

    प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
    भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते.

  • निष्ठेची किमत!

    जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणाऱ्या लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.