जेव्हा-जेव्हा विकासाबद्दल चर्चा होते, मग तो एखाद्या खेड्याचा असो अथवा एखाद्या देशाचा प्रत्येक वेळी उपलब्ध साधनसंपत्ती, दळणवळणाच्या सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचाच प्रामुख्याने उल्लेख होतो. अर्थात विकासाच्या संदर्भात या सगळ््या गोष्टींचे महत्त्व नाकारता येत नाहीच; परंतु यापेक्षाही अधिक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाची मानसिकता! ही मानसिकता असेल तर साधनसंपत्तीची उपलब्धता नसणे ही अडचण ठरत नाही आणि ही मानसिकता नसेल तर कितीही अनुकूल परिस्थिती असली तरी विकासाच्या केवळ गप्पाच होऊ शकतात.

कृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकऱ्यांना संकटात आणलं. घरे, शेती, गाई-गुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशावेळी घाबरायला हवा होता. पण कृष्णच तो…तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली केली आणि ते काही बोलण्याआधीच कोसळणाऱ्या मुसळधार पावसावर मी उपाय सांगतो असे आश्वासन दिले. मी युक्ती करतो असा धीर दिला.
युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच ‘केजीबी’चा सदस्य.
कोणत्याही विषयावर आपल्या मनातलं लिहा आणि किमान ४ लाख मराठी माणसांपर्यंत पोहोचा.
संगमनेरच्या पूलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. या पूलाचे आत्मवृत्त!
क्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत. या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी.
मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, ‘एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?’ विषय ‘मी का लिहितो?’ मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, ‘तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?’ ‘लिहिणं’ ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे.
आज मराठी सृष्टीवर श्री. जयवंत वानखडे ( रहाणार : कोपरना) यांची एक सुंदर गझल (गज़ल) वाचली. कोपरना महाराष्टात कुठे आहे, मला माहीत नाहीं.( हा हन्त हन्त !) . मात्र तें, मंबई-पुणे-नागपुर-कोल्हापुर-सोलापुर-नाशिक-औरंगाबाद-रत्नागिरी वगैरेंसारखे नाहीं, हें मात्र मला कळतें आहे. वानखडे प्रोफेशननें कवी नाहींत. ते शाळेचे मुख्याध्यापक होते. हें सर्व लिहिण्यांचें कारण की, मनाला भिडेल असें कांहींहीं लिहायला व्यवसाय, निवासाचें गांव/शहर अशा गोष्टी आड येत नाहींत.
- मराठी सृष्टीच्या वाचकांनी मूळ गझल वाचावी. तसें तर, सुंदर बांधलेल्या गझला बरेच जण लिहितात, ( हें मी एक गझलप्रेमी व गझलगो म्हणुन सांगत आहे). पण त्यांतही, एखादा शेर मनाला असा भिडतो की, ‘वाह् क्या बात है!’ असा उद्गार काढणेंही आपण विसरून जातो. इथें माजें तेंच झालें.
- वानखडे यांच्या गझलचा अंतिम शेर पहा -
‘भूकेस शरण गेली आज माय कोणी
ओट्यात (ओच्यात ?) दडवलेले पाव पाहिले मी’ .
एक आई आपल्या भुकेल्या कच्चा-बच्चांसाठी, कुणीतरी तिला दिलेले , किंवा कुणीतरी फेकून दिलेले, किंवा तिनें चोरलेले, पाव दडवून नेते आहे ! चोरले असतील तर, तौ ते पाव दडवणारच. पण चोरले बसले, आणि तरीही ती दडवत असली तर तें अधिकच करुण आहे, कारण तिला त्याची स्वत:लाच लाज वाटते आहे . रस्त्यात किंवा कचर्यात कुणीतरी अर्धवट खाऊन फेकलेले पाव, किंवा बुसटलेले म्हणून कुणीतरी फेकून दिलेले पाव नेणें, हें लज्जास्पसदच की ! गरिबांनाही अब्रू असतेच ! फक्त , ती त्यांना गुंडाळून बाजूला ठेवावी लागते,केवळ नाइलाजानें.
- भारतातील बहुतांशी अस्तित्वात असलेल्या या ‘कुरूप सत्या’चें ( अग्ली ट्रुथ) वानखडे यांनी अल्प शब्दांमध्ये अगदी तथार्थ दर्शन घडवलें आहे.
- आपण सिनेमात अशी दृश्यें पाहतो , की एका कुणीतरी ( सहसा लहान मुलानें किंवा मुलीने, किंवा आई किंवा बापानें, ) एक पाव चोरला, मग मार खाल्ला , वगैरे वगैरे. त्यावेळी आपण तें दृश्य पाहतो, आणि नंतर विसरूनही जातो, कारण सिनेमा हा केवळ कल्पनेचा खेळ आहे ! मात्र, वानखडे यांनी केलेला उल्लेख वाचला तर स्पष्ट जाणीव होते की हें, आणि केवळ हेंच, आपल्या देशातले सत्य आहे!
आज आय्. टी. वगैरेंमुळे मध्यमवर्गीयांना भरपूर पगार मिळताहेत ( अर्थात, माझी त्याबद्दल अजिबात तक्रार नाहींच ), पण होतें काय की , त्यामुळे, देशातील अन्यांच्या दैन्यावस्थेकडे आपलें दुर्लक्ष तर होत नाहीं ना ? अशा वेळी वानखडे यांचा शेर आपल्याला अंतर्मुख करतो; मला केलें, तुम्हांलाही करेल.
- या प्रसंगीं मला असाच एक शेर आठवला, जो मी बर्याच वर्षांपूर्वी वाचला होता, हृदयाला भिडला होता, व आजही तो माझ्या मनावर परिणाम करतो. श्री. अनिल कांबळे यांच्या एका गझलमधील तो शेर असा आहे -
‘खोकल्यानें बाप मेला, माय आजारात गेली
घेउनी देहास आपल्या, लेक बाजारात गेली’
किती विदारक सत्य ! नेकेड-अग्ली ट्रुथ !
- अखेरीस : ‘सोशली सिग्निफिकंट’ शेरासाठी वानखडे यांचे अभिनंदन आनि आभारही.
-- सुभाष स. नाईक,
मुंबई, पुणें.
९८६९००२१२६
काही खेडेगाव कायमस्वरूपी स्वच्छ झालेली आहेत, तर आजही काही खेडेगावात 20% च्या आसपास लोक उगड्यावर संडासला बसत आहेत. ज्या खेड्यातले थोडेही लोक रस्त्यावर संडासला बसतात, हा तेथील सुशिक्षित लोकांचाच अपमान आहे, असे मला वाटते कारण उगड्यावर बसणाऱ्यांंना मानपान, ज्ञान मुळातच नसते, त्यामुळेच हा अपमान अशिक्षीतांचा नसून सुशिक्षितांंचाच आहे असे वाटते.
ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घ्यायला साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे; परंतु त्यांनी जाताना आपल्या ज्या काही बऱ्या वाईट स्मृती इथे ठेवल्या त्यांचे ठसठशीत अस्तित्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवते. अशा अनेक स्मृतींपैकी एक म्हणजे त्यांनी या देशात रूढ केलेली प्रशासकीय व्यवस्था. ब्रिटन हा मुळातच भारताच्या तुलनेत एक चिमुकला देश, त्यामुळे खंडप्राय भारतावर हुकूमत गाजवायची असेल तर राज्यकर्त्यांना पूरक ठरणारी, मदत करणारी व्यवस्था इथल्या लोकांनाच हाताशी धरून उभी करणे त्यांना भाग होते.
Copyright © 2025 | Marathisrushti