(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बागुलबुवा महागाईचा

    ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.

  • मॅचिंग..

    त्याने किंवा तिने सांगितले
    कपडे शिवताना चार मास्क पण शिवा
    शिंपी म्हणाला ते तर आम्ही देतोच ?
    मला त्या कपडे शिवून घेणाऱ्याची कीव आली.
    खरे तर योग्य ती काळजी परखडपणे घेतली पाहिजे.
    मास्क घालणे ही नियतीने आपल्याला मजबूर केले आहे, इतके तरी समजून घ्या
    गुलामीचा, असाह्यतेचा देखील उत्सव ?
    आज आपण आपल्या वृत्ती भयानक वळणावर नेऊन ठेवल्या आहेत.
    कुणाला विचारले , ' कसे आहात '
    उत्तर येते , ' मजेत '
    मास्कआडून बोलतो
    तेव्हा माणूस सहनशील मजबूर आहे
    हे समजले...आणि हसू येते
    जणू काहीच चिंता नाही
    सर्व काही आलबेल,
    विचारले तर म्हणतो
    पॉझिटीव्ह रहावे ?
    त्याच्या या पण ' मॅचिंग ' चे ....
    कौतुक ? वाटते..
    -- सतीश चाफेकर.
  • आनंदाची अनुभूती

    सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.

  • कुणा मुखी पडते लोणी…!

    भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आपल्या घटनेतच तसे लिहिले आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्तेची सूत्र प्रजेच्या हाती असलेले. सोबतच आपल्या घटनेने प्रत्येक नागरिकाला समान वागणूक, समान दर्जा आणि समान अधिकार देण्याचे आश्वासन दिलेले आहे. घटनेच्या या मार्गदर्शक तत्त्वानुसार किंवा घटनेशी बांधीलकी राखूनच देशाचा कारभार चालत असतो, किमान तसे सांगितले तरी जाते.

  • कुंवारा प्रदेश!

    प्रत्येक प्रदेशाची आपली एक ओळख असते. ही ओळख त्या प्रदेशाचे भौगोलिक स्वरूप, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती, लोकांचे राहणीमान आणि अर्थातच काही वैशिष्ट्यांमुळे निर्माण होत असते. अर्थात प्रत्येकवेळी ही ओळख चांगली आणि कायमस्वरूपी असेलच असे नाही.

  • भारतही लष्करशाहीच्या दिशेने

    म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्यदेश, कधीकाळी भारतीय महाखंडाचा एक भाग असलेला हा देश आज प्रचंड असंतोषाने धुमसत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून लष्करी शासकांच्या ताब्यात असलेल्या या देशात बौद्ध भिक्षुंनी प्रस्थापित लष्करी शासनाविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे. लष्करी दडपशाहीला तिथली जनता कंटाळली आहे.

  • आधुनिक नवीन शिक्षाशास्त्र

    केलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला.

  • उफराटा प्रवास!

    ‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते.

  • हा तर राष्ट्रदोहच!

    व्यवसायानिमित्त किंवा पत्रकार म्हणून मला बरेचदा विदेशात जावे लागते. तिकडे गेल्यावर तिथली एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि आपल्याकडची परिस्थिती यात नकळत तुलना मनातल्या मनात होतेच. ही तुलना करतानाच ते लोक आपल्यापेक्षा पुढारलेले का, या प्रश्नाचे उत्तरदेखील मिळते.

  • निर्णय क्षमता

    माणसाच्या अनेक क्षमतांपैकी निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे.कोणतेही कार्य निर्णय घेतल्याविना आरंभ देखील होत नाही.बरीच कार्य फक्त निर्णय घेण्याअभावी थांबलेले असतात, निर्णय न घेणे ही चालढकल तर त्यास विलंब करणे मतिमंदत्व आहे.तीक्ष्ण बुद्धी असेल तर निर्णय तातडीने होतात.