(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • साने गुरुजी यांचा ‘श्यामची आई’ चित्रपट

    श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.

      March 6, 2022


  • दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे समर्थक जास्त धोकादायक

    आपले सैन्य देशाच्या सीमांचे संरक्षण डोळ्यात तेल घालून करीत आहेत. हे करीत असताना पाकिस्तानच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद होत आहेत, तर काहींना दहशतवाद्यांशी लढतालढता वीरमरण येत आहे

      November 22, 2016


  • आठवा खंड

    झिलँडिया खंडाचा पाण्याखालचा थर आणि ऑस्ट्रेलिया खंडाभोवतीचा पाण्याखालचा थर हे स्पष्टपणे वेगवेगळे झालेले असून, ते एका खोल घळीनं विभागले आहेत. सुमारे साडेतीन किलोमीटर इतकी खोली असणारी ही घळ ‘कॅटो ट्रफ’ या नावानं ओळखली जाते.

      February 8, 2022


  • चला बदल घडवू या…

    सार्वत्रिक जीवनात जगताना आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून आपल्याला हे जाणवत जातं की हा कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गोतासाठी काळ ठरत आहे. पण आपली देखील गंमत अशी आहे, की आपण फारसे बंड करून उठत नाही. फारसे विरोधात बोलत नाही. सर्वसामान्यांची जी ताकद आहे, ती एकजुटीने वापरली गेली तर निश्चितपणे बदल घडेल यात शंका नाही.

      April 7, 2020


  • सुहास्य..

    ’हसणे’ ही एक उपजत, अफ़लातुन कला आहे. ती कुणी कुणाला शिकवत नसते, आणि शिकवता ही येत नसते. नैसर्गिक स्मितहास्यातून व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आपल्या हास्यशैलीवरून अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो.

      September 20, 2019


  • चलनी नोटा, सुटे पैसे आणि आरोग्य

    आपल्या देशाचे सरकार आपल्या चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करत येईल याकडे खुपच गांभीर्याने लक्ष देत आहे. चलन फुगवटा होणार नाही, चलनाचे अवमुल्यन होणार नाही, याकडे लक्ष देत आहे.

      April 20, 2013


  • एका शर्तीच्या जीवनाची..

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये दे. ना. चौधरी यांनी लिहिलेला हा लेख


    माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांना शेतीच्या उत्पन्नातून चरितार्थ चालवणे जिकीरीचे होऊ लागल्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान टाकले. जिद्द, चिकाटी व त्याच्या जोडीला सचोटी यामुळे त्यांच्या उद्योगाचा विस्तार वाढला. अशा वातावरणातच माझा १९३० मध्ये जन्म झाला. व्हर्नाक्युलर (म्हणजे सातवीची) परीक्षा पास झाल्यावर वडिलांची अशी इच्छा होती की, जळगावच्या जवळ असलेल्या ममुराबाद येथील शेतकी फार्मवर नोकरीसाठी जावे. त्यांचा तसा आग्रह होता. तसे नोकरीबाबतचे पत्र देखील मला मिळाले होते. परंतु माझी इच्छा पुढे शिक्षण चालू ठेवण्याची होती. म्हणून मी नोकरी न स्विकारता एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात वाहातुकीची साधने उपलब्ध नव्हती.

    त्यामुळे डोक्यावर पेटी घेऊन मी माझ्या गावापासून ८ कि.मी. अंतरावरील भुसावळला पोहोचलो. तिथून जळगावला. एस.एस.सी. च्या परीक्षेसाठी रेल्वेने गेलो. शिक्षणासाठी संघर्षमय जीवनाचा शेवट इथेच संपत नाही. कॉलेजची शिक्षण घेण्याची माझी खूप इच्छा होती. तथापि वडील गावाचे मुलकी पाटील असल्यामुळे व त्यांचा संपर्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी येत असल्यामुळे त्यांना असे वाटत होते की, आपल्या मुलाने महसूल विभागात नोकरी धरावी. म्हणजे त्याला पुढे परिक्षा देऊन मामलेदार होता येईल व प्रांत ऑफिसरची जागा त्याला मिळू शकेल. कारण मामलेदार व प्रांत ऑफिसर म्हणजेच केवळ 'साहेब' अशी त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती. आणि तेच खरे अधिकारी समजले जात होते. कारण ग्रामीण भागातील लोकांचा केवळ या अधिकाऱ्यांशीच संबंध येतो त्यामुळे त्यांना ते देवासमान मानतात. त्यांचे बोलणे म्हणजे जणू देववाणीच समजतात. त्यामुळे वडील कॉलेज शिक्षणाला परवानगी देईनात कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी श्री. डमरी (नंतर वित्त विभागात सचिव होते.) नाशिकला कलेक्टर होते. त्यांचा व वडिलांचा संबंध येत असे. वडिलांनी त्यांना सल्ला विचारला. त्यांनी मला नाशिकला एच.पी.टी. कॉलेजमध्ये शिकायला ठेवा, असा वडिलांकडे आग्रह धरला. एवढेच नव्हे तर माझे नाशिकमधील ते गार्डियन म्हणून राहणार असे वडिलांना सांगितले. मला पुणे किंवा नाशिकला कॉलेज शिक्षणासाठी जाता आले नाही.

    माझे काका नडियाद (गुजरात) येथे इंजिनियर होते. त्यांनी मला कॉलेज शिक्षणासाठी नडियादला येण्याचा आग्रह धरला. वडिलांचा विरोध सहन करून मी गुजराथ विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळवली. लगेच माझा विवाह झाला. त्यानंतर नोकरी करून एल.एल.बी. ची पदवी मिळवली. अकाऊंटस् मध्ये क्लार्कची नोकरी करीतच माझं वकिली शिक्षण पूर्ण झाले. मी वकिली सुरू केली. वकिलीतून बऱ्यापैकी पैसे मिळू लागलेत. परंतु जळगावसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहात असल्यामुळे आजारपणासाठी अथवा अन्य कारणासाठी जळगावला येणाऱ्या असंख्य नातेवाईकांमुळे माझे घर रेल्वेचे वेटिंग रूम झाले व माझ्या पत्नीला दवाखान्यात नातेवाईकांना डबे पोहोचविणे, आल्यागेलेल्यांसाठी चहा करीत बसणे हाच मुख्य व्यवसाय झाला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली. हे मला आवडले नाही. म्हणून मी सरकारी नोकरी स्विकारली व अकोल्यात असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून पुणे व मुंबईत काम केले. त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट ड्राफ्टसमन कम अवर सचिव व डेप्युटी ड्राफ्टसमन कम डेप्युटी सेक्रेटरी या मंत्रालयातील विधी व न्याय विभागासाठी जाहिरात आली. मी सुरुवातीला अवर सचिव म्हणून रुजू झालो. परंतु लगेच ४ महिन्यात उपसचिव पदासाठी झालेल्या निवडीमुळे उपसचिव झालो. पुढे ४ वर्षांत मला सहसचिवाचे पदी बढती मिळाली. पुन्हा पुढील ४ वर्षांनंतर माझी सचिवपदी पदोन्नती झाली. पुढील दोन वर्षात मी प्रधान सचिव झालो तर त्यापुढील २ वर्षानंतर सेवानिवृत्त झालो. त्यानंतर शासनाने प्रधान सचिव, पार्लमेंटरी अफेअर्स या विभगात माझी प्रधान सचिव म्हणून पुर्ननियुक्ती केली. शासनाने तिथून माझा सेवा कालावधी संपायच्या आतच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र राज्य लॉ कमिशनचे चेअरमन म्हणून ३१ मे २००५ पासून नियुक्त केले. मी तिथून निवृत्त झालो. विधि आयोगाचे प्रामुख्याने काम म्हणजे आयोगाने राज्याचे विद्यमान कायदे व संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत मोडणारे कायदे तपासणे, त्याखाली केलेले नियम व अधिनियम हे संविधानातील तरतुदींशी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी न्यायदान पद्धतीत सुधारणा सुचविणे, संपुष्टात आलेले कायदे तपासून आवश्यक असल्यास ते निरसित करणेविषयी सुचविणे, समान विषयासंबंधीचे कायद्यांच्या एकत्रीकरणाबाबत शिफारस करणे, एखाद्या विषयावर नवीन विधिविधान करण्यासाठी शिफारस करणे, वगैरे बाबींचा त्यात समावेश होतो.

    जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं मिळत जातात व ते आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. शाळेत असताना मी अतिशय व्रात्य होतो परंतु त्यावेळी श्री.एल.एन. सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि त्या विषयाबद्दल माझ्यात निर्माण केलेली आवड माझ्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरली. त्यांचे मला मार्गदर्शन लाभले नसते तर माझे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न हे पहाटे पडलेले स्वप्न न होता मध्यरात्री पडलेले स्वप्न ठरले असते. त्यांनी मला जीवन कसे जगावे, त्यात प्रामाणिकपण असावा व सतत इतरांना मदत करीत राहावे ही शिकवण दिली व तसे वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला. तर वकिली करीत असताना मला वकील म्हणून घडविण्यात श्री. डी. डी. चौधरी या प्रथितयश वकिलांचा मोठा हात आहे. त्यामुळे मला वकिली करताना खूपच मदत झाली. तर मंत्रालयात विधी व न्याय विभागात रुजू झाल्यावर यशस्वी प्रारूपकार कसे होता येईल याचे धडे व मार्गदर्शन माझे वरिष्ठ अधिकारी श्री. धुरंधर व श्री. धोत्रे यांचे लाभले. त्याचा मला आयुष्यभर उपयोग होत राहिला. एवढंच नव्हे तर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर विविध नियुक्त्या झाल्यात त्या प्रत्येक ठिकाणी मला त्या प्रेरकच ठरल्यात. माझ्या आयुष्यात मला लोकांचे सतत प्रेमच मिळत राहिले. म्हणूनच मी वयाची ८८ वर्षे आनंदाने पार करून अजूनही उत्साहाने कार्यरत आहे. शासकीय सेवेत असताना विशेषत्वाने बॅ. अंतुले, श्री. शंकरराव चव्हाण, श्री. शरद पवार, श्री. सुधाकरराव नाईक, श्री. विलासराव देशमुख व श्री. सुशीलकुमार शिंदे या मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले व माझा कामातील उत्साह वाढवत ठेवला. तसेच विधी व न्यायमंत्री बॅ. रामराव आदिक यांचेही भरपूर सहकार्य लाभले.

    माझ्या यशस्वी जीवनाचा पाया हा माझ्या पत्नीने रचलेला आहे. तिची मला मिळालेली आयुष्यभराची साथ ही केवळ भावनिकच नसून कणखर व्यक्तिमत्त्वाची लाभली व त्यामुळेच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. संस्काराच्या मंदिराला रूप देऊन घर उभं करणारी ही गृहकर्तव्यदक्ष गृहिणी म्हणजे माझी खरी मार्गदर्शिकाच आहे. आपल्यावर बेतलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आक्रसून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्साहाने सामोरे जाऊन भूतकाळात जास्त न रमता भविष्याकडे नजर ठेवून वर्तमानाला जास्त महत्त्व देणारी ही समयसूचक गृहिणी म्हणजे लेवा परिवारातील एक आदर्श महिला आहे. तिने मुलांवर बालवयात केलेले सुसंस्कार आणि घडविलेला बौद्धिक विकास यामुळेच मी यशस्वी झालो. ती म्हणजे माझ्या यशोदायी जीवनाची प्रेरणा आहे. माझ्या मुलांचा, सूनांचा सहवास हा आनंददायी आहे. कदाचित माझ्या ठणठणीत प्रकृतीचे तेच रहस्य असू शकते.

    या यशस्वी जीवनात शासकीय सेवेत असताना कटु अनुभव देखील आलेत. मला पुर्ननियुक्ती मिळाल्यावर काहींना ते आवडले नाही. मला मात्र वेदना झाल्यात. पण मी मनात काही ठेवीत नसतो. मी विसरलो. कारण आयुष्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाही आहे. त्या कटु आठवणी विसरूनच मार्गक्रमणा चालू ठेवली.

    डेप्युटी ड्राफ्टसमन असताना मला शासनाने (केंद्र व राज्य शासनाच्या शिफारशीनंतर) लंडनला 'Course for Govt. Legal Officers from Overseas, London' साठी पाठविण्यात आले. हा अनुभव भावी जीवनात खूप उपयुक्त ठरला. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलक्युअलस् यांच्यामार्फत The great son of the soil हा पुरस्कार मला नवी दिल्लीला A Prominent social worker म्हणून दिला होता.

    आपल्या जीवनाच्या प्रवासात आईवडील, शिक्षक, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांचा जसा हातभार लागत असतो तसाच मी ज्या लेवा पाटीदार समाजात जन्माला आलो त्या समाजातील धुरीणांचा मी आभारी आहे. आमचा समाज बहुसंख्येने खानदेशात राहात असला तरी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. अशा समाजाला एकत्र आणून सामाजिक जाण निर्माण करून समजा सेवा करण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीने लेवा पाटीदार महासंघ स्थापन केला. त्या महासंघाचा मी पहिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. माझ्या या समाजकार्याची जाण ठेवून ठिकठिकाणच्या शाखांनी माझा बहुमान केला व मला 'समाजभूषण' म्हणून गौरविले.

    मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. मी १ डिसेंबर १९५९ पासून दरवर्षी १ डिसेंबरला कायम न चुकता शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शन, पूजा व आरतीसाठी जात असतो.

    काळ बदलतो तशा वृत्ती बदलतात आयुष्यात जी मानसिकता जपली तशी आताच्या पिढीत दिसत नाही. शासकीय सेवेत सेवाभावी वृत्ती हरपत चालली आहे. हे बघून मात्र खूप वाईट वाटते.

    -दे. ना. चौधरी

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

      August 30, 2022


  • सेरेंगेटी जंगलाच्या बादशहाला मानाचा कुर्निसात!

    ‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई  मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल. 

      January 4, 2025


  • तंत्रविश्व – भाग ८ : उत्पन्नाचा पर्यायी स्रोत – शेअर मार्केट

    2020 आणि 2021 ही दोन वर्षे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरतील अशी वर्षे असणार आहेत.कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध क्षेत्रातील अभूतपूर्व बदलाचे परिणाम अजून काही महिने तरी जाणतील असे चित्र आहे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना याचे परिणाम फारसे जाणवले नाहीत ,परंतु मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेअर मार्केट करू पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.कुणी आर्थिक गरजेपोटी तर कोणी केवळ मित्र करतो म्हणून तर काही जण केवळ trend आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा अभ्यास अभावी फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते.

    कोणतीही गोष्ट शिकण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्या पद्धतीने ती गोष्ट समजून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याने ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, गरज असते योग्य मार्गदर्शन घेण्याची! येथे योग्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे कारण केवळ दोन-चार युट्यूब व्हिडिओ पाहून किंवा एक दोन लेख वाचून तुम्ही लगेच ट्रेडिंग करायला लागलात तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी शेअर मार्केट विषयी परिपूर्ण माहिती घेऊन त्याच्यातील धोके जाणून घेऊन या मार्गाचा अवलंब केल्यास इच्छित उत्पन्न मिळवता येते, अन्यथा अतिआत्मविश्वास विनाशाकडे घेऊन जातो.

    तुम्हीदेखील शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पुढील काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    1. बेसिक गोष्टी शिकणे

    मित्रांनो कोणत्याही गोष्टी 2 लेवल मध्ये शिकायच्या असतात, पहिली बेसिक लेवल असते तर दुसरी आडव्हान्स किंवा एक्सपर्ट लेवल असते.त्यांना आपण टप्पे देखील म्हणू शकतो. या गोष्टी शेअर मार्केट बाबतीत देखील लागू होतात. शेअर मार्केट मध्ये प्रवेश करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला शेअर मार्केट विषयी प्राथमिक माहिती घेणे अतिशय आवश्यक ठरते, ही बेसिक लेव्हल पूर्ण केल्यानंतरच तुम्ही आत्मविश्वासपूर्वक ट्रेडिंग करू शकता. बेसिक लेवल एकदा क्लियर झाल्यानंतर आणि तुम्ही ट्रेडिंग करून आल्यानंतर आपोआपच तुम्ही ऍडव्हान्स लेवल देखील पूर्ण कराल.

    बेसिक गोष्टींमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक ओळख, शेअर मार्केट विषयी सर्व संकल्पना, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती, प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे, तांत्रिक बाबी यांसारख्या गोष्टी तपशीलवार समजून घेणे गरजेचे असते.

    शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी विविध स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पुस्तके, ऑनलाईन कोर्स, यूट्यूब व्हिडिओ, विविध लेख, वेबसाईट अशा संमिश्र स्रोतांचा वापर बेसिक शिकण्यासाठी करणे योग्य ठरते.त्यामुळे माहितीची सत्यता देखील तपासता येते आणि शिकलेल्या संकल्पना अधिक पक्क्या होतील.

    2.पेपर ट्रेडिंग अथवा सिम्युलेटर ॲपचा वापर

    मित्रानो शेअर मार्केट विषयी बेसिक गोष्टी शिकल्यानंतर त्याची प्रात्यक्षिके देखील करणे गरजेचे असते,अशा वेळी प्रत्यक्ष अकाउंट काढून लगेच ट्रेडिंग करणे कदाचित नुकसानकारक ठरू शकते अशावेळी काही दिवस पेपर ट्रेडिंग करणे योग्य ठरते. म्हणजे सध्या आपण ट्रेडिंग करत आहोत असे गृहीत धरून इच्छुक शेअरची खरेदी आणि योग्य वेळी विक्री प्रत्यक्षात न करता केवळ पेपरवर करणे आणि त्याद्वारे नफ्या तोट्याचा हिशोब करणे यास पेपर ट्रेडिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने थोडे दिवस प्रॅक्टीस करणे गरजेचे असते.

    सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सिम्युलेटर ॲप देखील आलेले आहेत त्याचा वापर करुन तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग केल्यासारखे सर्व गोष्टी करू शकता. ज्यामध्ये प्रत्यक्षात आपले पैसे इन्व्हेस्ट केलेले नसतात. उदाहरणार्थ मनी कंट्रोल ॲप.

    पेपर ट्रेडिंग किंवा सिम्युलेटर ॲप्स वापरण्याचा सराव केल्यामुळे दोन फायदे होतात, एक म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले नसल्यामुळे ट्रेडिंग मध्ये तुमचे नुकसान झाले तरी प्रत्यक्षात एक रुपया देखील जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला कशा पद्धतीने फायदा तोटा होऊ शकेल याचा एक अंदाज तुम्हाला येतो म्हणजे जो अनुभव तुम्ही काही पैसे घालवल्यानंतर मिळवला असता तो पूर्णपणे मोफत मिळवू शकता.

    अशा पद्धतीने ट्रेडिंग करण्याचा काही महिने सराव केल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी ठरवता येतील कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करावे हे ठरवता येईल. त्यासाठी या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

    3.गुंतवणूक करावयाची रक्कम

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही बेसिक गोष्टी शिकून घेतल्या, काही महीने प्रात्यक्षिक देखील केले त्यानंतर मुख्य तिसरा टप्पा प्रत्यक्षात गुंतवणूक करण्याचा येतो. अशा वेळी दोन प्रश्न निर्माण होतात.

    -शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी?

    -गुंतवणूक कशी असावी?

    साधारणपणे शेअर मार्केट विषयी गोष्टी शिकताना तुम्ही या गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे असते.कारण प्रत्यक्षात ट्रेडिंग करण्यास सुरुवात करताना वरील प्रश्न निर्माण होतात.शेअर मार्केटमध्ये किती रक्कम गुंतवावी याची काही मर्यादा नसते ते तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते आणि व्यक्तीपरत्वे ते बदलते. तुमचा दैनंदिन खर्च भागवून ,भविष्यकालीन येणाऱ्या समस्यांचा आणि गरजांचा विचार करून थोडीबहुत बँकेत शिल्लक रक्कम ठेवून उरलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना किंवा कर्ज काढून कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. उत्पन्नाचा एक पर्यायी स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे.

    शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी याच्या नंतर अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो ही गुंतवणूक कशी असावी ?आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्वरित, मध्यम व दीर्घकालीन असे परतावा देणारे तीनही पर्याय येथे उपलब्ध असतात. तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार यातील योग्य पर्यायाची निवड करणे गरजेचे असते.

    4.अपेक्षा कमी आणि संयम जास्त असणे गरजेचे

    गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपैकी सर्वोत्कृष्ट पर्याय शेअर मार्केट असला तरी याद्वारे प्रत्येक व्यक्तीला मिळणारा परतावा मात्र वेगळा असतो, कारण प्रत्येकाचे ज्ञान, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एक्सपर्ट लेवल यामध्ये फरक असतो.

    त्यामुळे सुरुवातीला अपेक्षा कमी ठेवणे आणि थोडाफार संयम ठेवणे गरजेचे असते.

    तुमच्या परिचित एखाद्या व्यक्तीस तुमच्या एवढीच गुंतवणूक करून कदाचित तुमच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील किंवा मिळतील, अशावेळी तुम्ही संयमी राहणे गरजेचे आहे. त्याच्याशी तुमची तुलना न करता आपण ठरवलेली एक निर्धारित रक्कम कशी मिळवता येईल हे पाहणे गरजेचे असते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाहणे गरजेचे असते.

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे चार टप्पे समजून घेतले तर गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच जास्त रिटर्न शेअर मार्केटद्वारे मिळतील.त्याकरिता सुरुवातीला संयम ठेवून आणि अपेक्षा कमी ठेवून तुम्ही काम केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल.

    -- विजयकुमार काशिनाथ पाटील

      August 18, 2021


  • समर्थ रामदास स्वामी पुण्यतिथी

    समर्थावर सन्त एकनाथाच्या वाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

      January 22, 2022