(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अमृततुल्य मैत्री

    प्रज्ञा रावकर 
    (मुंबई) यांच्या लेखावरुन

    पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर्‍्या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला. सुरुवातीला ते त्याला ‘बंगालीबाबू? म्हणायचे. हा बंगालीबाबू लवकरच मराठी शिकला आणि इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाला. गणपती, होळी साजरी करू लागला.

  • द ग्रेट मराठा सचिन तेंडुलकर

    विद्याधर ठाणेकर 
    सन्मित्र २४ एप्रिल २००२

    २४ एप्रिल २००२ हा सचिन तेंडुलकरचा २९ वा वाढदिवस. सर्वात प्रथम सचिनला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुक्षेच्छा! आणि योगायोगही असा की, सचिनने स्वतःच्याच २९ व्या वाढदिवसानिमित्त साऱ्या क्रिकेट शौकीनांना २९ व्या कसोठी शतकाची क्षेट दिली. त्यासाठी सचिनचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • जोत्स्ना भोळे यांना आदरांजली

    विद्याधर ठाणेकर 
    सन्मित्र - ५ ऑगस्ट २००२

    ठाणे शहराचा संगीताचा इतिहास लिहिला गेला तर मो. ह. विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावरील दि. २८ एप्रिल १९७४ ची रात्र सुवर्णाक्षरात लिहिली जाईल. कारणही तसेच आहे. कारण त्या रात्री “न भूतो न भविष्यती) असा नाट्यसंगीत मेजवानीचा कार्यक्रम मी स्वत: आयोजित केला होता. त्या रात्री संगीत क्षेत्रातील एकाहून एक सरस आणि दिग्गज गायक-कलावंतांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम होता ““नाट्यसंगीत रजनी?या कार्यक्रमात एकाचवेळी, एकाच मंचावर, एकाच रात्री त्याकाळातील लोकप्रिय पं. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, शरद जांक्षेकर, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार, विश्वनाथ बागुल, अलकनंदा वाडेकर (बकुळ पंडीत) जोत्स्ना मोहिले आणि जेष्ठ गायिका जोत्स्ना भोळे असे नऊ गायक गाऊन जेले. हा कार्यक्रम शनिवारी रात्रौ ९ वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता संपला.

  • अनाकलनीय अर्थशास्त्र

    परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.

  • आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी

    देशाची सार्वभौमता अखंड राखणे ही कोणत्याही देशाची सर्वाधिक प्राथमिकता असते. ही अखंडता कायम ठेवण्यासाठी केवळ लष्करानेच दक्ष राहून चालत नाही आणि अलीकडील काळात तर लष्करापेक्षा राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनतेनेच आपल्या देशाची सार्वभौमता अक्षय राखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लष्करी आक्रमण करून एखादा देश पादाक्रांत करणे आज जागतिक स्तरावरील बदलत्या परिमाणाच्या पार्श्वभूमीवर अगदीच अशक्य आणि कालबाह्य ठरले आहे.

  • आणखी एक इशारा!

    नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

    — प्रकाश पोहरे

  • छोटीशीच; पण… खूप महत्त्वाची!

    प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
    राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास 'धरावे' असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी 'ध' चा 'मा' केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.

  • आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची

    प्रकाशन दिनांक :- 01/06/2003
    गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय?

  • कोंडी झालेला उध्वस्त भारत

    प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
    एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.

  • शासकीय दरोडा!

    प्रकाशन दिनांक :- 19/10/2003
    ब्रिटिशांच्या जोखडातून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आज आपण स्वतंत्र आणि सार्वभौम देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत ते या लोकांच्या बलिदानामुळेच. स्वातंत्र्यवीरांच्या समरगाथा आम्हाला नेहमीच स्फूर्तिदायक वाटत आल्या आहेत.