वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेती करण्याकरिता छोट्या झोपड्या भोवती पाणी साठविण्यासाठी पाणथळी, एकत्रित राहणाऱ्या मानवाच्या वसाहती अशा पद्धतीने जगण्याची संकल्पना सुरू झाली व ५००० ते ६००० वर्षांपूर्वी पर्यंत ती चांगलीच रुजली. परंतु त्याचबरोबर आपले पाय रोवण्यास डासांना उत्तम संधी मिळाली . माणसाचे रक्त हेच डासांचे खाद्य असल्याने सहजपणे उपलब्ध झालेल्या या रक्तपुरवठ्यामुळे हळूहळू धष्टपुष्ट डासांची पैदास वाढू लागली.
उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात.
आयुर्वेदाने शिंक हा ‘अधारणीय वेग’ म्हणजे अडवून ठेवू नये अशी शारीर प्रक्रिया आहे असे सांगितले आहे. त्यामुळे शिंक आल्यावर आल्यावर ती दाबून ठेवू नये. मोकळेेपणाने शिंकावे. त्याचप्रमाणे मुद्दाम शिंका काढूदेखील नयेत. याकरताच वरील उपाय सांगितले आहेत. मुद्दाम शिंका काढल्याने वात वाढतो. तपकीर ओढण्याची सवय असणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे!
कडूनिंबाचा उपयोग आपण बऱ्याच प्रसंगी करतो.आपले हिंदू नव वर्ष अर्थात गुढी पाडवा ह्या दिवसाची सुरूवात नाही का आपण कडूनिंबाचा रस पिऊन करत.आपल्या शास्त्रात किती महत्त्व आहे पाहीलेत ना कडूनिंबाला.
ह्याचे १४-१६ मीटर उंच वृक्ष असतो.खोड टणक,सरळ वाढणारे असते पाने विषमपक्ष असून २०-३५ सेंमू लांब असतात पत्रकाच्या कडा दंतूर असतात.फुले मंजीरी स्वरूपात असतात पांढरी.फळ लांबट गोल १.२५-२ सेंमी लांब,पिकल्यावर पिवळे व कच्चे असताना हिरवे कडवट व उग्रगंधी असते.ह्यात १ बी असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे फुले,पाने,त्वचा,बीज व तैल.हा चवीला कडू,तिखट,तुरट असून थंड गुणाचा असतो तसेच हा हल्का व रूंक्ष आहे.कडूनिंब कफपित्तनाशक व वातकर आहे.
चला आता आपण ह्याचे काही उपयोग जाणून घेऊयात:
१)जखम धुवायला निंब सालीचा काढा उपयोगी आहे.
२)कडूनिंबचा पाला घरात जाळल्यास घरातील किटक जंतू ह्याचा नाश होतो.
३)पोटात कृमी झाल्या असल्यास निंबसालीचा रस मधासोबत देतात.
४)ताप येऊन त्यामुळे हातापायांची जळजळ होत असल्यास निंबाचा कल्क त्या जागी लेप करतात.
५)खरजेवर निंबाच्या बिया तीळ तेलात वाटून तिथे लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकन यादवी युद्ध काळात ५० टक्के गोरे ८० टक्के नागरिक मलेरियाग्रस्त होते.
ज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो. जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे.
हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात.
अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व फुल.अशोक चवीला तुरट,कडू असून तो थंड गुणाचा आहे.हा हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्त शामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)अशोक उत्तम वेदनाशामक असल्याने वेदना असणाऱ्या भागांवर ह्याचा लेप करतात.
२)मुळव्याधी मध्ये रक्तस्त्राव होत असल्यास अशोक सालीचे चुर्ण उपयोगी आहे.
३)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांनी अशोक सालीचे चुर्ण तांदुळाच्या धुवणात देतात.
४)गरोदर स्त्रिने अशोक घृत सगर्भावस्थे मध्ये नियमीत घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)अशोकाचे बी मुत्रल असल्याने मुत्रविकारात उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपल्या आजूबाजुची सद्यपरिस्थिती पहा; आचार्य चरकांची ‘दूरदृष्टी’ काय होती ते लक्षात येईल. किंवा अशा अवैद्यांचा इतिहास हा आयुर्वेदात कोणतीही ‘डिग्री’ देण्याची पद्धत नव्हती तेव्हापासूनचाच आहे हे लक्षात येईल!
डॉ ऱ्हेन आधुनिक काळातील हृद्य-शस्त्रक्रियांचे जनक मानले जातात. १८९६मध्ये एका २२ वर्षीय रुग्णावर यशस्वी हृद्य-शस्त्रक्रिया करून डॉ ऱ्हेन यांनी हृद्यावरील शल्यचिकित्सेद्वारे करावयाच्या उपचार पद्धतीला खूपच वरच्या पायरीवर नेवून ठेवले. ‘हृदय हे शल्यचिकित्सेच्या परिघाबाहेर आहे’ असे त्या काळात मानले जात होते. परंतु ऱ्हेन यांनी तो परीघ विस्तारला व हृद्य-शल्यचिकित्सा शक्यतेच्या मर्यादेत आणून ठेवली.
Copyright © 2025 | Marathisrushti