(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • नाचता नाचता व्यायाम

    एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. मुळात होऊन जाणार ही संकल्पनाच आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. एरोबिक्स सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली. झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच! एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते. पण उगीचंच कशाही उडय़ा मारणे किंवा इकडे-तिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. एरोबिक्समध्ये ‘फ्लोअर एरोबिक्स’ व ‘बेंच एरोबिक्स’ असे दोन प्रकार आहेत. फ्लोअर एरोबिक्समध्ये सुरुवातीला ‘वॉर्म अप’ व्यायाम करावे लागतात. यातही नुसते कसेही हात-पाय हलवून चालत नाही. वॉर्म अपच्याही ठरलेल्या स्टेप्स असतात. त्यालाच जोडून ३० ते ४० मिनिटे पोटावरील स्नायूंना (अॅअब्ज) तसेच कमरेखालच्या व वरच्या शरीराला व्यायाम दिला जातो.

    एरोबिक्स मध्ये वॉर्म अप असतोच. पण प्रत्यक्ष व्यायाम ‘बेंच’वर म्हणजे ठरावीक उंचीच्या मोडय़ांवर साधारण ३० मिनिटांसाठी असतो. कमरेखालचे आणि वरचे शरीर व हृदय यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे. यात बेंचच्या स्टेप्स चढणे व उतरण्यात पायांचाही खूप वापर होतो. झुंबा आणि बॉलीवूड डान्स झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. यातली संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीताच्या तालावर पाय आपसूक थिरकायला लागतात आणि नाचायचा हुरूप येतो. ७-८ वर्षांपूर्वीपासून झुंबा आपल्याकडे आला आणि हळूहळू लोकप्रियही होऊ लागला. बॉलीवूड डान्समध्येही वॉर्म अप चुकत नाही. पुढची ३० ते ४० मिनिटे व्यायाम करायचा असल्याने तो गरजेचा असतो. एरोबिक्स, झुंबा आणि बॉलीवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही. कारण इतर विचार करताना नाचाच्या स्टेप्स हटकून चुकतात, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावेच लागते. या सर्व व्यायामप्रकारांमध्ये शेवटी ‘कूल डाऊन’ व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. असा हा ५५ मिनिटे ते १ तासाचा ‘वर्कआऊट’ असतो. या व्यायाम प्रकारांना जिमच्या भाषेत ‘कार्डिओ-रेस्पिरेटरी वर्कआऊट’ असे संबोधले जाते.

    त्यामुळे शरीराला होणारे फायदे असे. * हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा व्हावा लागत असल्यामुळे अर्थातच हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर शरीराचा ‘स्टॅमिना’ वाढल्याचे जाणवू लागते. * नाचात पाय आणि हाताच्या हालचाली खूप असतात. पुन:पुन्हा झालेल्या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंना उत्तम व्यायाम होतो आणि स्नायू पिळदार होतात. (स्नायूंचे टोनिंग) * नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. * शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची यंत्रणा, चयापचय क्रिया सुधारते, चांगली भूक लागू लागते. * इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन नाचाचा व्यायाम करताना अक्षरश: प्राणायाम केल्यावर जसा शांत अनुभव मिळतो तसाच अनुभव येतो. हलके, ताजेतवाने वाटू लागते. * उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात. * एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांनाही चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. * चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते. पण अर्थात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या आहाराचाही मोठा भाग असतो. कमी झालेले वजन कमी राखण्यासाठी हे व्यायाम व जोडीने ‘वेट ट्रेनिंग’सारखे इतर व्यायामही सुचवले जातात. व्यक्तीला मुळात ज्या कारणासाठी व्यायाम करायचा आहे ते लक्षात घेऊन नाचाबरोबर इतर प्रकारच्या व्यायामांचा योग्य मेळ घालता येतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- लोकसत्ता / डॉ. पलक कुलकर्णी

  • श्वासाची दुर्गंधी

    मौखिक अस्वच्छता हे श्वासाला दुर्गंध येण्याचे एक कारण असू शकते. किंबहुना दात, जीभ, हिरड्या यांच्या म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, हे श्वाेसाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असते. काहीही खाल्ल्यानंतर दातात अन्नाचे छोटे मोठे कण अडकतात. तोंडातील जीवाणूंद्वारे त्या कणांचे विघटन होऊन दुर्गंधीयुक्त रासायनिक पदार्थ आणि वायू तयार होतात. या रासायनिक पदार्थांमुळे आणि वायूंमुळे तोंडाचा वास येऊ लागतो. शिवाय त्यांच्यामुळे दात किडतात आणि हिरड्या सुजून त्यात पू भरतो. दात आणि हिरड्यांच्या या जंतुसंसर्गामुळे हा वास अधिकच दुर्गंधीयुक्त बनतो. अनेकदा दातांची कवळी, काही दातांची डेन्चर्स, दातांना बसवलेल्या तारा ज्या व्यक्ती वापरतात, त्यांनी त्या त्या गोष्टींची स्वच्छता न बाळगल्याने त्यांना श्वचसन दुर्गंधीची बाधा होते. दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात तर जिभेवर द्रवपदार्थांचा साका जमा होतो. जिभेवर हा अन्नपदार्थांचा साका जमा होऊन त्यामध्ये जंतूंचा शिरकाव होतो आणि त्याचा वास येऊ लागतो. श्वावस दुर्गंधीच्या या कारणाला आळा घालण्याकरिता दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासावेत. दातांबरोबर जीभसुद्धा घासून स्वच्छ करावी. काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या कराव्यात. अधूनमधून "डेंटल फ्लॉस‘ वापरून दातांच्या फटीतले अन्नकण काढावेत. वर्षातून किमान एकदा दंत वैद्याकडून दातांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.

    विशिष्ट अन्नपदार्थ आणि पेयपान
    लसूण, कांदा, मसाल्याचे पदार्थ असे तीव्र वासाचे पदार्थ खाण्यात आले तर तोंडाला वास येतोच. चहा, कॉफी, मद्यपान अशा पेयांच्या सेवनानेसुद्धा श्वासाला दुर्गंध येतोच. मद्यसेवनानंतर उच्छवासात येणारा त्याचा अंश "ब्रेथ ऍनॅलायझर‘ या यंत्राच्या साह्याने पोलिसही तपासतात. या घन आणि द्रवपदार्थांच्या सेवनाने येणारा दुर्गंध जर टाळायचा असेल तर ते खाणे (किंवा पिणे) टाळणे हाच त्यावरचा उपाय असतो. कारण कितीही ब्रश केला किंवा गुळण्या केल्या तरी, कांदा-लसणाचा किंवा दारूचा वास सहजी नाहीसा होत नाही. याउलट दिवसभरात पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तींचे तोंड कोरडे पडून त्यांच्या श्वाससामध्येसुद्धा दुर्गंध जाणवू शकतो.

    तंबाखूजन्य पदार्थ
    धूम्रपानाचा वास हादेखील मद्याप्रमाणे उच्छवासातून येत असतो. तंबाखू, गुटखा, पान यांच्या सेवनानंतर त्यांच्यापासून निघणारा रस तोंडातील लाळेमध्ये मिसळतो. हा मिश्र द्रव तोंडातील दात, गालाची आतली बाजू, जीभ, हिरड्या यांच्यावर एक पातळ थर निर्माण करतो. त्याचा वास येत राहतो. त्याशिवाय विडी-सिगारेटच्या धुराचा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा तोंडातील दात, हिरड्या, टाळू आणि जीभ यांच्यावर रासायनिक परिणाम होऊन दातांवर लालसर काळ्या रंगाचे किटण तयार होते. त्याचाही कायमस्वरूपी दुर्गंध येत राहतो. या गोष्टींच्या व्यसनापासून मुक्त होणे, हाच या दुर्गंधावर मात करण्याचा ठोस उपाय आहे.

    फॅड डाएट
    व्यायाम करून वजन कमी करण्याऐवजी काहीतरी नवीन जाहिरातबाजी करणाऱ्या "विशेष आहाराच्या‘, डाएटच्या, उपाशी राहण्याच्या नादी लागण्याकडे आजकाल बहुसंख्य लोकांचा कल असतो. अशा डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ अत्यल्प खायला आणि साखर पूर्णपणे वर्ज्य करायला सांगितलेली असते. हा सल्ला अतिशय अशास्त्रीय असतो. कारण शरीराला पिष्टमय पदार्थ हे दैनंदिन जीवनात लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यावश्यसक असतात. ते कमी मिळाल्यामुळे शरीरातील चरबी वितळून तिच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. या प्रक्रियेत शरीरात "कीटोन्स‘ नावाचे दूषित पदार्थ निर्माण होतात. यांचा एक वेगळाच गोडसर वास श्वासाला येत राहतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त प्रमाणात राहिली तर असाच वास येत राहतो.

    औषधे
    काही ठराविक औषधांच्या नियमित वापरानंतर श्वाासाला दुर्गंध येऊ शकतो. यात छातीतल्या दुखण्यावर घेतल्या जाणाऱ्या नायट्रेट्‌स, केमोथेरपीमध्ये वापरली जाणारी काही औषधे, फिनोथायाझिन गटातली चिंतानाशक औषधे येतात. याशिवाय ऍसिडिटी कमी करणारी अल्सरविरोधी औषधे. उच्च रक्तदाबावरील, अर्धशिशीवरील, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी काही औषधेदेखील अशीच त्रासदायक ठरू शकतात. डोके आणि मानेच्या भागात एखाद्या अवयवाचा कर्क असेल तर त्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या किरणोपचारांमध्येसुद्धा असेच घडते.

    काही आजार
    काही विशिष्ट आजारांमध्ये तोंडाला दुर्गंधी येणे प्रकर्षाने आढळते.
    पोटाचे आजार- एच. पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग जठर आणि लहान आतड्याच्या सुरवातीच्या हिश्या आजात होतो. यामुळे हायपरऍसिडिटी, पोट दुखणे अशा प्रकारच्या त्रासांसमवेत तोंडाला दुर्गंधी येण्याचे आणि करपट ढेकर येण्याची लक्षणे आढळतात. हाच प्रकार जी.ई.आर.डी. या आजारात होतो. यामध्ये पोटातील आम्ल हे अन्ननलिकेत येत राहते.

    श्वासनसंस्थेचे आजार- सर्दीने नाक चोंदणे, सर्दी पिकणे, सायन्युसायटीस, घशाला सूज तसेच जंतुसंसर्ग होणे, टॉन्सिलायटिस, ब्रॉन्कायटिस, ब्रॉंकिएकटॅसिस अशा श्वेसन संस्थेच्या आजारात श्वावसाला हमखास दुर्गंधी येते.

    झीरोस्टोमिया- या आजारात तोंडात लाळ तयार होत नाही. त्यामुळे तोंडातील जंतूंची बेसुमार वाढ होते, शिवाय सर्वसामान्य लोकांच्या तोंडात आढळणाऱ्या जंतूंव्यतिरिक्त इतर प्रकारचे जंतूदेखील नव्याने तयार होतात. त्यांचा अन्नकणांशी संपर्क होऊन, सातत्याने खूपच दुर्गंधी येत राहते.

    स्योग्रेन्स सिंड्रोम- या स्वयंप्रतिकार रोगात (ऑटोइम्युन डिसीज) रुग्णाची लालोत्पादक पिंडे नष्ट होतात. त्यामुळेसुद्धा तोंड कोरडे पडून दुर्गंधी येत राहते.
    "हॅलिटोफोबिया‘ या मनोविकारात रुग्णाला सतत आपल्या तोंडाला दुर्गंध येतोय असं वाटत असतं. प्रत्यक्षात तसा तो येतच असतो असेही नाही, पण अशा व्यक्ती इतरांच्या साध्या बोलण्याचा तसा अन्वयार्थ लावतात. "आपल्या तोंडाची दुर्गंधी टाळणे‘ हा एक विचार त्यांच्या मनात पक्के घर करतो, त्यामुळे सतत दात घासणे, फ्लॉस करणे, च्युईंग गम खाणे, माउथ फ्रेशनर्स वापरणे अशा गोष्टी ते सतत अकारण करत राहतात. आजच्या जमान्यात "सेल्फ इमेज‘ किंवा स्वयं प्रतिमा या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते. चांगले दिसण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. पण यामध्ये वेशभूषा, केशभूषा, स्वतःला नटवण्यासाठी अनेक प्रसाधने वापरणे एवढेच केले जाते. पण तोंडाचे आणि पर्यायाने शरीराचे आरोग्य टिकवणाऱ्या मौखिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास, श्वास दुर्गंध तर जाणवणार नाहीच; पण व्यक्तिमत्त्वदेखील उजळून जाईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. अविनाश भोंडवे

  • आरोग्याकडे लक्ष

    नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सरास दुर्लक्ष करतो. आरोग्याशी निगडीत काही खास टिप्स...
    दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला तेज येतं.
    साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटं चालावं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
    दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
    श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात.
    स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
    व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरुर प्या.
    प्रशिक्षित प्रशिक्षक निवडा. जेणेकरुन भविष्यातील अपव्यय टाळता येईल.
    वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
    सकारात्मक विचारसणीचा अवलंब करा. जे तुम्हाला यश मिळवण्यास उपयोगी ठरेल.
    ताजी फळं आणि सालाड खाण्यावर भर द्या.
    एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. दिवसातून पाच ते सहा वेळा अल्पसा आहार घ्या.
    हळुहळू आणि व्यवस्थित चावून खा. तुम्ही जेवढं हळू खाल तेवढं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल.
    मानवी शरीराला दररोज अर्धा किंवा एक टिस्पून मीठाची गरज असते. त्यापेक्षा जास्त मीठाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो.
    ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी जास्त खाणं हा काही उपाय नाही.
    दररोज ध्यानधारणा आणि प्राणायम करण्याची एक वेळ निश्चित करा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.नमिता जैन

  • तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे

    पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनशी पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते.त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते. पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांतसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे , पोटातील जिवाणूंचा नाश होतो ,जळजळ होण्याची समस्या कमी होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅढन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅणन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. या पाण्यातील अॅ न्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्यायवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्याीवरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते. हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या अॅवन्टीऑक्सिडंट घटकांचा ,कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्याल शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने , संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पंचकर्म

    पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो.

  • किडनी डॅमेज करू शकतात तुमच्या या सवयी

    किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते.

    आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्यामागच्या काही सवयींविषयी सांगत आहोत.

    लघवी रोखणे
    जर तुम्ही जास्त प्रमाणात लघवी रोखून धरत असाल तर ही सवय तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे.
    यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते आणि किडनी खराब होते.
    यामुळे लघवी कधीही दाबून ठेवू नये.

    पाणी कमी पिणे
    जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पीत असाल तर किडनीला रक्त शुद्ध करण्यासाठी लिक्विड लागते ते पर्याप्त प्रमाणात मिळणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये जमा झालेली घाण तुमच्या शरीरातच राहील.
    यामुळे निश्चितच तुमची किडनी लवकर खराब होऊ शकते.

    मीठ जास्त खाणे
    शरीराला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मीठ म्हणजेच सोडियमची आवश्यकता असते.
    जर तुम्ही फळ, भाज्या नियमितपणे खात असाल तर त्यामधून तुम्हाला पर्याप्त प्रमाणात हे तत्व मिळते.
    जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचे ब्लडप्रेशर वाढेल आणि किडनीवर अतिरिक्त दबाव टाकेल.
    दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम घेऊ नये.

    कोल्ड्रिंक्स
    जर तुम्ही कोल्ड्रिंक्स पीत असाल तर हे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी किती घातक ठरते याचा तुम्हाला अंदाज नसेल.
    जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्यास तुमच्या शरीरातील प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडते. याचा अर्थ तुमची किडनी त्यावेळी योग्यप्रकारे काम करत नाहीये किंवा डॅमेज झाली आहे.

    पूर्ण झोप न घेणे
    जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा किडनीच्या नवीन पेशींचे नवनिर्माणहोते.
    यामुळे तुम्हाला पूर्ण आणि शांत झोपेची आवश्यकता असते.
    जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर या क्रियेमध्ये बाधा निर्माण होईल आणि तुमच्या किडनीवर याचा वाईट प्रभाव पडेल.

    मांसाहार
    मांसाहार केल्यामुळे किडनीच्या मेटाबॉलिज्मवर जास्त दबाव पडतो.
    जर तुम्ही आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर याचा अर्थ तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागेल.
    जे भविष्यात तुम्हाला विविध अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.

    दारू आणि सिगरेट
    जास्त प्रमाणात आणि नियमितपणे सिगरेट, दारू सेवन करणे तुमच्या लिव्हर आणि किडनीवर अत्यंत वाईट प्रभाव टाकतात.
    या सवयी तुम्हाला मृत्युच्या खूप जवळ घेऊन जातात.

    आहारात पोषक तत्वांची कमतरता
    आहारामध्ये ताजे फळ, भाज्या असणे किडनी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप आवश्यक आहे.
    किडनी फेल आणि स्टोन होण्यामागे मुख्य कारण आपल्या आहारातील मिनिरल्स आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आहे.
    मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत.

    डॉ.प्रवीण भा. रेडकर
    M. Ch Urology
    मुत्रविकार तज्ञ,
    युरोकेअर हॉस्पिटल, मुंबई

  • टेनिस एल्बो आजार

    टेनिस खेळल्यास हा आजार होतो म्हणून त्याचे नाव 'टेनिस एल्बो' असे पडले असले तरी हा आजार कोणालाही होऊ शकतो. टेनिस एल्बो म्हणजे दुखरा कोपरा. मनगटाला दंडाशी जोडणाऱ्या सांध्यावर ताण पडल्यावर कोपरा सुजतो. या आजारात कोपराच्या बाह्य भागाला वेदना होतात.

    कसा होतो? : हात सतत पूर्ण ताठ ठेवून काम केल्याने किंवा एकाच प्रकारे हातांची हालचाल होत असल्यास त्याचा भार कोपरावर पडून हा आजार होऊ शकतो. यामध्ये वयाचाही प्रभाव पडतो. टेनिस एल्बो झालेल्या बहुतांश व्यक्तींचे वय ३५ ते ५० यादरम्यान असते.

    टेनिस एल्बोची लक्षणे कोपराच्या बाह्य भागात वेदना होतात., कोपरावर बाहेर आलेल्या हाडाचे टोक दुखरे होते. वस्तू पकडताना किंवा हालचाल केल्यास मनगटात वेदना होतात, हाताच्या स्नायूंवर ताण देणाऱ्या हालचाली केल्यास (वजनदार वस्तू उचलणे इ.) वेदना होतात. सकाळी झोपेतून उठल्यावर हाताची हालचाल नीट होत नाही. हाताला मुंग्या येतात.

    टेनिस एल्बो वर उपचार

    आराम : त्रास होत असलेल्या हाताने स्क्रू ड्रायव्हर, हातोडी किंवा अन्य वजनदार वस्तू पकडणे काही काळासाठी बंद करावे. खरे तर आदर्श उपचारपद्धतीत कोपराला सहा आठवडे आराम देणे हे योग्य असते. पण दैनंदिन जीवनात हाताने करण्याची सर्व कामे बंद करणे शक्य होत नाही, म्हणून जड वस्तू न उचलण्याची खबरदारी घ्यावी.

    बर्फ : त्रास होत असलेल्या ठिकाणी बर्फाचा शेक द्यावा.

    व्यायाम : नुसता आराम केला तरी स्नायू कमजोर होतात व काम सुरू केल्यावर पुन्हा दुखू लागतात. त्यामुळे दंडाचे तसेच मनगटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा.
    टेनिस एल्बो वरील औषधे हातावरची सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
    आजार बळावल्यास काहीवेळा शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबला जातो.

    प्रतिबंधात्मक उपाय : स्नायू मजबूत राहिल्यास कोपराजवळचे सांधे ही मजबूत राहतील.
    हाताचे दंड, कोपरा, मनगट मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ.डॉ. रामप्रभू, अस्थिरोगतज्ज्ञ,

  • नाश्त्याला खायचे तरी काय?

    "तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?'"असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का ? उत्तर पोस्ट च्या तळाशी सापडेल.अहं!आधी पोस्ट पूर्ण वाचा.माझे अमहाराष्ट्रीय पेशंट सुद्धा समजावून सांगितले कि हे पदार्थ करून खातात त्यामुळे व्यर्थ excuse at least मराठी लोकांनी तरी देऊ नयेत.
    नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज ,सोपे ,कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ) (लेखिका :वैद्य रुपाली पानसे ,आद्यं आयुर्वेद ,पुणे )
    १.भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबर /तीळ चटणी बरोबर)
    २.मिश्र भाज्यांचा पराठा साजूक तूप
    ३.मिश्र भाज्यांचे(किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.)थालीपीठ धिरडे ,ताक)
    ४.अंड्याचे ऑम्लेट अथवा नुसतेच उकडलेले अंडे
    ५.मटार,मका,घेवडा,खोबरे,डाळ्या,टोमॅटो,इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.
    ६.फोडणीची ताक भाकरी.
    ७.ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उब्जे
    ८.भाकरी गूळ तुपाचा लाडू.
    ९.दडपे पोहे भरपूर ओले खोबरे,कोथिंबीर ,कांदा तसेच लिंबाचा रस टाकून
    १०.क्वचित साजूक तुपाचा कणकेचा केळ घालून शिरा.
    ११.नाचणीची उकड
    १२.नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.
    १३.शिजवलेल्या हिरव्या मुगाची कांदा, टोमॅटो शेव खालून मिसळ
    १४.ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी
    १५.खारीक खोबरे डिंक मेथ्या पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध .
    १६.मिश्र पिठाचा ढोकळा, पुदिना जवस चटणी
    १७.तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)
    १८.मिश्र पिठाचे धिरडे व चटणी
    १९.मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.
    २०.गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी
    २१.ओले खोबरे मटार,मका,भाज्या हिरवीमिरचीघालून फोडणीचा गव्हाचा दलिया
    २२.खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी
    २३.गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर
    २४.सालीच्या लाहीचा चिवडा कांदा टोमॅटो शेव घालून भेळेसारखा
    २५.फोडणीच्या तिखट शेवया
    २६.रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )
    २७.रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा
    २८.मुगाची डाळ शिजवून त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा
    २९.फोडणीची भगर आणि ताक.
    ३० वा पदार्थ जाहीर नाही कारण जर २९ दिवस हे पदार्थ तुम्ही नेमाने आळीपाळीने खाल्ले तर ३० वा दिवस तुमचा हक्काचा असेल. भरपूर बटर थापून ब्रेड, टोस्ट खा किंवा वैशाली वाडेश्वर ला जाऊन इडली डोसा उडीद वडा चोपा.

    वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
    (कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )

  • योगासने

    योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत.

    आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
    योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत
    सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
    प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.

    सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
    फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
    हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
    फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.

    पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
    फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.

    अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
    फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.

    अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
    फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.

    अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.

    फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
    भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
    फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

    फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही श्रीमती पिंटो नावाच्या एक महिला एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांची तक्रार जरा वेगळीच आणि काहीशी गमतीशीर होती !श्रीमती पिंटोच्या चेहऱ्यावर गेली दोन वर्षे पुटकुळ्या उठत होत्या पण पुटकुळ्यांची पद्धत अशी की त्या शनिवार-रविवारी अगदी फुलून येत आणि नंतर आपोआप हळूहळू मावळून जात ! गुरुवार शुक्रवारपर्यंत चेहरा स्वच्छ होऊन जाई. नंतर पुन्हा शनिवारी चेहरा भरून जाई.

    पिंटो अगदी वैतागून गेल्या होत्या. त्यांनी दोन वर्षात अनेक उपचार करून पाह्यले. तपासण्या, क्रीम, घरगुती औषधे सगळं झालं पण शनिवार-रविवार पुटकुळ्या चेहऱ्यावर आपल्या हजर ! त्यांना तपासले खरं, पण मलाही काय करावं प्रथम समजेच ना ! त्यांनी ठरवून टाकलं होतं, आता हा शेवटचाच उपाय. यापुढे उपचार बंद. त्यांचा निर्णय कळल्यामुळं माझीही जबाबदारि वाढली होती. मी पहिल्या प्रथम माझा सुरुवातीचा उपचार केला आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाबद्दल विचारलं.

    त्यांचे पती मुंबईला एका बड्या आंतराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्युटिव्ह होते. ते पुण्याला शनिवार-रविवारी यायचे. दोन दिवस कुटुंबात राहून सोमवारी परत मुंबईला जायचे.मिस्टर पिंटो पुण्याला आले की त्यांना भेटायला घेऊन येण्याबद्दल मी मिसेस पिंटोना सांगितलं. नंतरच्या शनिवारी पतिपत्नी दोघं कन्सल्टिंरुममध्ये आले. ते आत येताच इंपोर्टेड सेंटचा मंद सुवास रुममध्ये पसरला. ती दोघं बसली. पिटोंच्या अंगावरचा वास मला अस्वस्थ करू लागला. वास आवडला नाही म्हणून नाही; तर हा सेंटच मिसेस पिंटोच्या पुटकुळ्यांना कारणीभूत असेल काय असा विचार मनात आला म्हणून !
    मिस्टर पिंटोंना या आफ्टर शेव्हलोशनची खूप आवड. ते शानिवार-रविवार पुण्याला आले की साहजिकच ते इथंही दाढी केल्यावर हे लोशन वापरीत असणार !

    दोन दिवस पत्नीच्या सहवासात काढून ते सोमवारी जात. म्हणजे त्यानंतर शनिवारपर्यंत मिसेस पिंटो एकट्याच.मिस्टर पिंटोंना मी सांगितलं की तुम्ही पुण्याला पुन्हा आलात की दोन दिवस हे आफ्टर शेव्ह लोशन वापरू नका.त्यांनी तसं केलं. दोनच दिवसांनी मिसेस पिंटो आनंदी चेहेऱ्यानं आल्या आणि सांगू लागल्या, ‘ हा शनिवार-रविवार पुटकुळ्या आल्या नाहीत !

    अशा तऱ्हेच्या कितीतरी केसेस सांगता येतील. लोशन, क्रीम यासारख्या सौंदर्यप्रसाधनांमुळे कितीतरी स्त्रीपुरुषांना त्रास भोगावा लागत असतो. पण ते जागरूक राहत नाहीत.सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधं आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकानं विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्पपरिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासच होईल.

    नेहमी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधनं खाली उल्लेख केलेली प्रसाधनं नेहमी वापरलं जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.

    (१) हेअर डाईज :
    आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारी कितीतरी माणसं असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरलं जातं. बऱ्याच पेशंटच्या बाबतीत ते सैतानी उपद्र्व देणारं असते ! असे कलप वापरल्यानं चेहेरा सुजणं, लाल होणं, तसंच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होताट. दीर्घ काळापर्यंत हे कलप वापरल्यामुळ या व्याधी व्यक्तीला कायमच्या चिकटतात.
    कलप वापरल्यानं त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत. मेंदी हा नैसर्गिक कलप असून अत्यंत कमी धोकादायक आहे.

    (२) शांपू :
    अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसंच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होत जाते. आणि केस गळायला लागतात.

    (३) साबण :
    बहुतेक सर्व साबणांमध्ये कॉस्टिक सोडा वापरलेले असते. विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.

    (४) केसांचे सुगंधी तेल :
    जर कुणाला सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असेल, तर त्यांनी सुगंधी तेल न वापरणंच इष्ट असतं. कित्येकांना अशी तेलं वापरल्यानं डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात. आयुर्वेदिक साबण व सौम्य तेलं विशेषतः खोबरेल तेल वापरणं हितकारक असतं.

    (५) कुंकू :
    ज्या रंगाची साडी त्याच रंगाची कुंकवाची टिकली कपाळावर हवीच, अशी हल्लीची फॅशन आहे. निरनिरळ्या रंगाची कुमकुम हल्ली बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.

    (६) मस्कारा व आय शॅडोज :
    या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळं त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.

    (७) लिपस्टिक :
    लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ अत्यंत आकर्षक आणि आव्हानात्मक दिसतात. हे खरं असलं तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.

    (८) फेस पावडार क्रीम :
    विविध प्रकारच्या फेस पावडरींमध्ये क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.

    (९) जीवनसत्त्वांचा वापर :
    आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.

    (१०) ब्लिचिंग एजंटस :
    आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. पण या खाळ्या सावळ्या रंगातही सौंदर्य असतं, तेज असतं याची कल्पना स्त्रियांना नसते. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.

    (११) नेल पॉलिश :
    सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये ‘ फॉर्मलडिहाईड लिकर ” या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं ‘ पैरानोसिया ’ म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो. आणि काहीजणींना तर नखापासून दूर असलेल्या ठिकाणी म्हणजे पापण्याजवळ इसब वगैरेसारखे विकार होऊ शकतात.
    हे सर्व वाचल्यावर कुणी घाबरून गेल्यास नवल नाही. पण या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येकीला प्रत्येक सौंदर्य प्रसाधनाची ऍलर्जी असलेच असं नाही. प्रत्येकीच्या त्वचेची संवेदनक्षमता वेगवेगळी असते. सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वीच नीट दक्षता घेतली गेली तर त्याचा त्रास होण्याचा संभव कमी होतो.

    नेहमी वापरात असलेले ब्रँड एकदम बदलून दुसरे सुरू करू नयेत. जर नवीन प्रकार वापरायला सुरुवात केल्यावर त्वचेवर काही अनपेक्षित चमत्कारिक बदल दिसले तर लगेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि तो प्रकार वापरणं बंद करावं.किंमत जास्त असलेलं अगदी परदेशी प्रसाधनही एखादीला छळू शकतं. तेव्हा आणि अपाय यांचा काहीही संबंध नाही. कधी कधी अगदी साधं मलमसुद्धा त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा निसर्ग आणि नैसर्गिक उपचार हेच खरं. पाण्यानं स्वच्छ धुतलेला चेहरा नेहमीच टवटवीत दिसत नाही का ? तेव्हा आपल्याचं सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रसाधनांचा उपयोग न केलेलाच बरा.

    आरोग्यम् धनसंपदा