वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंटड्ढोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी रेटिनाची तपासणी केली पाहिजे. रेटिनाची तपासणी हे एक स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांत औषध टाकून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या केल्या जातात. नंतर इनडायरेक्ट किंवा क्वचित डायरेक्ट ऑफथॅलमोस्कोपद्वारे रेटिनाची पाहणी केली जाते. रेटिनाचे फोटोग्राफ फंड्स कॅमे-याद्वारे घेता येतात. एक औषध शिरेत देऊन रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीही केली जाऊ शकते. कशा प्रकारे तपासणी केली त्यापेक्षा तपासणीत काय दिसले हे महत्त्वाचे. आपल्या रेटिनाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, त्याच्या निरनिराळ्या लेअर्स असतात. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. यावर आर्टरीज आणि व्हेन्स (रक्तवाहिन्या) ठराविक पद्धतीने पसरलेल्या असतात. रेटिनाच्या बाहेरील बाजूस कोराईड व डोळ्यांबाहेरील आवरण म्हणजे स्कलेरा असतो. रेटिना संवेदनशील असून त्यावर पडलेल्या प्रतिमेस ज्ञानतंतूंद्वारे ऑप्टिक डिस्कमधून ऑप्टिक नव्र्हद्वारे मेंदूस माहिती दिली जाते. ती आपणास दिसते.
लक्षणे : या रेटिनावर मॅक्यूला नावाचा अतिसंवेदनशील भाग असतो. त्याच्या मध्यास फोबिया नावाचा सर्वांत जास्त संवेदनशील भाग केवळ काही मायक्रॉनच्या साईजचा असतो. या भागावरच संपूर्ण दृष्टीची तीव्रता अवलंबून असते. मधुमेहामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे रेटिनावर जागोजाग रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. काही ठिकाणी पांढरा पदार्थ तयार होतो. ब-याच ठिकाणी अत्यंत बारीक नव्या रक्तवाहिन्या तयार होतात (निओ व्हॅस्क्युलॅरायझेशन). या अत्यंत नाजूक असतात. म्हणून त्या फुटतात. त्यामुळे रेटिनावर रक्तस्राव होतो. वारंवार होणारे रक्तस्राव, व्हाईट एक्झिडेट्स आणि नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या यामुळे मेंबरेन तयार होते. हे मेंबरेन आकसून गेल्यास ते रेटिनाला ओढते. त्यामुळे रेटिना आपोआप बाजूला सरकतो. यास डिटॅचमेंट ऑफ रेटिना असे म्हणतात.
उपचार : हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य वेळी रेटिनाची तपासणी केल्यास या रक्तवाहिन्यांवर लेसर किरणोपचार करून त्यांना फुटण्यापासून थांबवता येते. तसेच जाणारी दृष्टी रोखता येते. आज जगात मोतीबिंदू नंतर अंधत्व भिंगारोपण शस्त्रक्रियेने कायमस्वरूपी दूर करता येते; पण रेटिनोपॅथीने आलेले अंधत्व पूर्णपणे दूर करता येत नाही, तर दृष्टीस येणारे नुकसान थांबवता येते. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेसर उपचारास फार महत्त्व आलेले आहे. ब-याच वेळेस हा उपचार वारंवार करण्याची गरज भासते. जागतिक पातळीवर व्हिजन २०२०, तर भारतात केंद्र सरकारने याला अंधत्व निवारणात खूप महत्त्व दिले आहे. यासाठी सरकारी पातळीवर बरेच कार्यक्रम राबवले जात आहेत. हा उपचार अत्यंत सुलभ आणि रुग्णास त्रास न होता करता येतो. यात कोठेही कापाकापी किंवा जखम होत नाही. योग्य उपचारांनंतर रुग्णास लवकर घरी जाता येते. डोळ्यांना पट्टी किंवा चष्मा लावण्याची गरज नसते. मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा उपचार करू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वजन वाढू नये, यासाठी अनेक पदार्थ जेवणात टाळले जातात. पण याशिवाय जेवणाची वेळही आपलं वजन वाढवू शकते, असं एका संशोधनातून पुढे आलं आहे. रात्री उशिरा जेवल्यास वजन वाढू शकतं, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील ‘सॉल्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीज’ यांच्या नुसार रात्री जेवताना एकीकडे इंटरनेटवर काम करत असाल किंवा टीव्ही बघत असाल, तर तुमचं वजन वाढू शकतं. “दिवसातील काही काळ आपले आतडे, मांस पेशी आपल्या कामाची परीसीमा गाठत असतात. इतर वेळी त्या सुषुप्तावस्थेत असतात. या प्रत्येक अंगाची एक वेळ ठरलेली असते. ही वेळ चयापचय चक्र ठरवत असते. जेव्हा इंदिर किंवा माणूस रात्री अपरात्री आहार घेतात, तेव्हा त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो.” यामुळेच अवेळी आहार घेतल्यास वजन वाढतं आणि शरीर बेढब होत जातं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कुठल्याही त्रासदायक गोष्टीला आपण डोकेदुखीची उपमा देतो, याचे कारण हेच, की डोकेदुखी चालू झाली तर माणूस अक्षरशः हतबल होतो. त्याची कार्यशक्ती, विचारशक्ती, इतकेच नव्हे, तर आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेण्याचे त्याचे सामर्थ्यही रसातळाला जाते. अर्धशिशी किंवा मायग्रेन ही अशाच प्रकारची वेदना आहे. अशा प्रकारची डोकेदुखी- मज्जातंतूंच्या दाहामुळे होत असली तरी हा दाह का होतो, याचे अचूक कारण वैद्यकीय शास्त्राला अजून तरी ज्ञात नाही. या विकारामध्ये डोके मध्यम किंवा अति ठणकणे (काही लोकांमध्ये डोक्या ची एकच बाजू, तर ४० टक्के लोकांमध्ये डोके पूर्ण ठणकते.) या वेदनेबरोबरच उलटी होणे, मळमळणे, प्रकाश सहन न होणे, आवाज सहन न होणे, शांत अधाऱ्या खोलीत झोपून राहावेसे वाटणे, अस्वस्थता वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. कुठलाही उपाय न केल्यास असा त्रास साधारणतः २ ते ४८ तासांपर्यंत राहू शकतो आणि नंतर त्याची तीव्रता आपोआपच कमी होत जाते. डोके दुखल्यानंतर थकवा, चिडचिडेपणा जाणवू शकतो व नंतर काही दिवस वेदना झालेला डोक्यााचा भाग दुखरा जाणवतो. अर्धशिशीचे अचूक कारण जरी माहीत नसले तरी वातावरणातील घटक, ऊन, हवा, वारा आणि आनुवंशिक घटकही कारणीभूत असतात, असे दिसून आले आहे. भावनातिरेक व नैराश्य, हीही भर घालणारी महत्त्वाची कारणे आहेत. याखेरीज पौगंडावस्थेत जेव्हा हॉर्मोनल बदल शरीरात घडून येतात तेव्हाही हा त्रास होऊ शकतो. स्त्रियांमध्ये ही व्याधी पुरुषांपेक्षा जास्त आढळते. सतत डोके दुखरे राहणे, ठणकणे, आवाज, प्रकाश अजिबात सहन न होणे, कोणत्याही कारणामुळे - झोप जास्त झाली म्हणून किंवा जागरण झाले म्हणून - अशा प्रकारचा त्रास होणे, यामुळे माणसाच्या जीवनमानावर काय परिणाम होतो, याची आपल्याला चांगलीच कल्पना येऊ शकते. वेदनाशामक औषधांनी दुखणे तात्पुरते थांबते; पण प्रवृत्ती मात्र जात नाही आणि वर्षानुवर्षे तोच त्रास होत राहतो. मात्र काही चाचण्या करूनही अर्धशिशीच आहे आणि इतर कोणत्याही प्रकारच्या व्याधीमुळे होणारी डोकेदुखी नाही, हे निश्चिूत करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक चाचण्या होऊनही रोगाचे निदान किंवा मूळ कळत नाही. डोकेदुखी तर पाठलाग करते. अशा वेळी होमिओपॅथी रुग्णाच्या मदतीला येते. रुग्णाला त्रास तर होतोच आहे, परंतु निदान तर होत नाही किंवा रोगाचे मूळ कारणही समजत नाही, अशी परिस्थिती अनेक वेळा येते. अशा वेळी परिणामकारक उपचार उपलब्ध करून देणे हा होमिओपॅथीचा विशेष आहे. मायग्रेन ही अशाच प्रकारची व्याधी- ज्यामध्ये वेदनेचे मूळ कारण कळत नाही, पण अशा व्याधीमध्ये रुग्णाच्या शारीरिकतेचा आणि मानसिकतेचा पूर्ण अभ्यास करून रामबाण उपाययोजना करता येते. अशा वेळी साधारणतः तीन ते चार महिने एकसंध उपचार घेणे गरजेचे ठरते. होमिओपॅथीतील नक्साव्हीमिका, बेलाडोना, ब्रायोनिया ही आणि यासारखी औषधे उपयुक्त आहेत. हळूहळू डोके दुखण्याची तीव्रता आणि वारंवारता कमी होते. डोके दुखण्याची प्रवृत्तीही कमी कमी होत जाते. कुठल्याही कारणाने डोके दुखेल, ही भीती हळूहळू नाहीशी होऊन रुग्णाचा आत्मविश्वा स वाढतो आणि डोके धरून चिंतातुर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर हळूहळू हास्य फुलायला लागते. होमिओपॅथी मूळ किंवा कारण न कळणाऱ्या रोगांसाठी वरदान आहे. सर्व उपचार पद्धतीबाबत आपला दृष्टिकोन आपण व्यापक, सजग ठेवायला हवा आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी जरूर घ्यायला हवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. अपर्णा पित्रे
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.
कारणे
श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.
लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो.
कर्करोगासाठी घशाची 'आतून' आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा लागतो. उपचाराने कोरडा खोकला 10-15 दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे पाठवावे.
उपचार
कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.
आयुर्वेद
अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.
आयुर्वेदिक घरघुती उपचार
फुफ्फुसाशी निगडीत दमा, खोकला, अॅलर्जी, सायनस, आदींना दूर ठेवण्यासाठी काही दैनंदिन वापरात येणाऱ्या आयुर्वेदिक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. काही पदार्थ आपल्या घरातच असतात.पण आपल्याला त्यांचा वापर कसा करावा, हे माहित नसते.
• आले – आले – सुंठ हे फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले असते. सुंठ उगाळून खडीसाखर घालून आणि शिजवून तयार केलेले चाटणाचे पाक खोकला असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास बरे वाटते. वारंवार सर्दी होणाऱ्यांना आणि दमा असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर केल्यास फुफ्फुसासाठी चांगले असते.
• ज्येष्ठमध - ज्येष्ठमध फुफ्फुसासाठी उत्कृष्ट औषध आहे. ज्येष्ठमधाचा काढा घेतल्याने खोकला बरा होतो.
• तुळस – तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीती भरलेला कफ सुटण्यास मदत होते.तुळशीची पाने चावून खाल्ल्यास श्वसनाचे आरोग्य सुधारते.
• लवंग – लवंग चघळण्याने दम लागत नाही. लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते.
• गवती चहा – गवती चहा, ज्येष्ठमध,दालचिनी, तुळस, पुदीना यांचा काढा थोडीशी साखर घालून पिण्याने ताप, खोकला,सर्दी कमी होतो.श्वासाशी संबंधित असलेले त्रास होत नाहीत.
• रुईची पाने – रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे, श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. दम लागत असल्यास, छातीत कफ भरला असल्यास अगोदर ताल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात आणि कफ दोष संतुलित होतो.
• ओवा – ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो.
अशाप्रकारे आयुर्वेदिक घरघुती उपचार केल्यास आजर किंवा व्याधीदूर होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
-- विनीत मासावकर यांनी लिहिलेली ही पोस्ट आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन घेतली आहे.
सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे.
ऍलर्जीमुळे "सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो?
सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला ओलावा आणण्यास "सायनसेस‘ एक ते दीड लिटर स्राव तयार करतात; परंतु सायनसची वाट किंवा तोंड (नाकात सूज आल्यामुळे) बंद झाल्यास सायनसमधील स्राव बाहेर पडू शकत नाही. स्राव साठल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन सायनसचे "इन्फेक्शसन‘ होते. ही सूज मूलतः ऍलर्जीमुळे येते, त्यामुळे डोके दुखणे, चेहेरा व डोके जड होणे, थकवा येणे, दिवसभर निरुत्साही वाटणे, कामावरील तसेच अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व शारीरिक चलनवलन कमी होणे ही लक्षणे आढळतात.
अनेक वर्षांचा त्रास असल्यास त्याचे परिवर्तन परत परत होणाऱ्या अथवा ऱ्हिनोसायन सिटीस मध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये सर्दी दाटून पोलिप तयार होतात व सर्व प्रकारचे वास येणे बंद होते, औषधांमुळे सायनस इन्फेक्श न दूर न झाल्यास दुर्बिणीद्वारा अगदी अलगदपणे ही सायनसची तोंडे उघडता येतात; पण काही कालावधीनंतर ऍलर्जीचा कायम स्वरूपी उपचार न केल्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात. सर्दीच्या योग्य उपायांमुळे सायनस मोकळे राहते व परत परत सायनसच्या इन्फेक्शतनची शक्यचता कमी होते.
ऍलर्जी म्हणजे काय?
प्रतिकारशक्तीचे मुख्य काम म्हणजे विविध जंतूविरुद्ध शरीराचे संरक्षण करणे. याकरिता आपल्या प्रतिकारशक्तीने शरीराला धोका निर्माण करणाऱ्या व धोका न निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. ऍलर्जी म्हणजे निसर्गामधील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक ठरू शकतो. कारण या घटकांना प्रतिपिंड (antibody) तयार होऊन हिस्टामाईन नावाचे द्रव्य तयार होते.
ते कसे शोधून काढायचे?
तपासणीसाठी त्वचा सर्वांत उपयोगी पडते. ऍलर्जीची औषधे चालू नसल्यास त्वचेची चाचणी रक्ताच्या तापसणीपेक्षा चांगले निष्कर्ष देते. ऍलर्जी वरील कायमस्वरूपी उपचाराला "इम्युनोथेरपी‘ असे म्हणतात.
इम्युनोथेरपी म्हणजे काय?
या उपायांमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी होण्याकरता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.
इम्युनोथेरपीमध्ये ऍलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते. मग शरीराचा बाह्य ऍलर्जीनिक द्रव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक ते पाच वर्षे ज्या रुग्णांनी हा उपचार केलेला आहे, त्या रुग्णांमध्ये याचे दीर्घकाळ फायदे आढळून येतात. प्रत्येक रुग्णामध्ये हा उपाय पूर्णतः लागू होईलच असे नाही; पण हा उपचार केल्यास ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो किंवा औषधाची गरज कमी भासते. जे रुग्ण ठराविक द्रव्याची ऍलर्जी असूनसुद्धा त्यांना टाळू शकत नाहीत किंवा ज्यांना औषध घेऊनसुद्धा ऍलर्जीचा त्रास होत आहे. त्यांनी हा उपचार अवलंबावा यामुळे ते दैनंदिन जीवन सुखाने जगू शकतील. खाद्य पदार्थांच्या किंवा औषधांच्या ऍलर्जीसाठी मात्र हा उपाय अतिशय अवघड आहे. ऍलर्जीवर काम करणारा प्रतिबंधात्मक उपाय हा विशष उपचार केंद्रात (स्पेशल क्लिननिक)मध्ये केला जातो. नाक, सायनस, श्वारसनलिकेच्या ऍलर्जीमध्ये हा नक्कीच उपयोगी ठरतो. जिभेच्या खाली याची लस देता येते. हळूहळू लसीचे प्रमाण वाढवले की ऍलर्जीचा त्रास कमी होतो. त्रास देणारी द्रव्ये शरीरात असूनसुद्धा प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ (antigen) व प्रतिपिंड यांचा त्रास होत नाही. हिस्टामिन हे द्रव्य तयार न झाल्याने ऍलर्जीचे परिणाम दिसत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ:- सकाळ / डॉ. विनया चितळे
कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.
शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.
याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चिकुनगुनियाचा ताप हा डेंगीच्या तापाप्रमाणे असला तरीही त्याची मुदत मात्र काही महिन्यांची असते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या तापाने अनेकांना जेरीस आणले. गर्भवती महिलांमध्येही या तापाची लागण होण्याची शक्यता असते. हा ताप बरा झाला तरी त्याचे दुष्परिणाम काही काळाने पुन्हा दिसू शकतात..
चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. हा आजार जडला की दिवस आणि आठवडेच नव्हे तर काही महिन्यांपर्यंत तो रुग्णाची पाठ सोडत नाही. चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात जवळजवळ कधीच दिसत नाही.
लक्षणे:
ताप येणे, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखण्याची लक्षणेही आढळून येतात. चिकुनगुनियाचा डास चावला की सुमारे १२ दिवस त्याची सर्वसाधारण लक्षणे दिसत नाहीत. मात्र, अनेकदा सांधेदुखी जाणवते. याचबरोबर पहिल्या १२ दिवसांत डोळ्यात लाली आणि प्रखर उजेडाकडे बघण्यास त्रास जाणवू शकतो.
हात-पायांवर रॅशेस येतात. मात्र, चिकनगुनियाचे निदान करण्याचा खात्रीदायक मार्ग म्हणजे रक्ताच्या नमुन्याची चाचणी. सर्वसाधारण तीव्र ताप आणि सांधेदुखी एकत्र आली की तात्काळ ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. आरटी-पीसीआर नेस्टेड प्राईम ही रक्तचाचणी यासाठी घेतली जाते. यामध्ये या विषाणूमुळे रक्तातील काही घटकांचे विघटन होऊन त्याच्या गुठळ्या बनल्याचे आढळतात आणि चिकुनगुनियाचे निदान होते.
आजाराचे परिणाम
तरुण रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने ५ ते ८ दिवसात हा आजार बरा होतो मध्यमवयीन रुग्णांमध्ये २-३ महिने या आजाराचा त्रास होऊ शकतो तर वृद्धत्वाकडे झुकलेल्यांना वर्षभर या आजाराच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.
तातडीने रक्तनिदान करुन घेणे.
डॅाक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पथ्यांसह पूर्ण करणे
आजाराची लागण पुन्हा होऊ नये म्हणून पहिली दोन वर्षे दर सहा महिन्यांनी रक्ततपासणी करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे.
तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते.
विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे.
पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात.
स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग, आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मणक्यांभोवतीच्या पेशींना इजा होऊन त्या तुटतात तेव्हा स्लिप डिस्क हा आजार होतो. दोन मणक्यांमधील मऊ चकती हालचाल करण्यासाठी, पुढे मागे करता येण्यासाठी या पेशी मदत करत असतात. ही सरकल्यामुळे हा आजार होतो. पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांमध्ये मऊ चकती असते. ही चकती हाडांचे रक्षण करतेच; परंतु चालताना, पळताना शरीराला बसणार्याय हादर्यांुपासून मणक्याचे रक्षण करण्याचे काम करते. ही चकती दोन भागात असते. चकतीचा आतला भाग मऊ, मांसल असतो तर बाहेरचे कवच कठीण असते. कोणताही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो. यालाच स्लिप डिस्क म्हणतात. काही गंभीर स्थितीत स्लिप डिस्कचा इलाज करण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.
स्लिप डिस्क होण्याची कारणे
पाठीच्या कण्यामध्ये स्लिप डिस्कचा धोका संभावतो. कधी तरी चकतीच्या बाहेरील भाग कमजोर होतो, तुटतो त्यामुळे आतील मांसल भाग बाहेर येतो. काही वेळेला चुकीच्या हालचालींमुळेही स्लिप डिस्कचा धोका संभवतो. एखादी वस्तु उचलताना, मणका फिरला किंवा ट्विस्ट होतो, कधी अतिजड वस्तू उचलल्यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. अशा प्रकारांमुळे स्लिप डिस्कचा त्रास होतो. कमजोर स्नायू, बैठे काम यामुळेही स्लिप डिस्क होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ही समस्या भेडसावते. काही इतर गोष्टीही तुमच्या मणक्यावरील दाब वाढवतात.
* झटकन खाली वाकणे
* नोकरीत जड वस्तू उचलण्याचे काम
* गाडी चालवण्यासारखी सतत बसून करण्याची कामे
* धूम्रपान
* अतिलठ्ठ किंवा वजन जास्त असणे
* वेटलिफ्टिंग साऱखे वजन जास्त लागणारे खेळ
* गाडी अपघातात मणक्यांना होणारी दुखापत
स्लिप डिस्कची लक्षणे
* असह्य वेदना, बधीरपणा, बहुतेकदा शरीराच्या एका भागात हे त्रास जाणवतात.
* पाठीतून सुरू होणारे हे दुखणे नंतर पाय आणि हातांपर्यत येते.
* रात्रीच्या वेळी असह्य वेदना होतात
* बसताना उठताना देखील असह्य वेदना होतात.
* कमी अंतर चालून जाणे सुद्धा वेदनादायी ठरते.
* स्नायूंमध्ये कमजोरी येणे, स्लिप डिस्क झालेल्या जागी मुंग्या येणे जळणं, दुखणे,आदी लक्षणे दिसतात.
* अर्थात प्रत्येक रुग्णागणिक वेदनांचे स्वरुप बदलत जाते. जर मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे.
उपचार
आजार किती बळावला आहे, त्यावर उपचारांची दिशा अवलंबून असते. मणक्याची चकती तिच्या जागेवरुन किती सरकली आहे, यावरही औषधोपचार काय करावे हे ठरते. ठराविक व्यायामाने औषधांशिवाय रुग्णांना आराम मिळतो. पाठीच्या कण्याला ताण देण्यासारखे व्यायाम पाठ आणि स्नायूंना ताकद देतात. फिजिओ़थेरिपी ने स्लिप डिस्कमध्ये फायदा होतो. त्यातील तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्यायामाने तुमच्या पाठीचे स्नायू मजबूत होऊन तुमचे दुखणे कमी होईल.
स्लिप डिस्क आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गांभीर्य वाढून नसांना कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत स्लिप डिस्कमुळे पाय किंवा पाठीच्या नसांचा आजार होतो. त्याला कॉडा इक्विना असे म्हणतात. हा त्रास उद्भवल्यास मुत्राशय किंवा आतड्यावरील नियंत्रण गमावण्याची भीती असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. रामदास जाधव
दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत. हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्तर सुजू लागते. साधारण २ तासांनी नाकपुडी बंद होते. नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते. दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात. शरीराच्या एकाच भागावर मधूनअधून किंवा सातत्याने मुंग्या येण्याची अथवा तो भाग बधिर असण्याची भावना येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे. शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असण्याचे आहे. पक्षाघात (शरीराची उजवी अगर डावी बाजू शक्तीहीन होणे, लुळी पडणे) किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, या आजाराची सुरवात अशी होते. डोक्यााला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या आभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे (subdural nematoms) लक्षण आहे. मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जिवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते. एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्याकत दोष असल्याचे लक्षण असते. दोन मणक्यांवतील चकत्या झिजतात, त्या सरकतात, त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो. असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंज्याच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील "मीडियन' (median) शीर दाबली जात असते. कार्पल टनेल सिंड्रोम (carpal tunnel syndrome) काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटण्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व्ह कंडक्शान स्टडीज (nerve conduction studies) या तपासानंतर हे निदान निश्चिरत करता येते. मधुमेह या विकारात पायाच्या (व हातांच्यासुद्धा) शिरा कमजोर होऊ लागतात. (peripheral neuropethy). लघवीला वारंवार जावे लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली, तर लगेच रक्त-लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते. अनेक रुग्णांना तळपायाची आग होते. मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला किंवा रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते. कॅपसॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात. कॅपसॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. (capsacin). काही रुग्णांना उभे राहिले किंवा चालू लागले की पायांना मुंग्या येऊ लागतात. चालताना मधेच उभे राहण्याची वेळ आली तर पायात होणारा त्रास असह्य होऊ लागतो. आपल्या कमरेच्या मणक्याहतील चकत्या झिजून सरकल्या म्हणजे मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या चेताशिरांवर दाब येऊ लागतो, त्यामुळे हा त्रास होतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti