वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो.
आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत आणि त्यामुळे आयुर्वेद हा वेदाचा एक घटक समजला जातो. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.
आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. चरक आणि सुश्रुत संहितांचे बर्याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत.
आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही परंपरा आहे, जिची सुरूवात सुश्रुताने केली. इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणार्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदीक साहित्यांचे संश्लेषण केले ज्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळाधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला.
आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जाऊ लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बर्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. मार्गदर्शक आणि मूळ तत्वे पंचमहाभूते प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेले आहे ज्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळतत्वाचे स्वत:चे काही गुण आहेत. ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.
1. आकाश
2. वायू
3. अग्नी
4. आप
5. पृथ्वी
6. दोष
सर्व शारिरीक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात.
वात दोष
वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छवास, मनातील विचार इत्यादि गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
कफ दोष
कफ आपतत्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकार शक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक, जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि ऍलर्जि इत्यादि त्रास होतात.
पित्त दोष
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्न पचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.
-- आरोग्यदूत WhatsApp समूहातून
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो. तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संतोष जळूकर
कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील "बेसल गॉंग्लिया' नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना अनेक स्नायूंचे कित्येक सेकंद टिकणारे आकुंचन होत राहते. परिणामी व्यक्तीचे श्व सन दीर्घ पूरक स्थितीत जाते म्हणजे श्वाचस आत घेण्याची क्रिया नेहमीच्या श्वावसोच्छ्वासापेक्षा लांबते. त्याच वेळी घशाचा आकार विस्तारतो. खालचा जबडा व जीभ खाली जाते. दीर्घ श्वासस घेण्याने फुफ्फुस व पोट यातील पडदा (डायफ्रॅम) पोटाकडे सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीत ऋण भार (negative pressure) तयार होतो. शरीरातील नीलांमधील रक्त छातीकडे (हृदयाकडे) जाते. त्यामुळे हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा सुधारतो. दीर्घ श्वीसनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे फुफ्फुसातील बंद कोष उघडले जातात.
आपल्या नेहमीच्या किमान 40 टक्के फुफ्फुसातील कोष कार्यान्वित होत नसतात. अशा न उघडलेल्या कोषातून प्राणवायूची देवाणघेवाण होत नाही. प्राणवायू कमी असणारे रक्त तसेच हृदयाकडे परत जाते व रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. मधूनच दीर्घ श्वेसन झाले तर हा दोष टळतो. अनेकदा हॉस्पिटल्समध्ये अति दक्षता भागात रुग्णांना कृत्रिम श्वास होणाऱ्या "व्हेंटिलेटर' र्(ventilator) मशिनवर ठेवले जाते. या वेळी रुग्णाला जांभई येत नाही. त्यामुळे बंद असणाऱ्या कोषातील "अशुद्ध' (म्हणजे प्राणवायू कमी असणारे) रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तात मिसळते. परिणामी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घसरते. तसे होऊ नये म्हणून जास्त दबावाने प्राणवायू देणयाची प्रथा आहे. कधी कधी खूपच जास्त दबावाखाली प्राणवायू वापरावा लागतो. हायपर बॅरिक ऑक्सि न चेंबर(hyper baric oxygen chamber) जांभई येताना चेहऱ्यावरचे स्नायू व हाताचे स्नायूदेखील कार्यान्वित होतात.
या क्रियांनीदेखील रुधिराभिसरणाला चालना मिळते. शिवाय स्नायूंच्या आत असणाऱ्या काही मज्जा-स्वीकारांना (sensory receptors) चालना मिळते. यांच्यामधून मज्जारज्जूत व मेंदूत जाणाऱ्या चेतनांमुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. ही झोपेची पूर्वतयारी आहे. हाताच्या स्नायूंचे हे काम मेंदूच्या हालचाल केंद्राच्या (motor cortex) ताब्यात नाही. एखाद्या व्यक्तीला पक्षाघात (hemiplegia) झालेला असला तर ती व्यक्ती आपला (उजवा किंवा डावा) हात स्वेच्छेने हलवू शकत नाही. कारण या हालचाल केंद्राचा व हात हलविण्यास जबाबदार असणाऱ्या मज्जारज्जूतील पेशींचा संबंध दुरावलेला असतो. अशा व्यक्तीला जांभई आली तर मात्र हात उचलला जातो, ताणला जातो. हीदेखील बेसल गॉंग्लियामधून देखरेख केलेली एक प्रतिक्षिप्त क्रियाच असते. असा लुळा पडलेला हात जांभईच्या वेळी हलताना पाहून पाहणाऱ्याला नवल वाटते.
उत्क्रांत होत असताना अनेक श्वानपदांना आपल्या संरक्षणासाठी वास घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या प्रमाणात श्वा स घेण्याने बरीच हवा नाका -घशात जाते. या भागात नेहमी होणारी हवेची हालचाल संथ गतीने व कमी घनफळाची असते. त्यातील वाढीमुळे वास घेण्याची क्षमता वाढते. झोप येण्यापूर्वी आपल्या आसपास धोकादायक श्वावपदाचे अस्तित्व जाणणे प्राणिमात्राच्या जीवन-मरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. हा गुणधर्म सर्व प्राण्यांत दिसतो व मानवातदेखील उतरलेला आहे. झोप येण्यापूर्वी जांभया येऊ लागतात. ही क्रिया अनैच्छिक प्रतिक्षिप्त असते. कंटाळा येणे ही मानसिक प्रक्रिया झोप येणे या शारीरिक क्रियेशी संबंधित आहे.
ज्या वातावरणात मन रमू शकत नाही (कंटाळवाणे व्याख्यान) तेव्हा मनाला तेथून दूर जावेसे वाटते. पण सांस्कृतिक आणि इतर कारणांनी शरीर तेव्हा दूर जाऊ शकत नसले तर मन त्या वातावरणातून दूर एखाद्या कोषात गेल्याप्रमाणे लक्ष काढून घेते. म्हणजेच मनाची झोप सुरू होते. मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या जांभया येऊ लागतात. क्वचितच जांभया येणे हे एखाद्या मेंदूच्या विकाराचे लक्षण असते. फेफरे (epileptic fit) येणाऱ्या रुग्णाला फिट येण्यापूर्वी जांभया येऊ लागणे शक्या असते. मेंदू-ज्वर या आजारातदेखील रुग्णाला सारख्या जांभया येतात. अफू हा एक मादक पदार्थ आहे. त्याचे नियमाने सेवन करणाऱ्या व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. अशा व्यक्तीला अफू मिळाली नाही किंवा मादक पदार्थांचे परिणाम नष्ट करण्याची औषधे दिली तर सतत जांभया येऊ लागतात. जांभई येणे हा जरी वैश्विणक अनुभव असला तरी त्याबद्दल संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अजून मिळालेली नाही. व्यवहारात असे दिसते की कोणत्याही कारणाने रात्री झोप न मिळाल्यास दिवसा सारख्या जांभया येतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई
आपण नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती.
माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर केला जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे.
नॅचरोपॅथीचे डॉक्टर रोग्याच्या जीवन पध्दतीकडे जास्त लक्ष देत असतात. नॅचरोपॅथी मध्ये फिजीकल, फिजीकोलॉजीकल, तसेच स्पिरिच्यूअल घटक आजारामध्ये लक्षात घेतले जातात.
नॅचरोपॅथीमध्ये रोग्यावर उपचार करताना अनेक अल्टरनेटिव्ह थेरेपीचा वापर करतात उदा. होमिओपॅथी, हर्बल रेमिडीज, पारंपारीक चायनीज औषध उपचार, डाएट आणि न्युट्रिशन, योग, अॅक्युप्रेशर, हायड्रोथेरेपी, मॅगनेट थेरेपी, मसाज आणि व्यायाम.
नॅचरोपॅथी चे डॉक्टर अधिकृत नॅचरोपॅथी मेडिकल स्कुल मध्ये शिक्षण घेतलेले असतात. पहिले वर्ष सामान्य वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण दिले जाते त्यानंतर शेवटच्या वर्षात नॅचरल हिलींग टेक्निकवर शिक्षण दिले जाते.
निसर्गोपचार ही आरोग्याची अशी एक नैसर्गिक उपचार पध्द्ती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेते.
पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी, रोगांसाठी आणि उपचारांसाठी ज्या पध्दती उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक निसर्गोपचाराची पध्दत उत्तम आहे. यात जीवन जगण्याच्या सगळ्या तत्वांचे एकीकरण झाले आहे आणि हीच एक पध्दत अशी आहे की जी मानवाला त्याच्या आजच्या वाढत्या रोगराई पासून आणि त्यापासून निर्माण होणा-या धोक्यातून बाहेर काढू शकते. जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या तत्वांचा या पध्दतीत वापर केला जातो.
तुम्ही तुमचे आरोग्य विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला योग आणि नैसर्गिक आरोग्याच्या मदतीने उभे करावे लागते. येथे आरोग्याची बांधणी करावी लागते विकत नाही घेता येत. औषधांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्यांचे जे इतर परिणाम होतात, ते शरीराला हानिकारक असतात. सामान्य जनतासुध्दा आता या मुद्यावर सावधपणे विचार करत आहे. निसर्गोपचार पध्द्ती ही सर्वश्रेष्ठ उपचार पध्द्ती आहे हे आता ते मान्य करु लागले आहेत. या उपचार पध्दती बरोबर पातांजली योगसूत्रांचा वापर केला पाहिजे. ती योगसूत्रे या प्रमाणे - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामुळे तुम्हाला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल. आत्मविश्वास संपादन करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी यांचा उपयोग होईल.
डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई
9820584716
आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते.
स्वभाव व मानसिकता : कित्येक लोकांचा स्वभाव मुळात असमाधानी व अति महत्त्वाकांक्षी असतो. ते थोडय़ा वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात व वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अॅिड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.
मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अॅसड्रिनालीन व नॉरेअॅ ड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.
‘अ’ व्यक्तिमत्त्व (Type A-Personality) असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत ‘निकोटिन’ व ‘कार्बन मोनोक्साइड’ ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे नॉरेअॅकड्रिनालीन या स्स्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.
मद्यपान : मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते.
मिठाचा अतिरेक : जे लोक मिठाचा अल्प प्रमाणात उपयोग करतात त्याचा रक्तदाब हा कमी किंवा नॉर्मल असतो. त्याच्याविरुद्ध ज्या व्यक्ती मिठाचा अतिरेक करतात, त्यांना अति रक्तदाब असण्याचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनक्षील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने जर आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर अशा रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल होऊ शकतो, किंवा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (ATHEROSCLEROSIS)
जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांच्या आंतरस्तरावरील दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात आनुवंशिकता, वाढणारे वय, रक्तातील चरबीचे अतिप्रमाण, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा व बैठे जीवन आणि ताण-तणावाचे जीवन या गोष्टींचा समावेश होतो.
लठ्ठपणा, अतिरक्त वजन :
स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा लहान वयातच सुरू होऊ शकतो. तसेच जर अशा लोकांनी वजन कमी केल्यास त्यांचा अति रक्तदाब थोडय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.
अति रक्तदाबाची लक्षणे
अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ (Silent Killer) आहे, असे म्हटले जाते. कारण बऱ्याचदा मनुष्याला अति रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. बऱ्याच वेळा इतर काही आजारांसाठी मनुष्य डॉक्टरकडे जातो आणि तपासणीचा एक भाग म्हणून डॉक्टर रक्तदाब तपासतात, तेव्हा तो वाढलेला आढळतो, अशा वेळी अति रक्तदाबाचे निदान होते.
अति रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.
* सतत डोके दुखणे, जड वाटणे.
* चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.
* छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.
* लैंगिक सामथ्र्य कमी होणे.
रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.
* दृष्टिदोष, कमी दिसणे, अंधूक दिसणे
* नाकातून रक्तस्राव होणे.
* हातापायावर सूज येणे.
* किंवा कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम
१) हृदयाची अकार्यक्षमता :
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.
उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
२) मूत्रपिंडावर परिणाम :
उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.
३) इतर दुष्परिणाम :
अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.
उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.
अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)
अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.
रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.
* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.
* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.
* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY असे म्हणतात.
* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अॅावोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.
अति रक्तदाबाचे उपचार
अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.
वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.
रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.
१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.
२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.
३) वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते.
चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.
स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.
* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
४) व्यायाम आणि योगासने :
* वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
* भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.
* अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.
* योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.
‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.
ताण-तणाव कमी करणे
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.
नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.
क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.
मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.
दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी. ‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी
साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसाचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो.
सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो.
फक्त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.
वजन वाढले की भात खाणे सहसा बंद केले जाते. मात्र देशी वाणाचे, साठेसाळी, रक्तसाळी, जिरगा, काळी गजरी वगैरे तांदूळ पचायला सोपे असतात, त्यातही जर शिजविण्यापूर्वी ते थोड्या तुपावर परतून घेतले व कुकरऐवजी भांड्यामध्ये शिजवले, तर ते कफ-मेद वाढवत नाहीत.
रोज सकाळी तांदळाचा मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्ती कृश होते.
"उकळलेले गरम पाणी‘ हासुद्धा वजन कमी करण्यासाठी सोपा; पण प्रभावी उपाय होय. एकंदर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जे पाणी उकळून घ्यायचे ते साधारणतः 15-20 मिनिटांसाठी उकळणे अपेक्षित असते. आयुर्वेदातील शारंगधर संहितेत उष्णोदक म्हणजे पाणी उकळण्याची विशेष पद्धत दिलेली आहे.
अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत् ।।
श्लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम् ।
कासश्वासज्वरहरं पीतमुष्मोदकं निशि ।।...शांरगधरसंहिता
अगोदर गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पातेल्यात ठेवून अष्टमांश, चतुर्थांश किंवा अर्धे शिल्लक राहीपर्यंत अग्नीवर उकळावे व गरम असतानाच प्यायला द्यावे. हा पाण्याचा काढा वात व कफदोष शमवतो, अवाजवी वाढलेला मेद कमी करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, अग्निदीपन करतो, खोकला, दमा व तापामध्ये हितकारक असतो. ताप आलेला असताना तसेच जुलाब होत असतानाही या प्रकारचे पाणी पिण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
लठ्ठपणामध्ये मिठावर सुद्धा निर्बंध येतात. अति प्रमाणात मीठ कोणासाठीच चांगले नाही, पण अजिबात मीठ बंद करून वरून मीठ घेणे किंवा कच्चे मीठ खाणे टाळणे चांगले. मात्र अन्न शिजवताना चवीपुरते सैंधव वापरण्यास हरकत नाही. याखेरीज आयुर्वेदिक अन्नयोग संकल्पनेवर आधारित पुढील काही नियम लठ्ठपणा कमी करण्यासाठी लक्षात घ्यावे लागतील.
अध्यशन न करणे - एकदा खाल्ले की ते अन्न पचण्यापूर्वी पुन्हा काहीही न खाणे. दोन खाण्यांमध्ये किमान 3-4 तासांचे अंतर असणे अपेक्षित होय.अहिताशन न करणे - स्वतःच्या प्रकृतीला अहितकर ते अहिताशन होय. स्थूल व्यक्तींनी प्रकृतीचे व कफ-मेदाचे भान ठेवून सुरवातीला सुचविलेल्या पथ्यकर गोष्टी सेवन करणेच आवश्यक.मात्रानिश्चिती - प्रत्येकाने अन्नाची मात्रा अग्नीच्या पचनसामर्थ्याच्या सापेक्षतेने ठरवायची असते.त्यामुळे लठ्ठपणातही पथ्यकर आहार, फार कमी नाही व फार जास्ती नाही अशा योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर असते. त्यातही द्रवपदार्थांवर भर दिला उदा., सकाळी फक्त भाताची पेज, रात्री फक्त सूप तर वजन कमी होण्यास निश्चित हातभार लागतो.अनाठायी डायट करून उपासमार करून घेण्याऐवजी या प्रकारे आहाराचे नीट नियोजन, आचरण, व्यायाम, औषधोपचार यांची सुयोग्य जोड दिली तर लठ्ठपणाची भीती राहणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
पोटात दुखणे, गुदद्वारा (अॅनस) जवळ खाज येणे ही सामान्य लक्षण वाटू शकतात. परंतू ही सारी ‘हर्निया’ या आजाराची लक्षणं असू शकतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. काही शस्त्रक्रिया, लठ्ठपणा,बद्धकोष्ठता, कमजोर स्नायू यामुळे हर्निया जडू शकतो. प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळणार्या् या आजारावर शस्त्रक्रियेने वाढलेला भाग किंवा स्क्रिन काढणे हाच उपाय उपलब्ध आहे. म्हणूनच वेळीच ओळखा हर्नियाची खालील लक्षणं
पोटाजवळ किंवा गुदद्वाराजवळ फुगवटा आल्यासारखे वाटल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा.
मांडीजवळ किंवा गुद्द्वाराजवळ खाज येणे ही हर्नियामधील सुरवातीच्या ट्प्प्यातील लक्षण आहे. त्यामुळे ही लक्षण दुर्लक्षित न करता वेळीच उपचार केल्यास हर्निया रोखण्यास मदत होते. मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडणे किंवा त्या भागाजवळ ताण येत असल्यास वेळीच लक्ष द्या. यासोबतच मळ्मळणे किंवा उलट्या होणे ही हर्नियाची लक्षण आहेत. हायएटल हर्निया ( hiatal hernia) हा पोटाच्या वरच्या बाजूला होतो. यामध्ये पित्त होणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणं आढळतात.
बेंबी, मांडी, गुदद्वाराजवळ वेदनादायी फुगवटा जाणवत असल्यास ते हर्नियाचे लक्षण आहे.
तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासासोबत मलविसर्जनातून रक्त जाणे हे पोटाजवळील हर्नियाचे लक्षण आहे. अशावेळेस उठता-बसताना ताण आल्याने तेथील स्क्रीन अधिक वाढू शकते.
झोपल्यावर पोटाजवळचा फुगवटा जाणवत नाही मात्र उभे राहिल्यावर किंवा पोटावर दाब दिसल्यास पुन्हा जाणवणे हे दुर्लक्षित करू नका. त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हर्नियाचे विविध प्रकार आढळतात मात्र त्याची लक्षणं ही सारखीच असतात. फार उशीर न केल्यास वाढणारा फुगवटा कमी करणे शक्य आहे. त्यामुळे आजाराबाबत अधिक भीती बाळगून किंवा शरम वाटून हा आजार लपवू नका. यामुळे भविष्यात त्यातील गुंतागुंत अधिक वाढत जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते.
सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते.
दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे .
अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे.
हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते.
ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते . कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे.
रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.
दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.
दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते.
दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे.
रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.
सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे सूक्ष्म कण श्वाीसामार्फत सरळ शरीरात जाऊ नयेत यासाठी नाक या अवयवाची रचना केलेली आहे. नाकाच्या आतील बाजूला चिकट अस्तर असते, यामध्ये हवेतील अशुद्धता, बारीक कण अडकून राहू शकतात व आत जाण्यापासून थोपविले जाऊ शकतात. नाकाच्या मध्यभागी असणाऱ्या मांसल पडद्यावर अतिसूक्ष्म व खूप मोठ्या संख्येने रक्तलवाहिन्या असतात, यामुळे श्वा्सावाटे आत जाणारी हवा किंचित दमट व उबदार बनविली जाते. वासाचे ज्ञान करविणाऱ्या विशेष ग्रंथी नाकाच्या वरच्या एक तृतीयांश भागात असतात व तेथून गंधाचे ज्ञान मेंदूपर्यंत पोचवले जाते. नाक खाली घशाशी व वर सायनसच्या मार्फत डोळ्यांशी जोडलेले असते, तसेच त्याच्याही वर मेंदूशी संबंधित असते. म्हणूनच नाकाची नीट काळजी घेणे अत्यावश्यजक असते.
गवती चहाचा काढा
नाकाशी संबंधित सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेला त्रास म्हणजे नाक चोंदणे व सर्दी होणे. वरवर पाहता साधा वाटला तरी यामुळे व्यक्तीक बेजार होऊन जाऊ शकते. वारंवार सर्दी-पडसे होणे हे शरीराची रोगप्रतिकारशक्तीह कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. अशा वेळी दीर्घ काळपर्यंत उपचार घ्यावे लागतात. साध्या सर्दीवर मात्र लवकरात लवकर सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह घेणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, गवती चहाचा काढा घेणे यासारखे उपाय करता येतात. गवती चहाचा काढा पुढीलप्रमाणे बनवता येतो.
पाणी - दोन कप
गवती चहा - दोन पाती
किसलेले आले - अर्धा चमचा
दालचिनी - एक इंच तुकडा
तुळशीची वा पुदिन्याची पाच-सहा पाने
हे सर्व एकत्र करून मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. एक कप उरल्यावर त्यात चवीपुरती साखर टाकून गरम गरम पिण्याने सर्दीची लक्षणे कमी होतात, तापासारखे वाटत असल्यासही बरे वाटते.
नाक चोंदत असल्यास दोन-तीन थेंब पातळ केलेले साजूक तूप नाकात टाकणे चांगले. यामुळे सहसा लगेच नाक मोकळे होते व श्वा स घेणे सोपे होते.
नाकाभोवतीच्या पोकळ्यांमध्ये सर्दीमुळे किंवा अन्य जंतुसंसर्गामुळे अवरोध तयार झाल्याने कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. यालाच सायनोसायटिस असे म्हटले जाते. यावर गरम पाण्याचा वाफारा घेणे, ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे, रुईच्या गरम पानाने शेकणे यासारखे उपाय करता येतात. दालचिनी, लवंग, चंदन, केशर वगैरे द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप सायनसवर लावण्यानेही आराम मिळू शकतो.
घोळणा फुटला तर
नाकातून रक्तट येणे अथवा घोळणा फुटणे हे लक्षणही बऱ्याचदा आढळते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षण अधिक प्रमाणात आढळते. मात्र उन्हाळ्यात, शरद ऋतूत, पित्त वाढले असताही नाकातून रक्ती येणाऱ्या व्यक्तीध असतात. वारंवार नाकाचा घोळणा फुटत असल्यास त्वरेने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, मात्र प्राथमिक उपचारात व्यक्तीअला आडवे झोपवणे, नाकावर, कपाळावर व डोक्या वर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे यासारखे उपाय करावे लागतात. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद, धात्री रसायनसारखे शीतल रसायन घेणे, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, हे उपायही प्रभावी होत.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नाकाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे नाकाद्वारा करता येणारे नस्य. औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे नस्य हा रोज करावा असा उपचार होय. ज्यायोगे नुसते नाकाचीच नव्हे, तर मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता टिकविण्यास, वाढण्यास मदत होते.
घसा हासुद्धा शरीरातील एक महत्त्वाचा भाग होय. अन्न-पाणी शरीरात घेणे, बोलणे, श्वारसोच्छ्वास वगैरे अनेक क्रिया घशाशी संबंधित असतात. घसा अतिशय संवेदनशील अवयव असतो. मसालेदार पदार्थ, तिखट, थंड किंवा गरम पदार्थ, तंबाखू वगैरेंचा घशावर दुष्परिणाम होत असतो. टॉन्सिल या रोगप्रतिकारशक्तीणशी संबंधित ग्रंथीसुद्धा घशातच असतात. शरीरात जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून या ग्रंथींची घशात योजना केलेली असते, मात्र टॉन्सिल्स सुजल्या की घसाही दुखू लागतो, खाणे-पिणे-बोलणे वगैरे क्रिया अवघड होत जातात. घशाचे आरोग्य टिकवायचे असेल तर टॉन्सिल्सची काळजी घेणे आवश्यंक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ सकाळ
सडसडीत व किडकिडीत यामधला फरकही समजून घेणे आवश्योक असते. सर्व बांधा सुदृढ व मनुष्य आकारात असणे, शरीराच्या कुठल्याही भागावर अवाजवी चरबी साठलेली नसून उंची व वजन यांचे प्रमाण उचित असून चालणे, पोहणे, काम करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये चपळता असणे म्हणजे सडसडीत असणे. पण उंची जास्त व त्यामानाने वजन कमी असणे, शरीरावयवांना योग्य तो आकार नसणे व अशा व्यक्तीसला पाहिल्यावर आपण काडी/काठी पाहतो आहोत असा भाव मनात येणे म्हणजे किडकिडीत असणे.
दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवण, सकाळची न्याहारी, मध्ये एखाद्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे असे नियमात राहून स्वतःच्या प्रकृतीला मानवणारा आहार घेत राहिले तर सहसा कुठल्याही प्रकारचे आजार येत नाहीत, वजनही बरोबर राहते व शरीरही सडसडीत राहते. परंतु वजन वाढेल अशी भीती मनात असली तरी वजन कमी होते. वजन वाढेल या भीतीपायी शरीराला शक्तीय देण्यास समर्थ असलेले दूध, तूप, लोणी, साखर यांसारखे घटक बंद केले तर नुसतेच वजन उतरत नाही, तर शरीराची शक्तीम कमी होते. शक्तीा कमी व्हायला लागली, शरीराचे एकूणच असंतुलन सुरू झाले की शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन होते व त्याचेही अनेक त्रास होऊ लागतात. त्याउलट अति खाण्याची, अति झोपण्याची, आळसात वेळ घालविण्याची सवय असली तर वजनाचा काटा प्रमाणाबाहेर झुकू लागतो, त्यातही नितंबांवर, मांड्यांवर, दंडावर, पोटावर अशा चुकीच्या ठिकाणी चरबी वाढल्याने वजन वाढू लागते.
न पचणारे नकोच
स्त्रियांचा मासिक धर्म जोपर्यंत व्यवस्थित चालत असतो तोपर्यंत सहसा वजन वाढत नाही, पण मासिक धर्मात काहीही असंतुलन झाले (उदा. एकच दिवस अंगावर जाणे वगैरे) तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात, त्वचा काळपट व रुक्ष होण्यात होऊ शकतो. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर शरीराचे धर्म पाळत असतानासुद्धा पोट व ओटीपोट येथे चरबी वाढण्याकडे प्रवृत्ती असते. याचा संबंध केवळ अन्नसेवनाशीच असतो असे नाही.
आईवडिलांकडून आलेल्या गुणांमुळे ज्यांच्या प्रकृतीचा कल वजन वाढण्याकडे असतो त्यांचे किंवा बुटक्यां व्यक्तीुचे शरीर भरायला लागले तर ते चांगले दिसत नाही. असे वजन कमी करण्याचीच आवश्ययकता असते. पण या उलट मनुष्य फार किडकिडीत झाल्यास (वंशपरंपरेने असो वा इतर कारणांमुळे असो) त्याचे वजन वाढवणे आवश्यिक असते. यासाठी कायम शरीराला सिद्ध तेलाचा अभ्यंग आवश्य्क असतो. स्त्रीने आपला मासिक धर्म व्यवस्थित आहे याकडे लक्ष ठेवावे (तो नीट नसल्यास आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून प्रकृती तपासून घेऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावेत). शरीर किडकिडीतेकडून सडसडीतेकडे नेण्यास याचा उपयोग होतो. अमुक गोष्ट खाऊन वजन वाढते व तमुक गोष्ट खाऊन वजन कमी होते या वक्त व्याला फारसा अर्थ नसतो. कुठलीही गोष्ट खाऊन अपचन झाले की वजन नक्की वाढते. न पचणाऱ्या गोष्टी खाल्ल्या, सातत्याने रात्री उशिरा जेवले तर मात्र वजन नक्की वाढते. पण असे वाढलेले वजन असंतुलनाला व रोगाला कारणीभूत ठरत असल्यामुळे या वजनाचा काही उपयोग नसतो.
किडकिडीत असणाऱ्या व्यक्तीरला शरीरसौष्ठव प्राप्त व्हावे यासाठी अभ्यंगाचा उपयोग होतो, तसेच स्वतःच्या प्रकृतीला जाणून त्यानुसार योग्य आहार घ्यावा. सकाळी न्याहारीच्या वेळी कुठलातरी गरम ताजा पदार्थ, दुपारच्या वेळी भरपूर जेवण, रात्री अल्पाहार म्हणजे दूध-भात, सूप, एखादी-दुसरी पोळी असा एकूण आहार ठेवल्यास वजन वाढायला मदत होते.
वजन वाढण्यासाठी आवश्य क असणाऱ्या धातूंची पुष्टी होण्यासाठी त्यानुसार धातुवर्धक अन्नसेवन आवश्याक असते, पण त्यासाठी व्यक्ति्गत मार्गदर्शन आयुर्वेदाच्या डॉक्टेरांकडून घेणे व त्यानुसार आहार ठेवणे आवश्यसक असते. याचे मार्गदर्शन आयुर्वेदिक डॉक्टदरांकडून अशासाठी, की आयुर्वेदाचा एकूण आहारासंबंधी दृष्टिकोन संपूर्ण वेगळा असतो, प्रकृतीनुसार तसेच पचनशक्ती्ला साजेसा आहार सुचविलेला असतो.
शरीर किडकिडीत नसावे, सडसडीत असावे अशा दृष्टीने वजन वाढविण्याची इच्छा असणाऱ्यांना व्यायामही आवश्यषक असतो. स्थूल व्यक्तींवना वजन उतरविण्यासाठी व्यायामाची आवश्य कता असते अशी समजूत अनेक वेळा असलेली दिसते. पण वजन वाढविण्यासाठीसुद्धा व्यायामाची गरज असतेच. अशा व्यक्तीं नी योगासने, प्राणायाम करणेही आवश्याक असते. फुफ्फुसांमध्ये प्राणवायू जेवढा अधिक स्वीकारला जाईल तेवढे शरीर सुदृढ व चांगले होते. योग करण्याने शरीरातील संप्रेरकांचे संतुलन व्यवस्थित राहिल्यामुळेही वजन व्यवस्थित वाढते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले, तर किडकिडीत न राहता सडसडीत राहायला मदत होईल, शरीराचा आकार व सौष्ठव चांगले राहून शरीर आकर्षक होऊ शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- balaji tambe
Copyright © 2025 | Marathisrushti