वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.
सन 1905 मध्ये फ्रिट्झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.
1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.
महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली.
खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.
अनुदान, कर्जामध्ये गुंतली शेती
आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी अधिक फायद्यासाठी तिसऱ्या जगाकडे वळली. जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने ही तंत्रे स्वीकारण्यासाठी भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला. त्याच सुमारास भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने भारत सरकारने जनतेचे पोट भरण्यासाठी या सर्वांचा स्वीकार केला.
1) अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला. 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला.
2) हेक्टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले. नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले.
3) रासायनिक कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994-95 पर्यंत 100 टक्क्यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही. अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमी न आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत.
4) 1977 मध्ये कर्नाटकमधील मालनाड येथे घडलेली घटना "हंडी सिंड्रोम' या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसीस दिसून आला. खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश सापडले. असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
5) जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही. पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल "डाऊन टू अर्थ' या मासिकात प्रसिद्ध झाला.
6) पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात. दुर्दैवी गाडीचे नाव "कॅन्सर एक्स्प्रेस' असे लोकांनी ठेवले आहे.
त्यामुळे आज आपणा सर्वाना गरज आहे जैविक शेती व जैविक खतांची....
August 31, 2016
एकूण काय हे सर्व नियम मध्यमवर्गीयांना
September 1, 2010
बहुतेक कलाकार लहरी व आपल्याच विश्वात मग्न असतात त्याला चित्रकार अपवाद कसे असू शकतील. नावजलेल्या चित्रकारांची विविध वैशिष्ठये व पद्धती आकृत्या व रंगातून दिसतात. काहीना रंग आवडतात तर काहींना आकृत्या. काही चित्रकार रंग व आकृत्या अशा प्रकारे काढतात की त्यातून त्यांना एक स्टोरी किंवा घटनाक्रम सांगावासा वाटतो. काही चित्रकारांचे मन हळवे आध्यात्मिक तर काहींचे तर्हेव्हाईक असते.
July 12, 2011
आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही.
December 5, 2017
श्री मुद्गल पुराण सांगते की हे सर्व विकार आपल्याला “सह-ज” रूपात मिळाले आहेत. अर्थात हे सर्व विकार जन्मापासून आपल्यासोबत आहेत. खरेतर जन्माच्या आधीपासून सोबत आहेत. या विकारांनी, या वासनांनी युक्त असल्यामुळे जन्माला यावे लागते असे शास्त्र सांगते.
September 8, 2019
अथर्वशीर्षात गजाननाबद्दल, रक्तिम-वस्त्रे-परिधान-केलेला, रक्तगंधानें-लिप्त-अंग असलेला, रक्तपुष्प-पूजित असे उल्लेख आहेत. गजाननाला रक्तवर्ण (लाल रंग) प्रिय आहे, असे अन्यत्रही उल्लेख आहेत. असें कां बरें ? याचें उत्तर पुरातन वाङ्मयानेंच दिलेले आहे. त्यात उल्लेख केलेला आहे की, गजानन हा आरंभीच्या काळात ‘विघ्नेश’, ‘विघ्नकर्ता’ होता; आणि नंतर त्याचें ‘विघ्नहर्ता’ हें रूप प्रचलित झाले. अरेच्चा !! पण इतका उलटा बदल कसा बरें झाला असावा?
सध्या जगात एक चर्चा जोरात चालू आहे, व ती अशी की, जर अवकाशातून एखादा परग्रहवासी (alien) पृथ्वीवर उतरला, तर तो मानवाचा मित्र असेल की शत्रू, तो शांतताप्रिय असेल की युद्धप्रिय, तो मानवांचा संहार करेल की त्याना मदत करेल ? या विषयावर कादंबर्या लिहिल्या गेल्या आहेत, सिनेमे काढले गेले आहेत, आणि विचारवंतांनीही आपली मतें मांडलेली आहेत. आपणही, तशाच दृष्टिकोनातून, ‘गजानन’ या अवकाशप्रवाशाबद्दल विचार केला तर काय उत्तर मिळेल ?
अशी शक्यता नाकारता येत नाहीं, की या परग्रहवासीयांच्या समूहाला सुरुवातीला स्वसंरक्षणार्थ शस्त्रांचा वापर करावा लागला असेल ; त्यामुळे हताहत प्राण्यांचे व मानवांचे रक्त वाहिले असेल, गजाननाच्या अंगावरही उडाले असेल. (कदाचित, त्याला संघर्ष नकोही असेल, पण त्याचा नाइलाज झाला असेल). भूतलवासीयांशी संघर्ष करणारा, त्यांना त्रासणारा, पीडा देणारा, त्यांच्या जीवनात विघ्न आणणारा, असा आरंभीचा गणेश ; आणि म्हणून गजाननाचा सुरुवातीचा उल्लेख ‘विघ्नकर्ता’ असा केला गेला असावा, व त्याला रक्त अथवा रक्तवर्ण प्रिय आहे, असे म्हटले गेलें असावें.
आपण एक हल्लीचें उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. एकोणिसाव्या शतकात, आफ्रिकेतील अप्रगत रहिवाशांसमोर बंदुका व मशीनगन घेऊन उभ्या ठाकलेल्या युरोपियनांबद्दल त्या आदिवासींना कशी भीती वाटत असे, व तत्कालीन युरोपियनांनी आफ्रिकेत किती नरसंहार केला, किती रक्त वहावले, हें आपण वाचलेलें आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विमानातून उतरलेल्या युरोपियनांसमोर अप्रगत आफ्रिकन जंगलवासीयांनी लोटांगण घातले असेल, तर त्यात नवल काय ? एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील ही परिस्थिती, तर मग अनेक सहस्त्रकांपूर्वी तसें घडणें अशक्य नव्हेच !
सुरुवातीच्या काळात हा परग्रहवासी-गण ‘विघ्नकर्ता’ वाटला असला, तरी त्याच्यापुढे जग वाकल्यावर, नतमस्तक झाल्यावर, (किंवा, परग्रहवासियांची टोळी येथें स्थिरस्थावर झाल्यामुळे), शांतता प्रस्थापित झाली असावी, व मानव त्याचें पूजनही करू लागले असावेत. त्यामुळे, त्यानंतर त्या अवकाशप्रवाशासी-गणाला स्वसंरक्षणार्थ संहाराची गरज भासली नसणार ; एवढेंच नव्हे तर, त्यानें मानवाला सहाय्यही केलें असणार. म्हणूनच, या नंतरच्या काळात, हा गणपति ‘विघ्नहर्ता’ व ‘सुखकर्ता’ म्हणून ओळखला जाऊं लागला असणार.
आपण गजाननाच्या हातात गव्हाची लोंबी पहातो. गहू हें धान्यच मुळी मूळ भारतीय नव्हे, तर तें मध्य-पूर्वेकडील देशांमधून आलेलें आहे. तिथे इ.स.पू. ८०००-१००० या काळी गहू या रानटी ‘झुडुपाची’ शेती सुरू झाली. (पहा : संजीव सान्याल लिखित ‘लँड ऑफ दि सेव्हन रिव्हर्स’, Yuval Noah Harari याचे ‘Sapiens’, ही पुस्तकें ). म्हणजेच, गणपतीच्या मूर्तीच्या हातातील वस्तूंमधे गव्हाच्या लोंबीचा समावेश ही एक नंतरच्या काळातील घटना आहे.
मात्र एक गोष्ट खरी, की गहू हें शेतीचें प्रतीक आहे. त्यामुळे, असा अर्थ काढतां येतो की, हा अवकाशवासी ‘गजानन’ मानवांचा सहाय्यकर्ता झाल्यानंतर, त्याच्याच मार्गदर्शनाखाली मानवानें शेतीची सुरुवात केलेली असणार, व ह्या घटनेचें प्रतीक म्हणून गजाननाच्या हातात लोंबी दिसते.
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
August 3, 2016
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 16, 2020
स्वयंपाकघरात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी उपकरणं वापरतांना गृहिणी आपला अभियांत्रिकी मेंदू सहजच उपयोगात आणते.
May 13, 2023
माणूस हा भूचर प्राणी आहे. त्याचे वावरणे जमिनीवर असल्यामुळे, पोहताना त्याची पाण्याखाली राहण्याची क्षमता मर्यादित असते. परंतु, यालाही काही अपवाद आहेत. एक ‘पाणबुडी’ जमात या अपवादात मोडते. या पाणबुड्या जमातीतील लोकांवर शास्त्रज्ञांकडून संशोधन केले जात आहे. या संशोधनात एक अनपेक्षित निष्कर्ष निघाला आहे. त्या संशोधनाचीच ही ओळख…
February 23, 2024
मानवाच्या वाढत्या गरजा, चैन, भोगवाद, चंगळवाद आणि जगण्याच्या नाना तऱ्हा तसेच वाढलेल्या सत्ता स्पर्धा त्यातून निर्माण झालेले कलह, लढाया आणि त्याला तोंड देता देता पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भविष्यात आरोग्याच्या चिंता निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.
February 1, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti