वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील "बेसल गॉंग्लिया' नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना अनेक स्नायूंचे कित्येक सेकंद टिकणारे आकुंचन होत राहते. परिणामी व्यक्तीचे श्व सन दीर्घ पूरक स्थितीत जाते म्हणजे श्वाचस आत घेण्याची क्रिया नेहमीच्या श्वावसोच्छ्वासापेक्षा लांबते. त्याच वेळी घशाचा आकार विस्तारतो. खालचा जबडा व जीभ खाली जाते. दीर्घ श्वासस घेण्याने फुफ्फुस व पोट यातील पडदा (डायफ्रॅम) पोटाकडे सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीत ऋण भार (negative pressure) तयार होतो. शरीरातील नीलांमधील रक्त छातीकडे (हृदयाकडे) जाते. त्यामुळे हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा सुधारतो. दीर्घ श्वीसनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे फुफ्फुसातील बंद कोष उघडले जातात.
आपल्या नेहमीच्या किमान 40 टक्के फुफ्फुसातील कोष कार्यान्वित होत नसतात. अशा न उघडलेल्या कोषातून प्राणवायूची देवाणघेवाण होत नाही. प्राणवायू कमी असणारे रक्त तसेच हृदयाकडे परत जाते व रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. मधूनच दीर्घ श्वेसन झाले तर हा दोष टळतो. अनेकदा हॉस्पिटल्समध्ये अति दक्षता भागात रुग्णांना कृत्रिम श्वास होणाऱ्या "व्हेंटिलेटर' र्(ventilator) मशिनवर ठेवले जाते. या वेळी रुग्णाला जांभई येत नाही. त्यामुळे बंद असणाऱ्या कोषातील "अशुद्ध' (म्हणजे प्राणवायू कमी असणारे) रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तात मिसळते. परिणामी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घसरते. तसे होऊ नये म्हणून जास्त दबावाने प्राणवायू देणयाची प्रथा आहे. कधी कधी खूपच जास्त दबावाखाली प्राणवायू वापरावा लागतो. हायपर बॅरिक ऑक्सि न चेंबर(hyper baric oxygen chamber) जांभई येताना चेहऱ्यावरचे स्नायू व हाताचे स्नायूदेखील कार्यान्वित होतात.
या क्रियांनीदेखील रुधिराभिसरणाला चालना मिळते. शिवाय स्नायूंच्या आत असणाऱ्या काही मज्जा-स्वीकारांना (sensory receptors) चालना मिळते. यांच्यामधून मज्जारज्जूत व मेंदूत जाणाऱ्या चेतनांमुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. ही झोपेची पूर्वतयारी आहे. हाताच्या स्नायूंचे हे काम मेंदूच्या हालचाल केंद्राच्या (motor cortex) ताब्यात नाही. एखाद्या व्यक्तीला पक्षाघात (hemiplegia) झालेला असला तर ती व्यक्ती आपला (उजवा किंवा डावा) हात स्वेच्छेने हलवू शकत नाही. कारण या हालचाल केंद्राचा व हात हलविण्यास जबाबदार असणाऱ्या मज्जारज्जूतील पेशींचा संबंध दुरावलेला असतो. अशा व्यक्तीला जांभई आली तर मात्र हात उचलला जातो, ताणला जातो. हीदेखील बेसल गॉंग्लियामधून देखरेख केलेली एक प्रतिक्षिप्त क्रियाच असते. असा लुळा पडलेला हात जांभईच्या वेळी हलताना पाहून पाहणाऱ्याला नवल वाटते.
उत्क्रांत होत असताना अनेक श्वानपदांना आपल्या संरक्षणासाठी वास घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या प्रमाणात श्वा स घेण्याने बरीच हवा नाका -घशात जाते. या भागात नेहमी होणारी हवेची हालचाल संथ गतीने व कमी घनफळाची असते. त्यातील वाढीमुळे वास घेण्याची क्षमता वाढते. झोप येण्यापूर्वी आपल्या आसपास धोकादायक श्वावपदाचे अस्तित्व जाणणे प्राणिमात्राच्या जीवन-मरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. हा गुणधर्म सर्व प्राण्यांत दिसतो व मानवातदेखील उतरलेला आहे. झोप येण्यापूर्वी जांभया येऊ लागतात. ही क्रिया अनैच्छिक प्रतिक्षिप्त असते. कंटाळा येणे ही मानसिक प्रक्रिया झोप येणे या शारीरिक क्रियेशी संबंधित आहे.
ज्या वातावरणात मन रमू शकत नाही (कंटाळवाणे व्याख्यान) तेव्हा मनाला तेथून दूर जावेसे वाटते. पण सांस्कृतिक आणि इतर कारणांनी शरीर तेव्हा दूर जाऊ शकत नसले तर मन त्या वातावरणातून दूर एखाद्या कोषात गेल्याप्रमाणे लक्ष काढून घेते. म्हणजेच मनाची झोप सुरू होते. मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या जांभया येऊ लागतात. क्वचितच जांभया येणे हे एखाद्या मेंदूच्या विकाराचे लक्षण असते. फेफरे (epileptic fit) येणाऱ्या रुग्णाला फिट येण्यापूर्वी जांभया येऊ लागणे शक्या असते. मेंदू-ज्वर या आजारातदेखील रुग्णाला सारख्या जांभया येतात. अफू हा एक मादक पदार्थ आहे. त्याचे नियमाने सेवन करणाऱ्या व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. अशा व्यक्तीला अफू मिळाली नाही किंवा मादक पदार्थांचे परिणाम नष्ट करण्याची औषधे दिली तर सतत जांभया येऊ लागतात. जांभई येणे हा जरी वैश्विणक अनुभव असला तरी त्याबद्दल संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अजून मिळालेली नाही. व्यवहारात असे दिसते की कोणत्याही कारणाने रात्री झोप न मिळाल्यास दिवसा सारख्या जांभया येतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई
आपण नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती.
माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर केला जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे.
नॅचरोपॅथीचे डॉक्टर रोग्याच्या जीवन पध्दतीकडे जास्त लक्ष देत असतात. नॅचरोपॅथी मध्ये फिजीकल, फिजीकोलॉजीकल, तसेच स्पिरिच्यूअल घटक आजारामध्ये लक्षात घेतले जातात.
नॅचरोपॅथीमध्ये रोग्यावर उपचार करताना अनेक अल्टरनेटिव्ह थेरेपीचा वापर करतात उदा. होमिओपॅथी, हर्बल रेमिडीज, पारंपारीक चायनीज औषध उपचार, डाएट आणि न्युट्रिशन, योग, अॅक्युप्रेशर, हायड्रोथेरेपी, मॅगनेट थेरेपी, मसाज आणि व्यायाम.
नॅचरोपॅथी चे डॉक्टर अधिकृत नॅचरोपॅथी मेडिकल स्कुल मध्ये शिक्षण घेतलेले असतात. पहिले वर्ष सामान्य वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण दिले जाते त्यानंतर शेवटच्या वर्षात नॅचरल हिलींग टेक्निकवर शिक्षण दिले जाते.
निसर्गोपचार ही आरोग्याची अशी एक नैसर्गिक उपचार पध्द्ती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेते.
पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी, रोगांसाठी आणि उपचारांसाठी ज्या पध्दती उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक निसर्गोपचाराची पध्दत उत्तम आहे. यात जीवन जगण्याच्या सगळ्या तत्वांचे एकीकरण झाले आहे आणि हीच एक पध्दत अशी आहे की जी मानवाला त्याच्या आजच्या वाढत्या रोगराई पासून आणि त्यापासून निर्माण होणा-या धोक्यातून बाहेर काढू शकते. जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या तत्वांचा या पध्दतीत वापर केला जातो.
तुम्ही तुमचे आरोग्य विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला योग आणि नैसर्गिक आरोग्याच्या मदतीने उभे करावे लागते. येथे आरोग्याची बांधणी करावी लागते विकत नाही घेता येत. औषधांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्यांचे जे इतर परिणाम होतात, ते शरीराला हानिकारक असतात. सामान्य जनतासुध्दा आता या मुद्यावर सावधपणे विचार करत आहे. निसर्गोपचार पध्द्ती ही सर्वश्रेष्ठ उपचार पध्द्ती आहे हे आता ते मान्य करु लागले आहेत. या उपचार पध्दती बरोबर पातांजली योगसूत्रांचा वापर केला पाहिजे. ती योगसूत्रे या प्रमाणे - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामुळे तुम्हाला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल. आत्मविश्वास संपादन करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी यांचा उपयोग होईल.
डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई
9820584716
आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते.
स्वभाव व मानसिकता : कित्येक लोकांचा स्वभाव मुळात असमाधानी व अति महत्त्वाकांक्षी असतो. ते थोडय़ा वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात व वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अॅिड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.
मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अॅसड्रिनालीन व नॉरेअॅ ड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.
‘अ’ व्यक्तिमत्त्व (Type A-Personality) असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत ‘निकोटिन’ व ‘कार्बन मोनोक्साइड’ ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे नॉरेअॅकड्रिनालीन या स्स्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.
मद्यपान : मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते.
मिठाचा अतिरेक : जे लोक मिठाचा अल्प प्रमाणात उपयोग करतात त्याचा रक्तदाब हा कमी किंवा नॉर्मल असतो. त्याच्याविरुद्ध ज्या व्यक्ती मिठाचा अतिरेक करतात, त्यांना अति रक्तदाब असण्याचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनक्षील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने जर आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर अशा रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल होऊ शकतो, किंवा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (ATHEROSCLEROSIS)
जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांच्या आंतरस्तरावरील दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात आनुवंशिकता, वाढणारे वय, रक्तातील चरबीचे अतिप्रमाण, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा व बैठे जीवन आणि ताण-तणावाचे जीवन या गोष्टींचा समावेश होतो.
लठ्ठपणा, अतिरक्त वजन :
स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा लहान वयातच सुरू होऊ शकतो. तसेच जर अशा लोकांनी वजन कमी केल्यास त्यांचा अति रक्तदाब थोडय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.
अति रक्तदाबाची लक्षणे
अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ (Silent Killer) आहे, असे म्हटले जाते. कारण बऱ्याचदा मनुष्याला अति रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. बऱ्याच वेळा इतर काही आजारांसाठी मनुष्य डॉक्टरकडे जातो आणि तपासणीचा एक भाग म्हणून डॉक्टर रक्तदाब तपासतात, तेव्हा तो वाढलेला आढळतो, अशा वेळी अति रक्तदाबाचे निदान होते.
अति रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.
* सतत डोके दुखणे, जड वाटणे.
* चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.
* छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.
* लैंगिक सामथ्र्य कमी होणे.
रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.
* दृष्टिदोष, कमी दिसणे, अंधूक दिसणे
* नाकातून रक्तस्राव होणे.
* हातापायावर सूज येणे.
* किंवा कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम
१) हृदयाची अकार्यक्षमता :
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.
उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
२) मूत्रपिंडावर परिणाम :
उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.
३) इतर दुष्परिणाम :
अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.
उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.
अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)
अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.
रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.
* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.
* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.
* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY असे म्हणतात.
* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अॅावोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.
अति रक्तदाबाचे उपचार
अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.
वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.
रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.
१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.
२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.
३) वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते.
चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.
स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.
* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
४) व्यायाम आणि योगासने :
* वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
* भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.
* अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.
* योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.
‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.
ताण-तणाव कमी करणे
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.
नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.
क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.
मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.
दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी. ‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी
साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसाचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो.
सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो.
फक्त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.
वजन वाढले की भात खाणे सहसा बंद केले जाते. मात्र देशी वाणाचे, साठेसाळी, रक्तसाळी, जिरगा, काळी गजरी वगैरे तांदूळ पचायला सोपे असतात, त्यातही जर शिजविण्यापूर्वी ते थोड्या तुपावर परतून घेतले व कुकरऐवजी भांड्यामध्ये शिजवले, तर ते कफ-मेद वाढवत नाहीत.
रोज सकाळी तांदळाचा मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्ती कृश होते.
"उकळलेले गरम पाणी‘ हासुद्धा वजन कमी करण्यासाठी सोपा; पण प्रभावी उपाय होय. एकंदर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जे पाणी उकळून घ्यायचे ते साधारणतः 15-20 मिनिटांसाठी उकळणे अपेक्षित असते. आयुर्वेदातील शारंगधर संहितेत उष्णोदक म्हणजे पाणी उकळण्याची विशेष पद्धत दिलेली आहे.
अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत् ।।
श्लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम् ।
कासश्वासज्वरहरं पीतमुष्मोदकं निशि ।।...शांरगधरसंहिता
अगोदर गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पातेल्यात ठेवून अष्टमांश, चतुर्थांश किंवा अर्धे शिल्लक राहीपर्यंत अग्नीवर उकळावे व गरम असतानाच प्यायला द्यावे. हा पाण्याचा काढा वात व कफदोष शमवतो, अवाजवी वाढलेला मेद कमी करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, अग्निदीपन करतो, खोकला, दमा व तापामध्ये हितकारक असतो. ताप आलेला असताना तसेच जुलाब होत असतानाही या प्रकारचे पाणी पिण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
लठ्ठपणामध्ये मिठावर सुद्धा निर्बंध येतात. अति प्रमाणात मीठ कोणासाठीच चांगले नाही, पण अजिबात मीठ बंद करून वरून मीठ घेणे किंवा कच्चे मीठ खाणे टाळणे चांगले. मात्र अन्न शिजवताना चवीपुरते सैंधव वापरण्यास हरकत नाही. याखेरीज आयुर्वेदिक अन्नयोग संकल्पनेवर आधारित पुढील काही नियम लठ्ठपणा कमी करण्यासाठी लक्षात घ्यावे लागतील.
अध्यशन न करणे - एकदा खाल्ले की ते अन्न पचण्यापूर्वी पुन्हा काहीही न खाणे. दोन खाण्यांमध्ये किमान 3-4 तासांचे अंतर असणे अपेक्षित होय.अहिताशन न करणे - स्वतःच्या प्रकृतीला अहितकर ते अहिताशन होय. स्थूल व्यक्तींनी प्रकृतीचे व कफ-मेदाचे भान ठेवून सुरवातीला सुचविलेल्या पथ्यकर गोष्टी सेवन करणेच आवश्यक.मात्रानिश्चिती - प्रत्येकाने अन्नाची मात्रा अग्नीच्या पचनसामर्थ्याच्या सापेक्षतेने ठरवायची असते.त्यामुळे लठ्ठपणातही पथ्यकर आहार, फार कमी नाही व फार जास्ती नाही अशा योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर असते. त्यातही द्रवपदार्थांवर भर दिला उदा., सकाळी फक्त भाताची पेज, रात्री फक्त सूप तर वजन कमी होण्यास निश्चित हातभार लागतो.अनाठायी डायट करून उपासमार करून घेण्याऐवजी या प्रकारे आहाराचे नीट नियोजन, आचरण, व्यायाम, औषधोपचार यांची सुयोग्य जोड दिली तर लठ्ठपणाची भीती राहणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
हर्निया हा सहज आढळणारा आजार आहे. तो सगळ्या वयोगटांमध्ये व स्त्री-पुरुष अशा दोन्हींतही दिसतो. हर्निया म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू कमजोर होतात, पोटात काहीशी पोकळी निर्माण होते आणि पोटातील आतडी बाहेर येऊन फुगा निर्माण करतात. मोठे आतडे किंवा लहान आतडे हर्नियाच्या पिशवीत ओढ लागणे, फुगा दिसणे, फुगा कमी-जास्त होणे, पोट फुगणे यांसारखी लक्षणे दिसतात.ही लक्षणे हळूहळू किंवा अचानक दिसतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात दुखत असते. काही लोकांना वाटते, की पोटात काहीतरी फुटले आहे किंवा काहीतरी वेगळ्या दिशेने जात आहे. आणखी काही लक्षणे अशी -अशक्तपणा जाणवणे, पोटात आग होणे, दुखणे.पोटातील फुगा, जांघेत दिसतो. मात्र खोकला काढल्यावर किंवा झोपल्यावर तो दिसत नाही.काहीतरी जडान्न खाल्ल्यानंतर खोकला आला तर दुखते.पोटातील कुठल्याही भागात हर्निया होऊ शकतो, पण सगळ्यात जास्त हर्निया जांघेत दिसतो.
हर्नियाचे तीन प्रकार आहेत -१) जांघेतील हर्निया, २) बेंबीतील हर्निया, ३) शस्त्रक्रियेनंतर होणारा हर्निया.
हर्नियामध्ये घ्यावयाची काळजी - शरीराला कमीत कमी ताण द्यावा. कारण तेवढ्यानेही पोटात दुखून अस्वस्थता वाढते. ऑपरेशनमुळे हा त्रास कमी होतो. ट्रिटमेंट न दिल्यास हर्निया वाढू शकतो व एक वैद्यकीय आणीबाणी निर्माण होऊ शकते. वर्षानुवर्षे साधा वाटणारा हर्निया अचानक आतडे अडकल्यामुळे ऐनवेळी जिवाला धोका उत्पन्न करू शकतो. हर्निया हा अचानक मोठा होऊ शकतो किंवा अडकू शकतो आणि त्यात अडकलेल्या आतड्याचे गॅंग्रीन होऊ शकते. अशा वेळी त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यावाचून इलाज नसतो.
हर्निया कसा बरा करतात?
हर्निया बरा करण्याचे वेगवेगळे प्रकार वापरता येतात. १) टेन्शन रिपेअर, २) टेन्शन फ्री रिपेअर, ३) दुर्बिणीतून टेन्शन फ्री उपचार. रुग्णांसाठी सगळ्यात चांगली पद्धत कुठली आहे, ज्या पद्धतीच्या वापरानंतर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्रास होणार नाही, हे डॉक्टयर ठरवतात. आधुनिक शस्त्रक्रियेत साधी भूल दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते आणि आठवड्याच्या आत कामावर रुजू होणे शक्यध होते. अत्याधुनिक थ्रीडी मेश पद्धतीमुळे हे सर्व सहज शक्ये झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- डॉ. जयश्री तोडकर
सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते.
सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते.
दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे .
अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे.
हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते.
ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते . कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे.
रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.
दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.
दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते.
दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे.
रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.
सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे सूक्ष्म कण श्वाीसामार्फत सरळ शरीरात जाऊ नयेत यासाठी नाक या अवयवाची रचना केलेली आहे. नाकाच्या आतील बाजूला चिकट अस्तर असते, यामध्ये हवेतील अशुद्धता, बारीक कण अडकून राहू शकतात व आत जाण्यापासून थोपविले जाऊ शकतात. नाकाच्या मध्यभागी असणाऱ्या मांसल पडद्यावर अतिसूक्ष्म व खूप मोठ्या संख्येने रक्तलवाहिन्या असतात, यामुळे श्वा्सावाटे आत जाणारी हवा किंचित दमट व उबदार बनविली जाते. वासाचे ज्ञान करविणाऱ्या विशेष ग्रंथी नाकाच्या वरच्या एक तृतीयांश भागात असतात व तेथून गंधाचे ज्ञान मेंदूपर्यंत पोचवले जाते. नाक खाली घशाशी व वर सायनसच्या मार्फत डोळ्यांशी जोडलेले असते, तसेच त्याच्याही वर मेंदूशी संबंधित असते. म्हणूनच नाकाची नीट काळजी घेणे अत्यावश्यजक असते.
गवती चहाचा काढा
नाकाशी संबंधित सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेला त्रास म्हणजे नाक चोंदणे व सर्दी होणे. वरवर पाहता साधा वाटला तरी यामुळे व्यक्तीक बेजार होऊन जाऊ शकते. वारंवार सर्दी-पडसे होणे हे शरीराची रोगप्रतिकारशक्तीह कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. अशा वेळी दीर्घ काळपर्यंत उपचार घ्यावे लागतात. साध्या सर्दीवर मात्र लवकरात लवकर सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह घेणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, गवती चहाचा काढा घेणे यासारखे उपाय करता येतात. गवती चहाचा काढा पुढीलप्रमाणे बनवता येतो.
पाणी - दोन कप
गवती चहा - दोन पाती
किसलेले आले - अर्धा चमचा
दालचिनी - एक इंच तुकडा
तुळशीची वा पुदिन्याची पाच-सहा पाने
हे सर्व एकत्र करून मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. एक कप उरल्यावर त्यात चवीपुरती साखर टाकून गरम गरम पिण्याने सर्दीची लक्षणे कमी होतात, तापासारखे वाटत असल्यासही बरे वाटते.
नाक चोंदत असल्यास दोन-तीन थेंब पातळ केलेले साजूक तूप नाकात टाकणे चांगले. यामुळे सहसा लगेच नाक मोकळे होते व श्वा स घेणे सोपे होते.
नाकाभोवतीच्या पोकळ्यांमध्ये सर्दीमुळे किंवा अन्य जंतुसंसर्गामुळे अवरोध तयार झाल्याने कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. यालाच सायनोसायटिस असे म्हटले जाते. यावर गरम पाण्याचा वाफारा घेणे, ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे, रुईच्या गरम पानाने शेकणे यासारखे उपाय करता येतात. दालचिनी, लवंग, चंदन, केशर वगैरे द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप सायनसवर लावण्यानेही आराम मिळू शकतो.
घोळणा फुटला तर
नाकातून रक्तट येणे अथवा घोळणा फुटणे हे लक्षणही बऱ्याचदा आढळते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षण अधिक प्रमाणात आढळते. मात्र उन्हाळ्यात, शरद ऋतूत, पित्त वाढले असताही नाकातून रक्ती येणाऱ्या व्यक्तीध असतात. वारंवार नाकाचा घोळणा फुटत असल्यास त्वरेने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, मात्र प्राथमिक उपचारात व्यक्तीअला आडवे झोपवणे, नाकावर, कपाळावर व डोक्या वर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे यासारखे उपाय करावे लागतात. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद, धात्री रसायनसारखे शीतल रसायन घेणे, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, हे उपायही प्रभावी होत.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नाकाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे नाकाद्वारा करता येणारे नस्य. औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे नस्य हा रोज करावा असा उपचार होय. ज्यायोगे नुसते नाकाचीच नव्हे, तर मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता टिकविण्यास, वाढण्यास मदत होते.
घसा हासुद्धा शरीरातील एक महत्त्वाचा भाग होय. अन्न-पाणी शरीरात घेणे, बोलणे, श्वारसोच्छ्वास वगैरे अनेक क्रिया घशाशी संबंधित असतात. घसा अतिशय संवेदनशील अवयव असतो. मसालेदार पदार्थ, तिखट, थंड किंवा गरम पदार्थ, तंबाखू वगैरेंचा घशावर दुष्परिणाम होत असतो. टॉन्सिल या रोगप्रतिकारशक्तीणशी संबंधित ग्रंथीसुद्धा घशातच असतात. शरीरात जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून या ग्रंथींची घशात योजना केलेली असते, मात्र टॉन्सिल्स सुजल्या की घसाही दुखू लागतो, खाणे-पिणे-बोलणे वगैरे क्रिया अवघड होत जातात. घशाचे आरोग्य टिकवायचे असेल तर टॉन्सिल्सची काळजी घेणे आवश्यंक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ सकाळ
सडसडीत व किडकिडीत यामधला फरकही समजून घेणे आवश्योक असते. सर्व बांधा सुदृढ व मनुष्य आकारात असणे, शरीराच्या कुठल्याही भागावर अवाजवी चरबी साठलेली नसून उंची व वजन यांचे प्रमाण उचित असून चालणे, पोहणे, काम करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये चपळता असणे म्हणजे सडसडीत असणे. पण उंची जास्त व त्यामानाने वजन कमी असणे, शरीरावयवांना योग्य तो आकार नसणे व अशा व्यक्तीसला पाहिल्यावर आपण काडी/काठी पाहतो आहोत असा भाव मनात येणे म्हणजे किडकिडीत असणे.
दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवण, सकाळची न्याहारी, मध्ये एखाद्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे असे नियमात राहून स्वतःच्या प्रकृतीला मानवणारा आहार घेत राहिले तर सहसा कुठल्याही प्रकारचे आजार येत नाहीत, वजनही बरोबर राहते व शरीरही सडसडीत राहते. परंतु वजन वाढेल अशी भीती मनात असली तरी वजन कमी होते. वजन वाढेल या भीतीपायी शरीराला शक्तीय देण्यास समर्थ असलेले दूध, तूप, लोणी, साखर यांसारखे घटक बंद केले तर नुसतेच वजन उतरत नाही, तर शरीराची शक्तीम कमी होते. शक्तीा कमी व्हायला लागली, शरीराचे एकूणच असंतुलन सुरू झाले की शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन होते व त्याचेही अनेक त्रास होऊ लागतात. त्याउलट अति खाण्याची, अति झोपण्याची, आळसात वेळ घालविण्याची सवय असली तर वजनाचा काटा प्रमाणाबाहेर झुकू लागतो, त्यातही नितंबांवर, मांड्यांवर, दंडावर, पोटावर अशा चुकीच्या ठिकाणी चरबी वाढल्याने वजन वाढू लागते.
न पचणारे नकोच
स्त्रियांचा मासिक धर्म जोपर्यंत व्यवस्थित चालत असतो तोपर्यंत सहसा वजन वाढत नाही, पण मासिक धर्मात काहीही असंतुलन झाले (उदा. एकच दिवस अंगावर जाणे वगैरे) तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात, त्वचा काळपट व रुक्ष होण्यात होऊ शकतो. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर शरीराचे धर्म पाळत असतानासुद्धा पोट व ओटीपोट येथे चरबी वाढण्याकडे प्रवृत्ती असते. याचा संबंध केवळ अन्नसेवनाशीच असतो असे नाही.
आईवडिलांकडून आलेल्या गुणांमुळे ज्यांच्या प्रकृतीचा कल वजन वाढण्याकडे असतो त्यांचे किंवा बुटक्यां व्यक्तीुचे शरीर भरायला लागले तर ते चांगले दिसत नाही. असे वजन कमी करण्याचीच आवश्ययकता असते. पण या उलट मनुष्य फार किडकिडीत झाल्यास (वंशपरंपरेने असो वा इतर कारणांमुळे असो) त्याचे वजन वाढवणे आवश्यिक असते. यासाठी कायम शरीराला सिद्ध तेलाचा अभ्यंग आवश्य्क असतो. स्त्रीने आपला मासिक धर्म व्यवस्थित आहे याकडे लक्ष ठेवावे (तो नीट नसल्यास आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून प्रकृती तपासून घेऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावेत). शरीर किडकिडीतेकडून सडसडीतेकडे नेण्यास याचा उपयोग होतो. अमुक गोष्ट खाऊन वजन वाढते व तमुक गोष्ट खाऊन वजन कमी होते या वक्त व्याला फारसा अर्थ नसतो. कुठलीही गोष्ट खाऊन अपचन झाले की वजन नक्की वाढते. न पचणाऱ्या गोष्टी खाल्ल्या, सातत्याने रात्री उशिरा जेवले तर मात्र वजन नक्की वाढते. पण असे वाढलेले वजन असंतुलनाला व रोगाला कारणीभूत ठरत असल्यामुळे या वजनाचा काही उपयोग नसतो.
किडकिडीत असणाऱ्या व्यक्तीरला शरीरसौष्ठव प्राप्त व्हावे यासाठी अभ्यंगाचा उपयोग होतो, तसेच स्वतःच्या प्रकृतीला जाणून त्यानुसार योग्य आहार घ्यावा. सकाळी न्याहारीच्या वेळी कुठलातरी गरम ताजा पदार्थ, दुपारच्या वेळी भरपूर जेवण, रात्री अल्पाहार म्हणजे दूध-भात, सूप, एखादी-दुसरी पोळी असा एकूण आहार ठेवल्यास वजन वाढायला मदत होते.
वजन वाढण्यासाठी आवश्य क असणाऱ्या धातूंची पुष्टी होण्यासाठी त्यानुसार धातुवर्धक अन्नसेवन आवश्याक असते, पण त्यासाठी व्यक्ति्गत मार्गदर्शन आयुर्वेदाच्या डॉक्टेरांकडून घेणे व त्यानुसार आहार ठेवणे आवश्यसक असते. याचे मार्गदर्शन आयुर्वेदिक डॉक्टदरांकडून अशासाठी, की आयुर्वेदाचा एकूण आहारासंबंधी दृष्टिकोन संपूर्ण वेगळा असतो, प्रकृतीनुसार तसेच पचनशक्ती्ला साजेसा आहार सुचविलेला असतो.
शरीर किडकिडीत नसावे, सडसडीत असावे अशा दृष्टीने वजन वाढविण्याची इच्छा असणाऱ्यांना व्यायामही आवश्यषक असतो. स्थूल व्यक्तींवना वजन उतरविण्यासाठी व्यायामाची आवश्य कता असते अशी समजूत अनेक वेळा असलेली दिसते. पण वजन वाढविण्यासाठीसुद्धा व्यायामाची गरज असतेच. अशा व्यक्तीं नी योगासने, प्राणायाम करणेही आवश्याक असते. फुफ्फुसांमध्ये प्राणवायू जेवढा अधिक स्वीकारला जाईल तेवढे शरीर सुदृढ व चांगले होते. योग करण्याने शरीरातील संप्रेरकांचे संतुलन व्यवस्थित राहिल्यामुळेही वजन व्यवस्थित वाढते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले, तर किडकिडीत न राहता सडसडीत राहायला मदत होईल, शरीराचा आकार व सौष्ठव चांगले राहून शरीर आकर्षक होऊ शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- balaji tambe
एक चमचा मेथ्या रात्री भिजत घाला. त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा, असं सगळं चांगलं घोटून (मेथ्या मिक्सरमधून आधी काढून घ्यायच्या किंवा सगळेच मिक्सरातून काढून घ्यायचे) मिक्स करा. गरजेप्रमाणे पाणी / नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दूध मिळते ते) घाला. केसाला मेंदी लावताना जी कन्सिस्टन्सी तयार करतो तीच करा. एकेका बटेला डोक्यापासून केसाच्या टोकापर्यंत लावा. अर्धा-पाऊण तास ठेवा आणि नुसत्या पाण्याने धुवून टाका. रात्री डोक्याला तेल. दुसर्यार दिवशी सकाळी माइल्ड शांपू लावून केस धुवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. कधी आयुष्यभर आधार देणाऱ्या माता-पित्याचे निधन होते. अनपेक्षित आजार विशेषत: मधुमेह व रक्तदाबासारखे जीवनशैलीविषयक आजार तिला याच काळात त्रास देत असतात.
नोकरदार स्त्रीची सेवानिवृत्तीही याच दरम्यान होते. यामुळे जीवनाची जी एक व्यस्त व मस्त अशी घडी असते ती विस्कळीत व्हायचाही हाच काळ असतो. यामुळे स्त्रीला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा मोकळा वेळ निर्माण झाल्यासारखे वाटते. आपला आयुष्यावरचा ताबा हातातून गेला आहे म्हणून येणारी विमनस्कता आणि स्वत:बद्दलचा कमी होणारा विश्वास व महत्त्व यामुळे मानसिक खच्चीकरणही या काळात होते. विशेषत: ज्या भगिनींनी नुसती गृहिणी म्हणून भूमिका बजावलेली असते, त्यांना रजोनिवृत्तीमुळे येणाऱ्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाता येत नाही. त्याचा मानसिक दुष्परिणामही त्यांना सहन करावा लागतो. याउलट ज्या स्त्रियांनी उत्तमपणे नोकरी केली आहे, करिअरमध्ये समाधान मिळविले आहे, हाताशी पसा आहे तो स्वत:साठी कुणावर अवलंबून न राहता वापरता येतो, त्या स्त्रिया रजोनिवृत्तीतील बदलांना शांतपणे सामोरे जातात.
बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे म्हणून उगाचच राग राग करतेस. ‘सायकिक’ झाली आहेस, उगाचच चिडचिडी झाली आहेस अशा टोमण्यांनी तिला आणखी सतावले जाते. रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या ४५ नंतर चालू होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत तो खूप लवकर व खूप नंतरही येतो. रजोनिवृत्ती ही खरे तर नसíगक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच वेळा गर्भाशय व अंडाशय काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे जसे की, कर्करोग झाला तर शस्त्रक्रियेमुळे काढला गेल्यास रजोनिवृत्ती कृत्रिमरीत्या येते. रजोनिवृत्तीचा त्रास मासिक पाळी बंद झाल्यावर दोन ते चार वर्षांत आपसूक संपतो.
पाळी गेल्यानंतरच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स कमी होऊ लागतात. स्त्रीची मासिक पाळी थांबते आणि नसíगकरीत्या तिला आता गर्भधारणा होत नाही.
रजोनिवृत्तीच्या काळात जवळजवळ ८५ टक्के स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात शरीरातील कुठल्या ना कुठल्या भागात अचानक गरम झाल्यासारखे वा वाफा आल्यासारखे वाटते. विशेषत: चेहऱ्यावर मानेच्या भोवती, गालावर, कानशिलाजवळ हे जास्त प्रमाणात जाणवते. कधी कधी ही गरमागरम संवेदना एका ठिकाणी सुरू होऊन अचानक पूर्ण शरीरात पसरत जाते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही संवदेना हलकीफुलकी व कालांतराने कमी कमी होत जाते. तर काहींच्या बाबतीत पूर्ण शरीरात एखादी ज्वाला भडकते आहे की काय, अशा प्रकारचा अनुभवही असू शकतो आणि तो दीर्घ काळही चालतो.
याच काळात किंवा पाळी जायच्या काही महिने आधीपासूनच रात्री अचानक खूप घाम फुटल्यामुळे काही स्त्रिया घाबऱ्याघुबऱ्या होतात. टॉवेल पूर्ण भिजला आहे, गाऊन, कपडे पूर्ण भिजले आहेत अशा प्रकारचा घाम फुटण्याचा अनुभव भयंकर असतो. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. पूर्ण रात्रभर त्या अस्वस्थ राहतात. त्यांच्यात दिवसा चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो. रात्रीचे हे घाम फुटणे इतर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकते. म्हणून यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.
काही स्त्रियांना पाळी जाण्याच्या दरम्यान विलक्षण अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे व खूप थकवा जाणवतो आहे, अशा तक्रारी त्या करतात. या थकव्याबरोबर त्यांना खूप चिडचिडल्यासारखे वाटते व इतर गोष्टींबद्दल काही आकर्षण वाटत नाही. बऱ्याच वेळा हा थकवा प्रचंड तीव्रतेने येतो आणि अचानक येतो. स्त्रिया आपले नियमित साधे कामसुद्धा करू शकत नाहीत. त्यांना पूर्ण गळून गेल्यासारखे वाटते. हे खरे तर रजोनिवृत्तीमधले खूप महत्त्वाचे लक्षण आहे बरं. पण बऱ्याच वेळा घरच्यांच्या ते लक्षात येत नाही. या काळात बऱ्याच स्त्रियांच्या मुलाचे लग्न झालेले असते. सूनबाई घरी आलेली असते. ती आजकालच्या काळात नोकरीला जात असते. अशा वेळी घरात काम करायचे नाही म्हणून सासूबाई सुनेला छळण्यासाठी थकल्याचे हे सोंग करताहेत असे घरातल्यांना वाटते. यामुळे घरच्यांची आणखी चिडचिड होते. कमी होणाऱ्या इस्ट्रोजनसारख्या हार्मोनबरोबर स्त्रीच्या शरीरातील शक्ती ही कमी होते. अशा तऱ्हेचा दीर्घकालीन थकवा स्त्रीची दमछाक करतोच पण तिचे नातेसंबंध व विधायकतेवरही दुष्परिणाम घडवितो. बराच काळ तिच्यात क्षमता असूनही ती सुप्तावस्थेत जाते आणि काहीच करत नाही.
भावनिक अस्थर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते.
या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते. स्त्रीला रात्र म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटते. कित्येक रात्री शांत झोप लागली नाही म्हणून पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटते. रक्तदाब वाढला आहे, मधुमेहावरचा ताबा राहत नाही. झोप न आल्यामुळे दिवसा कामात किंवा कशातही मन रमत नाही. मन एकाग्र होत नाही. नोकरीवर असल्यास नेहमीच्या कामात चुका होतात. घरातसुद्धा साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत. स्वयंपाक हमखास बिघडतो. खरे तर काही स्त्रियांना रजोनिवृत्ती सुरू व्हायच्या एक-दोन वर्षे आधीच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोप न येण्याची तक्रार सुरू होते. याच काळात बऱ्याच स्त्रियांना झोपेच्या गोळ्या घ्यायचे व्यसनही जडते. म्हणून झोपेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
बऱ्याच स्त्रियांचे रजोनिवृत्तीच्या काळात वजन प्रचंड प्रमाणात वाढू लागते. हे पुन्हा हार्मोन्स कमी झाल्यामुळेच होते. हे वजन वाढल्याने स्त्रीला स्वत:विषयीच राग येऊ लागतो. आपण बेढब दिसायला लागलो आहोत, आपले म्हातारपण जवळ आले आहे, आपले सौंदर्य कमी झाले आहे, असे वाटायला लागते. कामाची जबाबदारी घरात किंवा नोकरीवर पूर्वीच्या तुलनेने कमी होते. सुस्तपणा व थकवा आल्याने शारीरिक चापल्य कमी होते. त्यामानाने आहारावरही नियंत्रण राहत नाही. शरीराची हालचाल मंदावली जाते. या काळात हाडांचे दुखणे वाढते. गुडघे दुखू लागल्याने बाहेर जाणे कमी होते आणि वजन जास्त वाढायची प्रक्रिया चालू राहते.
या दरम्यान पोटाला फुगारा येतो वा फुगल्यासारखे वाटते. खूप अस्वस्थ वाटते. पोटात दुखतेही. अन्नपचन होत नाही. गॅस झाल्यासारखे वाटते. अॅ सिडिटी झाल्यासारखे वाटते. हा फुगारा एक प्रकारचा रोगच आहे की काय असे स्त्रियांना वाटते. मग घरगुती औषधे सुरू होतात. बऱ्याच वेळा स्वत:च्याच मनाने किंवा दुसऱ्याने सांगितले म्हणून इनोसारखं औषध घे, आयुर्वेदिक औषधे घे असे प्रकार सुरू होतात, ज्यामुळे स्त्रियांना आणखी त्रास होऊ शकतो. म्हणून वैद्यकीय उपचार डॉक्टरांना सांगूनच करावेत.
काही स्त्रियांचे डोके खूप दुखते आहे किंवा डोक्याभोवती स्नायू आवळल्यासारखे वाटतात. डोकेदुखी वा मायग्रेन पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असेल तर रजोनिवृत्तीच्या काळात ती जास्त प्रमाणात दिसून येते. सांधेदुखी ही दुसरी महत्त्वाची तक्रार स्त्रिया या काळात सतत करतात. मानेच्या, खांद्याच्या, पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला तर त्यांना पूर्वीची जी कामे व्यवस्थित करता येत होती, ती आता करता येत नाहीत. याच्यावर वेळीच लक्ष दिल्यास हाडांची पुढे होणारी झीज लक्षात येऊ शकते व उपचाराने ती रोखताही येऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची झीज होणे अपेक्षित आहे. हाडांना ठिसूळपणा येऊन ओस्टिवोपोरोसिस व आर्थायटिससारखा विकार बळावू शकतो. या काळात हाडे नव्याने भरून यायची तरुणपणातली प्रक्रिया चांगलीच मंदावते. म्हणून पुढे येणारी हाडांची व एकंदरीत हालचाल करण्याची दुर्बलता थांबविण्यासाठी कॅल्शियम किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाबाबत डॉक्टरी सल्ला व्यवस्थित घेणे आवश्यक आहे.
याशिवाय आणखी महत्त्वाची तक्रार म्हणजे स्तनांमध्ये थोडे थोडे दुखरेपण जाणवते. एकदम तीव्र नसले तरी ठुसठुसणारी ही वेदना अस्वस्थ वाटायला लागते. आजकाल तर स्त्रियांना आपल्याला कर्करोग झाला आहे, असा संशय पटकन येतो. त्यामुळे त्या घाबरतात व डॉक्टरांकडे जायचे टाळतात. स्तनांमधली ही अशी वेदना जी कधी खुपल्यासारखी, टोचल्यासारखी, थोडय़ाशा दबावाने येणारी असेल तर स्त्रियांनी जरूर तपासून घ्यावी. ज्यायोगे इतर काही कर्करोगासारखे आजार असतील तर तात्काळ ओळखता येतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. शुभांगी पारकर
Copyright © 2025 | Marathisrushti