वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोणत्याही माणसाची आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे !
हिमोग्लोबिन कसे वाढवायचे हे येथे सांगितले आहे.
मुख्य आहार हा सर्व ६ चवीनी युक्त हा आनंदीमनाने, अगदी मनापासून प्रार्थना म्हणून जेवणाला सुरवात करा.
आहळीवाची खिरेचा वापर करणे.खजूरातील बि काढून त्यामध्ये घट्ट तुप भरून तो खाणे.बिट,गाजर खाण्यात ठेवणे.लाल रंगाची फळे जसे की कलिंगण,करंवद वगैरेसारखी फळे खाणे.लाल रंगाचे कपडे वापरल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदतच होते.
स्त्रियांच्या बाबतीत शतावरी कल्प/शतावरीधृताचा वापर वैद्दयांच्या सल्ल्यांने करणे.पान (विडा)खाणे.राजगिरा खाणे (लाडू,चिक्की.लाहया) रव्याची लापशी गुळ घालून खाणे. आपली गावातील उकडया तांदळाची पेज मस्तपैकी साजूक तूप घालून खाणे.
हिमोग्लोबिन वाढविणारे बहुतेक पदार्थांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून साजुक तूपाचा हात सोडून वापर करणे.
तुम्ही जर ताजा नुकताच काढलेला पालक वापरू शकत असाल तर पालकाचे मीरी,लिंबू वगैरे घालून मस्तपैकी सुप बनवून पिऊ शकता.पण पालक अगदी फ्रेश हवा.तडक्याचा पण वापर करून वरून फोडणी देणे.
पाणी पिताना लोखंडी तडका मस्त गरम करून प्यावयाच्या भांडयात बुडविणे व असे पाणी पिणे.चपात्या/भाक-या नॉनस्टिक तव्यावर न भाजता लोखंडी तव्यावर भाजणे.
आंबट भाज्या सोडून इतर सर्व भाज्या लोखंडी कढईतच करण्याचा अट्टाहास धरणे.
गाजर+बिट ज्युस,काळया मनुका आदल्यारात्री पाण्यात भिजवुन दुस-या दिवशी खाणे आणि हे सर्व आपल्या पचनसंस्थेचा सारासार विचार करुन आणि कसलेच tension करायचे नाही.कारण आवडीने व मनापासून खाल्लेत तरच तुम्हांला चांगला result मिळणार. नाचणी सत्व /नाचणीची आंबिल खाऊ शकता. डाळिंबपण चांगले असते आणि जेवण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यत (7 च्या आत घरात) करा. झोपण्याच्या वेळा पाळा,कपालभांतिसारखे प्राणायाम,योग करा, आणि नेहमी tension free रहा.व तंदूरूस्त रहा.
जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!
कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा. दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन सpk
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना डॉक्टरांच्यामते जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
तोंडाच्या आजारांशी संबंधीत विशेषज्ज्ञ सोनाली बस्सींच्या मते गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.
जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य आहे यासाठी वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घेणे गरजेचे झाले आहे.
सामान्य आरोग्य तपासणी
महिलांनी नियमित एक किंवा दोन वर्षातून एकदा आपल्या शरीराचे चेकअप करून घ्यावे. यामुळे भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान वेळीचं होण्यास मदत होते.
याशिवाय तीन किंवा चार वर्षातून एकदा थायराइड टेस्ट (टीएसएच, टी 3, टी -4) जरूर करून घ्या असे केल्याने थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येते.
हाडांची तपासणी
वाढत्या वयाबरोबर आपली हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे ठिसुळ बनल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळते यासाठी हाडांचे चेकअप करने गरजेचे आहे. महिलांनी आपली बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेंसिटी टेस्ट ची तपासनी वयाच्या ५०शी नंतर करून घ्यावी.
ब्रेस्ट कॅन्सरचा चेकअप
बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. यासाठी वयाच्या पस्तीशी नंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट व क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करणे तर 35 वर्षाच्या आतिल स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करुन घ्यावी. या टेस्टमुळे सुरवातीच्या अवस्थेमध्येचं ब्रेस्ट कॅन्सरला ओळखून त्याला अटकाव करण्यास मदत होते.
डायबिटीज चेकअप
डायबिटीज म्हणजेचं मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड ग्लूकोस टेस्ट करून घ्या. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कळते आणि डायबिटीज आणि त्याच्या दुष्परीणामापासून रक्षण करण्यास मदत होते.
ह्रदय तपासणी
महिलांनी वयाच्या तिशी नंतर वर्षातून एकदा ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट आणि ECG टेस्ट करून घ्यावी. यामुळे विविध हृद्यरोगांपासून रक्षण करता येते. याशिवाय ३५ वर्षानंतर दर पाच वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंग टेस्ट जरूर करून घ्या.
रिप्रोडक्टिव/सेक्सुअल हेल्थ
प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी वयाच्या २१-६५ वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने ३ वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. पॅप स्मिअर टेस्ट करून सर्वाइकल कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरचे वेळीचं निदान करता येते.
तर वंधत्वाची समस्या होऊ नये म्हणून १८ ते ४० वयाच्या महिलांनी नियमित ‘पीसीओएस’ संबंधी हेल्थ चेकअप करून घ्या. ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोजच्या जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हाच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यासह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न किंवा इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, असे सांगितले जाते. जेवताना अन्न टाकायचे नसतेच. तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे; पण तरीही भराभर वाढून घेणे आणि नुसतीच चव चाखून ते टाकणे, असा तऱ्हेवाईकपणा वाढतो आहे. आपले तत्त्वज्ञान तर अन्न प्राशनाविषयी खूप खोलवर जाऊन बोलते. अन्नाची निंदा करू नये, त्याला नावे ठेवू नये आणि ते टाकू नये, असे साक्षात् उपनिषदांनी नोंदवून ठेवले आहे. त्याचे पालन होत नाही. बाहेरील मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या; पण घरातही खूप अन्न वाया जाते. त्याचा विचार व्हावा. रोज हजारो भुकेल्यांचे पोट भरेल एवढे अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवले, तर ‘अन्नदान श्रेष्ठदान’ सारखी आध्यात्मिक कृती घडेल. तैतरिय उपनिषदाच्या भृगुवल्लीमध्ये नवव्या अनुवाकात म्हटले आहे की,
अन्नं बहु कुर्वीत। तद् व्रतं। पृथिवी वा अन्नम्।
आकाशोऽन्नादः। पृथिव्यामाकाशः प्रतिष्ठितः।
आकाशे पृथिवी प्रतिष्ठिता।
तदेतदन्नमन्ने प्रतिष्ठितम्।
ह य एतदन्नमन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतितिष्ठति।
अन्नवानन्नादो भवति।
महान् भवति। प्रजया पशुभीर्ब्रह्मवर्चसेन।
महान् कीर्त्या।
अर्थ असा की, विपुल अन्न निर्मित करणे हे एक व्रत आहे. आकाश अन्नाद आहे. त्यातही पृथ्वीप्रमाणेच अन्नस्थित असते; त्यामुळे अन्नवास होणे हे ब्रह्मवर्चस्वाइतके मोठे होणे आहे. यावरून रोजच्या भोजनातील आध्यात्माची आपल्याला कल्पना येते. इंग्रजीत एक म्हण आहे की, Money Saved is money earned याचा अर्थ पैसा वाचविणे हे पैसा मिळविण्यासारखेच असते. याचाच संदर्भ घेऊन आपण अन्न या घटकाकडे पाहिले पाहिजे. अन्नाचा काटकसरीने वापर करणे हे अन्न निर्माण करण्यासारखेच आहे. आपल्याला घासातील एक घास भुकेल्याला ठेवणे, याला मनाची उदात्तता लागते. अतिथी-अभ्यागताची गरज लक्षात घेऊन त्याला अन्न देणे हे मानव्याच्या दृष्टीने परमभाग्य होय!
नव्या युगात ‘बुफे डिनर’ असते. मुळात लागेल तेवढे घेण्यासाठी बुफेची व्यवस्था असते; मात्र माणसं भराभर वाढून घेतात. ते खपणारे नसतेच; मग टाकून देतात. पंगतीतही वाढपे पुन्हा येतील की नाही, या भावनेने दोनऐवजी चार पुऱ्या घेतल्या जातात आणि मग अन्न वाया जाते. असे होऊ नये म्हणून स्वतःच पुढाकार घेणे श्रेयस्कर आहे. आपल्या रूढीप्रमाणे ‘अन्नसंस्कार’ केला जातो. सोळा संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार आहे; पण अलीकडच्या काळात या संस्काराचे आपण संस्कृतीत झालेले परिवर्तन मोडीत काढले असून एक विकृती म्हणून ही आपली अन्न संस्काराची परंपरा पुढे येत आहे. असे होणे प्रासंगिक घातकपणाचेच नव्हे, तर नव्या पिढीला बिघडविणारे आहे. आपण नव्यांच्या ओंजळीत जी संस्कार शिदोरी देतो तीच घेऊन ते पुढे जात असतात. त्यांच्या मन-बुद्धीचा विकासदेखील त्यावरच होत असतो आणि आपणच जर बेफिकीरीने जगत-वागत राहिलो, तर त्यांच्यावर तरी संस्कार होणार कसा? त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन वागले पाहिजे. जेवण झाल्यानंतर ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणण्याची एक रीत आहे. त्यातून अन्न देणारा आणि घेणारा दोघांचेही संस्कार दिसून येतात. जिभेला असलेले वळण जेव्हा मनाला लागते आणि त्याबरहुकूम मेंदू काम करतो तेव्हाच विवेकी आचरण घडत असते. यास्तव अन्नप्रतिष्ठा जपणे ही कुण्या एकटयाची नव्हे, तर राष्ट्रातील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
— प्राचार्य प्रशांत पाटील (सगुण निर्गुण, मटा. २८ नोव्हेंबर २०१६)
कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या उपचारांत वा त्याला आळा घालण्यात किंवा त्याला रोखण्यात काही भूमिका बजावतो का?
आपल्याला आश्चर्य वाटेल पण कॅन्सरच्या क्षेत्रातील तुलनेत ताजे मात्र परिणामकारक संशोधन हे आयुर्वेदीय सिद्धांतांवर आधारलेले आहे! या नव्या दालनाला Immunotherapy असे म्हणतात. या संशोधनातर्गत वापरण्यात आलेल्या औषधांना आता अमेरिकेत एफडीए चे प्रमाणपत्र मिळून त्यांचा उपचारांत वापरदेखील होऊ लागला आहे.
Immunotherapy म्हणजे काय?
थोड्क्यात सांगायचे झाल्यास; या प्रकारात रोगावर थेट औषध न देता आपल्या शरीरातील पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी तयार करण्यावर भर दिला जातो. आपल्या रक्तातील टी सेल्सना कॅन्सरच्या प्रोटीन्स आवरणाचे रूप बदलणाऱ्या पेशींना ओळखण्यास इंजेक्शनमार्फत काही औषधे देऊन प्रशिक्षित केले जाते. या संशोधनाने कॅन्सरच्या उपचारांत एक संपूर्ण नवा आयाम निर्माण केला असून हेच या उपचारांचे भविष्य असू शकते असे मतही जागतिक पातळीवरील कित्येक मान्यवर कॅन्सर उपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आयुर्वेद काय सांगतो?
आपल्यापैकी कित्येकांना हे माहिती नसेल; पण रोगप्रतिकार शक्ती अथवा 'व्याधीक्षमत्व' हा शब्द जगाला सर्वप्रथम आयुर्वेदाने सांगितला आहे. पुन्हा त्याचेही दोन उपप्रकार आणि त्यांचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. रोगावर थेट हल्ला न करता शरीराची एकंदरीत परिस्थिती अशा प्रकारे सुधारणे की जेणेकरून तो रोग शरीरात घर करूच शकू नये असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. आयुर्वेदात 'स्वभावोपरम वाद' या शीर्षकाखाली हा विषय सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.
आता आपल्या लक्षात आले असेल की नेमका हाच आयुर्वेदीय सिद्धांत वापरून सध्या आधुनिक वैद्यकाची वाटचाल सुरु असून; त्यांना याविषयी मोठा आधार वाटू लागला आहे. कॅन्सरचे रुग्ण आयुर्वेदीय पद्धतीने हाताळणारे शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न वैद्यगण याच सिद्धांताच्या आधारे उपचार करत असतात. (या क्षेत्रात आयुर्वेदाच्या नावाखाली भलत्याच लोकांकडून केली जाणारी लूटमार समोर असल्यानेच 'शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न' हे शब्द निवडले आहेत.) अर्थात; रोगाची अवस्था लक्षात घेऊन आणि क्वचित काही अपवाद वगळता बहुतांशी आधुनिक वैद्यकाच्या जोडीने हे उपचार दिले जातात. मात्र या संशोधनाने आयुर्वेदीय विचारसरणीला नव्याने बळकटी दिली आहे.
अर्थात; लगेच आयत्या बिळावर नागोबा बनायचेदेखील कारण नाही. कारण हा सिद्धांत आणि संकल्पना आयुर्वेदाची असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. जोवर सध्या आयुर्वेदात सुरु असलेल्या संशोधनांच्या आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या परिस्थितीत आपदतलमस्तक बदल होऊन आयुर्वेदीय परिभाषा व सिद्धांतानुसार रिसर्च प्रोटोकॉल तयार होत नाही किंवा या संशोधनांची क्षमता कित्येक पटीने अधिक वाढत नाही तोवर या क्षेत्रात सध्याच्या युगात अधिकारवाणीने भाष्य करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला नसेल. अर्थातच; हे एकट्या- दुकट्याचे काम नसून त्याकरता शासकीय पातळीवरूनच बदल करावा लागेल. अन्यथा तिथेही अमेरिका वा जर्मनीसारखे आयुर्वेदाचे महत्व जाणणारे देश आहेच. आज या दोन्ही देशांत आयुर्वेदावर मुबलक संशोधने सुरु आहेत. आमच्या देशात मात्र एक वर्ग आयुर्वेद म्हणजे भंपकपणा हा मूर्ख समज (जाणूनबुजून) कवटाळून बसला आहे तर दुसरा वर्ग आयुर्वेद हा अमक्या- ढमक्या पण्यजीवी व्यक्तींमुळेच सर्व लोकांपर्यंत कसा पोहचला या मिथ्या स्वप्नरंजनात दंग आहे. प्राप्त परिस्थितीत उद्या या देशांतील 'वैद्य' आपल्या हिंदुस्थानात येऊन 'अष्टांगहृदय' वा 'चरकसंहिता' शिकवू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण पण दुर्लक्षित अवयव म्हणजे पाठकणा होय.
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते.
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.
पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!
आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.
पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते.
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.
खरी भूक लागल्यावर हवे ते-
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?
शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य नक्की सुधारण्यास मदत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ.डॉ. शिरिष पटवर्धन
Copyright © 2025 | Marathisrushti