(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • न वैद्यो प्रभुरायुष:।

    "आजवर कित्येक उपचार घेतले; काही फरक नाही. अगदी IUI चे कित्येक प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा खर्च झाला; तरीही रिझल्ट नाही. माझ्या बहिणीने तुमच्या नावाचा आग्रहच धरला म्हणून इथे आले. इतर कशाने फरक पडलेलाच नाही; आता आयुर्वेदाने काही फरक पडतोय का बघूया इतकाच विचार डोक्यात होता. फारशी काही अपेक्षा नव्हतीच. तुमच्या औषधाने मात्र आमचं जीवन बदललं. आधीच तुमच्याकडून उपचार घ्यायला हवे होते."
    लग्न होऊन सहा वर्षे झाली पण गर्भधारणा नाही; अशी तक्रार असलेले जोडपे आपल्या नवजात बालकाला घेऊन आपल्याकडे येऊन ही प्रतिक्रिया देतात तेव्हा 'हा सूर्य हा जयद्रथ' इतकी स्पष्ट स्थिती असते. 'तुमच्या औषधाने' हे शब्द मात्र कानाला थोडेसे खटकले. माझं औषध? माझं असं काय आहे त्यात? जे आहे ते आयुर्वेदाचं; चरक-वाग्भटादि आचार्यांचं, वात्स्ययनादि महर्षींचं. आम्हा वैद्यांचं काम हमालाचं फक्त. 'फोडिले भांडार धन्याचा माल। मी तो हमाल भारवाही।'
    आम्हाला ज्ञान देणारा आयुर्वेद आणि फळ देणारे भगवान धन्वंतरी. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तमात्र. माझ्यासहच बहुतांशी वैद्य 'तुमच्या औषधाने' या शब्दांवर अडतात; 'माझ्या नाही - आयुर्वेदाच्या' असं तुम्हाला झटकन सुचवतात! शास्त्र हे सर्वोपरि. फार कशाला; काही मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले विद्यार्थीदेखील नमस्कार करण्यासाठी पुढे सरसावतात तेव्हाही मी त्यांना अडवतो आणि माझ्या चिकित्साकक्षातल्या धन्वंतरीप्रतिमेकडे बोट दाखवतो. बहुतांशी वैद्य असेच असतात; निष्काम कर्मयोग्यासारखे. किंबहुना तसेच असण्याचा आयुर्वेदाचा आदेश आहे.
    'न वैद्यो प्रभुरायुष:।'
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • रोजचा आहार अधिक पौष्टिक करण्यासाठी काही उपयुक्त सूचना

    गोडा मसाला बनवताना सुके खोबरे व तीळ हे स्निग्ध पदार्थ टाळून अथवा अत्यल्प प्रमाणात घेऊन, धने-जीरे, लवंग - दालचिनी, तमालपत्र, लालसुकी मिरची वगैरे पदार्थ तेलाशिवाय कोरडे भाजून दळून मसाला बनवावा.

    मैद्याऐवजी नेहमी गव्हाचे पीठ म्हणजे कणीक वापरावी. चवीत काहीही फरक पडत नाही. रोजच्या पोळीच्या कणकेत थोडे सोयाबीनचे पीठ मिसळून ठेवावे. ज्वारी - बाजरीच्या पिठात थोडे नाचणीचे पीठ मिसळून ठेवावे म्हणजे रोजचीच पोळी - भाकरी अधिक पौष्टिक बनेल.
    कॅलरीज कमी करण्यासाठी स्किम्ड दुधाचा वापर करावा. दोन वेळा दुधावरची मलई काढून टाकल्यावर ते दूध "लो फॅट स्किम्ड मिल्क' बनेल. ह्या दुधाचे दही, ताक सर्व बनवता येते. शक्य तर गाईचे दूध वापरावे.

    डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. तुरीची, मुगाची, मसुरीची उडदाची अशा सर्व प्रकारच्या डाळी आपण वापरतो. डाळ शिजवतानाच त्यात आवडीप्रमाणे कांदा - लसूण - टोमॅटो - हिरवी मिरची घालावी. म्हणजे नंतर चमचाभर तेलाची फोडणी पुरेल. बदल म्हणून डाळ शिजतानाच त्यात मेथी, पालक, शेपू अशी कोणतीही पालेभाजी घालून शिजवावे. म्हणजे प्रथिनांबरोबर पालेभाजीतील "लोह' व "अ' जीवनसत्व मिळेल.

    डाळींप्रमाणे कडधान्ये म्हणजे प्रथिनांचे स्रोत मानतात. कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी, गाजर, मुळा बीटरूट अशा कोणत्याही कोशिंबीरीत मोड आलेले कोणतेही कडधान्य कच्चेच घालावे. फोडणी देणे टाळावे. म्हणजे रोजचीच कोशिंबीर अधिक पौष्टिक बनेल.
    प्रेशर कुकर, ओव्हन, नॉनस्टिक तवा, पॅन, कढई यांचा वापर केल्यास कमीत कमी तेलात अनेक पदार्थ बनवता येतील.

    साखरेऐवजी शक्ये तेथे गूळ वापरावा, मधाचा उपयोग करावा.
    ताजी फळे खाणे उत्तम! सुकामेव्यापैकी आक्रोड, खजूर, काळ्या मनुका, सुके अंजीर सर्वांत पौष्टिक असतात. वजन कमी करण्याचा प्रश्न् नसेल तर रोज दोन बदाम खावेत.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. उमाशशी भालेराव

  • सण आणि सौंदर्य

    सामान्यतः महत्वाचे सणाच्या दिवसांमध्ये बहुतांश लोक एवढे बिझी असतात की, त्यांना या सणामध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि तासंतास पार्लरमध्ये बसण्यासाठी वेळच मिळत नाही. तुमच्या समोरही हीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला झटपट चेहरा उजळवणारे काही निवडक नैसर्गिक उपाय सांगत आहोत.

    1. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर १५ मिनिट लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर रक्तचंदनाचा लेपही लावा. या उपायाने चेहरा उजळ होण्यास मदत होईल.

    2. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. पिकलेली स्ट्रॉबेरी मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. हे चेहऱ्यासाठी टॉनिकप्रमाणे काम करते. या उपायाने रंग गोरा होतो.

    3. चेहर्‍याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ दिसेल.

    4. अनेक प्रातांमध्ये लोक मधाचा वापर करून फेसपॅक तयार करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार बेसन, मध, ऑलिव्ह, दुधाची साय एकत्र करून तयार केलेला फेसपॅक प्रभावी टॉनिकप्रमाणे काम करतो.

    5. फेसपॅक तयार करण्यासाठी ३ चमचे बेसन पीठ, मध, दुधाची साय आणि ऑलिव्ह तेल १-१ चमचाभर मात्रेत घेऊन एकत्र करून घ्या. हे मिश्रण २० मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धवून घ्या.

    6. दक्षिण भारतातील महिला रक्त चंदन नारळाच्या मलईमध्ये मिसळून चेहर्‍यावर लावतात. दक्षिण भारतीय या मिश्रणाला त्वचेसाठी खूप लाभदायक मानतात.
    7. हिमाचल प्रदेशातील महिला चाहेर्यासाठी सफरचंदचा वापर करतात. यांच्या मतानुसार सफरचंद ज्यूस चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍यावरील काळे डाग दूर होतात. याच्या नियमित वापरणे चेहरा उजळतो.
    8. दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे चेहर्‍यावर लावा. २० मिनिटांनी चेहर्‍यावरील हे मिश्रण ओल्या कापसाने स्वच्छ करून घ्या. या उपायाने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ होईल.

    9. कोरफडीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही ठिंब टाका. हे मिश्रण चेहरावर लावून वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या.

    10. चेहरा आणि ओठांवर साजूक तूप किंवा लोणी लावल्यास चेह-यावर चमक येईल. किमान तासभर हा लेप चेह-यावर लावून ठेवावा. यामुळे चेहरा आणि ओठ अतिशय मऊ आणि चमकदार होईल.

    तेलकट त्वचेकरीता उपाय

    1 चमचा दही, 1 चमचा बेसन, चिमुटभर हळद व 2-4 थेंब लिंबाचा रस टाकून घट्ट लेप तयार करून शरीरावर लावा. या उपायाने त्वचा निरोगी राहील आणि उजळेल.

    100 ग्रॅम हळकुंड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. हे उटणे थंडीपासून रक्षण करण्यासाठी आणि कांतीसाठी उपयुक्त आहे.

    थोडेसे दही घेऊन त्यामध्ये ८-१० तुळस किंवा लिंबाच्या पानांची पावडर मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. या उपायाने वारंवार चेहऱ्यावर येणारे पुरळ, फोडं यापासून मुक्तता मिळेल.

    एक चमचा गव्हाचे पीठ, तांदुळाची पेस्ट, ५-६ पुदिन्याचे पानं आणि ५ गुलाबाच्या पाकळ्या एकत्रितपणे कुटून एकजीव करा. या उपायाने त्वचा कोमल होईल.

    रुक्ष त्वचेकरीता उपाय

    थोडेसे तीळ दुधामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी यामध्ये चिमुटभर हळद टाकून बारीक कुटून पेस्ट तयार करा. हा लेप त्वचेवर लावल्यास त्वचा तजेलदार होईल.

    २ बदाम आणि एक चमचे बेदाणे रात्री दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी पेस्ट करून चेहऱ्यावर लावा.
    एक चमचा तांदुळाचे पीठ, 1 छोटा चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. या उपायाने त्वचा मुलायम होईल.

    एक चमचा उडदाची डाळ न तापवलेल्या दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करून यामध्ये थोडेसे गुलाबपाणी टाकून चेहऱ्यावर लावा.

    एक चमचा दही आणि 1 चमचा बेसन पिठामध्ये गुलाबपाणी मिसळून त्वचेवर लावल्यास मृत त्वचा निघून जाईल.

    केळ बारीक करून त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ मिसळुन हे मिश्रण त्वचेवर लावल्यास टॅनिंगची समस्या दूर होईल.

    सौजन्य
    डाँ..घोसाळकर
    7798617222

    `आरोग्यदूत ७' या WhatsApp ग्रुपवरुन साभार

  • साडेतीन मिनिटे

    डॉक्टरांनी सांगितलेले -
    ज्यांना अगदी सकाळी अथवा रात्री झोपेत असताना लघवीला जावे लागते अशांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना -

    प्रत्येकाने अशावेळी साडेतीन मिनिटे जपायला हवे. हे इतके महत्वाचे का आहे ? ही साडेतीन मिनिटे अकस्मात मृत्यूची संख्या कमी करु शकतात. ज्या ज्या वेळी असे जेव्हा घडले त्या त्या वेळी शारीरीक दृष्टीने तंदुरुस्त असलेल्या व्यक्ती रात्रीच मृत्यू पावल्या. अशा व्यक्तींच्या बाबतीत आपणास नेहमी ऐकिवात येते की कालच तर मी त्याच्याशी बोललो, हा असा अचानक कसा वारला ? याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री बाथरूमला जायला उठता तेव्हा तुम्ही ताबडतोब जाता. आपण जेव्हा एकदम उभे राहतो तेव्हा मेंदुला रक्त पुरवठा होत नाही. ही साडेतीन मिनिटे अतिशय महत्त्वाची का असतात ? मध्यरात्री जेव्हा तुम्ही त्वरित लघवी करण्यासाठी जागे होता तेंव्हा तुमचा ई.सी.जी. चा पॅटर्न बदलू शकतो. कारण एकदम उभे राहिल्याने मेंदूत रक्त पोचत नाही व त्यामुळे ह्रदयक्रिया बंद पडते. साडेतीन मिनिटाचा सराव हा यावर उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे

    1) झोपेतून उठतेवेळी पहिला अर्धा मिनिट गादीवर पडून राहा

    2) पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा

    3) त्यानंतर पुढील अडीच मिनिटे गादीच्या काठावर बसून दोन्ही पाय खाली सोडा.

    साडेतीन मिनिटानंतर तुमचा मेंदू रक्तावीना राहणार नाही व ह्रुदय क्रिया बंद पडणार नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यूची संख्या देखील कमी होईल.

    आपल्या परिचयातील स्नेहीजनांना या उपायाने लाभ व्हावा म्हणुन हा संदेश अधिकाधिक प्रसारित करा.

  • आपला आवाज कसा निर्माण होतो

    घशामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका जिथे वेगळ्या केल्या जातात तेथेच स्वरयंत्र असते. अन्ननलिका आणि श्वासनलिका एका झाकणासारख्या झडपेने वेगळ्या केल्या जातात. त्याला “एपिग्लॉटिस’ असे म्हणतात. स्वरयंत्र या एपिग्लॉटिसच्या खाली आणि “ट्रॅकिआ’ म्हणजे फुफ्फुसांकडून येणाऱ्या श्वासनलिकेच्या भागाच्या वर असते. स्वरयंत्रात दोन पातळ आडव्या पट्ट्या असतात, ज्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. या पट्ट्या पाठीच्या कण्याच्या बाजूला ऍरेटिनॉइड कार्टिलेजला तर पुढील कंठाच्या बाजूस थॉयराइड कार्टिलेजला जोडलेल्या असतात. दोन्ही बाजूंनी त्या स्वरयंत्राच्या आतल्या भिंतींना स्नायूंद्वारे जोडलेल्या असतात. आणि त्यांचा मधला भाग मोकळा असतो. प्रामुख्याने श्लेष्मल पेशींनी बनलेल्या या पट्ट्यांमध्ये काही स्नायूतंतूही असतात. या पट्ट्यांची कंपने “व्हेगस’ चंतातंतूंद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांना होणारा रक्ताचा पुरवठा अगदीच कमी असल्याने त्या मोतिया पांढऱ्या रंगाच्या दिसतात. हवेच्या योग्य दाबाने या पट्ट्यांची वेगवेगळी कंपने निर्माण केली जातात, त्यामुळे वेगवेगळे स्वर निर्माण होतात. हवेच्या दाबामुळे दूर ढकलल्या गेलेल्या या पट्ट्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे पुन्हा एकत्र येतात आणि हवेच्या दाबाने पुन्हा दूर ढकलल्या जातात. हे चक्र सतत सुरू राहते आणि आवाज निर्माण होतो. प्रत्येकाच्या आवाजाची प्रत ही त्याच्या स्वरयंत्रातील या दोन पट्ट्यांची लांबी, जाडी, आकार, त्यावरील ताण यावर अवलंबून असते.

    आवाज कुणाचा?
    आपल्या घशात असलेल्या स्वरयंत्रामधल्या स्नायूंच्या दोन पट्ट्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. घशातून निर्माण झालेला ध्वनी जीभ, जबडा, टाळू, ओठ यांच्या प्रभावामुळे बदलत जातो आणि आपल्या तोंडून “आवाज’ बाहेर पडतो. बोलाण्यासाठी, गाण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी, ओरडण्यासाठी या आवाजाचा वापर केला जातो. या आवाजातील चढ-उतारांवरून क्रोध, आश्चर्य, आनंद यासारख्या भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. तर त्याचा प्रभावी वापर करून गायक संगीत निर्माण करतात. पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांच्या आवाजाची कंप्रता सर्वसाधारणपणे १२५ हर्टझ् एवढी असते. स्त्रियांच्या आवाजाची कंप्रता २१० हर्टझ् तर मुलांच्या आवाजाची कंप्रता ३०० हर्टझ् असते.
    आवाज जपण्यासाठी काय करावे.

    चरकसंहितेत दहा कण्ठ्य द्रव्ये सांगितलेली आहेत. कण्ठ्य म्हणजे कंठाला, घशाला हितकर. अनंतमूळ, उसाचे मूळ, ज्येष्ठमध, पिंपळी, मनुका, विदारीकंद, कायफळ, हंसपादी, बृहती, कंटकारी ही द्रव्ये स्वराला हितकर असतात. प्रकृृतीनुरूप व दोषाच्या असंतुलनानुसार या द्रव्यांचा काढा, चूर्ण करून किंवा या द्रव्यांनी सिद्ध तेल वा तूप बनवून वापरणे आवाजासाठी हितकर असते. कण्ठ्य द्रव्यांपासून “संतुलन स्वरित’सारख्या गोळ्या तयार करून ठेवता येतात व या गोळ्या गवई, प्रवचनकार, वक्ते यांनी नित्य सेवन केल्यास आवाज उत्तम ठेवण्यास मदत मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. श्री बालाजी तांबे

  • डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…

    सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

    टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.

    बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.

    पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.

    काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.

    साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.

    व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.

    याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?

    फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?! काहींना हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले असेल. फोडणीसाठी तेलच वापरले जाते हे आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असलेले उत्तर. त्या तेलातही सोयाबीन वापरावे की सूर्यफूल अशा प्रश्नातच आम्ही बुडालेले असतो. मात्र मुळात फोडणीसाठी तेलच वापरावे का अन्य काही पर्याय आहे? याचा विचारदेखील आमच्या मनाला शिवत नाही.
    फोडणी देताना नेमकी काय प्रक्रिया होते?
    एखादा स्निग्ध पदार्थ खूप उच्च तापमानावर गरम करणे ही फोडणीतली मूलभूत प्रक्रिया. त्यात वापरला जाणारा स्निग्ध पदार्थ इतक्या तापमानावरही विघटित होऊन ‘फ्री रॅडिकल्स’ सारखे घातक असलेले घटक निर्माण करू नये हे महत्वाचे असते. यामुळेच फोडणीकरता ‘उच्च धुपांक’ (smoke point) असलेल्या तेलांचा वापर करा असे आधुनिक आहारशास्त्र सुचवते. खोबरेल तेल, तीळ तेल वा बटर यांची नावे या यादीत आघाडीवर येतात. (सध्या भारतात प्रचंड प्रिय होत असलेले ऑलिव्ह ऑइल मात्र यात नाही बरं! त्यावरही स्वतंत्रपणे लिहिनच.)
    वर दिलेल्या पर्यायांना ‘स्टेबल’ अथवा स्थिर घटक समजण्यात येते. मात्र यात एका महत्वाच्या घटकाचा समावेश केलेला नाही. तो पदार्थ म्हणजे तूप!! वरील बहुतांश संशोधने परदेशांत झाल्याने आणि त्यांना ‘तूप’ या पदार्थाच्या ‘विरजण ते कढवणे’ या प्रवासाची संपूर्ण माहितीच नसल्याने त्याचा वापर तितक्या प्रमाणात होत नाही. प्रत्यक्षात मात्र तुपासंदर्भात झालेल्या संशोधनांत असे आढळून आले की तुपाचा स्मोक पॉईंट बटरपेक्षाही जास्त आहे; थोडक्यात ते अधिक फोडणी देण्यास अधिक उपयुक्त आहे. याशिवाय Short chain fatty acids असल्याने ते पचायला तुलनेत सोपे आहे हा एक मुद्दा आहेच.
    आयुर्वेद काय सांगतो?
    आयुर्वेदाने अन्नपानात वापर करण्यासाठी देशी गायींचे तूप हेच सर्वोत्तम सांगितले आहे. फोडणीसाठी तेलाचा सर्रास वापर हा आपल्या अन्नात आजच्या इतका होत नव्हता. पाकशास्त्रावर आधारित असलेल्या कोणत्याही प्राचीन ग्रंथात क्वचित अपवाद वगळता फोडणीसाठी तुपाचाच वापर केलेला दिसून येतो. आमच्या देशातील गोधन घटल्यावर लोक आहारात तेलाचा इतका सर्रास वापर करू लागले. (कदाचित यामुळेदेखील पूर्वीच्या तुलनेत आरोग्यमान खालावले.) ‘विरजण ते कढवणे’ हा प्रवास पूर्ण केलेल्या देशी गायींच्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही; उलट कमी होते हेही प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
    विज्ञान हे प्रगतीशील आहे. मात्र; आधुनिक वैद्यक/आहार शास्त्रातील एखादे संशोधन पूर्णवस्थेला पोहचते तेव्हा ९९% वेळेस त्यांनी आयुर्वेदाचेच मत मान्य केलेले असते!! हे याचे जिवंत उदाहरण आहे. आपल्या आहारात फोडणीसाठी देशी गायींच्या तुपाचा वापर सुरु करा. न मिळाल्यास हॉर्मोन्स वगैरे न टोचलेल्या म्हशींचे तूप वापरा. आणि तरीही तेलच वापरायचे असल्यास कुठले आणि कसे वापरावे यासाठी पुढील लेखांकाची वाट पहा.
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • मिठाचा नवा सत्याग्रह

    मीठ कमी खा. मस्त जगा.

  • आज जागतिक मधुमेह दिन

    आज १४ नोव्हेंबर..आज जागतिक मधुमेह दिन
    मधुमेह... सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात इसवी सनपूर्व ४०० ते ५०० या कालखंडात मधुमेहाचा उल्लेख अढळतो. देशातील मधुमेहाचे प्रमाण २०१२च्या अहवालानुसार सहा कोटी तीस लाख एवढे आहे आणि ते वाढत जाण्याची शक्यता आहे. जवळपास ५० टक्के व्यक्तींच्या मधुमेहाचे निदानच होत नाही. सुमारे २० टक्के प्रौढ व्यक्तींना मधुमेह आहे, त्यातील ७५ टक्के मधुमेहींना योग्य इलाज मिळत नाही, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मधुमेह अनियंत्रित आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मधुमेहाची पूर्ण शास्त्रीय माहिती रुग्णांपर्यंत बहुतेक वेळा पोहोचवली जात नाही. शरीरातील प्रत्येक पेशीच्या ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लुकोज आहे. अन्नपदार्थाचे रूपांतर पचनसंस्थेमध्ये रक्तात शोषल्या जाणाऱ्या छोट्या अन्न घटकांमध्ये होते, जसे कर्बोदकांचे (साखर आणि स्टार्च) रूपांतर ग्लुकोजमध्ये होते, प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो अॅसिडमध्ये (मेदाम्ले) होते, तर चरबीचे रूपांतर फॅट ग्लोब्युलमध्ये होते. रक्तातील ग्लुकोज शरीराच्या सर्व पेशींसाठी गरजेप्रमाणे उपलब्ध होते, तर जास्तीचे ग्लुकोज ग्लायकोजेन आणि मेदाम्लाच्या रूपात शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये साठविली जाते व गरजेनुसार वापरली जाते. इन्शूलीन आणि ग्लुकॅगॉन ही स्वादूपिंडीत तयार होणारी संप्रेरके शरीरातील ग्लुकोजचे नियंत्रण करतात. इन्शुलीन रक्तातील साखर कमी करते, तर ग्लुकॅगॉन साखर वाढविते. इन्शुलीन तयार होण्याच्या प्रक्रियेत अनियमितता किंवा इन्शुलीनला पेशींनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही, तर पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढून पेशींमध्ये साखर कमी पडते. या स्थितीलाच मधुमेह म्हणतात.

    मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्तातील दीर्घकालीन वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात. मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व, वंध्यत्व इत्यादी सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि ज्या अवयवाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला, तर त्याचा गंभीर आजार होतो. पायात रक्तपुरवठा न होणे, जखमेत संसर्ग, जखमा बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे, पाय सडणे, असा त्रास यामध्ये होतो.

    मधुमेहाचे प्रकार
    आयडीडीएम
    या प्रकारचा मधुमेह लहान वयात किंवा तरुणपणी होतो. शरीरात इन्शुलीन तयार होत नाही किंवा अत्यल्प होते. यांना इन्शुलीनचे इंजेक्शन अनिवार्य असते. इन्शुलीनअभावी शरीरात किटोन तयार होतो. यातून व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मृत्यूच्या स्थितीकडे जाऊ शकते.
    इन्शुलीन आवश्यक नसलेला मधुमेह. मधुमेहाच्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना इन्शुलीन आवश्यक नसलेला मधुमेह असतो. हा सहसा चाळीशीनंतर होतो. अधिक वजन आणि बैठी जीवनशैली या आजाराला कारण ठरते. आहार, औषधी आणि योग्य जीवनशैली यांनी या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

    गरोदरपणातील मधुमेह
    काही महिलांमध्ये दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत मधुमेहाची लक्षणे दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना हा त्रास होतो. जीवनशैलीतील बदल आणि उशिरा होणारी गर्भधारणामुळे हा त्रास होतो. यामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे, बाळाची ग्लुकोज कमी होणे, बाळाला जन्मल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे किंवा कावीळ यांना सामोरे जावे लागते.
    औषधामुळे होणारा मधुमेह अनेक औषधांमुळे शरीरातील इन्शुलीनची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. अशा स्थितीस सेकंडरी मधुमेह म्हणतात. या प्रकारचा मधुमेह औषधे बंद केल्यास बरा होतो.

    मधुमेहाची कारणे आणि लक्षणे
    एफसीपीडी या मधुमेह विशेष प्रकारात पोटात दुखणे, शौचाला जास्त प्रमाणात व तेलकट होणे आणि अन्नघटकांचे पचन व शोषण अपूर्ण राहिल्यामुळे होणारी लक्षणे दिसून येतात. स्वादुपिंडात तयार होणारी पाचकद्रव्ये कमी झाल्याने अशा रुग्णांची पचनशक्ती मंदावते. आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील बदल अशा दोन्ही कारणांनी मधुमेह होत असावा. स्थूलपणा मोजण्यासाठी बॉडीमास इंडेक्सचा वापर करतात.

    इन्शुलीन रेजिस्टंस
    दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलीन तयार होते, पण पेशी इन्शुलीनला प्रतिसाद देत नाहीत. याला इन्शुलीन रेजिस्टंस म्हणतात. त्यामुळे या व्यक्तींमध्ये मधुमेह असल्याची जाणीव लगेच होत नाही.

    मधुमेहाची लक्षणे
    अनेक व्यक्तींमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, तर काहींना खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागणे, वजन घटणे आणि अशक्तपणा जाणवणे, अशा तक्रारी असतात. निरनिराळ्या अवयवांचा जंतुसंसर्ग उदा. त्वचा (पुरळ, गळवे, खाज), मूत्रमार्ग (लघवीला जळजळ / आग, लघवीच्या जागी खाज येणे, जागा लाल होणे), सायनसचे विकार व क्षयरोग जाणवू लागतात.

    मधुमेहाच्या परिणामांची लक्षणे अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका, कमजोर नजर, अंधत्व, वंध्यत्व,मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे होणारी विविध लक्षणे आहेत. महिलांबाबत गर्भपात, अर्भकाचा गर्भाशयातच मृत्यू, मुलांमधे विकृती यांनी मधुमेह अस्तित्व दाखवतो.

    मधुमेहाचे निदान
    उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरून मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखर तपासण्यासाठी व्यक्तीने किमान आठ तासांपूर्वी अन्न ग्रहण केलेले असावे. रक्तातील साखरेचे सामान्य प्रमाण ८० ते १०० मिलिग्रॅम टक्क्यांएवढे असते. उपाशीपोटी साखर १२६ मिलिग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर मधुमेह झाला आहे, असे खात्रीलायकपणे म्हणता येते. रक्तातील सामान्य साखर २०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त आणि मधुमेहाची लक्षणे असतील, तरीही मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखर जेवणानंतर दोन तासांनी १५० मिलिग्रॅमहून अधिक असेल, तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. रक्तातील ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ६.५पेक्षा जास्त असेल, तर मधुमेह असतो.

    ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनबद्दल थोडी माहिती करून घेऊयात. आपल्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. त्याचा संयोग रक्तातील साखरेबरोबर होऊन ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन तयार होते आणि तांबड्या पेशीचे आयुष्य तीन महिने असते. त्यामुळे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन मागील तीन महिन्यांची साखरेची मात्रा दाखविते. या टेस्टने मागील ३ महिन्यांतील साखरेचे नियंत्रण कसे आहे, ते कळते. ही तपासणी कोणत्याही वेळी केली जाऊ शकते.

    जीटीटी (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट)
    मधुमेहाचे निदान करण्याची ही एक विश्वासार्ह चाचणी आहे. ती उपाशीपोटी करावयाची आहे. ग्लुकोमीटर हे ग्लुकोजची रक्तातील साखर त्वरित मोजण्याचे छोटे सुटसुटीत यंत्र आहे. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आवश्यकतेनुसार कधीही मोजता येते.

    मधुमेहातील इतर तपासण्या.
    बॉडी मास इंडेक्स, पोटाचा घेर, रक्तदाब, त्वचा, पायच्या संवेदना, थायरॉइड ग्रंथीची तपासणी, डोळ्यांचा पडदा, रक्तातील साखर नियंत्रणात असेल, तर दर तीन महिन्यांनी रक्तातील साखर उपाशीपोटी आणि जेवणानंतर तपासावी, रक्तातील चरबी ‘ट्रायग्लिसेराइड’ची तपासणी महत्त्वाची आहे, किडनी फंक्शन टेस्ट, किडनीच्या प्रकृतीसाठी लघवीमधील मायक्रोअल्बुमिनची तपासणी, हृदयविकरासाठी ईसीजी, कलर डोप्लर, स्ट्रेस टेस्ट, दातांची तपासणी आणि गरजेनुसार इतर तपासण्या. या चाचण्या ठराविक कलांनातराने पुन्हा करणे गरजेचे असते.

    मधुमेहावरील उपचार
    सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल, असे एकही औषध उपलब्ध नाही. तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये वजन कमी करण्यानेसुद्धा मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.

    मधुमेही व्यक्तीचा आहार काय असावा?
    - साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट पूर्ण बंद करावे.
    - फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ टाळावे.
    - तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे. दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदयरोगालाही आमंत्रण मिळते.

    - मोनो अनसॅचुरेटेड नावाची चरबी शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते आणि यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर असते.
    - ट्रान्स फॅटी अॅसिड्स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यामध्ये यांचे प्रमाण जास्त असते.

    - मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे हे पदार्थ बंद करावे.
    - आंबा, केळी, चिक्कू, द्राक्ष ही फळे बंद करावीत.
    - पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात.
    - मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त प्रमाणात घ्यावे.
    - टरबूज, पपई, बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे घ्यावीत. रोज एक फळ खाणे रोग्यासाठी चांगले असते.
    - तंतुमय पदार्थांचे सेवन करावे जसे रागी, बाजारी, मका, गहू इत्यादी.
    - द्रव पदार्थ उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत.
    - मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धवस्था येण्याची शक्यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात.

    मधुमेही व्यक्तींसाठी व्यायाम
    मधुमेहींसाठी व्यायाम हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा रुग्णांनी मध्यम प्रतीचा व्यायाम करावा. रोज ३० मिनिटे मध्यम किंवा तीव्र गतीने चालण्याचा व्यायाम हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे. व्यायामपूर्वी १० मिनिटे वार्मअप होणे गरजेचे आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान यांचाही शरीरावर चांगला परिणाम होतो. मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरच्या सल्ल्याने व्यायाम करावा. शेवटी सर्वांत महत्त्वाचा संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगसाधना, ध्यान, व्यसनमुक्त जीवन, योग्य औषधोपचार आणि मधुमेह शिक्षण याद्वारे या आजारावर मात करता येऊ शकते. जो मधुमेही रुग्ण मधुमेहासंबंधी जास्तीत जास्त ज्ञान मिळवेल आणि योग्य तो उपचार करेल तो दीर्घायुषी होईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. विकास रत्नपारखे./ मटा.

  • आपली संस्कृती….

    बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का
    मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !!

    सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा
    कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल.

    बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या सौंदर्याची शान ,त्याच बांगड्यांमुळे होते गर्भाशय सुरक्षित असल्या ची जाण.
    शारीरिक व मानसीक बदल.हा आहे एक भाग, म्हणून जोडवि बीरोदी घालुन सूहासिनी सारखी बाई तू वाग !!

    शरीरातील रक्तप्रवाहासाठी टोचतात लहानपणीच कान ,
    भारतीय संस्कृतीने दिला आहे, स्त्रियांना " कानातले " घालायचा मान.