वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते.
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.
पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!
आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.
पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते.
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.
खरी भूक लागल्यावर हवे ते-
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?
शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य नक्की सुधारण्यास मदत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ.डॉ. शिरिष पटवर्धन
मूल जन्माला येते, ते नैसर्गिकरित्या सुडौल व बांधेसूदच असते. त्यानंतर वाढीच्या वयात आहार व व्यायाम जसा असेल त्याप्रमाणे शरीराचे आकारमान, वजन बदलत जाते. नैसर्गिकरित्या असलेला बांधा/चण मात्र तसाच राहतो. उदाहरणार्थ, व्यक्ती बारीक, मध्यम किंवा रुंद चणीच्या असू शकतात.
ज्या व्यक्ती मुळातच बारीक चणीच्या आहेत, त्यांनी कितीही आहार व व्यायाम केला तरी मूळची चण बदलत नाही. त्यावर चरबीची किंवा स्नायूंची वाढ होऊन वजन वाढेलही, पण एकदा आहार व व्यायाम थांबला की काही काळातच शरीर पुन्हा नैसर्गिक चण धारण करेल.
याच प्रकारे मध्यम व रुंद बांध्याचेही होते. म्हणूनच शरीर सुडौल, बांधेसूद करायची सुरुवात करण्याआधी आपला मूळचा बांधा कसा आहे हे माहीत असणे अत्यंत गरजेचे असते.
एकदा आपला बांधा कळला की मग आपले वजन किती असावे हे ठरवता येते. बारीक चणीच्या व्यक्तीचे वजन मध्यम चणीच्या व्यक्तीत योग्य वजनापेक्षा 2-3 किलो किलो जास्त असू शकते.
उदाहरणार्थ - 5 फूट 2 इंच उंचीच्या तीन व्यक्ती आहेत. एक बारीक चणीची, एक मध्यम व तिसरी रुंद चणीची.
या उंचीसाठी मध्यम चणीच्या व्यक्तीचे योग्य वजन 50 ते 55 किलोदरम्यान असते, तर बारीक चणीच्या व्यक्तीचे योग्य वजन 47 ते 52 किलो व रुंद चणीच्या व्यक्तीचे 52 ते 57 किलो असू शकते. त्यामुळे आपली उंची व बांधा यावर आपले योग्य वजन अवलंबून असते, हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे.
तुमचे वजन व उंची प्रमाणात आहे किंवा नाही हे मोजायचे एक प्रमाण असते. त्याला Body Mass Index असेही म्हणतात. जर हा Index 18 ते 25च्या मध्ये असेल, तर तुमचे वजन उंचीच्या प्रमाणात आहे, असे म्हणता येते.
मात्र या वजनाच्या खेळात एक मेख मात्र आहे! आपल्या शरीराचा डौलदारपणा, सुबकपणा व आरोग्य यावर अवलंबून असते.
आपल्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग स्नायूंनी व किती टक्के भाग चरबीने बनलेला आहे, याचे प्रमाण हीच ती मेख! वजन जरी उंचीप्रमाणे योग्य असेल, पण जर त्यात चरबीचे प्रमाण जास्त असेल, तर शरीर बेढब व स्थूल दिसते. पण जर स्नायूंचे प्रमाण जास्त असेल, तर मात्र शरीर सुबक, पिळदार व कसलेले दिसते. म्हणूनच वजन कमी करण्यापेक्षा शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे हे सुडौल बांधा मिळवण्यासाठी नितांत आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये ही चरबी मुख्यत्वे कमरेच्या आजूबाजूस साचते, तर पुरुषांमध्ये पोटावर. त्यामुळेच स्त्रियांमधील स्थूलता ही पेअरच्या आकाराची व पुरुषांमधील सफरचंदाच्या आकारासारखी दिसते. मासिक पाळी संपल्यावर मात्र स्त्रियांमध्येही पुरुषांप्रमाणे पोटावरही चरबी साठू शकते. म्हणूनच या वयानंतर स्त्रियांच्या पोटाचा घेरही वाढलेला दिसतो. स्नायू व चरबी यांचे प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये वेगवेगळे असते.
पुरुषांमध्ये चरबीचे प्रमाण वजनाच्या कमीत कमी 12-15% असणे व स्त्रियांमध्ये 25-28% असणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे सुडौल बनवण्याच्या नादात चरबीचे प्रमाण यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला, तर हानिकारक ठरू शकते. स्थूलपणाचे दुष्परिणामही बरेच आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा, जडत्व, Varicose Veins, सायटिका, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इ.इ. त्यामुळे शरीर सुडौल दिसण्याबरोबरच ते निरोगी ठेवण्यासाठी वजन त्यामुळे आटोक्यात असणे गरजेचे असते.
आजकाल ठिकठिकाणी Gyms, Yoga Centres यांचे पेव फुटलेले दिसते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सल्ले मिळतात. त्यामुळे नक्की कसे व किती वजन कमी करावे याबाबत गोंधळ असतो. सुडौल बांध्यासाठी योग्य आहार व व्यायाम याला पर्याय नाही.
* प्रथमत: हे लक्षात घ्यावे की व्यायाम आपल्यावर लादलेली गोष्ट न होता ती जीवनशैली बनली पाहिजे.
* आठवडयातून 4-5 वेळा एक तासभर योग्य प्रकारे व्यायाम केल्यास शरीर सुडौल व निरोगी बनतेच.
* व्यायामही वेगवेगळया प्रकारचे असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे एरोबिक पध्दतीचे व्यायाम - उदा. चालणे, पळणे, पोहणे, नृत्य. सध्या प्रचलित असलेला झुंबा याच प्रकारात मोडतो. अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी या प्रकारच्या व्यायामांची गरज असते. मात्र त्यासाठी कुठलाही एरोबिक व्यायाम कमीत कमी अर्धा तास, न थांबता व मध्यम गतीने करणे आवश्यक आहे.
तुमचे वय व शारीरिक व्याधी - उदा. गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार इ. ध्यानात धरूनच एरोबिक व्यायाम प्रकार व त्याची गती निश्चित करावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
दुसरा प्रकार म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम. यामध्ये स्नायूंना बळकटी मिळते व स्नायूंचे आकारमानही वाढते. यामुळे शरीर पुष्ट, सशक्त व पिळदार होते. वजन वाढवण्यासाठी असे व्यायाम खूप उपयुक्त असतात.
शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढल्यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाण्यासही मदत होते.
तिसरा प्रकार म्हणजे लवचीकता वाढवणारे व्यायाम प्रकार. यात सांध्यांचे व्यायाम, सूक्ष्म व्यायाम व योगासने यांचा समावेश होतो.
व्यायामांमुळेच नवीन बनलेले, बळकट झालेले स्नायू लवचीक असतीलच असे नाही. असे कडक स्नायू ताण सहन करू शकत नाहीत. त्यामुळे लचक भरणे, सांधे दुखणे असे त्रास होऊ शकतात.
लवचीकपणा वाढविणाऱ्या व्यायामांमुळे हे स्नायू लवचीक होतात व कुठल्याही प्रकारचा ताण सहन करू शकतात. त्यामुळे पाय मुरगळणे, मुका मार लागणे, सांधेदुखी इ. छोटया-मोठया दुखापती टळू शकतात.
वजन उचलण्याचे व्यायाम केल्यामुळे स्नायूंमध्ये जर Soreness किंवा ताठरपणा येत असेल तर या व्यायामांमुळे तो कमी होण्यास खूप मदत होते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. वृषाली वझे आहारतज्ज्ञ
विशेषत: लहान मुलांना हे स्निग्ध पदार्थ खाऊ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अशा वेळी या स्निग्ध पदार्थात सुकामेवा, साखर, मध, हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर, मिरची पूड आदी पदार्थ टाकत त्याची चव बदलत ते मुलांना दिल्यास मुलेही आवडीने खातील. हे स्निग्ध पदार्थ नुसते खाण्याऐवजी चपाती, भाकरी, भात, खिचडीसोबत खावेत.
दूध आबालवृद्धांच्या आहारात दुधाचा हमखास समावेश असतो. अनेक जण सकाळ-संध्याकाळ दूध आवडीने पितात. पण दुधाला पाहून नाक मुरडणारेही अनेक जण आहेत. अशा वेळी दुधाची चव बदलत ते पिल्यास केव्हाही चांगले. हिवाळ्यात ज्यांना नुसते गरम दूध आवडते त्यांनी ते दररोज एक ग्लास प्यावे.
दुधात साखर घालण्याऐवजी मध टाकून प्यावं. मध हा साखरेला उत्तम पर्याय आहेच, शिवाय मधात स्वत:चे उष्ण गुणधर्म आहे. त्यामुळे ग्लासभर दुधात एक चमचा मध टाकल्यास चविष्ट दूध लागेल. हे दूध मुले आवडीने सेवन करतील. साखर आणि मधऐवजी दूध मसाला हाही एक उत्तम पर्याय आहे. केशर, बदाम, काजू, वेलचीपूड, जायफळ यांचा समावेश असलेला दुधाचा मसाला दुधात टाकावा. दुधासोबत मसाल्यात समाविष्ट सुकामेव्याचे गुणधर्मही शरीराला मिळतील.
ताक हिवाळ्यातील थंडीत भूक अधिक लागते. थंड वातावरणामुळे पचनही लवकर होते. अशा वेळी ताकाचे सेवन केल्यास उत्तम. पण दररोज त्याचे सेवन करू नये. जेवणानंतर ग्लासभर ताक पिणं चांगलं. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. नुसतं ताक पिण्याऐवजी त्यात आवडीनुसार साखर घालूनही पिऊ शकतो. तर इतर वेळी कोथिंबीर, मीठ, हिंग, जिरे यांचा समावेश असलेला ताकाचा मसाला वापरतही ताकाची चव वाढवता येऊ शकते.
लोणी ताजे लोणी हे नेहमी रुचकर लागते. ताजे लोणी चवीला गोड असते आणि त्यात ताकाचा अंश असल्याने चविला किंचित तुरट, आंबटही लागते. लोणी पचायला हलके असल्याने हिवाळयात दिवसातून दोन-तीन चमचे नुसते खावे. ज्यांना नुसते लोणी खाणे आवडत नसेल त्यांनी लोण्याचा दररोजच्या आहारात समावेश करावा.
बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत ताजे लोणी चविष्ट लागेल. लोण्यात किंचित मिरचीपूड टाकल्यास लोण्याचीही चव वाढवता येऊ शकते. लोणीमध्ये चमचाभर साखर घालत हे मिश्रण गरम चपाती किंवा भाजलेल्या ब्रेडवर लावून दिल्यास मुले आवडीने खातील.
तूप साजूक तूप जेवढे चविष्ट, रुचकर आहे तेवढेच ते औषधीही आहे. दररोजच्या आहारात तुपाचा सर्रास वापर होतो. हिवाळ्यात गरम चपाती, भाकरीसोबत तूप खावे. तांदळाच्या भातासोबत तसेच मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी करत त्यासोबत तूप खाल्ल्यास चांगले. मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी.
जिरे, लसूण, मोहरी, सूंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.
थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळयात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी.
सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ संध्याकाळ कोमट पाणी प्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
जगभरात नेहमी आढळणारी व सर्व वयोगटातील लोकांची तक्रार म्हणजे घसा दुखणे. या दुखण्यामागची कारणे पण अनेक आहेत. सर्दीसायनसपासून कॅन्सरपर्यंत अनेक प्रकारच्या आजारात घसा दुखू शकतो. या बाबतीत योग्य निदान, वेळ न दवडता होणे महत्त्वाचे असते व त्याबरोबरच डॉक्टुरांकडून रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी होणेदेखील महत्त्वाचे असते. घशात खूप वेदना जाणवणे, घसा कोरडा पडणेखवखवणेखाज सुटणे ही वरवर दिसणारी लक्षण आहेत. या आजारात काही रुग्णांचा कानही दुखू शकतो. अनेक लोकांना तोंड उघडे ठेवण्याची सवय असते. त्यामुळे श्वा सामुळे घसा कोरडा पडू शकतो. जिवाणू किंवा जिवाणूजन्य दाह, ऍलर्जी, अति प्रदूषण, अति धूळ किंवा घरात कचरा सांडणे, सिगारेटचा धूर, उदबत्तीचा उग्र वास किंवा उदबत्तीचा धूर, अति मोठ्याने बोलणे, घट्ट कॉलरचा शर्ट किंवा घट्ट टाय वापरणे, घशाला इजा होणे, घशाचा कॅन्सर, शरीरातील बिघाड किंवा काही प्रकारचे आजार; तसेच काही शस्त्रक्रिया किंवा तपासण्यांनंतर घसा दुखू शकतो. अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, नाकाघशातून धूर जाणे, ऍसबेस्टॉस किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये किंवा भट्टीजवळ काम करणे यामुळेसुद्धा घशाचे आजार संभवतात.
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे ऍलर्जीक ऱ्हायनायटिस.
अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
जे धूम्रपान करीत नाहीत, (passive smoking) त्यांनाही त्रास होऊ शकतो.
डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
काही औषधांमध्ये उदा सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टारांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
काही रुग्णांना घशात गाठ असण्याची भावना होऊ शकते. आवाज बसतो, स्वरयंत्रणेचा दाह होतो, स्वरयंत्रणेच्या कूर्चा सूजतात.
अगदी घरगुती उपचारांमध्ये वाफारा घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे करता येते.
विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, प्लिहा सूजणे, अति लाळ गळणे असा त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आठवड्यापासून जरा जास्तीच दुखतंय, अनवाणी तर चालता येतच नाही, पण स्पंजची गादी असलेल्या चपला वापरल्या तरी त्रास होतोय, सकाळी उठल्यावर तर तळपायाची वेदना मस्तकात जाते. पायाला विश्रांती दिली की बरं वाटतं. परंतु सारखं बसून कसं चालायचं? एकीकडे वजन कमी करायला, फिरायला जायला हवं, पण फिरलं तर टाच दुखते, कसं व्हायचं? टाचांचा एक्स रे केला, त्यामध्ये दोन्ही टाचांना असलेले टोकं स्पष्ट दिसत होती. सुरुवातीला हाडांच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पण त्याचा हवा तसा परिणाम होत नाही.
आपल्या तळव्याची रचना
पायाच्या तळव्याची टाच, चवडा, बोटे व टाच आणि चवड्याला जोडणारी कमान असे चार मुख्य भाग असतात. तळव्याची ही कमान ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या अस्थिबंधनापासून बनलेली असते. चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्या वजनाच्या वीसपट वजन टाचेवर पडत असते. या भाराचे योग्य विस्थापन करून तो पेलण्याचे काम ‘प्लांटर फेशिया’ हे अस्थिबंधन, तळव्याची चरबीची गादी व स्नायू यांच्या मदतीने वर्षानुवर्षे बेमालूमपणे करत असते. त्यामुळे कालांतराने पावलाच्या गादीची थोडीफार झीज होते. याशिवाय काही कारणांनी उदा. वजन जास्त असणे, अनियमित किंवा सुटीच्या दिवशी व्यायाम करणे, सांधे दुखी, मणक्याचे विकार असणे इत्यादीमुळे पावलाच्या भार पेलण्याच्या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे अस्थिबंधन दुखावले जाते. आणि तळवे विशेषत: टाचदुखीला सुरुवात होते. सकाळी प्रथम उठताना या दुखण्याची तीव्रता अधिक असते. चालायला सुरुवात केल्यावर हळूहळू कमी होते. ज्या व्यक्तींना सतत उभे राहण्याचे काम असते. अशा व्यक्ती उदा. वाहतूक पोलिस, व्यावसायिक, कंडक्टर, ड्रायव्हर, या व्यक्तींना हा त्रास जास्त असतो. जास्त वेळ उभं राहिलं, टणक पृष्ठभागावरून चाललं तर त्रास परत वाढतो. विश्रांती घेत असताना पायावरचा भार निघून गेल्याने टाचदुखी थांबते, पण उभं राहिल्यावर दुखते. अस्थिबंधन ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. काही वेळेसहे दुखणे ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. दुखणे इतके तीव्र असते की, दैनंदिन काम करणे मुश्कील होते.
उपाय यासाठी उपाय म्हणून शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत. यामुळे तात्पुरते दुखणे कमी होते. परंतु दीर्घकालीन उपचार म्हणून होमिओपॅथी औषधांचा करावा. यामुळे पूर्णत: त्रास नाहीसा होतो. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही पेशंटच्या प्रकृतीवरून व शारीरिक हालचालीच्या अभ्यासावरून खालील होमिओपॅथिक औषध उपयुक्त ठरतात. जसे - सिलेशिया, र्हवस टॉक्स, पल्सेटीला, रुटा, चेलिडोनियम, ग्लोनाइन,फास्फरस, ब्रायोनिया, कलेकेरिया, बेलाडोना अशा अनेक औषधींचा उपयोगलाभदायक ठरतो. पेशंटनी आपला औषधोपचार तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करावा. कारण प्रत्येक पेशंटची प्रकृती, शारीरिक हालचाल व लक्षणांवरून पोटेंसी व प्रमाण, डोस ठरवण्यात येतो. योग्य उपचाराद्वारे हा त्रास पूर्णत: नाहीसा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- डॉ. कपिल वानखेडे.
वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो. या आसनं मुळे नेहमीच वजन कमी करण्यात मदत होत असते. ही आसने करताना योगशिक्षकांची मार्गदर्शन घेऊनच करावीत.
वक्रासन
पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा. दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा. श्वाचस घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्व सन संथ चालू ठेवा.
फायदे
आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो. त्यामुळे पाठीचा कणाही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो. त्याच्या अगदी नेमकी उलट अवस्था या आसनात होते. त्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला या आसनाचा निश्चिलत उपयोग होतो. पोटाचे, मांड्यांचे, पोटर्यां चे स्नायू कार्यक्षम होतात.
दक्षता
पाठीच्या कण्याचे विकार असणार्याक रुग्णांनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करू नये.
भुजंगासान
जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा. दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या. हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत. एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात. आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा. लक्षात ठेवा: तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यात पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.
लक्षात ठेवा: तुमचे कान तुमच्या खांद्यांपासून दूर आहेत का? खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.
तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा. आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या.
श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.
फायदा:- खांदा व मानेला मोकळे करते. पोट पुष्ट करते. संपूर्ण पाठ व खांदे सशक्त बनवते. पाठीच्या मधल्या व वरील भागांना लवचिक बनवते. छाती विस्तारते. रक्ताभिसरण सुधारते. थकवा व तणाव कमी करते. श्वसनमार्गाचे विकार जसे दमा असलेल्या लोकांना फारच उपयुक्त. (परंतू खोकल्याची उबळ आली असता हे आसन करू नये).
भुजंगासन केंव्हा करू नये
गरोदरपणात, छातीचे अथवा मनगटाचे हाड मोडल्यास, किंवा नुकतीच एखादी पोटाची शस्त्रक्रिया, जशी हर्निया, झाली असल्यास हे आसन करू नये. तुम्हाला कार्पेल टनेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर भुजंगासन करू नका. जुन्या आजारात किंवा पाठीच्या कण्याच्या विकारात हे आसन फक्त योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
धनुरासन
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात.
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. पाठीला किंवा कण्याला गंभीर विकार झाले असतील तर हे आसन करू नये. अल्सर, कोलायटीससारखे पोटांचे विकार असलेल्यांनी हे आसन टाळावं. छातीवर झोपावं. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत आणि सहा ते सात इंच एकमेकांपासून दूर करावेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोटयाजवळ पकडावं. आता श्वास घ्यावा आणि हातांनी पाय व पायांनी हात ओढून वर उचला. संपूर्ण शरीर वर उचला आणि ताणलं जाऊ द्या.
पाय वर उचलताना पोटऱ्या मांडयापासून लांब नेण्याचा प्रयत्न करा. शरीराची आकृती ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत किमान १० ते ३० सेकंद राहा. श्वास संथगतीने सुरू राहू द्या.
या स्थितीत असताना हाताची पकड जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच शरीराचा सगळा भार पोटावर येईल. पूर्वावस्थेत येताना, श्वास सोडत सोडत, गुडघे, खांदे, हनुवटी हळूहळू जमिनीवर टेकवा. गुडघ्यात पाय हळूहळू सरळ करा, गुडघे सरळ केल्यावर पूर्वस्थितीला या. थोडया वेळ शरीर शिथिल करा.
फायदा:- या आसनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. तसंच पाठीचा मणका विशेषत: कुठल्याही दिनचर्येच्या कामात धनुष्याप्रमाणे असा ताणला जात नाही, तो या आसनामुळे ताणला जातो. म्हणून मणक्याची गादी सरकणं, मणके झिजणं आणि कमरेचे स्नायू जखडणं या व्याधींवर अत्यंत लाभदायी म्हणजे हा आसन प्रकार आहे.
पश्चिमोत्तानासन
पश्चिम या शब्दाचा अर्थ पाठीकडची बाजू असाही होतो. या आसनात पायाच्या घोट्यापासून मस्तकापर्यंतचा पाठीचा भाग ताणला जातो. म्हणून याला ‘पश्चिमोत्तानासन’ असं सार्थ नाव दिलेलं आहे.
सपाट जमिनीवर पाय पसरून बसावं. पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवावेत. मान सरळ आणि समोर असावी. कमरेत वाकून हात पावलांकडे न्यावेत. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे.
कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे. संथ श्वास चालू ठेवावा.
थोडा वेळ याच स्थितीत बसावं. हळूहळू हाताची पकड सोडत पूर्वस्थितीत यावं.
फायदे
शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात. खुरटलेली उंची वाढवण्यास या आसनाचा उपयोग होतो.
पोटावर, विशेषत: ओटीपोटावर घनदाब निर्माण झाल्याने तेथील मेद कमी होतो. तरुण वयात निर्माण होणारे वीर्यदोष व तरुण स्त्रियांना जाणवणारा मासिक पाळीच्या अतिरिक्त स्त्रावाचा त्रास या आसनाच्या सरावानं नाहीसा होतो. सायटिका, पाठीची व कमरेची इतर दुखणी या आसनाच्या योग्य व नित्य अभ्यासाने दूर होतात. पचनक्षमता सुधारते.
चक्कीभ चलनासन
योगचं हे आसन पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते. पहिल्यांदा जमीनवर तुम्ही आरामत बसा, या दरम्यान तुमचे पाय सरळ पसरवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून असले पाहिजेत, याचं भान ठेवा आणि गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात फिरवा. दहा वेळेस या आसनाला घड्याळ्याच्या दिशेने फिरवा आणि काही वेळाने घड्याळ्याच्या विरूद्ध दिशेने फिरवा, आणि नंतर सोडून द्या.'
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मला अजूनही उमगले नाही,..
शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात...
1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात...हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240...
3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.
मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो....
एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 ...बरोबर ...रूपये 270
एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची....टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये ...
आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल....
तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.
कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे....याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ....
महात्मा गांधी सांगत ",खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच."
आला ना हिशोब ध्यानात ......शुद्ध ....शुद्ध खाद्यतेलाचा....
आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन ...
-- मकरंद
घनदाट काळ्या केसांसाठी
केसांच्या मुळांना मिळणारे पोषण हेच काळ्या, दाट आणि लांबसडक केसांचे रहस्य आहे. योग्य आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कलर, डाय किंवा शाम्पूने केसांना पोषण मिळत नाही. आयुर्वेदिक जडी-बुटींनी केस धुतल्याने तसेच आयुर्वेदिक तेल लावल्याने पोषण मिळते. आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. त्याचबरोबर केस गळणेही बंद होते.
काही आयुर्वेदिक उपाय काळ्या केसांसाठी.
आवळा पावडर आवळ्याची पावडर काळ्या रंगाच्या लोखंडाच्या भांड्यात एक दिवस ठेवा. दुसर्या् दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण आठवडाभर पाणी मिसळून लोखंडाच्या भांड्यात ठेवा. आठवड्याभरात या पेस्टचा रंगही काळा होईल. पूर्ण काळी झाल्यानंतर ही पेस्ट डायप्रमाणे केसांना लावावी. दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या दिवशी हा प्रयोग करून पाहा. केस नैसर्गिकरीत्या काळे होऊ लागतील आणि त्यांची चमकही वाढेल.
शिकेकाई शिकेकाई आणि सुका आवळा चांगला ठेचावा. दोन्ही तुकडे पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी कापडाने हे पाणी गाळताना या कापडाने ते दाबून एकत्र करावे. या पेस्टने केसांना मालीश करावी. मालीशनंतर अर्ध्या तासाने अंघोळ करावी. केस वाळल्यानंतर खोबरेल तेल लावावे. असे केल्यास केस काळे, दाट, लांबसडक आणि चमकदार होतात. विशेष म्हणजे, शिकेकाई आणि आवळा वापरल्यास केस कधी पांढरे होत नाहीत आणि ज्यांचे पांढरे झालेत ते काळे होतात.
खोबरेल तेल, जैतुन तेल आणि लिंबू खोबरेल तेल आणि जैतुन तेल (ऑलिव्ह ऑईल) समप्रमाणात मिसळून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. या मिश्रणाने केसांना मालीश करा. मालीशनंतर डोके गरम टॉवेलने तीन मिनिटे झाकून ठेवा. असे केल्यास केस गळणे थांबते आणि केस काळेही होतात.
मेथी पावडर मेथीच्या बियांमध्ये केसांना पोषक अशी सर्व तत्त्वे असतात. मेथीच्या दाण्यामध्ये फॉस्फेट, लेसिथिन, न्यूक्लिओ-अल्ब्युमिन आणि कॉड लिव्हर ऑईलबरोबरच फॉलिक अॅासिड, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त, तांबे, नियासिन, थियामिन, कॅरोटिन अशी पोषकद्रव्ये असतात. ही पोषकद्रव्ये केसांच्या मुळांना मजबूत करतात. मेथीच्या दाण्यांचे ग्राईंडरमध्ये चूर्ण करून पाण्यात कालवून त्याची पेस्ट तयार करा. यामुळे केस काळे, दाट आणि लांबसडक होतीलच; शिवाय कोंड्याची समस्याही नाहीशी होईल.
अमरवेल सुमारे 250 ग्रॅम अमरवेल तीन लिटर पाण्यात उकळा. जेव्हा पाणी अर्धे उरेल आणि अमरवेल पाण्यात पूर्णपणे विरघळेल तेव्हा पातेले उतरवा. सकाळच्या वेळी या पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट आणि लांबसडक होतात.
त्रिफळा त्रिफळा चूर्णात निम्म्या प्रमाणात लोह भस्म मिसळा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास केस गळणे थांबते आणि केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो.
कलौंजी( कांद्याचे बी.) एक लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम कलौंजी उकळा. हे उकळलेले पाणी थंड करून त्याने केस धुवा. एक महिन्यात केस काळे आणि लांबसडक होतील.
कडुलिंब कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून ठेचून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावा. दोन ते तीन तासांनी केस धुवा. यामुळे केस गळणे कमी होऊन ते लांबसडक आणि काळेही होतील.
मेंदी आणि आवळा कोरडी मेंदी आणि कोरडा आवळा समप्रमाणात घेऊन सायंकाळी पाण्यात भिजत घाला. रात्रभर भिजविल्यानंतर सकाळी या पाण्याने केस धुवा. असे वारंवार केल्याने केस काळे, मुलायम आणि लांबसडक होतात.
रिठा एक ग्रॅम कापूर, १०० ग्रॅम नागरमोथा आणि रिठ्याच्या फळाचा गर, पावशेर शिकेकाई आणि200 ग्रॅम आवळा हे मिश्रण एकत्र करून दळा. अर्धा ग्लास पाण्यात हे मिश्रण टाकून लेप तयार करा. हा लेप केसांना लावून केस सुकेपर्यंत वाट पाहा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट आणि लांबसडक होतील. तसेच ते सिल्की आणि चमकदार होतील.
शंखपुष्पी शंखपुष्पीपासून तयार केलेले तेल दररोज केसांना लावले तर पांढरे केसही काळे होतात.
भांगरा डोक्यावरील काही भागात केस नसतील, तर भांगराच्या पानांचा रस काढून त्या भागात लावावा. काही दिवसांनी तेथे काळे केस उगवू शकतात. ज्यांचे केस वारंवार गळतात अशा व्यक्तींनी हा उपाय जरूर वापरून पाहिला पाहिजे. त्रिफळा चूर्णाला भांगराच्या रसात उकळून नंतर ते व्यवस्थित वाळवावे. नंतर हे मिश्रण दळून ठेवा. हे मिश्रण दररोज सकाळी केवळ दोन ग्रॅम सेवन करा. यामुळे केस पांढरे होणे थांबते.
काळे तीळ काळ्या तिळाचे तेल केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत. दररोज तिळाच्या तेलाने मालीश केल्यामुळे केस नेहमी मुलायम, काळे आणि लांबसडक राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.डॉ. भारत लुणावत.
आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात 'सूर्यकेतू' नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला 'स्वर्णक्षार' म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
डोळे दुखणे - उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
आम्लपित्त - आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
रक्तपित्त - ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.
आतड्यांचे रोग - जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अनेकांना डोकेदुखीचा त्रास झाला की, त्यावर ते पेन किलर घेतात. तसे पाहता डोकेदुखी ही सर्वसाधारण समस्या आहे, पण ही नेहमीची डोकेदुखीची समस्या काहीही केल्या बंद होत नसेल तर हे ‘ब्रेन ट्युमर’चे एक लक्षणही असू शकते व यावर वेळीच उपाययोजना न केल्यास हा आजार जिवावर बेतू शकतो.
शरीरात बनणारे सेल्स काही वेळेनंतर नष्ट होऊन जातात आणि त्या सेल्सच्या जागी नवीन सेल्स बनतात. ही एक साधी क्रिया आहे, पण ही क्रिया जेव्हा चुकते तेव्हा ट्युमरचे सेल्स बनने चालू होतात आणि ब्रेन ट्युमरचा त्रास चालू होतो. ब्रेन ट्यूमरला मस्तिष्क कॅन्सरही म्हटल्या जाते. ब्रेन ट्यूमर ३ ते १५ वर्षे वयोगटामध्ये किंवा ५० वर्षांच्या व्यक्तीलाही होऊ शकतो. पुरुष किंवा महिला यांना कोणालाही हा आजार होतो. त्यामुळे या डोकेदुखीकडे दुर्लक्ष न करता त्यावर निदान करणे गरजेचे आहे.
ट्यूमरचे प्रकार ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमधील पेशी कुठल्याही नियंत्रणाविना वाढत राहतात. ही वाढ पटकन लक्षातही येत नाही. हा घातक आजार दोन प्रकारचा असतो.
बिनाइन ट्यूमर या प्रकारात मेंदूच्या नेहमीच्या पेशींना कुठेही धक्का न लावता ट्यूमर वाढतो आणि ऑपरेशन करून हा ट्यूमर काढून टाकला तर या विकारापासून मुक्ती मिळू शकते.मेलिग्नेंट ट्यूमर या प्रकारात अधिक घातक असतो, तो असतो ब्रेन कॅन्सरचा. ऑपरेशन केले, तरी कॅन्सरग्रस्त पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते. यातही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात प्राथमिक स्वरुपाच्या ब्रेन कॅन्सरची सुरवात मेंदूमध्येच होते, तर दुसऱ्या प्रकारात कॅन्सरची वाढ शरीराच्या एका भागात होते आणि ती मेंदूपर्यंत पसरते.
ब्रेन ट्यूमरची लक्षणे
ब्रेन ट्यूमरचे पहिले लक्षण म्हणचे डोकेदुखी होय. सकाळच्या पहरी जास्त व जसजसा दिवस उजाळतो तसा कमी कमी होत असते.
‘पेन किलर’ने डोके दुखीवर तात्पुर्ता आराम मिळत असतो. परंतु औषधीची क्षमता कमी झाल्यानंतर पुन्हा तीव्रतेने डोके दुखायला लागते.
ब्रेन ट्यूमरमध्ये डोके दुखी व्यतिरिक्त इतर लक्षणे ही आहेत. जसे की, वारंवार शरीराचा तोल जाणे, पायांत अशक्तपणा येणे, चालताना अडखळणे, दृष्टिदोष येणे, तिरळेपणा, बोलण्यात अडखळने, वाढ खुंटणे, मानसिक अस्वस्थता, शुद्ध हरपणे तसेच झोपाळू वृत्ती बळावणे कमी ऐकू येणे आदी लक्षणे जाणवतात.
मस्तिष्क अथवा त्या संबंधित क्रियामध्या अचानक परिवर्तन घडत असते. डोके जड पडणे, स्मरणशक्तीचा लोप पावणे, डोक्यासोबत मान दुखणे तसेच शुध्द हरपरे अशी लक्षणे रोग्यात जाणवत असतात.
मस्तिष्क कॅन्सरचे निदान कसे कराल.?
१) ब्रेन ट्यूमरवर उपचार लक्षण व परीक्षणाच्या काळात होऊ शकतो. परीक्षणानंतर विशेष प्रकारच्या चाचण्या कराव्या लागत असतात. डोक्याचा एक्स-रे, कॅट स्केन, मनक्यातील पाण्याचे परिक्षण यादीद्वारे या रोगाचा निदान करू शकतात. ब्रेन ट्यूमरवर प्रारंभिक अवस्थेतच उपाचार करणे शक्य होत असते.
२) शल्य चिकित्सा, रेडिओ थेरपी तसेच औषधीच्या माध्यमातून ब्रेन ट्यूमरवर आता प्रभावी उपचार केला जाऊ शकतो.३) डोके दुखीवर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टराचा सल्ला घ्यावा. ब्रेन ट्यूमरचे लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत परीक्षण करून घेणे हाच ब्रेन ट्यूमरवर प्राथमिक उपाचार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti