(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • कशाला हवयं विदर्भ राज्य ?

    महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत.

    दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात शेवटच्या टोकावर आहे. यालाच आम्ही वऱ्हाड म्हणतो. पूर्वी इंग्रज लोक बेरार म्हणत होते. जिल्ह्याचा दक्षिण भाग मराठवाड्याला लागून आहे. जालना आणि हिंगोली हे जिल्हे आहेत. इकडे पश्चिमेकडून जाईचा देव असलेला मराठवाड्यातील औरंगाबाद आणि खानदेशातील जळगाव जिल्हा लागून आहे. उत्तरेकडून मध्यप्रदेश राज्य आहे. पूर्वी आमचा बुलडाणा जिल्हाही याच राज्यात म्हणजे मध्यप्रदेशात होता. तेव्हा आमच्या सीपी अँड बेरार या प्रांताची राजधानी नागपूर होती. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषा एक नाही. घाटावरचे म्हणजे, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यातील लोकांवर मराठवाड्यातील भाषेचा प्रभाव आहे. त्याला आम्ही घाटावरची भाषा म्हणतो. तर इकडे मलकापूर, नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यातील लोकांवर खानदेशी बोलीभाषेचा प्रभाव आहे. त्यांच्या बोलण्यात वेगळीच ढब आहे. तर खामगाव, शेगाव, संग्रामपूरचा भाग घाटाखाली असून अकोल्याला लागून आहे. त्यामुळे इकडचे लोक प्युअर वऱ्हाडी बोलतात. बरेच वर्षे आमचा खामगाव विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभेतच समाविष्ट होता. आता कुठे बुलडाणा झाला आहे. तर तिकडचे मलकापूर आणि नांदुरा हे तालुके आता जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत. त्यांचे बहुतांश व्यवहार जळगाव खांदेशशी आहेत. तर बुलडाणा, माेताळा तालुकाही भावनिक, सांस्कृतिकदृष्ट्या तिकडेच जोडलेला आहे. एकंदरित चित्र जर पाहिले तर जिल्ह्यातल्या जिल्ह्यातही अनेकांचे नातेसंबंध नाहीत. दीडशे किमी अंतरावर अमरावती जिल्ह्याशी अनेकांचे नातेसंबंध असू शकतात. पण घाटाखालचे आणि घाटावरचे असे नाते अलिकडच्या काळापर्यंतही जुळू शकलेले नाहीत. शहरांनी ही सीमा कधीचीच ओलांडली आहे. विषय ग्रामीण भागाचा आहे. कारण बुलडाणा जिल्हा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातच आहे.

    उदाहरणच द्यायचे झाले तर खामगाव तालुक्यातील बऱ्याच ग्रामस्थांनी कधी जिल्ह्यातील सिंदखेडराजा पाहिलेले नाही. आणि घाटावरच्या लोकांनी कधी जळगाव जामोद, संग्रामपूर पाहिले नसावे. असा हा विरोधाभास आहे. हे फक्त ग्रामीण लोकांनाच लागू पडते अशातला भाग नाही. तर पोलिस विभागालाही लागू होऊ शकते अशी परिस्थिती आतापर्यंत होती. कारण इकडे तामगाव पोलिस स्टेशनचा कर्मचारी कधी किनगावराजा पोलिस स्टेशनला बदलीवर जाण्यास तयार होत नव्हता. तर डोणगावचा कर्मचारी इकडे जळगाव जामोद किंवा बोराखेडी पोलिस स्टेशनला येण्यास तयार नव्हता. तसे पाहिले तर जिल्हा तीन भागात विखुरलेला आहे. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ यामुळे कुणाचे विचार वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहेत, तर कुणाचे विरोधात आहेत.

    राजकारणी लोकांनी सुरुवातीपासूनच विदर्भाचा मुद्दा ताटकळत ठेवला आहे. जे आतापर्यंत विदर्भ राज्य व्हावे असे बाेंबलत होते, ते भाजपच्या काळात मूग गिळून चूप बसले आहेत. त्यांना विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता आवाज तर करता येतच नाही. पण पाठिंबाही देता येत नाही. यात बहुधा काँग्रेसीच अधिक आहेत. आपल्याला काँग्रेसवर टीका करायची नाही. पण भाजप विदर्भाची मागणी करत असताना विदर्भातील जनतेच्या सोयीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे मुद्दा रेटून धरण्यात गैर आहे काय?

    याउलट परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची आहे, जे आतापर्यंत विदर्भातील लोकांचा केवळ द्वेषच करत आले, ते अजूनही द्वेषच करत असून अखंड महाराष्ट्राची भाषा बोलत आहेत. विदर्भाचे वेगळे राज्य झाल्यास महाराष्ट्र काय नकाशातून गायब होणार आहे काय ? उत्तर भारतात एका हिंदी भाषेचे अनेक राज्य आहेत. आपल्या मराठी भाषेचे दोन राज्य झाली तर आभाळ कोसळणार आहे काय ? उलट आतापर्यंत देशात एकच मराठी भाषिक राज्य होते, आता दोन होतील.

    दुसरे असे की, लोकांना आपल्या गावात गट ग्रामपंचायत असली तर स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी असे वाटते. ग्रामपंचायत असेल तर त्याचे रुपांतर नगरपंचायतीत किंवा नगरपालिकेत व्हावे असे वाटते. एखादे मोठे गाव असेल तर तेथे तालुका व्हावा यासाठी मागणी केली जाते. खामगावसारखे मोठे शहर असेल तर जिल्हा व्हावा, अशी मागणी केली जाते. पण एखादा प्रांत जर मोठा असेल तर त्याचे राज्य व्हावे असे म्हटले की, बऱ्याच जणांच्या पोटात दुखते.

    ग्रामपंचात, तालुके, जिल्हे आणि राज्याची निर्मिती ही प्रशासनाच्या सोयीसाठी केली जाते, हे शहाण्यांच्या लक्षात येत नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काळानुरुप बदल होणे आवश्यक आहे. छोटी राज्ये ही भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड ही नवी राज्ये निर्माण झाली. हे सर्वांच्या सोयीसाठी. तसेच विदर्भाचे राज्य व्हावे, हे सुद्धा सर्वांच्या सोयीसाठी. पण उर्वरित महाराष्ट्रातील लोकांचा किंवा विदर्भातील लोकांचा विरोध कशासाठी होतोय ? हेच कळायला मार्ग नाही.

    - जनार्दन गव्हाळे,
    खामगाव, जिल्हा बुलढाणा,
    विदर्भ.
    मोबाईल 9168147080

  • ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास……

    ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास….. ग्रुप वरील सदस्यांच्या भिन्नकभिन्न मानसिकतेचा सांगोपांग विचार, एक शोध, अनेक बोध..

  • मराठा मोर्चा

    मराठा मोर्चा सर्व महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, होणारच, कारण ज्यांच्या मताने गेली चार पाच दशके मराठा सरपंचा पासून मराठा मुख्यमंत्री या राज्याच्या सिंहासनावर बसून शासन करत होते, ते सर्व आज पूर्ण मराठा समाजाला, वेठबिगारी बनवून सत्तेसोबत मालमत्तेची मलई आपल्या ताटात ओढून या अभागी जनतेला देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य उघड झाले.

    हे असे का झाले, याचा कानोसा घेतला तर दिसते कि,

    मराठा धनदंडग्यांनी अर्थात सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री, संत्री, यांनी जवळपास सर्व सहकारी बँका बुडवल्या. याच सहकारी बँकेत अश्या गरीब मराठा लोकांचा पैसा जो त्यांनी काबाड कष्ट करून मिळवला तो ठेवलेला होता, त्यांची नावे सर्वाना माहित आहेत. भाबडेपणाने मराठा लोक आपले भाऊ, आण्णा, तात्या, असे बिरुद लावणारे बँकेचे चेअरमन आपल्या जातीचे आहेत, सर्व डायरेक्टर आपलेच जातभाई आहेत, आपल भल करण्यासाठीच हि बँक त्यांनी सुरु केली, या गोड गैरसमजुतीत राहिले, आणि पैसा घालवून बसले, दोष तरी कुणाला द्यायचा, आपलेच दात आणि आपलेच ओठ. असे चेअरमन, आजही ताठ मानेने एक कोटीच्या गाडीतून फिरतात व वर्षातून दोन तीन वेळा हवापालट करण्यासाठी विदेश वारी करतात, जेव्हा कि त्यांना कारावासाची हवा मिळायला पाहिजे.

    महाराष्ट्रातील पन्नास टक्के मराठा आमदार, खासदारांनी त्यात पवार कुटुंब आहेच, आपल्या नातलगांना भरमसाठ कर्जे दिली, आणि बँक बुडवल्या, उदाहरण देऊ का, सुनील केदार ने गरीब जनतेचे 155 कोटी बँक बुडवुन फस्त केले, हे कुणाचे पैसे आहेत, कधी विचार केलात? आपल्या माजी राष्टपती यांनी प्रतिभा महिला बँक बुडवली, चौकशी करा, त्यात कुणाचा पैसा होता, अहो गरीब मराठयांचा होता, कुणी खाल्ला, त्यांच्या भावाने व भाच्याने. का नाही त्यांच्या घरावर मोर्चा काढत? या सर्व कार्यकाळात मराठा मुख्यमंत्री होते, याचा अर्थ काय. म्हणजे या ठेवीदार मराठ्यांची हि दशा कुणी केली, इतर जातींनी नक्कीच नाही, मग सध्याच्या सरकारवर का दबाव आणण्याचा का प्रयत्न करताय? मराठीत याला साप साप ओरडून दोरखंडाला काठीने मारणे म्हणतात. आज सुनील केदार तोंड वर करून फिरतो, निवडणूक लढवतो, आणि हे मराठे आपला माणूस म्हणून त्याला आजही भरगोस मतदान करतात, याला हसावं का रडावं हेच कळत नाही.

    उसाला हेच साखर कारखानदार योग्य भाव देत नाहीत, व मराठा शेतकऱ्याची गळचेपी करतात. सर्व सहकारी साखर कारखाने जाणूनबुजून आजारी केले आहेत, हे त्रिवार सत्य असताना पिचलेला मराठा का त्यांना शरण जातो, काय मोहिनी हे लोक करतात हेच समजत नाही? जे प्रायव्हेट साखर कारखाने चालवले जातात ते उसाचा भाव या सहकारी करखान्यांपेक्षा खूप जास्त देऊन सुद्धा नफा दाखवतात, भागधारकांना भरगोस लाभ देतात, मग असा लाभ सहकारी कारखाने का देत नाहीत? दरवर्षी नुकसान का दाखवतात? मला नेहेमी प्रश्न पडतो, हा नुकसानीचा धंदा असूनही हे नेते लोक जीवाचा आटापिटा करून कारखान्याची सत्ता हातात घेण्यासाठी आसुसलेले का असतात. सामान्य माणसे नुकसान होत असेल तर धंदा बंद करतात, मग हे नेते का निवडणूक लढवतात?

    आजही आपल्या देशात मारवाडी, सिंधी, गुजराथी, बोहरा मुस्लिम हे स्वतःच्या गरीब जात बांधवाना व्यवसाय करण्यासाठी पैसे गोळा करून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देतात, ते ना आरक्षण मागतात, न भीक मागतात. मराठा समाजातील जे मागासवर्गीय राहिले, त्यांना इतर श्रीमंत मराठयानी वर येण्यासाठी मदत करायला पाहिजे कि नको? तसे हे धनदांडगे का करत नाहीत? तुम्हाला आरक्षण देऊन पोसणे हे सरकारचे काम नाही, हेच या मोर्चे काढणाऱ्याना समजत नाही, इथेच तुमची गफलत होते आहे. लक्ष्यात घ्या फाळणी नंतर सिंधी समाज फक्त अंगावरच्या कपड्यांनी हिंदुस्तानात आला, देशभरात विखुरला, आणि आज अरबो रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला आहे, तेही फक्त 70 वर्षात. तुमच्याकडे तर गेल्या चारशे वर्षापासून जमिनी आहेत, तुम्हाला सिंधी समाजासारखा घरदार सोडून जावे लागले नाही, मग तरी तुमच्यावर आज आरक्षण मागायची वेळ का यावी? होळकर, शिंदे, गायकवाड उत्तर हिंदुस्तानात काही एकटे गेले नाहीत, त्यांच्यासोबत मोठया संख्येने मराठे स्थलांतरित झाले, त्यांच्यावर अशी वाईट वेळ आलेली दिसत नाही, ते मराठे गुजरात, मध्यप्रदेशात राहतात, पण आरक्षण मागत नाहीत.

    आज जो प्रकार चालू आहे त्याला आपली लत्करें वेशीवर टांगणे म्हणतात. यदाकदाचित शिवाजी महाराज आज परत आले आणि त्यांनी हे सर्व पहिले, तर सर्वात प्रथम तुमच्या साहेबांपासून सर्व साखर व शिक्षण सम्राटांना तोफेच्या तोंडी देतील, मग या मोर्चेकऱ्यांचा छडीचे समाचार घेतील, आणि म्हणतील कष्ट करून, घाम गळून पैसा कमवा, आणि तो पैसा सरकारी बँकेत ठेवा. मनगटात जोर असताना भीक का मागता, असे म्हणून दोन फटके जास्त लावतील.

    मीही किती स्वप्नाळू, म्हणजे मूर्ख आहे, कि या नासलेल्या जगात महाराज पाय ठेवतील अशी भाबडी आश्या बाळगतोय, अशक्य आहे ते. माफ करा महाराज, मोर्चा असाच सुरु राहूदे, विनाश काले विपरीत बुद्धी यालाच तर म्हणतात.

    -- अभागी मराठा

    फेसबुकवरील पोस्ट

  • राईट टू डिस्कनेक्ट !

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्वाचे विधेयक लोकसभेत मांडले .हे एक खासगी विधेयक होते .त्या विधेयकाचे नाव होते Right to disconnect.या विधेयकावर सोशल मिडीयावर फार चर्चा झाली नाही आणि बातम्यांमध्ये सुद्धा हे विधेयक जरा दुर्लक्षित राहीले .खरेतर या विधेयकावर दूरदर्शन वर विशेष चर्चा व्हायला हवी होती पण ती झाली नाही.

  • श्राद्धामागील ‘श्रद्धा’

    या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख.

  • स्मार्ट सिटी नागपूर

    काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता.

    भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता इथेनॉल वर चालणाऱ्या 50 बसेस आणणार आहोत, असे सांगत होते. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले आम्ही आमच्या सत्तेच्या काळात 300 बसेस या शहराला दिल्या, सरासरी या बसेसचे आयुष्य 15 वर्षे असायला पाहिजे, परंतु 8-9 वर्षांतच त्यातील जवळपास 200 बसेस मोडकळीस आल्या, आणि फक्त 95-100 चालू स्थितीत आहेत, याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे.

    गोष्ट अगदी बरोबर आहे, जवळपास 200 बसेस मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत हे मान्य करावेच लागेल. त्या का नादुरुस्त अवस्थेत आहेत याची करणे दिल्यास, हे सर्वाना लक्षात येईल कि, सामान्य जनता या सुविधा देण्याच्या लायकीचीच नाही, हे शब्द जरी कठोर असतील, पण हे सत्य आहे, कि या लोकांना कोणतीही चांगली वस्तू द्या त्याची वाट लावण्यातच या लोकांना आनंद मिळतो.

    नागपूरमध्ये सिटीबस ला स्टारबस या नावाने ओळखले जाते, यातील ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्याच्यावर नजर फिरवलीतर लक्षात येईल, कि बहुतेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, हे कृत्य नतद्रष्ट लोकांनी दगडफेकीत केलेले आहे, तसेच सर्व गाड्यांच्या सीट्सचे फोम फाडून त्यातील स्पंज प्रवासी लोकांनी गायब केलेला आहे, तसेच सीट च्या फ्रेम वाकवलेल्या आहेत. काही बसेस जळलेल्या आहेत, ह्या कुणी जाळल्या, हे पहिले तर लक्ष्यात येईल, कि झोपडपट्टीतील, किव्वा शहरातील काही भाग जिथे असामाजिक माणसे जगतात, त्या भागात दंगल अथवा खून झाला कि, त्याचा राग सरकारी वहानांच्यावर निघतो, आणि ती जाळण्यात येतात. आजपर्यंत ज्या लोकांनी हि कृत्ये केली त्यातील एकही तुरुंगात खडी फोडण्यास गेला नाही, कारण यांना वरील उपस्थित कोणत्या ना कोणत्या पक्षाचे पाठबळ मिळालेले असते, आणि म्हणूनच हे मग्रूर लोक असे कृत्य करून ताठ मानेने समाजात फिरत आहेत. काही वर्षातच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या डब्यात लोक खर्रा खाऊन, थुंकून कोपरे लाल करतील, सीट फाडतील, तसेच काचा फोडतील असे झाल्यास नवल वाटायला नको.

    स्वच्छ नागपूर या विषयावर चर्चा करताना पक्ष कार्यकर्त्यांनी सभागृहाचे भान न ठेवता बाचाबाची, सुरु केली, आणि कार्यक्रम जवळजवळ बंदच करण्याची वेळ आली. स्वच्छ भारत अंतर्गत पंतप्रधानांनी मागेल त्याला संडास देण्याचे कबूल केले, आणि तसे देण्यास सुरवातही केली, यासाठी मी कार्यक्रमात शासनाला मदत करण्याचा प्रयत्न केला, यात जी वस्तुस्थिती माझ्या समोर आली, त्याची कथा वाचल्यास सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

    जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील लोकांचे शून्य पैसे भरून खाते उघडण्यात आले, या खात्यात, ज्यांना संडास हवे असतील त्यांच्याकडून आधार कार्ड, पासबुक यांची प्रत मागवून त्यात सरकारने रु 8000, पहिला हप्ता म्हणून भरले, अट हि कि, त्यांनी संडास बांधावेत, व संडास पूर्ण बांधून झाल्यावर उरलेले 8000 दुसऱ्या हप्त्यात जमा होणार. 85 टक्के लोकांनी हलकट वृत्ती दाखवत, पहिल्या हप्त्याचे जनधन खात्यात भरलेले रु 8000 खाऊन टाकले, वरती सरकारी अधिकाऱ्यांना तोंड वर करून सांगत होते कि, आम्हाला माहीतच न्हवते संडास बांधण्यासाठीचे हे पैसे आहेत. याना हे सर्व शिकवणारे अर्थात बोलावते धनी वेगळेच होते हे सांगायची गरज नाहीच.

    नागपूर महानगरपालिकेने मग निर्णय बदलून, स्वतःच संडास बांधून देण्याचे ठरवले, त्या प्रमाणे फायबर (FRP) चे बनवलेले संडास लाऊन देण्याचे ठरले, व टेंडर पद्धतीने असे संडास लावण्याच्या निविदा काढल्या. हे संडास लागले, परंतु पुढच्या दोन दिवसात सर्व शौचगृहांचे दरवाजे रात्रीत तोडून गायब करण्यात आले, संडासच्या छिद्रात दगडे, विटा टाकण्यात आल्या. किती नतद्रष्टेपणा या लोकांच्यात ठासून भरलेला आहे याची हि उदाहरणे आहेत, आज परत ही सर्व मंडळी लोटा घेऊन रस्त्याकडेला, किव्वा रानात जातात. सर्वात प्रथम हंटरने याना फोडून काढले पाहिजे, हेच लोक समाजातील मुख्यप्रवाहात सामील होण्यास तयार नाहीत, असे लोक आर्थिक मागासलेले नाहीत, कारण बहुतेकांच्या घरात टीव्ही आहे, डिश अँटेना अनेक घराच्या छतावर दिसतात, मोटरसायकल आहे, तर मानसिक दिवाळखोरीत जगत आहेत, त्यांना तसेच राहण्यातच समाधान आहे. नागपूर हे एक उदाहरण आहे, अश्या घाणेरड्या वृत्तीची लोक भारताच्या प्रत्येक शहरात ठासून भरलेले आहेत, त्यामुळे सगळीकडची परिस्थिती कमीअधिक प्रमाणात सारखीच असणार आहे.

    मुळात आपल्या देशात सुजाण, सुसंकृत, पिढी तयार करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत, हेच खरे दुर्दैव आहे. या देशात जवळ जवळ सर्व जातीचे लोक, आम्ही कसे मागास, उपेक्षित, गरीब, दुबळे आहोत, हे सांगण्यात एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात, असा देश प्रगत होण्याची चिन्हे येणाऱ्या पन्नास वर्षातही दिसणार नाहित.

    सकाळी लोट्या सोबत स्मार्ट फोन घेऊन लोक वावरात जातील, यालाच स्मार्ट सिटी/शहर, म्हणायचे का?

    -- विजय लिमये

  • आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

    आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो.

  • काटकसर

    आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!

  • रामायणाचे महत्व !

     रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही.

  • व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

    आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे.