वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला.
मोदक. मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे.
आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे.
बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो.
जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर.
हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते.
चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ?
नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती.
टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता।
आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता.
भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार......
फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ?
घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती.
गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला
नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते.
नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
पहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान केलेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
काल आपण माता दुर्गेच्या नवरात्रींपैकी पहिल्या दिवसाच्या पर्वकालातील माहिती पाहिली.आज या कुलोत्पन्न ऊत्सवाचा दुसरा दिवस.दुसरी माळ.आज गुरुवार.गुरु म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रभाव.आज मातेने पिवळी वस्र परिधान केलेली आहेत अशी श्रध्ददा आहे.दुसर्या माळेला देवी भागवतात अनंत,मोगरा,चमेली,तमर अशा पांढर्या फुलांची माळ घटापर्यंत अर्पण करायची आहे.
जपः-दधाना करपद्माभ्याम् क्षमालाकमण्डलू।
देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।।
या जपाने ब्रह्मचारिणी मातेची आळवणी करुन जी पूजा मांडली आहे त्या पुजास्थानी स्थीर होण्याचं आवाहन करायचं.यशा मिलीतोपचार द्रव्यांसह पुष्पांनी मातेची मनोभावे पुजा करावी.आजच्या दुसर्या दिवशी.
साक्षात महादेव आपणांस पती लाभावेत अशी इच्छा तिने निश्चित केली होती.त्यासाठी म्हणजे महादेवाला प्राप्त करण्याच्या इराद्याने तीने घोर तपश्चर्या केली.म्हणून तीला “तपश्चारिणी”किंवा ब्रह्मचारिणी ” या नामाभिदानाने ओळखले जाते.
अत्यंत कठीण प्रसंगी ब्रह्मचारिणी मातेची आराधना केली तर ती तिच्या भक्तांना ती पावते अशो श्भाविकांची श्रध्दा आहे.तिचे रुप अत्यंत भव्य असून पूर्ण ज्योतिर्मय आहे.डाव्या हातात जपमाला असुन ऊजव्या हातात कमंडलु धारण केले आहे.ज्ञान आणि वैराग्य यांची प्राप्ती ब्रह्मचारिणी च्या पूजेने होते.शरद ऋतुमध्ये हा ऊत्सव सुरु होतो.वसंताच्या सृजना प्रमाणे जसे वृक्षराजी नवीनतम पालवी फुटून नव्याने सृष्टीला सुशोभित करु लागतात त्याच प्रमाणे या ऊत्सवात नेहमीपेक्षा एक हजार पट अधिक प्रमाणात देवी तत्व पृथ्वीवर कार्यरत असते.म्हणून या कालावधीत “श्री दूर्गादेव्यै नमः”हा जप जितका जास्त करता येईल तितका तो सिध्द होत जातो.
पहिल्या माळेला माता स्वरुप हे “कुमारीके”प्रमाणे आसतं.दोन वर्षाच्या कन्येचं आणि मातेचं निरागस रुप...त्याची आराधना ऐश्वर्यप्राप्ती देते तर दुसर्या माळेची मातेची छबी ही तिन वर्षाच्या कन्ये प्रमाणे असते.त्रिमूर्तिनी हे नाव धारण केलेले आहे.तिच्या पूजनाने भोग आणि मोक्ष प्राप्ती होते.
आज पिवळ्या रंगांचे पदार्थ आहारामध्ये असावेत.पिवळ्या रंगांसह पिवळ्याच्या जवळच्या रंगमालेतील सहरंग देखिल याच प्रकारात येतात.
-- गजानन सिताराम शेपाळ
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti