वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये म्हणून आणि काजळ डोळ्यांची निगा राखायला.
पुढे शाळेत जायला लागल्यावर सोबत असणारी काळीकुट्ट सिंगल किंवा डबल पाटी. त्या पाटीवर सर्वप्रथम श्री हे अक्षर काढायचं. स्पंजपेटी दप्तरात बाळगायची.
September 15, 2022
मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.
देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.
९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.
त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.
आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.
“देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.
मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.
<!--घटस्थापनेच्या शूभमुहुर्तावर देवीच्या साड्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे.
सर्व साड्यांसाठी घरपोच डिलिव्हरी सेवा मुंबई आणि ठाणे विभागात उपलब्ध.
डिलिव्हरी चार्जेस - रु.७०/- प्रति साडी. डिलिव्हरी ३ दिवसात मिळेल
रंगाच्या निवडीसाठी फोनवरुन संपर्क साधावा व त्यानंतर ऑनलाईन लिंकवर जाऊन पैेसे भरावेत. आपला पत्ता आणि फोन नंबर आमच्याकडे इ-मेलने पाठवावा.
पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा
[supsystic-tables id='1']
[supsystic-tables id='2']
-->
पत्ता - ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
फोन - 9869007736
इ-मेल - ramakantarchana@gmail.com
September 29, 2016
अतिविषा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी हिमालयात आढळते आणि तिचे उपयोग अनेक आहेत. ती प्रामुख्याने लहान मुलांच्या आजारांवर वापरली जाते, पण सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या अनेक समस्यांवरही गुणकारी आहे.
December 13, 2025
डेल (Dell) ही संगणक क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून तिची स्थापना १९८४ मध्ये मायकल डेल यांनी केली. डेलचे लॅपटॉप आणि डेस्कटॉप त्यांच्या टिकाऊपणा आणि विविध श्रेणींसाठी ओळखले जातात.
April 9, 2026
ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस येणे वगैरे लक्षणं दिसतात. परिस्थिती गंभीर झाल्यास लहान आतड्यांच्या कर्करोगाचीदेखील शक्यता असते असे सांगितले जाते.
आधुनिक शास्त्रात यावर इलाज म्हणून जन्माला आलेली संकल्पना म्हणजे ग्लूटेन फ्री डायट. अर्थात ज्या पदार्थांत ग्लूटेन आहे ते टाळणे आणि त्याचे पर्याय शोधणे. थोड्क्यात; आहारातून गहू, जव इत्यादि गोष्टी हद्दपार करणे. आता या ग्लूटेन फ्री डायटबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेऊ.
१. एखादा पदार्थ पचत नसल्यास तो टाळणे हा मार्ग नसून तो कसा पचेल यावर विचार करणे हे अधिक योग्य ठरते. थोड्क्यात आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेला 'अग्निविचार' हा याठिकाणी महत्वाचा आहे.
२. ग्लूटेन फ्री डायटच्या दुष्परिणामांतील सर्वात प्रमुख म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता आहे असे आधुनिक आहारशास्त्रच सांगते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
३. ग्लूटेनची समस्या प्रामुख्याने ब्रेडसारख्या बेकरी उत्पादनांत मोठी असून त्यामागे किण्वीकरण प्रक्रियेचा मोठा हात आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. भारतासारख्या देशातील पोळी/चपाती, दलिया यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना तोच न्याय लावणे योग्य होणार नाही. याकरताच मी शीर्षकात 'गवगवा' हा शब्द वापरला. ग्लूटेन फ्री डायट ही संकल्पना सध्या आपल्या देशात जोमाने रुजू पाहत आहे. हे चित्र समाधानकारक नक्कीच नाही.
४. ज्यांना पोळी/चपाती पचायला जड जाते त्यांनी ग्लूटेन फ्री डायटच्या मागे न लागता भाकरी वा थेट निखारे अथवा गॅस बर्नरवर भाजलेले फुलके यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवताना पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
५. आयुर्वेदीय उपचार आणि आहारातील नाममात्र पथ्ये यांच्या सहाय्याने 'ग्लूटेन फ्री डायट' पासून 'फ्री' राहण्यास मदत होते. त्यामुळे चपाती पचत नाही म्हणून लगेच आपल्याला ग्लूटेन फ्री डायटच हवे असा गैरसमज करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आयुर्वेदाने गहू हे धान्य 'संधानकर' म्हणजे शरीराला जोडणारे/ बळकटी देणारे सांगितले आहे. पंजाबसारख्या प्रचुर मात्रेत गहू पिकवणाऱ्या राज्यातील नागरिकांची शरीरयष्टी याची साक्षच नाही का? त्यामुळे एखाद्या संकल्पनेमागे वाहवत जाऊन उत्तम पोषक अन्न खाण्याच्या आनंदाला मुकू नका!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
December 1, 2016
।। श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन........।।
एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.'
त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे.
'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ.
दुसर्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे.
पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे.
आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे.
अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही.
एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.
संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे.
जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत.
स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे.
ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.
नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी.
परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.
१८०. सर्व काही करावे । पण खरे प्रेम साधनावर असावे ॥
२८ जून
July 26, 2017
संस्कृत सुभाषिता मध्ये पण म्हटले आहे की मित्रच नसले तर सुख कुठुन मिळणार ? असे प्रतिपादित करून मैत्रीचे महत्व सांगितले आहे.बालपणात ती नकळत होते.गंमत म्हणजे निस्वार्थ भाव असला तरी, त्या वयात कट्टी/ दोस्ती करून ती तोडतां जोडतां येते. नातगोत एखाद्या केळ्यासारखे असते.तुटले तर जोडता येत नाही पण मैत्री एखाद्या लाडु सारखी असते.
July 26, 2020
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्त्रियांना आता स्तनपानाचे महत्त्व पटू लागले आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे; पण अंगावर पाजणाच्या कालावधीत वाढ झालेली नाही. त्या पाजणे लवकर बंद करतात.
April 21, 2023
समाजाला आज खर्या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का?
June 17, 2013
खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो... घरी परत जायचेच नाही, या इराद्यानेच!
आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले...
घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन... आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन... जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???
आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही.
मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार, मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते ! त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता?
खुप मोठे विचार चक्र डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले... बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटातुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला! पण राग; राग त्रासापेक्षा जास्त होता...
रागातच पुढे चाललो...
पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटातुन ओले ओले जाणवले... रस्त्यावर पाणी सांडलेले होते. उडी मारताना पाणी बूटात आले, बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता....
तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टँडवर आलो.
पण दुर्दैव... तासभर एकही एस.टी.नव्हती...
मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू... पाकिट उघडले त्यात एक चिठ्ठी मिळाली.
त्याच्यावर लिहिले होते लॅपटॉप साठी ४० हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले...
अरे; तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो माझ्याकडेच आहे.
दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली--
ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय? आहे ते लिहा असे सांगितले होते...
त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते...
असे लिहले होते.
अरे चांगले बूट??
परंतु त्यांचे बूट तर फाटलेत...
आई मागच्या चार महिन्यांपासून पप्पांना सांगते नविन बूट घ्या...
पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महिने तरी चालतील हे बूट...
मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही...
मी...
मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून.
एक तीसरी चिठ्ठी मिळाली.
जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा...
आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या...
पप्पांची गाड़ी...
आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो...
आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता...
मी घरी धापा टाकतच पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी ही नव्हती...
मी समजलो पप्पा कुठे आहेत!
पप्पा तिथेच होते...
मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला...
नको पप्पा नको..
मला नाही पाहिजे मोटर सायकल...
बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या...
आणि हो पप्पा,
आता मला मोठा माणुस व्हायचच आहे...
तो पण तुमच्यासारखाच....
पप्पा फक्त तुमच्या सारखाच...
पुर्ण शोरुममध्ये शांतता पसरली...
सगळं शांत वातावरण...
मित्रांनो; आई-वडिलांना ओळखा.
आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही... खऱ्या अर्थाने जगा... हेच तर खरं जिवन आहे... आपण सर्व सजिव आहोत याचे भान असू द्या...
माणूस बनून जगा आणि मानवता हा एकच धर्म पाळा...
Forwarded Post
-- Aniket
November 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti