वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।
जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।
कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।
समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।
जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।
विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।
गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।
आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।
सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।
तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।
तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।
तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।
भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।
प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।
हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।
भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।
नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।
हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।
प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।
उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।
प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।
भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।
गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।
गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।
उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।
एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।
स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।
पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।
डॉ.भगवान नागापूरकर
१०- ३०१०८३
( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )
आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत .
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
(श्री भक्त पुंडलीक कथा)
श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी
दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १
पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण
सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २
सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी
ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३
तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे
हे कुणास न कळे प्रभूविना ४
असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा
कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५
कुणी करती मुर्तीपुजा कुणी पाही निसर्गांत मजा
प्रभूसी नको भाव दुजा मनोभावाविना ६
सत्य आणि तपशक्ती प्रभूस वाकवती
पाहून पुंडलीक भक्ती धाऊन आले पांडूरंग ७
माता पित्याची सेवा हाच भक्तीचा ठेवा
ती भक्ती खेचती देवा दर्शन देण्या भक्ताना ८
मातापिता सेवेचे प्रतीक मिळोनी धन्य होई पुंडलीक
विश्वाचे उदाहरण एक प्राप्त करण्या प्रभुसी ९
भक्तपुंडलीक कथा त्याची रंजक
होई जीवन सार्थक करुनी अचरणांत १०
पुंडलीक होता विलासी लक्ष्य त्याचे बायकोपाशीं
सर्वस्व समजे धनासी सुख मिळण्या देहाला ११
एके दिनी नारदमुनी गेले उपदेश करुनी
महती आईबापाची पटवूनी पुंडलीकास १२
झाली पुंडलीका उपरती केल्या कर्माचे दुःख होती
पश्चाताप मनी येती भाव भरले प्रेमाचे १३
अंधःकार भयाण जाई दुर होऊन
मिळता एक किरण प्रकाशाचा १४
गुरुकडून मार्ग मिळे ज्ञान झाले आगळे
भक्तीसेवा ही शक्ती कळे पुंडलीकासी १५
मातापित्याची सेवा हाची पुंडलीकाचा मेवा
सारे जीवन खर्ची पडावा ही त्याची इच्छा १६
स्वतःसी गेला विसरुनी आईबापाची काळजी करुनी
सर्वस्व अर्पिले रात्रंदिनीं मातापित्यासाठीं १७
सेवा हेची तप न लागे नामाचा जप
श्रद्धाभाव आपोआप यावेमनामध्यें १८
प्रभू भक्तिचा भुकेला जातां तप फळाला
दर्शन देई पुंडलीकाला विठ्ठल रुप घेऊनी १९
तल्लीन होऊनी सेवा करी आईबाप झोपतां मांडीवरी
त्याक्षणी पांडूरंग आले दारी पुंडलीकांच्या २०
पांडूरंगाचे रुप बघूनी अश्रुधारा आल्या नयनीं
भावनावश होऊनी नमन केले प्रभूला २१
हलविली नाही मांडी आईवडीलांची निद्रा न मोडी
मनी प्रभुच्या स्वागताची गोडी पुंडलीकांस पडली २२
समोर उभे परमात्मारुप मांडीवरी आईवडीलांची झोप
निद्रामोडता होईल ताप खंत याची पुंडलीकास २३
विट घेतली हातीं विठ्ठलासमोर टाकती
उभे राहण्यास विनविती विनंम्र होऊनी २४
क्षमा मागती प्रभूसी कसे उठवूं आईबांबासी
दुःख त्याचे मनासी झोप मोडता येई २५
आई वडील इच्छा करी जाण्या चंद्रभागेतीरीं
विठ्ठला उभाकरुनी विटेवरी नदीकाठी गेला पुंडलीक २६
माता पिताना घेऊन गेला चंद्रभागेकाठी रमला
विसरुनी जाई विठ्ठला पुंडलीक २७
पुंडलीक विनंती करी उभे रहावे विटेवरीं
परतोनी येई तो चंद्रभागेवरुनी २८
कर कटेवरी उभें विटेवरी
लक्ष्य वाटेवरी पुंडलीकाच्या २९
आईवडील भक्ती पोटीं रमला त्यांच्या पाठी
विसरला जगत् जेठीं पुंडलीक ३०
आजही जाता पंढरपूरीं विठोबाचे दर्शन करी
दिसेल तो उभा विटेवरी रुख्मिणीसंगे वाट बघत ३१
सुर्यचंद्र आकाशी अथांग तारे नभाशी
येऊन जाती रात्रंदिवशी हेच चक्र निसर्गाचे ३२
ऋतु नियमीत येती मार्ग ते ना बदलती
हीच असे निसर्ग महती प्रभूशक्तीमुळे ३३
निसर्गाची नियमितता हीच त्याची श्रेष्ठता
प्रभूचे अस्तित्व जाणतां त्या ठिकाणी ३४
जेव्हां अघटीत घटणा होई प्रभू त्यांत भाग घेई
तें चक्रची सुरु होई नियमित रुपे ३५
भक्तासी पावन झाला पंढरपूरी प्रभू अवतरला
आषाढी एकादशीला दर्शन देई पुंडलीका ३६
ही झाली अपूर्व घटना परी विचार येई मनां
सुरु होईल नवीन निसर्ग रचना प्रभूचे अगमन होण्याची ३७
होता प्रभूचे अवतरण शक्यता त्याची पुनरागमन
होईल निसर्ग नियमन हीच महती तिर्थाची ३८
त्याच स्थळी प्रतिवर्षी प्रभू अवतरेल त्याच दिवशी
भावना बाळगुनी उराशीं लाखो जमती वारकरी ३९
ही निसर्ग किमया प्रभू अवतरेल जाणूनिया
प्राप्त होईल त्याची दया ही भावना उराशीं ४०
चंद्रभागातीरीं पंढरपूर जैसे काशी गंगातीर
वारकऱ्यांचे माहेर भक्तांचा जमे मेळा ४१
विठ्ठल रुखमाई मंदीरीं दर्शन घेई वारकरी
तैसैचि पूजा पुंडलीकापरी भक्त प्रभूसी भजती ४२
।। शुभं भवतु ।।
डॉ.भगवान नागापूरकर
११- १३११८३
तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो .
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
प्रल्हादासी करितो नमन बालक असुनी महान
अणुरेणूंत असे भगवान दाखवूनी देई जगाला ।।१।।
बघावी सृष्टी ठेऊनी संत द्दष्टी
त्यासी दिसेल जगत् जेठी सर्व ठिकाणीं ।।२।।
प्रल्हादाचे तत्वज्ञान प्रभुमय सारे जग् जीवन
त्यासी घ्यावे ओळखून श्रद्धा द्दष्टीनें ।।३।।
अपूर्व प्रभू भक्ति उन्मत्त असूरी शक्ति
संघर्षकथा होती भक्त प्रल्हादाची ।।४।।
बहूत महान वीर प्रभुपुढे कोण टिकणार
परि प्रभूसीच वाकवणार प्रल्हाद बालक ।।५।।
नारद ऋषीं एके दिनीं हिरण्यकश्यपूचे राजधानीं
पाद्यपुजा स्वीकारुनी गेले प्रसन्न होऊनी ।।६।।
शिवाची करावी भक्ति मिळवावी तप शक्ति
सामर्थ्यवान ह्या जगतीं होऊनी करावे राज्य ।।७।।
नारद राणीस उपदेशीती जो नारायणाचे नाम घेती
उद्धार ह्या जगती त्याचा होत असे ।।८।।
गर्भवती तूं राणी भक्तिभाव ठेवतां मनीं
ईश्वर संस्कार पडूनी बनेल बालक महान ।।९।।
राजा उपदेश ऐकूनी गेला तपश्चर्येस वनीं
राणी राजधानी नारायणाचे नामस्मरण करी ।।१०।।
करुनी तप महान शिवासी केले प्रसन्न
वरदान घेई मागून वाढवी आपली शक्ति ।।११।।
असे मागीं वरदान जेणे टळावे मरण
परि प्रभू लिला महान कसे टाळी ब्रह्मालिखीत ।।१२।।
पशू अथवा नर राजगृहीं वा बाहेरी
कुणी न करी ठार हिरण्यकश्यपूला ।।१३।।
मृत्यु न यावा शस्त्रानीं भय नसावे अग्नीपासूनी
टाळावे मरण बुडोनी ही इच्छा करी राजा ।।१४।।
दिवस असो वा रात्र मृत्यु टाळावा मात्र
निष्प्रभ ठरावे अस्त्र फेकता राजा वरी ।।१५।।
शिवाचे मिळतां वरदान राजा झाला बेभान
सामर्थ गेले वाढून शिवकृपेमुळे ।।१६।।
सामर्थ्यांत असे शक्ति शक्ती ओघांत वाहती
ओघास दिशा लागती परिणाम दिसण्या योग्य ।।१७।।
मिळतां योग्य मार्ग होईल चांगला उपयोग
नम्रतेचा असता भाग मिळालेल्या शक्तिमध्ये ।।१८।।
दुरुपयोग होता शक्तिचा दुष्परिणाम दिसेल तिचा
उद्वस्त करी जीवनाचा केंद्र बिंदू अहंकार असतां ।।१९।।
पावन करुनी शिववर जागृत झाला अहंकार
मूळचा होता असूर हिरण्यकश्यपू ।।२०।।
गरोदरपणीं नामस्मरण मंत्र जपूनी नारायण
महान संस्कार करुन बाळास संगोपिले ।।२१।।
लागला ईश्वरी ध्यास सतत प्रल्हाद बाळास
बघे सर्वत्र प्रभूस रात्रंदिनी ।।२२।।
गोष्ट येता ध्यानीं राजा गेला संतापूनी
मजविण श्रेष्ठ नाही कुणी सांगु लागला प्रल्हाद बाळासी ।।२३।।
मीच प्रभूचे ठायी तुझी भक्ति अर्पावी
इच्छा नारायणाची सोडावी ताकद देई प्रल्हादबाळा ।।२४।।
नाम नारायणाचे शब्द ते अंतर्मनांचे
भाव गुंतले ह्रदयाचे प्रल्हादबाळाचे ।।२५।।
जन्मबीजाचे संस्कार सहजतेने न जाणार
बाह्य शक्तीचा करी अव्हेर प्रल्हादबाळ ।।२६।।
धमकावले प्रल्हादासी त्यास जीवे मारण्यासी
चालू ठेवता नामस्मरणासी नारायणाच्या ।।२७।।
आत्मा हा अविनाशी समर्पित झाला नारायणाशी
न देई महत्व देहाशी प्रल्हादबाळ ।।२८।।
सर्वत्र सोडता प्रभूवर काळजी तोच घेणार
संशय नसावा त्याचेवर समर्पण करते समयीं ।।२९।।
प्रल्हादाचा हट्ट बघूनी राजा जाई क्रोधूनी
ठार करण्या ठरवूनी हूकुम देई प्रधाना ।।३०।।
पर्वतावरुन लोटले उकळत्या तेलांत ठाकले
ऐरावताच्या पायीं बांधले सर्व प्रयत्न जाई निष्फळ ।।३१।।
प्रभू असतां तारणधारी कोण त्यास जीवें मारी
राजाचे प्रयत्न निष्प्रभ ठरी परमेश्वर शक्तीपुढे ।।३२।।
राजाचा क्रोधाग्नी पेटला प्रश्न करी प्रल्हादाला
नारायण कोठें दाखव ? नाश करीन मी त्याचा ।।३३।।
हे विश्वची प्रभूमय अणूरेणूंत तो होय
सर्वत्र समावून जाय हीच त्याची लीला ।।३४।।
ईश्वर आहे महान ब्रह्मांड त्याचा भाग असून
अंशरुपें जायीं समावून प्रत्येक वस्तूमध्ये ।।३५।।
महासागरातील नीर अगणीत थेंबांचा बनणार
थेंबांत सागरी अंश असणार हे घ्यावे समजावूनी ।।३६।।
'तो नाही' ऐसे ठिकाण न सापडेल ते शोधून
तुझ्या माझ्यांत ही तो असून वास करीत राही ।।३७।।
नारायण आहे सर्व ठिकाणीं घ्यावे हे समजावूनी
हया खांबी तो बसूनी हास्य वदन करी ।।३८।।
प्रल्हादाचे शब्द ऐकूनी राजा गेला चवताळूनी
जोरानें लाथ मारुनी प्रहार केला खांबावरी ।।३९।।
भयंकर होऊनी आवाज कडाडून चमके वीज
हिरण्यकश्यपू न येई समज ह्या चमत्काराची ।।४०।।
मानव देही सिंह शिर नखें त्याची भयंकर
गर्जना देत बाहेर पडला खांबांतूनी ।।४१।।
रुप आक्रळ विक्राळ जणु भासला महाकाळ
घाबरुनी सोडी सकळ ओढूनी घेई असुराला ।।४२।।
सायंकाळचे समयीं भयंकर रुप घेई
हिरण्यकश्यपूस मारण्या येई नारायण ।।४३।।
बसूनी उंचावरी घेऊन राजास मांडीवरी
नखानी पोट चिरी नृसिंह ।।४४।।
वचनाचे करुन पालन वरदानाचा ठेऊन मान
नृसिंह आवतार घेवून ठार करी राजाला ।।४५।।
डोळे मिटूनी नामस्मरण ऐकूनी प्रल्हादाचे भजन
प्रसन्न होई नारायण दर्शन देई विष्णूरुपे ।।४६।।
प्रल्हाद झाला पावन प्रभूचे नामस्मरण करुन
भक्तीचा विजय होऊन अहंकारासी केले नष्ट ।।४७।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१२- ०११२८३
ज्ञानेश्वरांना माणूस फार अचूक कळला होता. या माणसाला जगवण्यासाठी काय ज्ञान द्यावे लागेल हे त्यांना फार चांगले उमगले होते. यामुळेच त्यांनी वेदांमधून कडसून काढलेल्या भगवदगीतेचा भावार्थ सांगायचे ठरवले असावे. तो भावार्थ असावा, अनुवाद नसावा हा त्यांच्या प्रज्ञाचक्षुंचा दूरगामी निर्णय.
( अर्थात वटपौर्णिमा व्रत )
स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी
धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री //१//
ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल
हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले //२//
जरी येतां काळ चुकवावी वेळ
बदलेल फळ हेच दाखविले तीने //३//
समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा
मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं //४//
मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे अश्वपति
कन्या त्याची सावित्री प्रेम करी तिजवर //५//
कन्या होती उपवर धाडीले शोधण्या वर
राजा करी कदर कन्येच्या इच्छेची //६//
फिरुनी सर्व देशी न मिळे कुणीही तीजशी
आली एका आश्रमापाशी दृष्टीस पडला एक युवक //७//
नजर त्यावरी पडूनी स्तंभित राजकन्या होऊनी
रुप लागली न्याहाळूनी सत्यवान युवकाचे //८//
तेजोमय युवक पाहूनी भान जाय हरपूनी
राजकन्येने वरिले मनोमनी संकल्प लग्नाचा करी //९//
राजपूत्र होता सत्यवान पिता जाई राज्य गमावून
अंधत्व पित्याचे त्यास कारण वनवासी झाले सारे //१०//
सावित्री परतूनी घरीं सर्व हकीकत कथन करी
आवड तिची सत्यवानापरी मनीं त्यास वरिले //११//
चर्चा करीत समयीं नारदाचे आगमन होई
आनंदी भाव भरुनी येई पुता पुत्रीचे //१२//
वंदन करुनी देवर्षीला कन्येचा संकल्प सांगितला
आशिर्वाद मागती लग्नाला सावित्री सत्यवानाच्या //१३//
नारद वदले खिन्न होऊनी लग्न संकल्प द्यावा सोडूनी
विचार काढावा मनातूनी सत्यवानाविषयी //१४//
दुर्दैवी आहे सत्यवान त्याची आयुष्यरेषा लहान
एक वर्षांत जाईल मिटून जीवन त्याचे //१५//
हे आहे विधी लिखीत म्हणून होत निश्चीत
कोण करील बदल त्यांत प्रभूविना //१६//
ब्रह्मा लिखीत अटळ झडप घालीतो काळ
न चुके कधी ही वेळ हीच निसर्ग शक्ती //१७/
थर्रर्र कापला नृपति चकीत झाली सावित्री
ऐकून भयंकर भविष्याती सत्यवानाच्या //१८//
सावरोनी स्वतःशी विचार करी मनासी
वदू लागली नारदासी निश्चयीं स्वरानें //१९//
प्रथम दर्शनी वरिले मनोंमनीं पती मानिले
सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले कशी त्यागू मी त्याना //२०//
काया वाचा मन सत्यवाना अर्पून
पतिठायी त्याना वरुन ह्रदयीं बसविले //२१//
निवड करता पतीची मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
कल्पना न यावी दुजाची हाच स्त्रीधर्म //२२//
सप्त-पावली हा उपचार होण्या सर्व जगजाहीर
धार्मिक विधी एक प्रकार राहीला असे //२३//
स्त्रीचा असता हा धर्म कां सुचविता अधर्म
सांगा यातूनीच मार्ग सावित्री विनवी नारदासी //२४//
पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति करोनी पति भक्ति
ईश्वर मिळविण्याची युक्ती सांगू लागले नारद //२५//
पतिभक्ति करुन तपसामर्थ्य येइल महान
तेच नेईल उध्वरुन पावन होता प्रभू //२६//
बघूनी सावित्रीचा निश्चय नारद आनंदी होय
आशिर्वाद देऊनी जाय नारायण नाम घेत //२७//
दृढ निश्चयाची शक्ति सावित्रीस चेतना देती
माहित असून भविष्याती उडी घेई जीवनयज्ञांत //२८//
राजकन्या सावित्री सत्यवानासंगे वनाती
लग्न करोनी राहती संसार करण्या //२९//
पतीसी समजूनी देव त्याचे ठायीं आदर भाव
मनीं बसवी त्यांचे नांव अवरित //३०//
नामात असते लय लयांत एकाग्रता होय
एकाग्र मनी ईश्वरी भाव परमेश्वर सान्नीध्याचा //३१//
पति हाच परमेश्वर न पूजे दुजा ईश्वर
सावित्री त्याचे चरणावर अर्पण करी सेवा //३२//
सेवेत असते तप शक्तीचा तो दीप
प्रज्वलीत होईल आपोआप तपः सामर्थ्य वाढता //३३//
सोडूनी काळजी काळाची पर्वा नव्हती वेळेची
अंतरीक इच्छा समर्पणाची पतीच्या अल्प अयुष्यी //३४//
वर्षा अखेरचा दिवस भयाण घेत विश्रांति सत्यवान
वटवृक्षाखाली होता झोपून सावित्री देत मांडीचा आसरा //३५//
आयुष्याची रेखा संपता जीवन दोर जाई तुटतां
प्राणज्योत नेई यमदुता त्याक्षणीं //३६//
फांस घेऊन यमदूत नेण्या सत्यवान प्राणज्योत
टाकले फांस गळ्यांत सत्यवानाच्या //३७//
सावित्रीची तपशक्ति देई तिज दिव्य दृष्ठी
सोडून फास गळ्याभोवती देई दूर फेकून //३८//
यमदूत जाई घाबरुन हतबल झाले ते बघून
सावित्रीची शक्ति जाणून रिक्त हस्तें गेले यमपूरीं //३९//
यमराज मृत्युदंडाधिपती संतापून ते येती
नेण्या प्राणज्योती सत्यवानाची //४०//
यमराज प्रभूचे दिक् पाळ मृत्युरुपी ते महाकाळ
अपूर्व त्यांचे बळ राज्यकरीं यमपूरी ///४१//
नेवून मानव प्राणज्योत कर्माप्रमाणे शिक्षा देत
पाठवूनी नविन देही परत जीवन गाडा चालवी //४२//
रेड्यावर बैसूनी यमराज आले धाऊनी
हातीं फांस घेऊनी प्राण नेण्या सत्यवानाचे //४३//
बसूनी सत्यवाना शेजारीं पतीधर्माचे ध्यान धरीं
रक्षण कवच उत्पन्न करी पती पत्नी भोवती //४४//
तपाची दिव्य शक्ति यमराजासी येण्या रोकती
फांस त्याचे न पोहोंचती सत्यवाना पर्यंत //४५//
बघूनी ते तेजोवलय यमराज चकीत होय
शोधूं लागला उपाय सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत //४६//
पतीकडून पाणी मागवून सावित्रीस दूर सारुन
प्राण ज्योती घेई काढून सत्यवानाची //४७//
यमराज निघाला स्वर्गी सावित्री त्याच्या मागे मार्गी
पतिव्रता शक्ति तिचे अंगीं चेतना देई मार्गक्रमण्यास //४८//
मनीं तिच्या पतिभक्ति बघून अपूर्व शक्ति
यमराज प्रसन्न होती सांगतले वर मागण्या //४९//
श्वशुराचे अंधत्व गेले राज्य तया परत मिळाले
वडीलांस पुत्र प्राप्त झाले सावित्री मिळवी तीन वर //५०//
न पावली समाधान पाठलाग चालूं ठेवून
यमासी ठेवीत झुलवून चर्चुनी विषय निराळे //५१//
शेवटचा मी वर देईन परी तू जावे परतून
मानव देहा स्वर्ग कठीण कसे राहशील तूं तेथें ? //५२//
जीवन आतां माझें व्यर्थ न उरे जगण्या अर्थ
एकटेपणा ठरेल अनर्थ माझ्या आयुष्यीं //५३//
इच्छा माझी व्हावे माता सानिध्य मुलाचे मिळतां
एकटेपणाचा भाव न राहता उर्वरीत जीवनामध्यें //५४//
पाठलाग घेण्या सोडूनी तथास्तू म्हटले यमानी
मान्य तिची विनंती करुनी वर देई तिला //५५//
तथास्तू म्हणतां क्षणी धरती गेली हादरुनी
भयंकर विजा चमकोनी निसर्ग उत्पात माजला //५६//
मान्य केले मातृत्व नसता जीवित पितृत्व
शक्य कसे हे अस्तित्व चुक उमगली यमराजा //५७//
निसर्गाच्या नियमाला तथास्तूने धक्का दिला
नियतीचा डाव उलटला सावित्रीच्या शक्तिनें //५८//
जसा सुटावा बाण तसा शब्द जाऊन
यमराज पेचांत पडून हारला सावित्रीपूढे //५९//
सोडून देई प्राणज्योत सत्यवान जीवदान मिळत
अखंड सौभ्याग्यवती वरदान मिळाले सावित्रीला //६०//
वटवृक्षाखालती पाऊनी सतीशक्ति
जीवदान मिळती सत्यवाना //६१//
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्त्रीया पूजती वटवृक्षाला
अखंड मिळण्या सौभाग्याला सावित्रीप्रमाणे //६२//
पतिपत्नीतील प्रेमभाव समजोनी मनाचा ठाव
एकमेका आदरभाव हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली //६३//
// शुभंभवतु //
डॉ. भगवान नागापूरकर
१३- २५११८३
Copyright © 2025 | Marathisrushti