वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मारुतिस्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि करावी अशी शिकवण दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत.
ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला. या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील.
तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।।
त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।।
पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।।
पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।।
तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।।
गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।।
तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे 'वर' मिळोन ।।
कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन हो ।। ४।।
राजा नामें जालंदर । होता तो आसुर ।।
स्वभाव त्याचा क्रूर । गरीब जनांसाठी ।। ५ ।।
तयाची पत्नी सती । त्यास पतिव्रता लाभती ।।
महान तिची पतिभक्ति । वृंदा नाम तिचे ।। ६ ।।
पतिसी मानती देव । अर्पूनी त्याचे चरणीं भाव ।।
पुजिती त्यासी सदैव । मनोभावे ।। ७।।
राजाने देवांना जिंकूनी । बंदी त्यांना करूनी ।।
त्रास सर्वांना देवूनी । हा हा:कार माजविला ।। ८।।
प्रत्यक्ष शिव आला लढण्यास । मारण्या जालंदरास ।।
सोडविण्या देवांचा त्रास । त्याचे कडून ।।९।।
अपूरी पडली शिवशक्ती । मरण त्यास न येती ।।
कोण त्यास वाचविती । प्रश्न पडला शिवे ।।१०।।
ब्रह्म आले सत्वर । पूजा करुन विश्वेश्वर ।।
सुचविती उपाय त्यावर । दैत्यास मारण्याचा ।। ११।।
वृंदा आहे सती महान । पतिवृता शक्ती कठीण ।।
त्या शक्तीमुळे रक्षण । दैत्याचे होई ।।१२।।
तिचा पती धर्म । नष्ट करावा हे मर्म ।।
विष्णूसी सांगावे हे कर्म । करणे करिता ।।१३।।
पतिवृता हरण करणेसाठीं । कारस्थान केले जगतजेठीं ।।
दैत्यनाशा पोटीं । घात केला वृंदेचा ।।१४।।
दैत्य रुप घेवूनी । पती आहे हे भासवूनी ।।
पातिवृत्या नष्ट करोनी । वृंदासी फसविले ।। १५।।
प्रकार आला ध्यानीं । पतिधर्म गेला डागळूनी ।।
खिन्न झाली मनी । सती वृंदा ।। १६।।
शाप दिला संतापूनी । मानव जन्म घेवूनी ।।
पत्नी विरहाचे दु:ख मनीं । सहन करावे लागेल ।। १७।।
विष्णू 'राम' अवतरला । आजन्म विरह सोसला ।।
दु:खी, कष्टी आला । सीते साठीं ।। १८ ।।
वृंदेचे जेव्हां पावित्र जाई । रक्षणकवच दूर होई ।।
शिव दैत्यास मारण्या येई । त्याच वेळीं ।। १९।।
दु:खाचा डोंगर कोसळला । पति व पतिधर्म गेला ।।
जगण्यास अर्थ न उरला । वृंदेसाठी ।। २०।।
पति वियोग होतां । सती गेली पतिव्रता ।।
परमेश्वर तिज दर्शन देतां । आशिर्वाद दिला ।।२१।।
परमेश्वरांनी वर दिला । तुलसीचे रूप मिळेल तिला ।।
विष्णुचे सानिध्य लाभण्याला । तिचे भोवतीं ।।२२।।
घरातील अंगण । त्यांत तुलसी वृंदावन ।।
आनंद सुख समाधान । त्या घरी वसे ।।२३।।
पूजा आभिषेकांतील तीर्थ । अर्पूनी जल वृंदावनांत ।।
भाव भक्तीचे मनोरथ । तुलसी ठायी ठेवावे ।। २४।।
सौभाग्यवती ही सति । पतिव्रतेची एक शक्ति ।।
तुळशीच्या आशीर्वादे मिळती । गृहलक्ष्मींना ।।२५।।
तुळसी अंगणीं वसे । संरक्षण वलय असे ।।
दु:ख ना तेथे दिसे । त्या घरामाजीं ।।२६।।
( तुलसी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत )
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
८- २५११८३
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.
देव्हाऱ्यातील देव अनेक शंख तयांमध्ये एक
महत्त्व त्याचे जाणोनी ठीक सकलजन हो ।। १।।
हिंदूची दैवते अनेक रूपे देवांची कित्येक
इष्ट देवता पूजितो प्रत्येक सर्व देवांमध्ये ।।२।।
देव्हाऱ्यातील देवांत शंखघंटा असावी त्यांत
प्रथा पूजेची असण्यात हिंदूच्या ।।३।।
शंखास पूजेतील मान प्राप्त होई ‘वर’ मिळोन
कथा त्याची जाणून घ्यावी तुम्ही ।। ४।।
सांदिपनी ऋषीच्या आश्रम शिष्यगण करिती श्रम
प्रफुल्लता आनंद नी प्रेम आश्रममध्ये ।। ५।।
कृष्ण गोपा संगती विद्या अभ्यास घेती
संदिपनीचे आश्रमी राहती सर्व शिष्य गण ।। ६।।
ईश्वर होई शिष्य जेथे काय उणे मग तेथे
सीमा नसे आनंदाते ऋषीच्या आश्रमी ।। ७।।
निसर्ग नयन मनोहर पुष्पलता यांचे माहेर
तृप्त होती घेता फलाहार आश्रमवासी ।। ८।।
श्रीकृष्णाचा सहवास लाभता त्या आश्रमास
वाव नसे दु:खास त्या वातावरणी ।। ९ ।।
परि तेथील एक व्यक्ती दु:खी कष्टी होती
रात्रंदिनी झोप न येती गुरु पत्नीला ।। १० ।।
सांदिपनी गुरुपत्नी आश्रू होते तिचे नयनी
स्वपुत्र गमावूनी सागरामध्ये ।। ११।।
कृष्ण विनविता गुरूसी स्वीकारण्या गुरू दक्षिणेसी
सोडण्यापूर्वी आश्रमासी ज्ञान संपादूनी ।।१२।।
शिष्य म्हणूनी राहीला सार्थक दिले जीवनाला
हेच फळ गुरू दक्षिणेला मिळत असे तूजमुळे ।। १३ ।।
सांदिपनीचे सारे समाधान कृष्ण जैसा शिष्य गण
गुरू दक्षिणा मागील कोण प्रभू कडूनी ।। १४ ।।
गुरूपत्नी संसारिक आंतरमनी इच्छा एक
गुरू दक्षिणेचा मागती हक्क कृष्णाकडून ।।१५ ।।
बाळ बुडाला सागरी असह्य माझे जीवन करी
कशी जगू त्याचे परी बाळाविना ।। १६।।
असता इच्छाशक्ती घेवूनी यावे बाळाती
परत द्यावे माझे हाती हीच आसे गुरूदक्षिणा ।।१७ ।।
गुरूपत्नीस वंदिले कृष्ण सागरतिरी आले
सागरासी आव्हान केले गुरुपुत्रासासाठी ।। १८।।
प्रगट झाली सागर देवता कृष्णासी वंदन करिता
सांगू लागली लीन होता प्रभू समोरी ।। १९।।
शंखासूर नामे राक्षस सागरतळी करी वास
सागरी जिवांना देता त्रास राजा बनूनी तयांचा ।। २० ।।
गुरुपुत्र पडता सागरी शंखासूर गिळंकृत करी
बाळ तयाचे उदरी जात आसे ।। २१।।
सागरी राजा शंखासूर असूनी तो आसूर
भक्ती तयाची हरीवर विष्णूसी पूजित आसे ।। २२।।
रावणाचे जैसे शिव दैवत तैसा शंखासूर विष्णू भक्त
भाव प्रभू चरणी अर्पित मनोभावे ।।२३।।
शंखासूरास दर्शन दिले श्रीकृष्ण प्रकट झाले
प्रभू आसूनो विनविले शंखासुरासी ।।२४।।
गुरूबाळ तुझे उदरी तो मजलागी परत करी
इच्छा केली श्री हरी शंखासूरासी ।। २५ ।।
झाला शंखासूर धन्य घेवूनी प्रभूचे दर्शन
आनंदाने भरले मन प्रभूसी बघोनी ।। २६ ।।
फाडोनीया उदरासी काढावे बाळासी
विनविले प्रभूसी शंखासूराने ।। २७ ।।
बघूनी त्याचे आत्मापर्ण बाळ देण्या पोट फाडून
श्रीकृष्ण होई प्रसन्न त्याचे वरी ।। २८।।
प्रसन्न होई भक्ती बघोनी आशीर्वाद दिला प्रभूनी
घ्यावा ‘वर’ मागोनी श्रीकृष्ण बोले ।। २९।।
पूजेमध्ये मान मिळावा देवामाजी गणला जावा
सदैव प्रभू सहवास घडावा ही माझी इच्छा ।। ३०।।
‘तथास्तू’ म्हटले प्रभूनी त्याच्या भक्तीस बघूनी
‘वर’ दिला हरीनी शंखासुरास ।। ३१ ।।
आत्मार्पण करूनी स्वत:चे उदर फाडूनी
बाळास परत देवूनी टाकले आसे ।। ३२।।
बलीदानाचे प्रतीक रूप मिळेल तव शंख
जल पडता होईल अभिषेक तुझ्या पोटातूनी ।। ३३ ।।
तुझ्या उदरातून जलधार पडत राहील देवांचे वर
सार्थक पूजा न होई तोवर तूजविण पूजेमध्ये ।। ३४ ।।
शंखाविना पूजा निरर्थक पूजेमध्ये असेल तो एक
मिळण्या पूजेचे सार्थक शंख घंटा आसावी ।। ३५ ।।
शंखासी धरले हाती प्रभूचा सहवास लाभती
मोठेपण तयासी मिळती अपूर्व भक्तीमुळे ।।३६।।
शंखासूराचा शंख बनला देवाऱ्यात मान मिळाला
सर्व देवामध्ये बसला भक्ती सामर्थ्याने ।।३७।।
भक्तीचा महीमा थोर अंतरयामी आसावा ईश्वर
देवत्व येते असूनी असूर कुणालाही ।।३८।।
कुणीही नसती थोर लहान मिळवावे लागते मोठेपण
जेव्हां होई प्रभूचरणी लीन देवत्व तयांना येई ।। ३९।।
जीवनाचे तत्त्वज्ञान थोर बनूनी व्हावे लीन
सकलजनांचा मिळेल मान हेच माझे सांगणे ।। ४० ।।
“ शुभं भवतू “
डॉ. भगवान नागापूरकर
९- २९१०८३
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti