वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।।
त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।।
पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।।
पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।।
तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।।
गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।।
तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे 'वर' मिळोन ।।
कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन हो ।। ४।।
राजा नामें जालंदर । होता तो आसुर ।।
स्वभाव त्याचा क्रूर । गरीब जनांसाठी ।। ५ ।।
तयाची पत्नी सती । त्यास पतिव्रता लाभती ।।
महान तिची पतिभक्ति । वृंदा नाम तिचे ।। ६ ।।
पतिसी मानती देव । अर्पूनी त्याचे चरणीं भाव ।।
पुजिती त्यासी सदैव । मनोभावे ।। ७।।
राजाने देवांना जिंकूनी । बंदी त्यांना करूनी ।।
त्रास सर्वांना देवूनी । हा हा:कार माजविला ।। ८।।
प्रत्यक्ष शिव आला लढण्यास । मारण्या जालंदरास ।।
सोडविण्या देवांचा त्रास । त्याचे कडून ।।९।।
अपूरी पडली शिवशक्ती । मरण त्यास न येती ।।
कोण त्यास वाचविती । प्रश्न पडला शिवे ।।१०।।
ब्रह्म आले सत्वर । पूजा करुन विश्वेश्वर ।।
सुचविती उपाय त्यावर । दैत्यास मारण्याचा ।। ११।।
वृंदा आहे सती महान । पतिवृता शक्ती कठीण ।।
त्या शक्तीमुळे रक्षण । दैत्याचे होई ।।१२।।
तिचा पती धर्म । नष्ट करावा हे मर्म ।।
विष्णूसी सांगावे हे कर्म । करणे करिता ।।१३।।
पतिवृता हरण करणेसाठीं । कारस्थान केले जगतजेठीं ।।
दैत्यनाशा पोटीं । घात केला वृंदेचा ।।१४।।
दैत्य रुप घेवूनी । पती आहे हे भासवूनी ।।
पातिवृत्या नष्ट करोनी । वृंदासी फसविले ।। १५।।
प्रकार आला ध्यानीं । पतिधर्म गेला डागळूनी ।।
खिन्न झाली मनी । सती वृंदा ।। १६।।
शाप दिला संतापूनी । मानव जन्म घेवूनी ।।
पत्नी विरहाचे दु:ख मनीं । सहन करावे लागेल ।। १७।।
विष्णू 'राम' अवतरला । आजन्म विरह सोसला ।।
दु:खी, कष्टी आला । सीते साठीं ।। १८ ।।
वृंदेचे जेव्हां पावित्र जाई । रक्षणकवच दूर होई ।।
शिव दैत्यास मारण्या येई । त्याच वेळीं ।। १९।।
दु:खाचा डोंगर कोसळला । पति व पतिधर्म गेला ।।
जगण्यास अर्थ न उरला । वृंदेसाठी ।। २०।।
पति वियोग होतां । सती गेली पतिव्रता ।।
परमेश्वर तिज दर्शन देतां । आशिर्वाद दिला ।।२१।।
परमेश्वरांनी वर दिला । तुलसीचे रूप मिळेल तिला ।।
विष्णुचे सानिध्य लाभण्याला । तिचे भोवतीं ।।२२।।
घरातील अंगण । त्यांत तुलसी वृंदावन ।।
आनंद सुख समाधान । त्या घरी वसे ।।२३।।
पूजा आभिषेकांतील तीर्थ । अर्पूनी जल वृंदावनांत ।।
भाव भक्तीचे मनोरथ । तुलसी ठायी ठेवावे ।। २४।।
सौभाग्यवती ही सति । पतिव्रतेची एक शक्ति ।।
तुळशीच्या आशीर्वादे मिळती । गृहलक्ष्मींना ।।२५।।
तुळसी अंगणीं वसे । संरक्षण वलय असे ।।
दु:ख ना तेथे दिसे । त्या घरामाजीं ।।२६।।
( तुलसी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत )
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
८- २५११८३
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.
देव्हाऱ्यातील देव अनेक शंख तयांमध्ये एक
महत्त्व त्याचे जाणोनी ठीक सकलजन हो ।। १।।
हिंदूची दैवते अनेक रूपे देवांची कित्येक
इष्ट देवता पूजितो प्रत्येक सर्व देवांमध्ये ।।२।।
देव्हाऱ्यातील देवांत शंखघंटा असावी त्यांत
प्रथा पूजेची असण्यात हिंदूच्या ।।३।।
शंखास पूजेतील मान प्राप्त होई ‘वर’ मिळोन
कथा त्याची जाणून घ्यावी तुम्ही ।। ४।।
सांदिपनी ऋषीच्या आश्रम शिष्यगण करिती श्रम
प्रफुल्लता आनंद नी प्रेम आश्रममध्ये ।। ५।।
कृष्ण गोपा संगती विद्या अभ्यास घेती
संदिपनीचे आश्रमी राहती सर्व शिष्य गण ।। ६।।
ईश्वर होई शिष्य जेथे काय उणे मग तेथे
सीमा नसे आनंदाते ऋषीच्या आश्रमी ।। ७।।
निसर्ग नयन मनोहर पुष्पलता यांचे माहेर
तृप्त होती घेता फलाहार आश्रमवासी ।। ८।।
श्रीकृष्णाचा सहवास लाभता त्या आश्रमास
वाव नसे दु:खास त्या वातावरणी ।। ९ ।।
परि तेथील एक व्यक्ती दु:खी कष्टी होती
रात्रंदिनी झोप न येती गुरु पत्नीला ।। १० ।।
सांदिपनी गुरुपत्नी आश्रू होते तिचे नयनी
स्वपुत्र गमावूनी सागरामध्ये ।। ११।।
कृष्ण विनविता गुरूसी स्वीकारण्या गुरू दक्षिणेसी
सोडण्यापूर्वी आश्रमासी ज्ञान संपादूनी ।।१२।।
शिष्य म्हणूनी राहीला सार्थक दिले जीवनाला
हेच फळ गुरू दक्षिणेला मिळत असे तूजमुळे ।। १३ ।।
सांदिपनीचे सारे समाधान कृष्ण जैसा शिष्य गण
गुरू दक्षिणा मागील कोण प्रभू कडूनी ।। १४ ।।
गुरूपत्नी संसारिक आंतरमनी इच्छा एक
गुरू दक्षिणेचा मागती हक्क कृष्णाकडून ।।१५ ।।
बाळ बुडाला सागरी असह्य माझे जीवन करी
कशी जगू त्याचे परी बाळाविना ।। १६।।
असता इच्छाशक्ती घेवूनी यावे बाळाती
परत द्यावे माझे हाती हीच आसे गुरूदक्षिणा ।।१७ ।।
गुरूपत्नीस वंदिले कृष्ण सागरतिरी आले
सागरासी आव्हान केले गुरुपुत्रासासाठी ।। १८।।
प्रगट झाली सागर देवता कृष्णासी वंदन करिता
सांगू लागली लीन होता प्रभू समोरी ।। १९।।
शंखासूर नामे राक्षस सागरतळी करी वास
सागरी जिवांना देता त्रास राजा बनूनी तयांचा ।। २० ।।
गुरुपुत्र पडता सागरी शंखासूर गिळंकृत करी
बाळ तयाचे उदरी जात आसे ।। २१।।
सागरी राजा शंखासूर असूनी तो आसूर
भक्ती तयाची हरीवर विष्णूसी पूजित आसे ।। २२।।
रावणाचे जैसे शिव दैवत तैसा शंखासूर विष्णू भक्त
भाव प्रभू चरणी अर्पित मनोभावे ।।२३।।
शंखासूरास दर्शन दिले श्रीकृष्ण प्रकट झाले
प्रभू आसूनो विनविले शंखासुरासी ।।२४।।
गुरूबाळ तुझे उदरी तो मजलागी परत करी
इच्छा केली श्री हरी शंखासूरासी ।। २५ ।।
झाला शंखासूर धन्य घेवूनी प्रभूचे दर्शन
आनंदाने भरले मन प्रभूसी बघोनी ।। २६ ।।
फाडोनीया उदरासी काढावे बाळासी
विनविले प्रभूसी शंखासूराने ।। २७ ।।
बघूनी त्याचे आत्मापर्ण बाळ देण्या पोट फाडून
श्रीकृष्ण होई प्रसन्न त्याचे वरी ।। २८।।
प्रसन्न होई भक्ती बघोनी आशीर्वाद दिला प्रभूनी
घ्यावा ‘वर’ मागोनी श्रीकृष्ण बोले ।। २९।।
पूजेमध्ये मान मिळावा देवामाजी गणला जावा
सदैव प्रभू सहवास घडावा ही माझी इच्छा ।। ३०।।
‘तथास्तू’ म्हटले प्रभूनी त्याच्या भक्तीस बघूनी
‘वर’ दिला हरीनी शंखासुरास ।। ३१ ।।
आत्मार्पण करूनी स्वत:चे उदर फाडूनी
बाळास परत देवूनी टाकले आसे ।। ३२।।
बलीदानाचे प्रतीक रूप मिळेल तव शंख
जल पडता होईल अभिषेक तुझ्या पोटातूनी ।। ३३ ।।
तुझ्या उदरातून जलधार पडत राहील देवांचे वर
सार्थक पूजा न होई तोवर तूजविण पूजेमध्ये ।। ३४ ।।
शंखाविना पूजा निरर्थक पूजेमध्ये असेल तो एक
मिळण्या पूजेचे सार्थक शंख घंटा आसावी ।। ३५ ।।
शंखासी धरले हाती प्रभूचा सहवास लाभती
मोठेपण तयासी मिळती अपूर्व भक्तीमुळे ।।३६।।
शंखासूराचा शंख बनला देवाऱ्यात मान मिळाला
सर्व देवामध्ये बसला भक्ती सामर्थ्याने ।।३७।।
भक्तीचा महीमा थोर अंतरयामी आसावा ईश्वर
देवत्व येते असूनी असूर कुणालाही ।।३८।।
कुणीही नसती थोर लहान मिळवावे लागते मोठेपण
जेव्हां होई प्रभूचरणी लीन देवत्व तयांना येई ।। ३९।।
जीवनाचे तत्त्वज्ञान थोर बनूनी व्हावे लीन
सकलजनांचा मिळेल मान हेच माझे सांगणे ।। ४० ।।
“ शुभं भवतू “
डॉ. भगवान नागापूरकर
९- २९१०८३
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।
जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।
कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।
समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।
जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।
विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।
गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।
आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।
सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।
तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।
तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।
तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।
भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।
प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।
हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।
भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।
नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।
हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।
प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।
उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।
प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।
भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।
गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।
गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।
उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।
एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।
स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।
पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।
डॉ.भगवान नागापूरकर
१०- ३०१०८३
( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )
आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत .
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
(श्री भक्त पुंडलीक कथा)
श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी
दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १
पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण
सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २
सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी
ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३
तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे
हे कुणास न कळे प्रभूविना ४
असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा
कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५
कुणी करती मुर्तीपुजा कुणी पाही निसर्गांत मजा
प्रभूसी नको भाव दुजा मनोभावाविना ६
सत्य आणि तपशक्ती प्रभूस वाकवती
पाहून पुंडलीक भक्ती धाऊन आले पांडूरंग ७
माता पित्याची सेवा हाच भक्तीचा ठेवा
ती भक्ती खेचती देवा दर्शन देण्या भक्ताना ८
मातापिता सेवेचे प्रतीक मिळोनी धन्य होई पुंडलीक
विश्वाचे उदाहरण एक प्राप्त करण्या प्रभुसी ९
भक्तपुंडलीक कथा त्याची रंजक
होई जीवन सार्थक करुनी अचरणांत १०
पुंडलीक होता विलासी लक्ष्य त्याचे बायकोपाशीं
सर्वस्व समजे धनासी सुख मिळण्या देहाला ११
एके दिनी नारदमुनी गेले उपदेश करुनी
महती आईबापाची पटवूनी पुंडलीकास १२
झाली पुंडलीका उपरती केल्या कर्माचे दुःख होती
पश्चाताप मनी येती भाव भरले प्रेमाचे १३
अंधःकार भयाण जाई दुर होऊन
मिळता एक किरण प्रकाशाचा १४
गुरुकडून मार्ग मिळे ज्ञान झाले आगळे
भक्तीसेवा ही शक्ती कळे पुंडलीकासी १५
मातापित्याची सेवा हाची पुंडलीकाचा मेवा
सारे जीवन खर्ची पडावा ही त्याची इच्छा १६
स्वतःसी गेला विसरुनी आईबापाची काळजी करुनी
सर्वस्व अर्पिले रात्रंदिनीं मातापित्यासाठीं १७
सेवा हेची तप न लागे नामाचा जप
श्रद्धाभाव आपोआप यावेमनामध्यें १८
प्रभू भक्तिचा भुकेला जातां तप फळाला
दर्शन देई पुंडलीकाला विठ्ठल रुप घेऊनी १९
तल्लीन होऊनी सेवा करी आईबाप झोपतां मांडीवरी
त्याक्षणी पांडूरंग आले दारी पुंडलीकांच्या २०
पांडूरंगाचे रुप बघूनी अश्रुधारा आल्या नयनीं
भावनावश होऊनी नमन केले प्रभूला २१
हलविली नाही मांडी आईवडीलांची निद्रा न मोडी
मनी प्रभुच्या स्वागताची गोडी पुंडलीकांस पडली २२
समोर उभे परमात्मारुप मांडीवरी आईवडीलांची झोप
निद्रामोडता होईल ताप खंत याची पुंडलीकास २३
विट घेतली हातीं विठ्ठलासमोर टाकती
उभे राहण्यास विनविती विनंम्र होऊनी २४
क्षमा मागती प्रभूसी कसे उठवूं आईबांबासी
दुःख त्याचे मनासी झोप मोडता येई २५
आई वडील इच्छा करी जाण्या चंद्रभागेतीरीं
विठ्ठला उभाकरुनी विटेवरी नदीकाठी गेला पुंडलीक २६
माता पिताना घेऊन गेला चंद्रभागेकाठी रमला
विसरुनी जाई विठ्ठला पुंडलीक २७
पुंडलीक विनंती करी उभे रहावे विटेवरीं
परतोनी येई तो चंद्रभागेवरुनी २८
कर कटेवरी उभें विटेवरी
लक्ष्य वाटेवरी पुंडलीकाच्या २९
आईवडील भक्ती पोटीं रमला त्यांच्या पाठी
विसरला जगत् जेठीं पुंडलीक ३०
आजही जाता पंढरपूरीं विठोबाचे दर्शन करी
दिसेल तो उभा विटेवरी रुख्मिणीसंगे वाट बघत ३१
सुर्यचंद्र आकाशी अथांग तारे नभाशी
येऊन जाती रात्रंदिवशी हेच चक्र निसर्गाचे ३२
ऋतु नियमीत येती मार्ग ते ना बदलती
हीच असे निसर्ग महती प्रभूशक्तीमुळे ३३
निसर्गाची नियमितता हीच त्याची श्रेष्ठता
प्रभूचे अस्तित्व जाणतां त्या ठिकाणी ३४
जेव्हां अघटीत घटणा होई प्रभू त्यांत भाग घेई
तें चक्रची सुरु होई नियमित रुपे ३५
भक्तासी पावन झाला पंढरपूरी प्रभू अवतरला
आषाढी एकादशीला दर्शन देई पुंडलीका ३६
ही झाली अपूर्व घटना परी विचार येई मनां
सुरु होईल नवीन निसर्ग रचना प्रभूचे अगमन होण्याची ३७
होता प्रभूचे अवतरण शक्यता त्याची पुनरागमन
होईल निसर्ग नियमन हीच महती तिर्थाची ३८
त्याच स्थळी प्रतिवर्षी प्रभू अवतरेल त्याच दिवशी
भावना बाळगुनी उराशीं लाखो जमती वारकरी ३९
ही निसर्ग किमया प्रभू अवतरेल जाणूनिया
प्राप्त होईल त्याची दया ही भावना उराशीं ४०
चंद्रभागातीरीं पंढरपूर जैसे काशी गंगातीर
वारकऱ्यांचे माहेर भक्तांचा जमे मेळा ४१
विठ्ठल रुखमाई मंदीरीं दर्शन घेई वारकरी
तैसैचि पूजा पुंडलीकापरी भक्त प्रभूसी भजती ४२
।। शुभं भवतु ।।
डॉ.भगवान नागापूरकर
११- १३११८३
Copyright © 2025 | Marathisrushti