वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामले मामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली.
June 1, 2022
स्वतः कडे न्यूनत्व घेणे, स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हे संतांचे वैभव आहे. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे स्वतःच्या अशाच अल्पक्षमतेचे कथन आई जगदंबे च्या समोर करीत आहेत. असे असले तरी माझ्यासारख्या सामान्य जीवालाही ती सर्वस्व प्रदान करते हे सांगण्याची भूमिका त्यामागे आहे.
February 13, 2020
हल्ली एक सगळीकडे –
नवीनच फॅड झालंय,
भावनांना समाजाच्या –
खूप महत्त्व आलंय.
August 27, 2022
तुम्हाला माहितीय का की गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर, स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते. त्यामुळे जेव्हा लोकांनी गहू खाणं बंद केलं तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं यात काही नवल नाही. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.
July 14, 2017
भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत
September 2, 2015
प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो ।
ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो।
गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो ।
भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो ।
खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
अष्टदश भुजदंड माथा बरग्या पिगट जटा हो।
रत्त*ांबर परिधान शोभे कासोटा तटतटीत हो।
चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाभीचा टिळा हो।
तकाकी शोणित राहे तेज फाकितसे अंबरी हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
सिहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो ।
पसरूनी वितंड दाढा वदनी केले अग्नीकुंड हो।
घोर गर्जना केली कंपित झाले हे ब्रम्हांड हो ।
थरथर कापती असुरे पळती अपूरे हे ब्रम्हांड हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
भृकूटी व्यंकट केल्या नेत्री अग्नीचे स्फूलींग हो।
थयथय टाकीसी ज्वाला करिसी असूराचा मुळभंग हो ।
खणखण वाजती खडगे, सणसण सोडिसी कैसे शर हो ।
घणघण घंटा नादे दूमदूले अवती अंग हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
ऐसी ही अदिशत्त*ी हिचा न कळे कोणा पार हो
स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकी जयजयकार हो ।
विनवी गिरजा नंदन अंबे चरणी नमस्कार हो
ऐसी ही जगदंबा भत्त*ा नेईल अक्षय पार हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
गायक - श्री.विनोद पंदीरकर.
October 15, 2015
बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले. रामानंद सागर यांनी ‘बरसात’ चित्रपटाची पटकथा लिहीली होती. रामानंद सागर यांचा हा पहिला चित्रपट होता. अभिनेते प्रेमनाथ व अभिनेत्री निम्मी रूपेरी पडद्यावर प्रथमच झळकले, लता मंगेशकर यांना खरा ब्रेक मिळाला तो पण बरसात मधील गाण्यांमुळेच. बरसातमुळे राजकपूर यांचे नाव सर्वत्र झाले.
April 21, 2022
शाहीर पहिला : ( प्रास्ताविक ) :
पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं
अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी
दुश्मनास चकवून धावती चिखला तुडवत पायीं
सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई
पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे
‘आतां कैसें पुढला वेढा फोडुन वरती जावें ?’
बोलत बाजी, ”थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं
निजदेहांचे बांध बनवुनी दुश्मन अडवत राहूं
लाखांचे पोशिंदे तुम्ही, खुशाल जावें पुढती
अडवूं-तुडवूं दुश्मन आम्ही, मृत्यूची ना भीती. ”
-
बाजी प्रभू ( सोबत्यांना स्फूर्ती देत ) :
ज़बरी दुश्मन, मुठभर आपण, परंतु निधडी छाती
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
निबिड अरण्यामधल्या खिंडित अरुंद छोटी वाट
आली कितिही तल्वारींची लाटेवरती लाट
सहज थोपवूं इथें शत्रुच्या महापुराची शक्ती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
वेगें दौडत विशाळगड नृप अपुला गाठूं पाहे
अपुल्या निष्ठेची-शौर्याची आज परीक्षा आहे
स्वराज्ययज्ञीं शोणित शिंपुन देऊं प्राणाहुती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
‘दीनदीन’चा निनादतो स्वर, ‘हरहर आपण गर्जू
शत्रूच्या समशेरींपुढती खड्ग आपुलें परजूं
तल्वारींच्या खणाखणीनें करूं मृत्युची आरती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
अतुलनीय शौर्य-धैर्य अपुलें, मरणाचें भय कैचें ?
वेगें विचरूं , जैसे तांडवनृत्य महादेवाचें
अशक्य ठरवूं दुश्मनास पाऊल टाकणें पुढती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
घटी-प्रहर-पळ अचल, अचंबित काळ थांबुं दे आज
तोफांचे ध्वनि येईतों स्पर्शणार ना यमराज
तोंवर अरिवर अखंड बरसूं लवलवणारी पाती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
-
शाहीर पहिला :
अखेर आले गडावरूनी तोफांचे आवाज
म्हणती बाजी, ”अंतिम मुज़रा स्वीकारा महाराज
मराठदेशा, ठेव ज़ागती अविरत स्वराज्यज्योती ” ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
-
शाहीर दुसरा :
ऐसे लढले बाजी, ऐसे शूर मावळे लढले
मर्दुमकीची शर्थ करूनी धारातीर्थीं पडले
स्वराज्य राखाया स्वीकरली खुशिनें वीरगती ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
धन्य स्वराज्याचे पाइक ते, धन्य धन्य ते गाजी
धन्य धन्य ती घोडखिंड अन् धन्य वीर ते बाजी
धन्य मृत्यु ते, पावन ध्येया संजीवन जे देती ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
- - -
(१३.०७.१६ : पावनखिंड-स्मृतिदिन )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 15, 2016
या आत्मचरित्रात एकामागून एक प्रसंगांच्या लडी उलगडत जातात. कौटुंबिक कापडखरेदी, सूट शिवणं, मुलांची शालेय प्रगती, सहकुटुंब नाटकाला जाणं, मावशीच्या पार्ल्यातल्या बिऱ्हाडाचा शोध, विडीचा ज्वलंत प्रश्न, खिसा कापला जाणं, ज्योतिष आणि अध्यात्मिक अनुभव, सारं कांही मध्यमवर्गी कारकुनी जीवनाचं सार!
February 17, 2022
आत्ता पर्यंत: टीम पुणे त्रिकोणी ग्रहावर उतरली. यानातून बाहेर येऊन शहराकडे निघाली. वाटेत एक नदी आडवी आली. बोट बरोबर समोरच्या तीरावर असलेल्या कॅनॉल मध्ये न्यायची होती. स्टीअरिंग जॅम झाले होते आणि प्रवाह खूपच जोरात होता. बोट कॅनॉल मधे नाही नेता आली तर…
May 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti