(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

    अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.

      February 28, 2026


  • कट्फल / कायफळ

    कट्फल / कायफळ

    ह्याचे ३-५ मी उंच,सदाहरित,छायायुक्त व अतिसुगंधी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट किंवा पिंगट रंगाची व खडबडीत जड व ६ मिमी जाड असते.टहाळ्या रोमश व पाने ८-१५ सेंमी लांब असतात.नवीन पाने तीक्ष्ण व दंतूर असतात.पानाच्या पृष्ठ भागी राळेच्या गाठी असतात.स्त्री व पुरुष पुष्प वेगवेगळ्या वृक्षांवर उगवतात.हे लहान तांबडी व सुगंधी असते.ह्याचे फळ १-२ सेंमी लांब व पिकल्यावर लाल व आंबट गोड लागते हे फळ सरबतासाठी वापरतात.

    ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा.कायफळ चवीला तुरट,कडू,तिखट असते.तसेच हे उष्ण गुणाचे असून हल्के व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक आहे.

    चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)कायफळ चुर्णाचा वास घेतल्यास भरपूर शिंका येतात व डोके दुखी व सर्दी कमी होते .

    २)कायफळ चुर्ण व्रण स्वच्छ करायला तसेच भरून आणण्यास उपयुक्त आहे.

    ३)दातदुखत असल्यास कायफळ काढ्याने गंडूष करतात व चुर्ण मंजनासाठी वापरतात.

    ४)कायफळ चुर्ण कफनिस्सारक असल्याने खोकल्यात उपयुक्त आहे.

    ५)त्वचारोगात देखील कायफळ चुर्ण उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️Dr Swati Anvekar

      March 21, 2018


  • मुंबईतल्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स

    मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता.

      May 31, 2019


  • CRIC कथा : मराठीतील एकमेव क्रिकेट दिवाळी अंक

    CRIC कथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.

      November 21, 2022


  • कलाकाराची सल

    २०*३० च्या आयतावर वाकडे तिकडे हावभाव करून , हातपाय झाडत त्या खाली बसलेल्या रिकामटेकडया लोकांना हसवणं किंवा रडवणं. आहे काय त्यात? हे सहज कोणीही करू शकतं.

      December 20, 2021


  • पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज

    “पर्यावरणाचा र्‍हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्‍हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
    पर्यावरण र्‍हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो .

      June 27, 2024


  • श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ७

    भगवान शंकर आणि देवी पार्वती युगुलस्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..

      September 25, 2020


  • वार्धक्य एक आनंदयात्रा

    मूत्रपिंडांच्या धमन्यांत थर साचल्यास मूत्रपिंडाचे कार्य मंदावते. धमनीचित्रण करून स्टेण्ट टाकल्यावर (रक्तप्रवाह सुरळीत होऊन कार्य पूर्ववत चालू होते. मूत्रपिंडे बिघडल्यास अपोहन (डायलिसीस) व शेवटी प्रतिरोपणाचा पर्याय असतो. शरीरातील स्नायू ताठरतात व हालचालींचा वेग मंदावतो.

      July 9, 2023


  • निरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!

    संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत.

      April 15, 2021


  • फळे आरोग्यासाठी चांगली

    फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा झटत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का?

    - पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता.

    - पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

    - पपईने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
    वयानुसार दृष्टी राहण्यासाठी पपई खाणे फायदेशीर केव्हाही चांगले असते.

    - पपई खल्ल्याने पचन सुधारते. जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये
    पचनशक्तीवर परिणाम होतो. मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

    - वजन कमी करण्यास उपयुक्त फळ आहे. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते. मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

    - एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पोट भरते. याशिवाय पपईमध्ये असणारे फायबर्स भूकेवरील नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

    - पपई खाणे केव्हाही चांगले. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला शीण कमी होण्यास मदत होते.

    - पपई खाण्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राखण्यासही मदत होते.

    -- सुषमा मोहिते
    -- Sushama Mohite
    आरोग्यदूत - Aarogyadoot

      September 13, 2017