वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाणी शुद्धीकरण भाग एक
दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे.
दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे विष "जीवन" दूषित करतात.
आजच्या काळात वेगवेगळ्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी, अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखान्यातून बाहेर पडणारे रक्त, मल, मांस, युक्त दुषित आणि कुजलेले पाणी, गावागावातून नदीमधे टाकला जाणारा उकीरड्यावरील जैववैविध कचरा, तसेच प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारे साबणयुक्त रसायनमिश्रीत सांडपाणी........ कित्ती मोठ्ठी यादी होईल...
हे सर्व दूषित पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित करत आहेत.
भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर रोगाची कारणे शोधून काढून ती कारणे आपल्या जीवनशैलीतून कमी करता आली तर, किंवा काढता येतील तेवढी काढण्यासाठी या रोगांची यादी देतोय.
हे रोग फक्त अशुद्ध पाणी पिऊनच होतात असे नव्हे तर रोग होण्याच्या कारणामधे इतर कारणांबरोबरच दूषित पाणी हे देखील एक महत्वाचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही.
आठ प्रकारचे उदर रोग, वारंवार तहान लागणे, पोट फुगणे, वेगवेगळे तापाचे प्रकार, खोकला, भूक नाहीशी होणे, डोळे येणे, वेगवेगळे त्वचारोग, खाज येणे, गलगंड इ. अनेक रोग ग्रंथकार वर्णन करतात. त्याचबरोबर मुळव्याध, आदि गुदरोग, स्त्रीयामधील प्रदर आदि रोग, हत्तीरोग, रक्ताल्पता, शिरोरोग देखील नदीतील अशुद्ध पाणी, शुद्धी संस्कार करण्याअगोदर प्यायल्याने निर्माण होतात.
आजच्या भाषेत व्हायरल फिवरचे अनेक प्रकार नावं बदलून आपल्यासमोर रोज येत आहेत, अगदी चिकुनगुनीयापासून स्वाईन फ्लु, इबोला पर्यंत सर्व प्रकार पाण्याशी संबंधीत आहेत.
दूषित पाणी ज्या भागात आहे, त्या भागात हे आजार जास्त प्रमाणात पसरले आहेत. हे पण व्यवहारात दिसते.
या दूषित पाण्याखेरीज, अन्य ठिकाणचे जल, वापरासाठी नसेल तर याच दूषित जलावर योग्य ते शुद्धीसंस्कार करून नंतर ते वापरावे, म्हणजेच "रिसायकल" करून वापरावे, इथपर्यंत स्पष्ट आदेश देणारी आयुर्वेदाची दृष्टी, दूरदृष्टीची नाही, असे कसे म्हणू शकतो ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
28.12.2016
फीट्स, मिरगी, आकडी, फेफरं या नावानं ते ओळखलं जातं. इंग्रजीत मात्र त्याला एकच शब्द आहे, एपिलेप्सी. खरं तर हा एपिलेप्सी किंवा फीट्स येणं हे काही व्यंग नाही. तसंच हा आजारही नाही. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते.
ब्लडप्रेशर, मधुमेह, अॅसिडिटीसारखे आजार जसे असतात, तसंच हे. नियमित औषधोपचार घेतल्यास या फीट्स येण्यावर नियंत्रण मिळवून एक उत्तम आयुष्य जगता येतंच!
मात्र आपल्याकडे अजूनही या फीट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. मज्जा किंवा चेतासंस्थेच्या आजारांतला झटका केवळ दहा ते तीस सेकंदांचा असतो. काही वेळा त्यानंतर मूल बेशुद्ध पडते किंवा डोळे फिरवते. या आजारात तीव्र झटका हा एकाचवेळी संपूर्ण शरीरात येतो. यात तोंड, हातपाय तसेच शरीरातील अन्य स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. मेंदूकडे पोहोचणाऱ्या संवेदना काही वेळासाठी यात खुंटतात, त्यामुळे यावेळी मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. काहीवेळा तापाचे प्रमाण वाढल्याने फेफरे येतात. हा काळ पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतका असतो.
लक्षणे
पहिल्या टप्प्यांत चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, शरीर सैल पडणे अशी लक्षणे जाणवतात फेफरे किंवा फिट येण्याच्या टप्प्यांत काही तीव्र संवेदना कारण ठरू शकतात.
मेंदूमधील कंपनांमध्ये किंवा कामात अडसर निर्माण होणे.
खूप ताप, अचानक वाढलेला रक्तदाब वा मधुमेह
अतिनैराश्य
रक्तदाबाचे प्रमाण खाली जाणे.
चक्कर येऊन आदळल्याने शरीर सैल पडणे
श्वसनाचा वेग मंदावणे
रुग्णांची प्राथमिक काळजी काय घ्यावी.
फिटस् येत असतील तरी सतत या आजाराच्या दडपणाखाली राहू नये. दुखापत होईल, असे काम हाती घेऊ नये, उदा. विस्तवाजवळ काम करणे, उंचावर चढणे, जोरात वाहन चालवणे
डोळ्यावर तीव्र प्रकाशझोत येईल अशा ठिकाणी काम करणे टाळावे.
औषधोपचार सुरु असतील तर त्यात खंड पाडू नये.
प्राणायाम, योगा या सारख्या वेदनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या थेरपीज् महत्त्वाच्या असतात. त्यांचा वापर करावा. हा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्ये औषधांनी थोडी झोप येते. पण, त्यामुळे औषधे बंद करू नयेत.
फिटस् रोखण्यासाठीचे उपचार
फीट आली तर रुग्णाच्या तोंडाजवळ चप्पल सरकवली जाते. ही अतिशय चुकीची कल्पना आहे. दातामध्ये पट्टी, चमचा किंवा कपडा सरकवण्याचा प्रयत्न केला तर इजा होऊ शकते. रूग्णाला दाबून धरले तरी त्याला इजा होते.
रुग्णाला कुशीवर झोपवावे, त्याची लाळ गळू द्यावी. त्यानंतर, रुग्णाला धीर द्यावा. फीट आली असता नाकात उग्र वासाचे वेखंड फुंकावे पण ते नाकात जाणार नाही याची काळजी घ्यावी. ते नसल्यास मिठाच्या पाण्याचे एक-दोन थेंब त्यावेळी नाकपुडीत सोडावेत. लगेच करायचा उपाय म्हणून त्याचा उपयोग होतो. या रुग्णांना मानसिक आधार देणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
नैराश्यामुळे फिटस् येण्याचे प्रमाण वाढू शकते. सकस पोषक आहार, नियमित व्यायाम, मोकळ्या हवेतला वावर वाढवल्याने फिटस् येण्याचे प्रमाण निश्चितच कमी करता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा
मॅरथॉनसाठी सराव करणाऱ्या डॉ. राकेश सिन्हा या विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वांनीच वाचले असेल. डॉ. सिन्हा अतिशय फिट होते. रोजच्या रोज सराव सुरू होता. लवकरच वयाची ६० वर्ष पूर्ण करणार होते. आजवर चार फुल मॅरेथॉनचा अनुभव गाठीशी असलेल्या, तसेच पुढील मॅरेथॉनसाठी नियमित सराव करणाऱ्या आणि अलीकडेच सर्व वैद्यकीय चाचण्यांतून त्यांचे निकाल सामान्य असलेल्या डॉ. सिन्हा यांचा सराव करताना मृत्यू का व्हावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किंबहुना, यामुळे एकूणच फिटनेस, त्याबद्दल मिळणारा सल्ला या संदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. खंरतर मॅरेथॉन रनिंगबद्दल अनेक कार्डिओलॉजिस्टनी अनेक धोके सांगून ठेवले आहेत. मलाही अनेकांनी याबाबत विचारणा केली. मात्र यातील तांत्रिक कारणांत सखोलपणे न जाता मी त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
जेव्हा तुम्ही कोणताही व्यायाम सुरू करता तेव्हा त्याकरिता लागणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला दोन प्रकारे मिळते. ग्लुकोज, फॅटस, किंवा फॅटी अॅसिड. साठवलिलेली ग्लुकोज ही लिव्हर, मसलमध्ये ग्लायकोजन म्हणून पदार्थ असतो त्यातून मिळते पण ती लिमिटेड असते. त्यामुळे ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो जो दीर्घकाळासाठी आवश्यक असतो तो फॅटसमधून येतो. ज्याला एक्स्ट्रिम व्यायाम, मॅरथॉन अथवा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे अाहे, अशा व्यक्तीच्या शरीरात एनर्जीची डिमांड वाढते. या वाढीव एनर्जीची डिमांडही पायासाठी पायाजवळील फॅट मधून अशी लोकल न राहता ती डिमांड शरीरभर पसरते. एखाद्या व्हॉटसअप अथवा फेसबुकवर ज्या प्रमाणे एखादा संदेश व्हायरल होतो तशाच प्रकारे शरीरभर जिथे फॅट ग्रुप आहेत तिथे असा संदेश जातो की आम्हाला आत्ता एनर्जीची गरज आहे तरी फॅटस् रिलिज करा. त्यानंतर अशा फॅट डेपोमधून रक्ताद्वारे फॅट रिलिज केल्या जातात. ज्या माणसांकडे फॅट डेपो लिमिटेड आहेत त्यांच्याकडून निर्माण होणारी फॅट आणि ज्यांच्याकडे फॅटचे साठे चांगले आहे, त्यांच्याकडून निर्माण होणारी फॅट यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे जो माणूस अतिशय फिट आहेत, ज्याकडे फॅटचे डेपो जास्त आहेत त्यांच्याकडे फॅट मोठ्या प्रमाणात लिबरेट होते.
आता फॅट आणि ग्लुकोजच्या मेटाबॉलिझममधील फरक समजून घ्यायला हवा. ग्लुकोज रिलिज झाली आणि ती मसलमध्ये जायला हवी असेल ती ज्या पेशीकाम करतात तिथवर पोहोचायला हवी असेल तर इन्शुलिन लागते. पण, त्याच्यावर एक मर्यादा असते. किती ग्लुकोज त्या पेशींमध्ये शिरावे. पण निसर्गाने अशी रचना केली आहे की जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा हा फॅटसचा साठा, त्याला पेशींच्या आत शिरायला कोणत्याही हार्मोनची गरज लागत नाही. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रचंड प्रमाणात व्यायाम करता त्यावेळी प्रचंड प्रमाणात फॅट लिबरेट होचे. मात्र ती, जाळली जात नाही. मात्र ती परत त्फॅट डेपोमध्येच जाईल असेही नाही. तर घर्षण झालेल्या रक्तवाहिन्यात किंवा विशेषतः ह्दयाच्या रक्तवाहिन्यात जिथे सर्वाधिक घर्षण होते तेथील रक्तवाहिन्यांमधील पातळ आवरणाखाली ती शिरते. तिथे ती त्रासदायक ठरते. केमिकल रिएक्शन तिथे सुरू होतात. तिथे प्लेटलेटस् थांबायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्तिक्थे सॉफ्ट प्लाक्स तयार होतात. आता माणूस जरी फिट असला तरी जेव्हा तो काम करतो अथवा व्यायाम करतो, त्यावेळी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, रक्तपुरवठा चांगला सुरू होतो. त्यावेळळी हा सॉफ्ट प्लाक त्रास देत नाही. पण ह्रुदयाची गती खूप वाढली आणि वाढलेलीच राहिली तर धर्षणामुळे हा साॅफ्ट प्लाक सुटा होतो आणि पुढे जाण्यास सुरुवात होते. हा सुटा प्लाक छोट्या रक्तवाहिन्यात शिरला तर ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होते आणि तीव्र हार्टअॅटॅक येतो. मॅरेथॉन किंवा अशा पद्धतीचे टोकाचे व्यायाम प्रकार करणाऱ्या लोकांमध्ये ही शक्यता अधिक असते. हे केव्हा होईल सांगता येत नाही. हे केवळ अॅन्जिओग्राफीकरूनच कळू शकते की हे सॉफ्ट प्लाक्स तयार झालेत अथवा नाही. अनेक इथियोपियन अॅथलिट आपण मॅरेथॉन धावताना पाहतो जे अतिशय बारीक असतात त्यांच्याकडे फॅटसटा साठा बेताचाच असतो. त्यांच्याकडे हा प्रकार होण्याची शक्यता खूप कमी असते. पण जी फिट माणसे आहेत ज्यांची मसल, ब्लड व्हेसल हार्र्ट छान डेव्हलप केलेले आहे परंतु, ज्यांच्या शरीरात फॅटचा साठाही जास्त प्रमाणात आहे. तर त्यांनाही शक्यता अधिक असते. जास्त प्रमाणात सुटणारी फॅट नीटपणे पुन्हा साठविली जात नाही. आणि त्यातून हे सॉफ्ट प्लाक तयार होतात आणि त्यातूनच हे अकाली मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते.
... म्हणून कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, जास्त प्रमाणात किंवा व्यायामाचा अतिरेक टाळावा, आपण त्याकरिता बनलेलो नाही. आणि करायचाच असेल तर करताना हार्ट रेट नियंत्रित राहण्याकडे लक्ष द्यावे. किंवा ज्यांना मॅरेथॉन अथवा तत्सम व्यायाम करायचे आहेत त्यांनी आपल्या शरीरातील फॅटचे प्रमाण हे नेहमी २३ टक्क्यांच्या खाली ठेवल्यास ते उपयुक्त ठरू शकते. पण सध्या मॅरेथॉन धावण्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. लोकांना वाटत की आपण भारताला फिट करत आहोत पण ज्यावेळी आपण धावत नसतो किंवा त्या स्पर्धा नसतात त्यावेळी आपण आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देत नसतो, यामुळे अतिरिक्त फॅटस् शरीरात साठवतो. तेव्हा या दुर्देवी घटनेतून आपल्याला धडा घ्यायला हवा की, मॅरेथॉन धावायची असेल तर आपल्या शरीरातील फॅटसचे प्रमाण हे नियंत्रित हवे तरच आपल्याला यातील जोखीम कमी करता येईल.
-- डॉ. नितिन पाटणकर
मधुमेहतज्ज्ञ, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन विषयाचे मार्गदर्शक.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9223145555
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?
यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बर्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलंं, याचं भानही रहात नाही.
कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपणा विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रक्रुतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं;अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बर्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.
यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतरधावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं सार्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका,तेक्षण तेव्हाचे तेव्हाच जगू घ्या, लुटून घ्या.
आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय,हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती आसते,वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही आसतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुन जगावं.
स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर "निरोगी कसं जगावं"हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?
एक शायर म्हणतो......
उम्र-ए-दराज से
माँगकर लाये थे चार दिन,
दो आरजु में कट गये,
दो इंतजार में.....
बघा,आपलं असं होऊ नये......
-- आनंद रास्ते
आरोग्य किंवा आधुनिक युवा पिढीच्या भाषेत म्हणायचे तर हेल्थ किंवा फिटनेस कसा राखावा याचे शेकडो मार्ग वेळोवेळी सांगितले जात असतात. व्यायाम आणि आहार याचे त्यात अन्यन्यसाधारण महत्त्व असते. आहारात काय खावे, किती, कसे, कधी खावे याचीही माहिती सतत दिली जात असते. फळांचे आहारातील महत्त्व आपण सर्वजण जाणत असतोच. मात्र आजकाल फळांच्या किमती सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. फळामधला हेल्थसाठी फायदेशीर असणारा स्वस्त व मस्त पर्याय आजपर्यंत दुर्लक्षिला गेला आहे. हे फळ आहे, बारमाही कुठेही मिळणारा पेरू.
पेरू विकले जातात ते विविध प्रकारात. म्हणजे कच्चे, अर्धवट पिकलेले आणि पूर्ण पिकलेले. आरोग्यासाठी पेरू खाताना मात्र तो पिकताच लगोलग खाल्ला गेला पाहिजे. या अल्पमोली फळांत अनेक जीवनसत्त्वे, क्षार, खनिजे आहेत आणि अनेक व्याधींवर नियंत्रण आणण्यासाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरते असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे.
पेरू खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. एका केळ्यात जितके पोटॅशियम मिळते तितकेच ते पेरूतूनही मिळते. हे पोटॅशियम सोडियमचे दुष्परिणाम कमी करते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. पेरू रक्तातील कोलेस्टोरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो व त्यामुळे रक्त दाट होत नाही. पेरूमुळे रक्तात शोषल्या जाणारया साखरेचे प्रमाण कमी होते शिवाय त्यात फायबर किवा तंतूंचे प्रमाण चांगले असल्याने मधुमेहींना पेरू उपयुक्त ठरतो. संशोधनात असे आढळले आहे की १०० ग्रॅम पेरूमध्ये फायबरचे प्रमाण ५.४ ग्रॅम असते व त्यामुळे टाईप दोनचा मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
अँटी ऑक्सिडंट म्हणून ओळखल्या जाणऱ्या सी व्हिटॅमिन किंवा क जीवनसत्वाचे प्रमाण पेरूत संत्र्याच्या चौपट असते.त्यामुळे पेरूचे नियमित सेवन कर्करोगाची शक्यता कमी करते. पेरूत आयोडिन नाही. तरीही त्यात कॉपर असल्याने पेरू थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यास मदतगार ठरतो. कॉपरमुळे हार्मोनचे उत्पादन, शोषण यथोयोग्य होते. पेरूतील मँगनीझ एन्झाईम अॅक्टीव्हेटर (संप्रेरके) म्हणून काम करते.थायमिन, बायोटिन, अॅस्कॉर्बिन अॅसिड चे प्रमाण यथोयोग्य राहते.
पेरू बी ग्रुप व्हिटॅमिनने परिपूर्ण आहे. व्हीटॅमन बी३ जे रक्तप्रवाह सुरळीत ठेवते व मेंदूचे कार्य चांगले राखते त्याचबरोबर बी ६ हे नर्व्हजसाठी उपयुकत आहे ते पेरूतून मिळते. गरोदरपणातील प्रॉब्लेम पेरूच्या सेवनाने कमी करता येतात. म्हणजे पेरूतील फोलेट वंधत्व दूर करते. डोळ्याचे आजार किवा व्याधी दूर करण्यासाठीही पेरू खावा. यातील अे व्हिटॅमिन दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्वचेसाठीही पेरू उपयुक्त आहे. कारण यात असलेले ई व्हीटॅमिन त्वचेचे पोषण करण्यास मदत करते. गुलाबी पेरूत टोमॅटोच्या दुप्पट लायकोपेन असते ते त्वचेचे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून रक्षण करते. प्रोस्टेट कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठीही पेरू उपयुक्त आहे.
पेरूची पानेही औषधी गुणधर्माची आहेत. पानांचा रस सर्दी, कफ, श्वासनलिकेचे आजार व घशातील बॅक्टेरियाचा संसर्ग कमी करण्यास उपयुक्त असून पाण्यात ही पाने उकळून केलेले काढा साखरेसह प्यायल्याने हे विकार आटोक्यात येतात असेही संशोधनातून सिद्ध झाले आहे.
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
ओव्यापासून या आजारांमध्ये मिळेल त्वरित आराम..
भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.
गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.
१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे. ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.
गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.
गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
सतीश दळवी. ७८७५३२६२९८. ०२३२६२५४०७७.
पतंजली योगोपचार केंद्र, म्हाळुंगे, पो. तिसंगी, ता. गगनबावडा, कोल्हापूर ४१६२०६.
द्राक्ष खाण्याचे ११ फायदे, जे कदाचीत तुम्हाला माहिती नसतील.
आठवड्यापासून जरा जास्तीच दुखतंय, अनवाणी तर चालता येतच नाही, पण स्पंजची गादी असलेल्या चपला वापरल्या तरी त्रास होतोय, सकाळी उठल्यावर तर तळपायाची वेदना मस्तकात जाते. पायाला विश्रांती दिली की बरं वाटतं. परंतु सारखं बसून कसं चालायचं? एकीकडे वजन कमी करायला, फिरायला जायला हवं, पण फिरलं तर टाच दुखते, कसं व्हायचं? टाचांचा एक्स रे केला, त्यामध्ये दोन्ही टाचांना असलेले टोकं स्पष्ट दिसत होती. सुरुवातीला हाडांच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पण त्याचा हवा तसा परिणाम होत नाही.
आपल्या तळव्याची रचना
पायाच्या तळव्याची टाच, चवडा, बोटे व टाच आणि चवड्याला जोडणारी कमान असे चार मुख्य भाग असतात. तळव्याची ही कमान ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या अस्थिबंधनापासून बनलेली असते. चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्या वजनाच्या वीसपट वजन टाचेवर पडत असते. या भाराचे योग्य विस्थापन करून तो पेलण्याचे काम ‘प्लांटर फेशिया’ हे अस्थिबंधन, तळव्याची चरबीची गादी व स्नायू यांच्या मदतीने वर्षानुवर्षे बेमालूमपणे करत असते. त्यामुळे कालांतराने पावलाच्या गादीची थोडीफार झीज होते. याशिवाय काही कारणांनी उदा. वजन जास्त असणे, अनियमित किंवा सुटीच्या दिवशी व्यायाम करणे, सांधे दुखी, मणक्याचे विकार असणे इत्यादीमुळे पावलाच्या भार पेलण्याच्या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे अस्थिबंधन दुखावले जाते. आणि तळवे विशेषत: टाचदुखीला सुरुवात होते. सकाळी प्रथम उठताना या दुखण्याची तीव्रता अधिक असते. चालायला सुरुवात केल्यावर हळूहळू कमी होते. ज्या व्यक्तींना सतत उभे राहण्याचे काम असते. अशा व्यक्ती उदा. वाहतूक पोलिस, व्यावसायिक, कंडक्टर, ड्रायव्हर, या व्यक्तींना हा त्रास जास्त असतो. जास्त वेळ उभं राहिलं, टणक पृष्ठभागावरून चाललं तर त्रास परत वाढतो. विश्रांती घेत असताना पायावरचा भार निघून गेल्याने टाचदुखी थांबते, पण उभं राहिल्यावर दुखते. अस्थिबंधन ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. काही वेळेसहे दुखणे ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. दुखणे इतके तीव्र असते की, दैनंदिन काम करणे मुश्कील होते.
उपाय यासाठी उपाय म्हणून शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत. यामुळे तात्पुरते दुखणे कमी होते. परंतु दीर्घकालीन उपचार म्हणून होमिओपॅथी औषधांचा करावा. यामुळे पूर्णत: त्रास नाहीसा होतो. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही पेशंटच्या प्रकृतीवरून व शारीरिक हालचालीच्या अभ्यासावरून खालील होमिओपॅथिक औषध उपयुक्त ठरतात. जसे - सिलेशिया, र्हवस टॉक्स, पल्सेटीला, रुटा, चेलिडोनियम, ग्लोनाइन,फास्फरस, ब्रायोनिया, कलेकेरिया, बेलाडोना अशा अनेक औषधींचा उपयोगलाभदायक ठरतो. पेशंटनी आपला औषधोपचार तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करावा. कारण प्रत्येक पेशंटची प्रकृती, शारीरिक हालचाल व लक्षणांवरून पोटेंसी व प्रमाण, डोस ठरवण्यात येतो. योग्य उपचाराद्वारे हा त्रास पूर्णत: नाहीसा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- डॉ. कपिल वानखेडे.
Copyright © 2025 | Marathisrushti