वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जेवणात अथवा खाण्यासाठी आपण कोणते तेल वापरतो यावरही आपले आरोग्य अवलंबुन असते. आजकाल जेवण बनविण्यासाठी कोणते तेल वापरावे याबद्दल बहुतेक जण जागरुक असतात. अगदीच डॉक्टबरांच्या सल्ल्याने नाही तर सर्वसाधारण माहिती घेऊनच आज तेलाचा वापर केला जातो. ज्या तेलामध्ये फॅट्स कमी अथवा कॅलरिज कमी अशा तेलाचा वापर करण्याकडे सर्वांचा कल असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की, ऑलिव्ह ऑईल हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. ऑलिव्ह ऑईल शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी तर करतेच याशिवाय रक्तषदाबाची पातळीही आटोक्याशत ठेवण्यामध्ये ऑलिव्ह ऑईल लाभदायक ठरते. दिवसेंदिवस लोकांना ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यासंबंधीचे महत्व पटताना दिसत आहे. या दोन महत्वाच्या फायद्यांबरोबरच ऑलिव्ह ऑईलमुळे आणखीही अनेक फायदे होतात. ऑलिव्ह ऑईलमुळे त्वचा तुकतुकीत होते. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनबर्न होऊ नये यासाठीही हे फायदेशीर आहे. केस सिल्की आणि मऊ बनविण्यासाठी, त्वचेवर असलेले स्ट्रेच मार्क्सा घालविण्यासाठी, डोक्याकतील कोंड्यापासून मुक्तीन मिळवण्यासाठी अशा अनेक गोष्टींमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्तस ठरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.
चहाची कथा
चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.
जागतिक चहा दिना निमित्ताने
जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो... मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील.
केस चमकदार राहतात.
ग्रीन टीच्या वापराने केस चमकदार बनू शकतात. ग्रीन टीसुद्धा त्याच झाडांपासून बनवली जाते ज्यापासून काळा चहा बनवला जातो. मात्र ग्रीन टी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ग्रीन टीला ऑक्सिडाइज केलं जात नाही. त्यामुळे पानांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते इलेक्ट्रॉन केसांना चमकवण्यास मदत करतात.
ग्रीन टीचा वापर कसा करावा.
केस चमकदार बनवण्यासाठी, ग्रीन टीची तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. १० मिनिटानतंर केसांना कंडीशनर लावा. त्यानंतर केसांना येणारी चमक पाहण्यासारखी असते. तुम्ही केसांना गडदसुद्धा करू शकता, त्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.
जर तुमचे डोळे सुजले असतील तर काळजीचं कारण नाही. वापलेले दोन टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. तणाव, अॅलर्जी, जास्त दारू पिल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. मात्र, चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि स्किनला आराम देतात आणि तुमचे सूजलेले डोळे ठीक होतात. डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.
सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी जेव्हा तुम्ही जास्त वेळ सूर्य प्रकाशात राहता, तेव्हा चेहऱ्यावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी थंड टी बॅ्ग चेहऱ्यावर प्रभावित जागी १० मिनिट ठेवावी. त्यानंतर झालेला बदल तुम्हाला दिसेल. चहाच्या पानांमध्ये आढळणारा टॅनिक अॅसिड गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि रंग वाढवण्यास मदत करतो. वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी. त्याचा परिणाम फुलांवर होऊन फुले अधिक सुंदर होतात. जर तुमची स्किन थोडी कडक असेल तर इंजेक्शन घेण्यापूर्वी इंजेक्शन घेण्याच्या जागी थंड टी बॅग ठेवा. काही वेळाने स्किन मऊ होईल. त्यामुळे इंजेक्शनचा त्रासही होणार नाही आणि कोणतही इन्फेक्शन होण्याची भीतीही राहणार नाही. जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा स्किनची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. महाग स्प्रे खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
कोमट पाण्यात टी बॅग टाका. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, त्याचबरोबर पायदेखील मऊ होतील. चेहऱ्यावरील डाग, मुरूम यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होऊ शकतो. ग्रीन टी स्किनमध्ये असलेले बेन्जॉईल प्रॉक्साइडला थांबवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मणक्यांभोवतीच्या पेशींना इजा होऊन त्या तुटतात तेव्हा स्लिप डिस्क हा आजार होतो. दोन मणक्यांमधील मऊ चकती हालचाल करण्यासाठी, पुढे मागे करता येण्यासाठी या पेशी मदत करत असतात. ही सरकल्यामुळे हा आजार होतो. पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांमध्ये मऊ चकती असते. ही चकती हाडांचे रक्षण करतेच; परंतु चालताना, पळताना शरीराला बसणार्याय हादर्यांुपासून मणक्याचे रक्षण करण्याचे काम करते. ही चकती दोन भागात असते. चकतीचा आतला भाग मऊ, मांसल असतो तर बाहेरचे कवच कठीण असते. कोणताही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो. यालाच स्लिप डिस्क म्हणतात. काही गंभीर स्थितीत स्लिप डिस्कचा इलाज करण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.
स्लिप डिस्क होण्याची कारणे
पाठीच्या कण्यामध्ये स्लिप डिस्कचा धोका संभावतो. कधी तरी चकतीच्या बाहेरील भाग कमजोर होतो, तुटतो त्यामुळे आतील मांसल भाग बाहेर येतो. काही वेळेला चुकीच्या हालचालींमुळेही स्लिप डिस्कचा धोका संभवतो. एखादी वस्तु उचलताना, मणका फिरला किंवा ट्विस्ट होतो, कधी अतिजड वस्तू उचलल्यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. अशा प्रकारांमुळे स्लिप डिस्कचा त्रास होतो. कमजोर स्नायू, बैठे काम यामुळेही स्लिप डिस्क होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ही समस्या भेडसावते. काही इतर गोष्टीही तुमच्या मणक्यावरील दाब वाढवतात.
* झटकन खाली वाकणे
* नोकरीत जड वस्तू उचलण्याचे काम
* गाडी चालवण्यासारखी सतत बसून करण्याची कामे
* धूम्रपान
* अतिलठ्ठ किंवा वजन जास्त असणे
* वेटलिफ्टिंग साऱखे वजन जास्त लागणारे खेळ
* गाडी अपघातात मणक्यांना होणारी दुखापत
स्लिप डिस्कची लक्षणे
* असह्य वेदना, बधीरपणा, बहुतेकदा शरीराच्या एका भागात हे त्रास जाणवतात.
* पाठीतून सुरू होणारे हे दुखणे नंतर पाय आणि हातांपर्यत येते.
* रात्रीच्या वेळी असह्य वेदना होतात
* बसताना उठताना देखील असह्य वेदना होतात.
* कमी अंतर चालून जाणे सुद्धा वेदनादायी ठरते.
* स्नायूंमध्ये कमजोरी येणे, स्लिप डिस्क झालेल्या जागी मुंग्या येणे जळणं, दुखणे,आदी लक्षणे दिसतात.
* अर्थात प्रत्येक रुग्णागणिक वेदनांचे स्वरुप बदलत जाते. जर मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे.
उपचार
आजार किती बळावला आहे, त्यावर उपचारांची दिशा अवलंबून असते. मणक्याची चकती तिच्या जागेवरुन किती सरकली आहे, यावरही औषधोपचार काय करावे हे ठरते. ठराविक व्यायामाने औषधांशिवाय रुग्णांना आराम मिळतो. पाठीच्या कण्याला ताण देण्यासारखे व्यायाम पाठ आणि स्नायूंना ताकद देतात. फिजिओ़थेरिपी ने स्लिप डिस्कमध्ये फायदा होतो. त्यातील तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्यायामाने तुमच्या पाठीचे स्नायू मजबूत होऊन तुमचे दुखणे कमी होईल.
स्लिप डिस्क आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गांभीर्य वाढून नसांना कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत स्लिप डिस्कमुळे पाय किंवा पाठीच्या नसांचा आजार होतो. त्याला कॉडा इक्विना असे म्हणतात. हा त्रास उद्भवल्यास मुत्राशय किंवा आतड्यावरील नियंत्रण गमावण्याची भीती असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. रामदास जाधव
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो. तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संतोष जळूकर
पाणी शुद्धीकरण भाग दोन
पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, "पाणी शुद्ध कसे करा" हे मात्र सांगितले जात नाही. "इट इज नाॅट अवर बिझनेस" असं म्हटलं की विषय संपत नाही राव !
आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे केले जातेय का ? कसे करायचे हे सुस्पष्ट सांगितले जातेय का ?
परदेशी टेक्नाॅलाॅजी वापरून पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग, त्यातील पारदर्शकता अजूनही स्पष्ट होत नाही. एखादी कंपनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जावून एकमेकांच्या जाहीरातींशी जणुकाही स्पर्धाच करत असतात. मग त्यातील खरेखोटेपणा कसा तपासणार ?
शेवटी जो दुसऱ्यावरी अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे !
पाणी शुद्ध करण्यासाठी अस्सल भारतीय पद्धतींचा अभ्यासच होत नाहीये, या निमित्ताने आपण एक जल शुद्धीकरण मोहीम राबवूया. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्राचीन अथवा आजही ज्या पद्धतीने जलशुध्दीकरण केले जात होते, त्या पुनः एकदा प्रकाशात आणूया. पुढील पिढीला या पद्धतींची ओळख तर करून देऊया.
जसे पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातील गढुळपणा कमी होतो, पण तळात हा गढुळ भाग साठून रहातो. नंतर गाळून वरील स्वच्छ पाणी वेगळे करता येते.
आपल्याला माहिती असलेली पाणी शुद्धीकरणाची एखादी पारंपारिक स्वदेशी पद्धत सांगा. त्यातील दोष त्रुटी कमतरता शोधून काढू. त्या दूर कशा करता येतील यावर चर्चा करू. मत मांडायला तज्ञच असले पाहिजे असे नाही.
शाळेतदेखील आपल्याला पाणी शुद्ध करायच्या काही कृती शिकवल्या होत्या. शाळा आठवून पहा......
नाहीतर आजी आजोबांना विचारा. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधा. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी, कोणीतरी विचारल्याने त्यांना पण आनंद होईल. आपल्याही मताला आज कुणीतरी तिसरी पिढी विचारणारी आहे, असं त्यांनाही वाटेल.
ज्यांनी आपल्या जीवनातले अनेक चढउतार पाहिलेले आहेत, यशस्वीपणे पार केलेले आहेत, त्यांना 'या जीवनाच्या' शुद्धीकरणासाठीचा एखादा पर्याय सहज सुचेल. विचारून तर बघा.
"आजी आजोबा घरातील पाणी कसे शुद्ध करीत होते".....
घ्या वही पेन, द्या मुलांच्या हातात! सांगा आजीआजोबांची मुलाखत घ्यायला !! करूदेत शब्दबद्ध !!!
जीवनाचा सर्वात मोठा भाग, ज्या 'जीवनावर' आहे, त्या अशुद्ध जीवनाकडे इतक्या उदासीनपणे बघून चालणार नाही.
जीवनाचे शुद्धिकरण झालेच पाहिजे!!!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.12.2016
अखेर आज मी कोसळलो. खरं तर जगाचा निरोप घेण्याचं माझं वय नक्कीच नाही. माझ्या आसपास असलेले माझे सोबती अनेक वर्षांपासून ताठ मानेने उभे आहेत. मला मात्र अकाली मृत्यू आला यात शंकाच नाही. या न्यायालयाच्या आवारात गेल्या वीस वर्षांत घडलेल्या असंख्य घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. मला ऐकू येतं, मी बघू शकतो, पण निसर्गाने बोलण्याची देणगी मात्र मला दिली नाही. एका मोठ्या वादळात जेव्हा प्रचंड वेगाने वारे वाहू लागले तेव्हा माझा मृत्यू समीप आल्याचं मला जाणवलं आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून वेगाने सरकू लागला.
एक दिवस समोरच्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली एक तरुण स्त्री भर दुपारी ओक्साबोक्शी रडत बसली होती. मी मुका असल्यामुळे तिच्या रडण्याच्या कारणाची चौकशी करू शकत नव्हतो. पण बोलता येणारे दोन तरुण तिला बघून थबकले आणि त्यांनी तिच्या रडण्याचे कारण विचारले. काही महिन्यांचं कोवळं मूल कडेवर घेऊन घरी जात असताना दोन नरपशूंनी ते मूल हिसकावून व त्याला रस्त्याच्या कडेला भिरकावून तिच्यावर बलात्कार केला होता. न्यायालयाने त्या नराधमांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. तिची हृदयद्रावक कहाणी ऐकून ते कॉलेजवीर फिदीफिदी हसू लागले व तिला म्हणाले, ‘अगं वेडे, बलात्कारी माणसं काय समोर पुरावा उभा करून बलात्कार करत असतात की काय? ते निर्दोष सुटणारच!’ मला संतापाने भोवळ आली आणि त्याच क्षणी माझ्या फांद्या आणि पानांसकट त्या दोघांवर कोसळून त्यांचा चेंदामेंदा केला असता तर आयुष्य नक्कीच सार्थकी लागलं असतं असं मला वाटून गेलं, पण संतापाने धुमसण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही.
*****
गेल्या पंधरा वर्षांपासून जवळपास रोज त्याला मी इथे बघतो आहे. सुरुवातीचे काही दिवस मी त्याला न्यायालयाचा कर्मचारी समजत होतो, पण काही लोकांच्या बोलण्यावरून मला कळलं की, त्याने त्याच्या सख्ख्या भावावर इस्टेटीशी संबंधित केस टाकली आहे. त्याने या कोर्टात चकरा टाकण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचं डोकं काळ्या कुळकुळीत कुरळ्या केसांनी सजलं होतं, पण आता त्याला चांगलं गरगरीत टक्कल पडलं आहे. खरं तर त्याचं वय खूप जास्त नाही, पण कोर्ट केसच्या काळजीने त्याला अकाली म्हातारं करून टाकलं आहे. घरी अनेक पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असूनही जमिनीचा एक लहानसा तुकडा भावाला मिळू नये म्हणून हा पठ्ठा पंधरा वर्षांपासून कोर्टात झगडतो आहे. साडेचारशे कोटी वर्षे वय असलेल्या या पृथ्वीवर अवघ्या साठ ते पासष्ट वर्षांचा एक छोटासा प्रवास करायला आलेली माणसं आयुष्य सत्कारणी लावण्याऐवजी पराकोटीच्या स्वार्थापोटी काय काय उद्योग करतात नाही?
*****
एका खुन्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने काढलेली सरकारी वकीलाची जंगी मिरवणूक बघून मी माझ्या आनंदाश्रूंना आवर घालू शकलो नव्हतो. जनसामान्य कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करत असतात. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असली तरी ती अगदीच आंधळी नाही हे बघून आपल्या न्यायपालिकेबद्दल अभिमानाने माझा ऊर भरून आला.
*****
एक दिवस एका व्हॅनमधून वरकरणी सुशिक्षित वाटणारे काही स्त्री-पुरुष हसत खिदळत उतरले. एखाद्या हिल स्टेशनवर मौजमस्ती करायला आल्यासारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. न्यायालयाच्या आवारात सुहास्य वदनाने फिरणाऱ्या माणसांचं दर्शन क्वचितच होत असल्यामुळे मला जरा बरं वाटलं आणि माझी उत्सुकता ताणली गेली. त्यांच्या येण्याचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी मी कान टवकारले. स्वत:च्या वैवाहिक जीवनात पूर्णत: अयशस्वी ठरलेल्या त्या जोडप्यांनी एका सुखी, समाधानी आणि प्रगतिपथावर असलेल्या कुटुंबाला असूयेपोटी इमारतीतून हुसकावून लावण्यासाठी खोटी केस केली होती व त्या केसचा निकाल त्यांच्याच बाजूने लागेल याबद्दल सर्वांना पूर्ण खात्री होती; पण तसे न घडल्यामुळे आता त्या सुखी कुटुंबावर आणखी कोणत्या प्रकारे सूड उगवता येईल याची रसभरीत चर्चा कोर्टाच्या आवारातच सुरू झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फांद्या पसरवून मनुष्यस्वभावाच्या अगणित नमुन्यांचं दर्शन घेताना अनेकदा मोठ्याने ओरडून सर्वांना विचारण्याची इच्छा झाली - ‘का वागता तुम्ही असे?’
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
मोदींनी हजार व पाचशे च्या नोटा बंद करून काळा पैसा संपवण्याचा जो विडा उचलला आहे, त्याला काही बँकेतील अवलादी अधिकारीच हरताळ फासत आहेत हे आता उघड झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात बरेच बँक कर्मचारी तुरुंगात जाऊन, कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतील, तसेच आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्यावर ही पाणी सोडावे लागून, अब्रू मात्र वेशीवर टांगलेली दिसेल.
सरकार कोणतीही चांगली योजना आणते, त्यात भ्रष्ट अधिकारीच योजनेचा बट्टयाबोळ वाजवण्यास पुढाकार घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, पण या वेळेस मात्र, घर फिरले कि घराचे वसे हि फिरतात, अशीच काहीशी गत या अधिकाऱ्यांची झाली आहे. चोरांना मदत करताना, आपले उखळ कसे पांढरे करून घेता येईल, हे पाहताना, आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते याचा थोडाही विचार या नतद्रष्ट लोकांच्या मनाला शिवला नाही, आता भोगा कृत्याची फळे.
या आधी सुद्धा, असे बरेच बँक अधिकारी भ्रष्टाचाराच्या गंगेत अंघोळ करून बाहेर आले आहेत. NP अर्थात नॉन परफॉर्मिंग संपत्तीला कुवत नसताना भरमसाठ कर्ज देणे, आणि हे सिक युनिट बंद पडते, किव्वा पाडले जाते, नंतर हप्ते थांबतात, आणि दिलेल्या कर्जाची वसुली होणे अशक्य होते, अश्या अनेक घटना गेल्या काही वर्षात उदयास आल्या आहेत. विजय मल्ल्या हा कानफाट्या झाला, परंतू असे अनेक प्रतिमल्ल्या आजही समाजात ताठ मानेने फिरत आहेत, फक्त आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही.
आज अशातल्याच काही महाभागानी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला, परंतू तो अंगलट आला आहे.
-- विजय लिमये
२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो?
मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली "भज्जी", खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.
चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.
कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.
रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti