(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जांभळा हृदय दिन

    लेखाचं शिर्षक वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल की अशा रंगाचं हृदय कसं काय असू शकतं ? तुम्हाला खरं वाटो की न वाटो अशा रंगाचं हृदय अस्तित्वात आहे. हो हो हो अहो असं घाबरून जाऊ नका , मी कुठल्या मनुष्याच्या हृदयाबद्दल बोलत नाही आहे , मी बोलतोय एका पदकाबद्दल. हे पदक खूप खास आहे. का ते जाणून घेऊ.

    ७ ऑगस्ट रोजी जांभळा हृदय दिन, सैन्य गुणवत्तेसाठी साजरा केला जातो. सर्वात जुनी अमेरिकन सैन्य गुणवत्ता तयार केल्याबद्दलचा हा स्मृतिदिन. पर्पल हार्ट बॅच , मिलिटरी ऑर्डरमधील पुरुष आणि स्त्रियांचा सन्मान करते. अमेरिकन क्रांतिकारक युद्धाच्या वेळी बॅज फॉर मिलिटरी मेरिटने सहा ज्ञात सैनिकांना गौरविले गेले होते.

    जनरल जॉर्ज वॉशिंग्टनने १७८२ मध्ये बॅज ऑफ मेरिटची ​​निर्मिती केली. वॉशिंग्टनने कोणत्याही एकुलत्या एक गुणवंत कृतीसाठी सैनिकांना हा सन्मान सादर करण्याचा मानस धरला. त्याच्या डिझाइनमध्ये चांदीच्या पातळ काठाने बांधलेला जांभळ्या हृदयाच्या आकाराचा रेशमाचा तुकडा होता. संपूर्ण चेहरा ओलांडून मेरिट हा शब्द चांदीमध्ये कोरला होता. हे बॅज अमेरिकन देशभक्ताचे धैर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे, परंतु हा पुरस्कार कोणी डिझाइन केला हे कोणालाही माहिती नाही.

    वॉशिंग्टनच्या 200 व्या वाढदिवशी पर्यंत, जांभळ हृदय क्रांतिकारक युद्धातील तळटीप म्हणून कायम राहिले. जनरल डग्लस मॅकआर्थरच्या प्रयत्नातून अमेरिकेच्या युद्ध विभागाने जांभळा हृदयाची ऑर्डर तयार केली. आज पदक जॉर्ज वॉशिंग्टनचा अभिमान आणि त्याच्या ध्वजादि चिन्हं असलेली ढाल आहे.

    नावांची अचूक आणि संपूर्ण यादी यापुढे अस्तित्वात नसली तरी नॅशनल जिओग्राफिकने अलीकडेच असा अंदाज वर्तविला आहे की जवळपास १.९ दशलक्ष सेवा सदस्यांनी जांभळ्या ह्रदयांची निर्मिती केली आहे. हा सर्वात जुना अमेरिकन सैन्य सन्मान आहे जो अद्याप सेवा सेवकांना दिला जातो. १९४४ पर्यंत पर्पल हार्टने सेवा सदस्यांच्या ह्या स्तुत्य कृत्याला मान्यता दिली. त्यानंतर १९४४ मध्ये, आवश्यकतेमुळे केवळ जखमी किंवा युद्धात ठार झालेल्यांसाठी हा पुरस्कार मर्यादित होता.

    आजही हा पुरस्कार अमेरिकीन सैनिकांसाठी एक फार मोठा गौरव म्हणून ओळखला जातो.

    purple heart day, August 7, USA, Washington

      August 7, 2020


  • परप्रकाशी ‘स्वयं’सेवी संस्था !

    देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील.

      September 11, 2010


  • “आप”ली माध्यमे

    आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न...


    सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये कि, माध्यमे हे साफ विसरून गेलीयेत देशात दुसर्याही घटना घडतायत, आणि या आप वाल्यानाही माध्यमात, चर्चेत कसे राहायचे हे कळून चुकलाय, कधी कोणत्या घोषणा, कधी बतावण्या आणि काहीच नाही तर कधी वादळी वक्तव्य करून हे लोक चर्चेत माध्यमात राहतात. त्याचं प्रत्येक वाक्य किंबहुना त्याची प्रत्येक हालचाल हि ब्रेकिग न्यूज होऊन बसलीये. त्यामुळे देशातील इतर नागरिकांना आता काही प्रश्न नक्की पडत असतील कि, आपण भारतातच राहतो का? देशात दिल्ली सोडून दुसरी राज्य आहेत का? आपल्या देशात टीम केजरीवाल शिवाय इतर हि नेते आहेत का? आणि आप शिवाय दुसरे कोणते पक्ष आहेत का?

    वास्तविक आपल्या भारत देशात २८ स्वतंत्र राज्ये आणि ७ गणराज्ये आहेत. ६ राष्ट्रीय आणि ४० प्रादेशिक पक्ष आहेत. याशिवाय कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा वापर न करता हि काही लोक आमदार आणि खासदार निवडून येतात. असे आपल्या भारतात एकूण २८ मुख्यमंत्री, ५४३ खासदार आणि ४२१५ आमदार आहेत. या सगळ्या मध्ये सध्या देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी. हा पक्ष ज्या राज्यात निवडून आलाय त्या राज्याची एकूण लोकसंख्या आहे १६७५३२३५. विधानसभेची एकूण गणसंख्या आहे ७० आणि आम आदमी पार्टी चे एकूण आमदार आहेत फक्त २८. त्यांच्यापैकी फक्त ६ मंत्री आहेत आणि बाकी सदस्य आहेत. हि एवढी माहिती देण्याचे मुख्य कारण देशात दिल्ली सरकार च्या मंत्र्यानप्रमाणे देशभरात शेकडो मंत्री आहेत आणि हजारो आमदार आहेत. अरविंद केजरीवाल सोडून देशात २७ मुख्यमंत्री आहेत. ज्यांच्या पैकी ३ मुख्यमंत्री असे आहेत जे अरविंद केजारीवाल यांच्या सोबत निवडून आले आहेत. आणि तेही बहुमताने, पण तरीहीदेशाची माध्यमे त्यांची चर्चा कुठेच करताना दिसलं नाहीयेत. पण दिल्ली सरकार पैकी कोणी शिंकल तरी त्याची ब्रेकिंग न्यूज केली जातीये. अस म्हणतात कि, माध्यमे कोणालाही नायक आणि खलनायक बनवू शकतात त्याचा प्रत्यय पूर्णतः सध्या आपल्या देशात येतोय. माध्यमांनी बनवलेला नायक म्हणजे दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी. माध्यमांच्या आपल्याला हवा तसा वापर करून घेण या लोकांना उत्तम जमलाय म्हणूनच कदाचित माध्यमांना देशभरात ४२१५ विधानसभा सदस्य न दिसता फक्त २८ च दिसत आहेत.
    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून जन्माला आलेल्या या आम आदमी पार्टीचा जन्म मुळात कॉंग्रेसच्या भष्टाचारी राजवटी विरोधासाठी झाला. अण्णांनी आपले आंदोलन ज्या मुद्द्यावर केले, तोच मुद्दा उचलत आणि अण्णांशी फारकत घेत अरविंद केजरीवाल यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. कॉंग्रेस सरकार विरोधी वाढता जनक्षोभ आणि आणि सरकार ची भाष्टचाराची प्रकरणे याच्या विरोधी आंदोलने, मोर्चे काढून या पक्षाने आपली ओळख लोकांपर्यंत पोहोचवली. आधीच कॉंग्रेस च्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेला भाजपा हा उत्तम पर्याय समोर दिसत होता. दिल्ली च्या निवडणुकीतहि जनतेची प्रथम पसंती हि भाजपालाच होती. याचाच प्रत्यय म्हणून दिल्ली च्या जनतेने भाजपला सर्वाधिक पसंती देत ३२ जागांवर विजय मिळवून दिला. आणि आम आदमीला २८ जगावर म्हणजेच जनतेला सरकार हवे होते भाजपाचे. १५ वर्ष राज्य करणाऱ्या शीला दीक्षित यांच्या कॉंग्रेस पार्टीला फक्त ८ जागा मिळाल्या. भाजपा ने कोणाशीही युती न करता विरोधात बसने मान्य करत जनमताचा आदर राखला. पण आम आदमी पार्टीने सत्तेसाठी ज्या पक्षाच्या विरोधासाठी त्यांच्या जन्म झाला त्यांच्याशीच आघाडी करत जनतेची साफ फसवणूक केली. आणि आपल्या माध्यमांनी ह्या गोष्टीचा जाब विचारायचा सोडून आप चा उदोउदो चालू केला. ज्या कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न जनता करत होती त्याच कॉंग्रेस ला परत सत्तेत आणून आप ने जनतेची शुध्द फसवणूक केलीच, पण त्याहून जास्त फसवणूक आपल्या माध्यमांनी केली असा माझा स्पष्ट मत आहे. वास्तविक दिल्लीच्याच विधानसभा निवडणुकीच्या काळात राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छातीसगड याही राज्यांच्या निवडणुकी झाल्या. दिल्लीत जसे भाजपाला सर्वाधिक जनाधार मिळाला तसाच याही राज्यात मिळाला. लोकांची प्रथम पसंती भाजपालाच आहे हे हि स्पष्ट झाले. परंतु माध्यमांनी या गोष्टीला सोयीस्करपणे नजरेआड करत देशातील सर्वाधिक प्रामाणिक, सर्वाधिक जनाधाराचा पक्ष म्हणजे आपच अशा थाटात आपल्या बातम्या पुढे रेटल्या आणि त्या लोकांच्या मनात बिंबवत राहिल्या. देशात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घटनेला बगल देत माध्यमानी जनतेचे लक्ष फक्त आणि फक्त आप वर रोखायचा प्रयत्न करत. पक्षपाती पणाचा कळस केला. आपल्या देशातील वृत्त वाहिन्या कोणाच्या इशार्यावर चालतात हे जनतेला चांगलच कळायला लागलाय त्यामुळे कॉंग्रेसशी आघाडी हि वास्तवातील टीकेची झोड उठवणारी गोष्ट आप साठी मात्र सुप्रसिद्धीची सुवर्ण वाटच झाली.बर प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी कॉंग्रेसनेच शिकवलेले सगळे मार्ग हे लोक वापरू शकले. जसे साधे पणाचे नाटक करत शपथविधीसाठी केलेला मेट्रो प्रवास,(असा प्रवास सोनिया आणि राहुल गांधी यांनीही केला आहे फक्त लोकल मधून), लाल दिवा, सरकारी घर, सरकारी गाडी न वापरण्याच्या घोषणा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कॉंग्रेस च्या पायावर पाय देत केलेल्या पोकळ घोषणा दिल्ली च्या जनतेला अर्ध्या दारात वीज देणार, ७०० लिटर पाणी देणार, त्यामुळे देशभरातील जनतेचे लक्ष वेधण्याट हि माडली यशस्वी झाली खरी, पण त्यांच्याच सरकारने अशा अनेक घोषणा देशभरात या पूर्वीही करून ठेवल्यात पण अंमलबजावणी होताना कुठेही दिसला नाही. त्यामुळे आप च्या या घोषणांच्या मागे खरा आवाज कोणाचा हेही जनतेला लवकरच कळेल. किंबहुना कळायला सुरवात हि झालीये. सरकारीघरात राहणार नाही असे ठासून सांगणारे केजरीवाल १० खोल्यांच्या दुमजली घरामुळे जनतेसमोर खोटे सिध्द होताच आपल्याला नको मोठे घर सरकारी छोटे घर हि चालेल. असा म्हणून आपला बचाव करायचा केविलवाणा प्रयत्न हि या महाशयांनी केला. सरकारी गाड्या नाकारणाऱ्या आम आदमीच्या नेत्यांनी सरकारी गाड्या तर घेतल्याच वर आम्ही लाल दिवा नाकारला होता गाडी नाही असा खोटा बचाव हि केला. हे आणि अशी अनेक उदाहरण आहेत पुढेही मिळत राहतील. ते हे सगळ करतात या बद्दल काही तक्रार नाही कारण आधी सरकार विरोधी लढणारे आम आदमीचे कार्यकर्ते आता सरकार बनून खास झालेत. हे विसरून कस चालेल. आणि देशाला सवय झालीये सगळ्याची, गेली कित्येक दशके कॉंग्रेस तेच तर करत आलाय. आता फक्त मुखवटा आप चा असला आतला बोलविता धनी कॉंग्रेसच म्हणावा लागेल.

    असो सांगण्याचा मुद्दा हाच कि, अशा खोट्या वागण्याने जनतेची फसवणूक होणार असेल तर देशातील माध्यमांनी जनतेला खरेपणा दाखवून देण त्यांचा काम आहे. बर सगळी माध्यमे अशीच आहेत असा माझा बिलकुल मत नाही. पण जी आहेत त्यांनी निदान आता तरी जनतेशी प्रामाणिक व्हाव असा माझा प्रामाणिक मत आहे. कारण आपल्या वृत्ताला भुलून जनतेने जर चुकीच्या पक्षाला मतदान केले तर त्याचे परिणाम पुढील ५ वर्ष देशाला सलग भोगावे लागतील आणि सद्याच्या जनतेला ते परवडणार नाही. त्यामुळे जे खरे नायक आहेत त्यांनाच नायक म्हणा ज्यांना तुम्ही नायक बनवताय त्यांची पात्रता तेवढी आहे का हा हि विचार करा. नाहीतर प्रशांत भूषण सारखे हुशार काश्मिर सारख्या संवेदनशील विषयात आपले निर्बुद्ध विचार व्यक्त करतात आणि आप च्या सवयी प्रमाणे पुन; चर्चेत येतात. पण हे होत असताना देशाच्या, देशातील नागरिकांच्या, सीमेवर दिवसाची रात्र करणाऱ्या आपल्या जवानांच्या भावना किती दुखावल्या जात असतील. त्यांच्या मनोधैर्यावर किती परिणाम होत असेल हा विचार नाही करत. आणि आपली माध्यमेही या गोष्टीचा निषेध न करता अशा वक्तव्या वर येणाऱ्या प्रतिक्रियान सर्वस्वी दोष देत बसता. पण प्रतिक्रिया म्हणजे घडून गेलेल्या क्रियेचा पडसाद असतात. त्यामुळे आपल्या जवाबदारी ला ओळखून देशाचे नुकसान तर होणार नाही न याची घ्यायला हवी. सध्या तरी आपल्या देशाची परिस्थिती अशी नाही कि कोणाला प्रयोग म्हणून देश सोपवावा. ज्यांनी स्वताला सिध्द केला आहे अशा आणि अशाच लोकांकडे देशाची सत्ता असावी असा एक सामान्य माणूस म्हणून माझा मत आहे.
    बाकी समाजकारणासाठी जन्माला आलेल्या आप सारख्या पक्षाने सत्ताकारणासाठी कॉंग्रेस बरोबर मिळून केलेलं राजकारण कळण्या इतके आपल्या देशाचे नागरिक सुज्ञ नक्कीच आहेत...

      January 11, 2014


  • नवरत्नमालिका – १

    हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनी
    कारणेश्वरमौलिकोटिपरिकल्प्यमानपदपीठिकाम् ।
    कालकालफणिपाशबाणधनुरङ्कुशामरुणमेखलां
    फालभूतिलकलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ १॥

    नवरत्न शब्दाचा संबंध आहे नवग्रहांशी. सूर्यापासून तेजाचे ग्रहण करतात म्हणून त्यांना ग्रह म्हणतात. मग सूर्याला ग्रह का म्हणायचे? तर तो आई जगदंबे पासून तेज ग्रहण करतो.
    या ग्रहांच्या तेजाने चमकतात नवरत्न.

    सोप्या शब्दात जगातील समस्त चमकदार, आकर्षक अर्थात सुखदायक गोष्टींच्या मागे आहे आई जगदंबा. तिच्या दिव्य वैभवाचे हे स्तोत्र नवरत्नमालिका.

    हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनीं- हार म्हणजे मोत्यांच्या माळा,नूपुर म्हणजे पैंजण,किरीट म्हणजे बाजुबंद,कुण्डल इ. अलंकारांनी विभूषित केलेल्या अवयवांनी सुशोभित दिसणाऱ्या,
    कारणेश्वर- सर्व विश्वाचे कारण असणाऱ्या भगवान शंकरांच्या,
    मौलिकोटि- कोट्यावधी मस्तकांना

    परिकल्प्यमान
    पदपीठिकाम् - जणु काही आपली पद पीठिका अर्थात पाय ठेवण्याची जागा समजणाऱ्या, प्रत्येक ब्रह्मांडाचे एक ब्रह्मदेव तसे एक शंकर. अशा अनंत कोटी ब्रह्मांडांच्या अनंत कोटी शंकरांच्या मस्तकावर पाय ठेवणारी. अर्थात यांच्यावर सत्ता चालवणाऱ्या,
    कालकालफणि- कालाचाही काल असणाऱ्या फणि म्हणजे महासर्प नागराज शेषाला,
    पाश म्हणजे दोरी,बाण,धनुष्य,
    अंकुश इ. गोष्टी हातात धारण करणाऱ्या,
    अमरुणमेखलां- लालबुंद कंबर पट्टा धारण केलेल्या,
    फालभूतिलकलोचनां- मस्तकावर वेणीसाठी दोन भागात फाकवलेल्या केसांच्या मध्यभागी तिलक स्वरूपाचा तिसरा नेत्र असणाऱ्या,
    मनसि भावयामि परदेवताम् - परमतमा आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 15, 2020


  • दशश्लोकीस्तुती – २

    भगवान शंकरांच्या चरित्रातील दिव्य लीला म्हणजे त्रिपुरासुरवध. त्या लीलेचे चिंतन करीत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…

      August 26, 2020


  • दीपीका पदुकोन आणि गुंतवणूक

    विजय मल्ल्या यांची " किंगफिशर एरलाइन" एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र - सहकारी - वाचक - श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा , अगदी सतत , विचारत होते . आणि मी " माझे मत तरी नाही असॆ आहे . याउपर पैसे आणि निर्णय तुमचाअसल्याने खरेदी करायची तर करा " असे उत्तर देत असे .

    त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला . " मी किंगफिशर बाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? " , " विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ? " " त्यांनी मला किंगफिशर चे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ? " "आणि म्हणून मी किंगफिशर चे शेअर्स घेऊ नाहीत असे सांगतो का ? " अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला . पण ते काही पिच्छा सोडेनात . त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्सखरेदियोग्य वाटत नाहीत . त्यांनी त्यामागचे कारण विचारले . तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का ? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न . " सीने जगताविशयि ची पाने " या माझ्या उत्तराने त तरअक्षरशः चक्रावले . तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशर च्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या " मैत्रीची " चर्चा रंगात होती .

    माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरूण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की " माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे . तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे . हेबिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल ; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशर मधे Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगि वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकीसमन्जस , हुशार , चाणाक्ष आहे की मला तिच्या gut फीलिंग बद्दल खात्री आहे . त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदियोग्य वाटत नाहीत . "

    माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्यान्चे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही .

    पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणूकीबाबत निर्णय घेऊ शकतो . असे अपारंपारीक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची तर्हा अनेकदा फार उत्तम संदर्भ ( आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात . आपणत्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे .

    असा काहीसा अपारंपारीक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने अभिनेत्री दीपीका पदुकोन सारखे असावे असे मला अनेकदा वाटते . आजपर्यंत प्रसार - माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंगपर्यंत कितीजणांशी जोडले . पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाहि . तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे असे क्षणभर मानले तर इतक्यामोकळेपणाने आपण गुंतवणूकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक - बाधक विचार करतो का ?

    दीपीका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार - माध्यमात रंगली होती . पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकीर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपीका पदुकोन ने उत्तम प्रकारे घेतली .अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतांनासुध्दा . यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची व्रुत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात ,आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते .

    दीपीका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं - वाहिनिने केले .दीपीका पदुकोन सिनेस्रुश्तित कार्यरत असूनही तीने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही . असे वागायला धाडस लागते . स्वतःच्या decency ची चाड लागते . आणि प्रचंड आत्मविश्वास आणिस्वतःच्या हक्कांविशयी जागरूकता लागते . आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता , धाडस , आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार ?

    दीपीकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पध्धतिने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे . अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणूकीबाबत विचारकरतांना इतक्या मोकळेपणाने निदान विचार , अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र , त्यातही विशेषतः शेअर - बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथेभल्या - भल्यान्चे निर्णय चुकू शकतात . अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते . तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुन्तवनुकदारान्ची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहनकरणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूलि दिली . अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेचअशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ?

    दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाहीका !

    प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार - संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावूशकलो तर ?

    दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धीआमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . .

    दीपीका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय - सौंदर्य - व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.

    चंद्रशेखर टिळक
    ४ सप्टेंबर २०१६ .

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-mail . . . tilakc@nsdl.co.in

      September 30, 2016


  • जानेवारी ०२ : गावसकरचा दोन शतकांचा त्रिक्रम

    सामना : भारत वि. वेस्ट इंडीज. १९७८-७९ च्या हंगामातील तिसरी कसोटी.

    मानकरी : सुनील गावसकर (भारतीय कर्णधार).

    पराक्रम : कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक काढण्याची कामगिरी तिस‍र्‍यांदा केली !

      January 2, 2011


  • पावित्र्य रक्षाबंधनाचे !

    बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते
    रक्षाबंधनाच्या दिवशी,
    बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सुरु होते
    का त्याच दिवशी?

    एकदा भावाच्या मनगटावर राखी
    बांधली म्हणजे घेतली शपथ
    भावाने बहिणीच्या सुरक्षेची
    आणि पवित्र बंधनाची !

    एका वर्षात विसरला का भाऊ
    आपल्या बहिणीला?
    का लक्षात राहावे म्हणून
    पुनःपुन्हा दरवर्षी राखी
    बांधावी लागते भावाच्या
    मनगटावर बहिणीला?

    एवढे का तकलादू नाते असते जे
    खुंटा ठोकून घट्ट करण्यासारखे
    केले जाते राखी बांधून !

    मग का करतात तेच हात
    हत्या निर्घुणपणे आपल्या बहिणीची?

    का करतात काही ‘भाऊ’
    अत्याचार आणि बलात्कार
    दुसऱ्यांच्या बहिणीवर?

    तेव्हा का नाही आठवत राखीच्या
    पवित्र बंधनाचे नाते
    त्याने बहिणीसाठी जपलेले?

    जगदीश पटवर्धन

      August 31, 2015


  • अतिथी देवो भव संस्कृतीची लागली वाट

    मग कशासाठी हा सारा अट्टाहास आपण करीत आहोत आपण? याचा निदान नरकात जाण्यापूर्वी प्रत्येकाने गंभीरपणे विचार करावा.

      December 15, 2010


  • आरएमसी म्हणजे काय?

    इमारत बांधकामात हल्ली आरएमसी या संज्ञेचा वापर ऐकू येतो. आरएमसी म्हणजे रेडी मिक्स्ड कॉक्रिट. १० वर्षात या | काँक्रिटचा वापर खूप वाढला आहे. त्यापूर्वी सगळीकडे आणि अजूनही खूप ठिकाणी कॉक्रिटचे मिश्रण छोटया मिक्सरमध्ये बांधकामाचे जागीच बनवले जाते. यासाठी खडी, रेतीचे ढीग आणि सिमेंटच्या गोणींची थप्पीही मिक्सरजवळ लावावी लागते. मग खडी, रेती, सिमेंट मिक्सरच्या खालच्या डब्यात (हॉपर) भरले जाते व सगळे सुके मिश्रण फिरत्या मिक्सरमध्ये ओतले जाते.

      January 25, 2023