वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.
तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...
मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'
आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...
त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...
ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!
मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...
-स्वामी विवेकानंद
June 7, 2017
अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते.
November 6, 2010

आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात.
November 9, 2021
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे.
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.
वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.
समुद्र मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे(येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थवृक्षा खाली रडत बसली.
एकदा विष्णू तिथून जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.
या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. गौरीचे आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अष्टमीच्या दिवशी गौरीपूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘जेष्ठा गौरी व्रत’ असे मानतात.
गौरी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. जेष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो..
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात.
प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.
पुजन माहिती....
श्रीमहालक्ष्मीचे आवाहन
गौरीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.
देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. गौरींचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात. गौरींना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.
गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून गौरींच्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.
दुसर्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसर्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.
अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
September 8, 2016
आजची औषधी : कुमारी (कोरफड)
● कोरफड ही कडू चवीची आणि शीतवीर्य (थंड गुणात्मक) असल्यामुळे उत्तम पित्तशामक आहे.
● अम्लपित्तासारख्या त्रासात कोरफडीचा गर खाल्ल्याने पित्त मलावाटे बाहेर पडून जाते. आयुर्वेदामध्ये यालाच 'पित्त विरेचन' म्हणतात.
● बद्धकोष्ठता / पोटात मळाचे खडे होत असल्यास कोरफडीच्या गर / रसामुळे खडे फुटून पोट साफ होते. कोरफड घ्यायचे प्रमाण मात्र प्रत्येकाच्या कोठ्यानुसार बदलावे लागते.
● डोळ्यांची आग होणे , पाणी येणे अशा तक्रारींवर कोरफड उपयुक्त आहे. यासाठी कोरफडीचा गर डोळ्यांवर रोज दहा मिनिटे ठेवावा. पोटातही घ्यावा.
● पित्तासोबतच कोरफड वातशामक , विषघ्न व पाचक आहे.
● पचनक्रिया सुधारणारी असल्यामुळे रोज थोड्या प्रमाणात कोरफडीचा रस घेतल्यास शरीर बळकट बनते.
● सर्व प्रकारची पोटदुखी , विशेषतः यकृत-प्लीहा यांना सूज असेल , तर कोरफड खाल्ल्याने निश्चितच उपयोग होतो. म्हणूनच , काविळीवर कोरफड हे जालीम औषध आहे.
● जुनाट , बारीक ताप / कणकण अंगात असल्यास कोरफडीने तो ताप निघून जातो.
● चेहर्याची कांती सुधारण्यासाठी ; त्वचा कोरडी , खरखरीत झाली किंवा सुरकुत्या पडत असल्यास कोरफडीचा ओला गर लावून वाळेपर्यंत ठेवावा व नंतर धुवावा.
● त्वचा आणि रक्तातील दोषांमुळे होणारे खरूज , फोड , खाजेसारख्या सर्व त्वचारोगांमध्ये कोरफड पोटात घेतल्याने उपशय मिळतो.
● स्त्रियांमध्ये पाळी पुढे पुढे जाणे , प्रमाण कमी असणे , कंबरदुखी अशा सर्व तक्रारींमध्ये कोरफड पोटात घ्यावी.
● पोटात जंत झाल्यामुळे भूक न लागणे , अपचन , खाज , पोटदुखी अशी लक्षणे असताना लहान-मोठ्या सर्वांनीच कोरफडीचा रस घ्यावा.
● निरोगी व्यक्तीनेसुद्धा कोरफडीचा रस नियमित घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.
● लहान मुलांना लागणारा दमा , धाप , खोकला व अधिक कफ झाला असल्यास कोरफडीचा रस द्यावा.
● मुका मार लागून रक्त साकळल्यावर याचा लेप लावावा.
● मात्र , जुनाट मुळव्याधीसारख्या विकारात अंग बाहेर येत असल्यास ; गर्भावस्थेमध्ये , अति वृद्ध व्यक्ती , ज्या महिलांना पाळीचे प्रमाण जास्तच असते , अशांनी कोरफडीचा वापर करू नये.
[ टीप - सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरुन साभार)
August 2, 2017
साबा करीम, हृषिकेश कानिटकर, हेमांग बदानी या भारतीयांबरोबरच अडम गिल्क्रिस्ट आणि हॅरल्ड लार्वूड यांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर ही आहे. १९०४ हे लार्वूड यांचे जन्मवर्ष.
November 14, 2010
सर्व जग आणि आपल्या देशाला भेडसावणारा यक्ष प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचार. बऱ्याच विकसीत आणि विकसनशील देशांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आणि करीत आहेत. पण भ्रष्टाचारख्या शुल्लक गोष्टीचे निर्मुलन अजून तरी कुठल्याच देशाला करता आलेले नाही करण्याची मानसिकता आणि प्रबळ इच्छाशक्तीही नाही.
August 24, 2015
हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे.
December 29, 2018
मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ‘ श्रीमद्भगवद्गीता ‘ जशी आहे तशी वाचनात आली ,
January 25, 2020
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ८॥
या विश्वाची उत्पत्ती आई जगदंबे पासून होते हे सांगितल्यानंतर, ज्यावेळी हे विश्व दृशमान असते त्यावेळी आई जगदंबेचे स्थान नेमके काय? हे स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी ही रचना साकारली आहे.
आई जगदंबे च्या विश्व जननी स्वरूपानंतर विश्वाधिष्ठान स्वरूपाबद्दल बोलताना आचार्यश्री म्हणतात,
यस्यामोतं प्रोतमशेषं मणिमाला-
सूत्रे यद्वत्क्कापि चरं चाप्यचरं च ।
एखाद्या धाग्यात ओवलेले मणी जसे माळेत असावेत, तसे संपूर्ण चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरलेले आहे अशी.
येथे दिलेला माळेचा दृष्टांत मोठा रमणीय आहे. जसे माळेतील सर्व मणी एका अंतर्गत सूत्राने बांधलेले असतात, तसे या संपूर्ण विश्वाला बांधणारे आणि संचालित करणारे सूत्र म्हणजे आई जगदंबा.
बाहेरून माळ पाहतांना केवळ मणीच दिसतात. आतला धागा दिसत नाही. मात्र असे असले तरी आत तोच धागा आहे म्हणूनच माळ ही माळ आहे. तो धागा नसता तर सर्वत्र विखुरले पण राहिले असते. त्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये जी एक निश्चित नियमानुसार असणारी सुसूत्रता दिसते ती आई जगदंबेची शक्ती आहे. तिचे दिसणे महत्त्वाचे नाहीतर असणे महत्त्वाचे आहे.
एक लहानशी गोष्ट लक्षात घेऊ. या दृष्टांतात धागा आत असतो पण येथे आचार्यश्री म्हणतात ही चराचर विश्व जिच्यात ओतप्रोत भरले आहे. ती आत आहे म्हणायच्या ऐवजी विश्व तिच्यात आहे असे म्हटले आहे. अर्थात विश्वापेक्षा व्यापक आणि श्रेष्ठ आहे, हे सांगण्याची ही किती सुंदर पद्धती आहे.
तामध्यात्मज्ञानपदव्या गमनीयां- त्या अध्यात्मज्ञानरूपी पदवीने प्राप्त होणाऱ्या
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 6, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti