वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागते. केस त्वचा कोरडी होते. अशा वेळी काही घरगुती उपचार करा.
वाटीत खोबरेल तेल घेऊन ते गरम करावे. नंतर कापसाच्या बोळ्याने तेल संपूर्ण डोक्याला लावावे. हलक्या हाताने मालीश करावे. उथळ भांडयात पाणी गरम करून वाफ घ्यावी. गरम पाण्यात टॉवेल बुडवून घट्ट पिळून डोळ्यांभोवती गुंडाळावा व दहा मिनिटांनी पुन्हा मालीश करावे.
गाजर या दिवसात मुबलक मिळते. त्याचा रस घेतल्याने डोळ्यांना उपयुक्त ठरते.
डोळ्यांभोवतालची त्वचा कोरडी पडली असल्यास बदामाचे तेल लावावे किंवा बदाम उगाळून लावावा.
साय किंवा तुप थोड़े कोमट करून थोड़े ओठांना लावावे.
दुधाच्या सायीमध्ये ग्लिसरीनचे काही थेंब व लिंबाचा किंचित रस घालून ते मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावावे.
ग्लीसरीन, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस चमाचभर मिसळून हातापायाना लावावे. हातपाय स्वच्छ व मऊ राहतात.
हात साबण लावून धुतल्यावर लगेचच खोबरेल तेल लावावे. मऊ राहतात.
हे उपचार करण्याबरोबर थंडीच्या दिवसात भरपूर पाणी प्यावे.
लहान मुलांना बदामाच्या गराचे बारीक बारीक तुकडे करून ते मधाबरोबर खायला द्यावेत म्हणजे थंडीच्या दिवसात उद्धभवणा-या विकाराबरोबर त्यांचे रक्षण होते.
तुळशीचा रस व मध घेतल्यास थंडीमुळे येणारा ताप उतरतो.
पुदिन्याचा रस व मध मिसळून घेतल्यास ताप उतरतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
* काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे मिश्रण असलेले जेवण दिवसातून ६ वेळा घेणे गरजेचे आहे.
रात्रीचे जेवण नेहमी हलके घ्या, ज्यात फायब्रस काबरेहायड्रेट्सचा समावेश असेल. सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा.
* काबरेहायड्रेट्स, शर्करा आणि चरबी, सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या तळलेल्या पदार्थाचा समावेश जेवणात करणे टाळा.
* शरीरातील चरबी वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लाक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.
* शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राहील याची काळजी घ्या. डिहायड्रेट झालेले शरीर वजन घटवू शकत नाही, त्यामुळेच किमान ३ लिटर पाणी दिवसाला प्यायलेच पाहिजे.
* संध्याकाळचे अति खाणे टाळून त्यांच्या जागी दाणे, गाजर, काकडी यांचा समावेश करा.
* ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, सॅलड, भाज्या आणि फळे यांसारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स खाणे वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे.
* तुम्ही किती व्यायाम करता यावरही प्रत्येक आठवडय़ाला तुमचे वजन किती कमी होईल हे अवलंबून असते. आठवडय़ातील तीन दिवस वेट ट्रेिनग आणि तीन दिवस धावणे, पोहणे यांसारखी काíडओव्हॅस्क्युलर ट्रेनिग आठवडय़ातून ३ वेळा करणे गरजेचे आहे.
* मासे किंवा मटणपेक्षा चरबीचे प्रमाण कमी असलेले प्रोटिनयुक्त चिकन खाणे महत्त्वाचे आहे. शाकाहारींसाठी मलईरहित (स्किम्ड) दुग्धजन्य पदार्थ, दही आणि पनीर खाणे कधीही श्रेयस्कर.
* दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा दर २ ते ३ तासांनी खाणे कधीही योग्य. त्यामुळे अधिकाधिक कॅलरी जाळण्यास मदत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
थंडीत पायाच्या टाचांना भेगा पडणे अगदी सामान्य आहे. परंतू भेगा वाढणे, सूज येणे, वेदना होणे, यामुळे चालताना त्रास जाणवतो. यापासून वाचण्यासाठी उपाय पेट्रोलियम जेलीचा वापर सर्वात सोपा उपाय आहे. यासाठी दीड चमचा व्हॅसलीनमध्ये एक लहान चमचा बोरिक पावडर मिसळून घ्या. रात्री झोपताना ही पेस्ट टाचांवर लावून घ्या. काही दिवसात आराम पडेल.
आमचुराचे तेल भेगांसाठी रामबाण औषध आहे. हे घट्ट असतं जे विरघळवून आपण रात्री टाचांवर लावू शकता. सकाळी पाण्याने धुऊन टाका. काही दिवसातच टाचा नरम पडतील.
टाचांमध्ये अधिक भेगा पडल्या असतील तर मॅथिलेटिड स्पिरिटमध्ये कापसाचा गोळा भिजवून भेगांवर लावा. असे दिवसातून तीन ते चार वेळा करा. परंतू टाचांना धूळ-मातीपासून वाचवायचे आहे हेही लक्षात असू द्या.
कोमट पाण्यात जरा शांपू, एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाकून मिसळून घ्या. या पाण्यात दहा मिनिटापर्यंत पाय टाकून बसावे. त्वचा फुगल्यावर मॅथिलेटिड स्पिरिट लावून टाचांना प्यूमिक स्टोन किंवा इतर पाय घासण्याच्या ब्रशने रगडून स्वच्छ करून घ्या. याने टाचांची डेड स्कीन स्वच्छ होऊन जाईल. नंतर टॉवेलने पुसून कोमट नारळाच्या तेलाने मालीश करा.
पायांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी पेडिक्योर करावे. हे पायाचे नख, टाच, आणि तळपाय स्वच्छ करण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. नियमित हे केल्याने समस्या सुटेल. पेडिक्योर आपण घरी करू शकता किंवा ब्युटी स्पेशालिस्टकडून करवणेही उत्तम ठरेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पाणी शुद्धीकरण भाग पाच
पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.
त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.
याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.
हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.
पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.
पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.
केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.
एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.
नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.01.2017
नविन वर्षात आपल्या शरीराला गुदगुल्या करणारं, काहीतरी हवंहवंसं वाटणारं रोज घडो. त्याचसाठी तर आपण धडपडत असतो..परंतू त्याच बरोबर मनाच्या माध्यामातून मेंदूला गुदगुल्या करणारं, विचार करण्यास भाग पाडणारं, सदसदविवेकबुद्धी जागृत करणारंही काहीतरी घडो ह्या शुभेच्छा
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
पाणी शुद्धीकरण भाग चार
पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.
दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.
वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.
ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.
वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !
खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.
करून तर बघा,
गंमत म्हणून !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.12.2016
"आहीस्ता चल जीन्दगी,
अभी कर्ज चुकाना बाकी है..!
कुछ दर्द मिटाना बाकी है,
कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!"
आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस..
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन पुढं सरकत आणि मेहेनतीने प्राप्त केलेल्या त्या गोष्टीचा नीटसा आस्वादही घेता येत नाही..
"रफ्तारमे तेरे चलने से,
कुछ रुठ गये, कुछ छुट गये..
रुठोंको मनाना बाकी है,
रोतोंको हसाना बाकी है..!"
तसच दु:खाचही..! एखादं खुप जवळचं माणूस हरवावं पण त्याच दु:ख करायलाही वेळ नसतो हल्ली आपल्याकडे..
"कुछ हसरते अभी अधुरी है,
कुछ काम भी जरूरी है..
ख्वाईशें जो घुट गयी इस दिल मे,
उनको दफनाना बाकी है..!"
वर्षाच्या सुरुवातीस नविन वर्षात आपण काय काय करायचं हे ठरवत असतो..त्यातल्या काही गोष्टी होतात, काही अर्धवट होतात तर काहींवर पाणी सोडांव लागतं..तरीही दर नविन वर्षाच स्वागत आपण त्याच उत्साहानं करत असतो कारण नविन वर्षात काहीतरी आणखी चांगलं घडेल ही उमेद असतेच..
आयुष्याबरोबर चालावंच लागतं..तु पुढे चल, मी येतो मागून असं म्हणून नाही चालत..
"तू आगे चल, मै आता हूॅं
क्या छोड तुझे मै जी पाऊंगा?
आहीस्ता चल जिंदगी
अभी कई कर्ज चुकाना बाकी है..!!"
अलविदा २०१६..!!
-- नितीन साळुंखे
खांदेकरी शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन - अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये . दातात भरलेली चांदी मात्र तशीच राहील ; त्याचे श्रेय दंतवैद्याला द्यायला हरकत नाही , बिचारा कायम विनोदाचा विषय झालेला !
दफन झाले तर कीड्यामुंग्यांना मेजवानी आणि झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे , शिवाय शरीरातला काही भाग सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात पंचमहाभूतात विलीन होणार आहे , ही माहितीसुद्धा हाताशी असू द्यावी . बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा की ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत , मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत , सेवाभावी संस्था मागे लागणार नाहीत ८० - जी चे प्रमाणपत्र घेऊन ! आणि असलीच थोडी प्रॉपर्टी तर मृत्युपत्र करताना मुलाच्या नावे करण्याऐवजी नातवाच्या नावे करावी , म्हणजे नातू सज्ञान होईपर्यंत आपला नालायक मुलगा आपल्याला शिव्या देत , शेवटच्या क्षणी पाणी पाजल्याचा पश्चात्ताप करीत रोज आपली आठवण काढत राहील .
एरवी सर्वत्र पुढे असणाऱ्या पण शेवटी मागे राहणाऱ्या बायकोची काळजी करू नये . बायका वयाने नवऱ्यापेक्षा मोठ्या असण्याची पद्धत आपल्यात नसल्याने बायकांना विधवा करण्याची संधी नवऱ्यांना आयतीच मिळते , त्याला कोण काय करणार ? आणि दररोज लाल टिकली चिकटवून घेणाऱ्या कपाळालाही थोडा चेंज मिळावा यात गैर ते काय ?
अंत्ययात्रेच्या वेळी हसू नये जीवनाची कॉमेडी आठवून आणि बऱ्या - वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदवही जाता जाता हळूच परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे . जन्माला का आलो आणि का मेलो , यासारखे प्रश्न ' राम बोलो ' च्या डस्टरने पुसून टाकावे मनाच्या पाटीवरून .
गल्लोगल्ली श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यासाठी मित्रांना भुर्दंड पडेल , इतकी कीर्ती मिळवू नये . पुतळ्याचेही स्वप्न बाळगू नये . कारण कार्यकर्ते करतील त्याही निधीत भ्रष्टाचार आणि कावळ्यांना मिळेल सार्वजनिक कमोड ! मरताना डोळे मिटलेले असावे , स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत म्हणून आणि तोंड उघडे असू द्यावे सांगायचे बरेच काही राहून गेले पण ऐकून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नव्हता म्हणून .
महागुंगीच्या धुक्यात शिरताना समोर स्टेशनमास्तर भेटावा . त्याच्याकडे चौकशी करावी ' पुष्पक विमान ' कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची आणि वैकुंठाचे तिकीट काढून वाट पाहत बसावे तुकारामाचे आयटेम साँग म्हणतः आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !
-- अविनाश
उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..
Copyright © 2025 | Marathisrushti