(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • भारतातला शेक्सपिअर  – राम गणेश गडकरी

    भारतात सुद्धा एक शेक्सपिअर जन्माला आला होता आणि त्यांचे नाव – राम गणेश गडकरी ! पण मला हे ‘भेटले’ ते ‘भेटले’ अशी अशुद्ध भाषा बोलणारी पैदास मोठ्या संख्येने वैचारिक गोंधळ घालत आहेत. त्यांना त्यांचे काय महत्व कळणार. यांच्या पैकी किती जणांनी गडकरींचे वाङ्मय वाचले आहे. गडकरींची हि कविता फक्त वाचावी आणि साहित्य संमेलनात फक्त हजार मतदानात निवडून आलेल्यांनी आपण कुठे बसतोय याचे आत्मशोधन करावे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग २८

    पाणी शुद्धीकरण भाग आठ

    पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात.

    अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे आयुर्वेद मानतो. काही औषधे सूर्यप्रकाशात तर काही चंद्रकिरणात करायला सांगितली आहेत. काही वनौषधी विशिष्ट नक्षत्र असताना काढायला सांगितले आहे.

    तसेच काही धातुंचा संपर्क पाण्यातील अशुद्धी दूर करतो. शुद्धीकरणासाठी सर्वश्रेष्ठ धातु आहे, सोने. विषहर असा त्याचा गुणधर्मही सांगितलेला आहेच. पाणी पिताना, साठवताना सोन्याच्या भांड्यात साठवावे, हे आज सर्व सामान्यांनाच नव्हे तर उच्च श्रीमंत असलेल्याना सुद्धा जमणारे नाही. ( आणि आता तर एका परिवाराकडे अमुक तोळेच ठेवण्याचे चालले आहे म्हणे ! असो ! ) सोन्याचे पाणी स्वभावाने उष्ण गुणाचे तर चांदीच्या भांड्यातील पाणी थंड गुणाचे आहे.

    तांब्याच्या भांड्यातील पाणी उत्तम गुणाचे आहे, पण ते सूर्य उगवल्यानंतर भरावे आणि सूर्यास्तापर्यंत संपवावे. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कळकते. चव बदलते, क्वचित हिरवट छटादेखील येते.

    मातीचे मडके जे पूर्ण भाजलेले असते, त्या मातीतील अशुद्धी दूर झालेल्या असतात. अशा मातीच्या मडक्यात उकळून, गाळून भरलेले पाणी ठेवले तर नक्कीच चांगले असेल.

    शुद्धीकरणाचे मापदंड आज व्यवहाराच्या पातळीवर तपासलेच पाहिजेत. शक्यता आणि वास्तवात खूप अंतर असते. गृहीत धरून नाही चालणार काही गोष्टी !

    धातु जर शुद्ध स्वरूपात मिळत असतील तर त्यात ठेवलेल्या पाण्याची शुद्धी होईल, नाहीतर आगीतून फुफाट्यात....

    प्रत्येक गोष्टीची शुद्धी करण्याची पद्धत आणि मापदंड वेगळे असतात. तांदळाची शुद्धी पाण्याने धुण्यात होते. तर सोन्याची शुद्धी अग्नीत जाळल्याने होते. बिब्बा शुद्ध करायचा झाल्यास दुधातच उकळावा लागेल. आपल्याला एखाद्या पदार्थाची शुद्धी का आणि कोणत्या प्रकारची शुद्धी अपेक्षित आहे, हे ठरवून ती, त्या पदार्थाला अनुकुल अशी प्रक्रिया करावी लागेल.

    केवळ ग्रंथात सांगितले नाही, म्हणून हे शुद्धीकरण आम्हाला मान्य नाही असे म्हणून कसे चालेल ? काही "अनुक्त" विचारात ठेवावे लागतील.

    दूध हे आरोग्यासाठी चांगले असते, ही एका जमान्यातली ग्रंथोक्त गोष्ट झाली. पण कुठचे ? कसे ?

    आज उपलब्ध असलेले दूध, आणि दुधात घातले जाणारे (शुद्ध?) पाणी. यांची शुद्धी तपासायची झाल्यास ?

    शुद्धीकरण करणे किती कठीण आहे ना ? पन्नास दिवस सुद्धा पुरणारे नाहीत. पन्नास साठ वर्षातील अशुद्धी दूर करायला फक्त पन्नास दिवस पुरतील ? निदान पन्नास साठ महिने तरी लागतीलच !

    दुध कुठुन येते ती गाय आणि तिचा विदेशी वंश तपासणे आणि तो कायमचा दूर करणे हेच खरे शुद्धीकरण !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    04.01.2017

  • बाप्पांचे आलय : पद्मालय

    सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्‍वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्‍यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.

    गाभार्‍यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्‍त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद‍्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.

    मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्‍हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.

    या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
    पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.

    जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.

    सौ. मीनल कुलकर्णी
    7249822096 

  • बाप्पांचे आलय : पद्मालय

    सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्‍वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्‍यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.

    गाभार्‍यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्‍त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद‍्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.

    मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्‍हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.

    या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
    पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.

    जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.

    सौ. मीनल कुलकर्णी
    7249822096

  • आई बाळाचे संगोपन

    बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावं लागतं ? कोणती पथ्य पाळावी लागतात ?

  • आजारांवरील उपाय – आयुर्वेदिक, ऍलोपाथी आणि घरगुती

    नेहमीच होणार्‍या काही लहानमोठ्या आजारांवरील ऍलोपथीक, होमिओपथी, घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांची ही उपयुक्त माहिती.

  • कोरडा खोकला

    कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.

    कारणे

    श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.

    लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो.
    कर्करोगासाठी घशाची 'आतून' आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा लागतो. उपचाराने कोरडा खोकला 10-15 दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे पाठवावे.

    उपचार

    कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.

    आयुर्वेद

    अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.

    आयुर्वेदिक घरघुती उपचार

    फुफ्फुसाशी निगडीत दमा, खोकला, अॅलर्जी, सायनस, आदींना दूर ठेवण्यासाठी काही दैनंदिन वापरात येणाऱ्या आयुर्वेदिक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. काही पदार्थ आपल्या घरातच असतात.पण आपल्याला त्यांचा वापर कसा करावा, हे माहित नसते.

    • आले – आले – सुंठ हे फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले असते. सुंठ उगाळून खडीसाखर घालून आणि शिजवून तयार केलेले चाटणाचे पाक खोकला असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास बरे वाटते. वारंवार सर्दी होणाऱ्यांना आणि दमा असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर केल्यास फुफ्फुसासाठी चांगले असते.

    • ज्येष्ठमध - ज्येष्ठमध फुफ्फुसासाठी उत्कृष्ट औषध आहे. ज्येष्ठमधाचा काढा घेतल्याने खोकला बरा होतो.

    • तुळस – तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीती भरलेला कफ सुटण्यास मदत होते.तुळशीची पाने चावून खाल्ल्यास श्वसनाचे आरोग्य सुधारते.

    • लवंग – लवंग चघळण्याने दम लागत नाही. लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते.

    • गवती चहा – गवती चहा, ज्येष्ठमध,दालचिनी, तुळस, पुदीना यांचा काढा थोडीशी साखर घालून पिण्याने ताप, खोकला,सर्दी कमी होतो.श्वासाशी संबंधित असलेले त्रास होत नाहीत.

    • रुईची पाने – रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे, श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. दम लागत असल्यास, छातीत कफ भरला असल्यास अगोदर ताल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात आणि कफ दोष संतुलित होतो.

    • ओवा – ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो.
    अशाप्रकारे आयुर्वेदिक घरघुती उपचार केल्यास आजर किंवा व्याधीदूर होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

    -- विनीत मासावकर यांनी लिहिलेली ही पोस्ट आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन घेतली आहे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग २७

    पाणी शुद्धीकरण भाग सात

    आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते.

    हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ?
    ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध होते, तर पाणी शुद्ध करण्यासाठी हीच पद्धत वापरता येईल.

    म्हणजेच पाण्याला घुसळून वापरणे..
    दह्याचे ताक करताना जसे घुसळले जाते, तसे पाणी घुसळले तर त्यातील अशुद्धी खाली बसतात. त्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात, आणि पाणी शुद्ध होते.
    दही घुसळताना जी शक्ती वापरली जाते, त्या शक्तीच्या सहाय्याने दह्यातील सूक्ष्मत्व वेगळे होत जाते. त्यातील लोण्याचा घन भाग एकत्र येत जातो आणि वर तरंगतो, तसेच पाणी घुसळले गेल्यावर त्यातील अशुद्ध द्रव्याचा घनभाग एकत्र येतो आणि तळात एकत्रित होतो.

    या प्रक्रियेत आणखी एक फायदा असा होतो, तो म्हणजे वातावरणातील प्राणशक्ती पाण्यात जास्त प्रमाणात मिसळली जाते. आणि पाण्यातील अतिरिक्त वायु महाभूत निघून जाते.

    एखादे द्रव्य महाभूतांचा विचार करता पांचभौतिकच असते. फक्त तरतम भावांचा विचार करता, प्रत्येक द्रव्यातील संघात वेगवेगळा होतो, त्यावर ते द्रव्य घन वायु द्रव आकाशीय, तेजस बनणे अवलंबून असते.
    तसे पाण्यात असलेला घन, वायु आणि आकाशीय भाग कमी करत गेला की शुद्ध जल महाभूताकडे आपण जातो. आपल्याला जे द्रव्य ज्या स्वरूपात हवे आहे, ते महाभूत त्यामधे शिल्लक ठेवून अन्य महाभूतांचे प्रमाण कमी करीत जाणे. हीच खरी शुद्धी.

    हाच नियम कुठेही वापरू शकतो. अगदी सोन्याच्या बाबतीतही. मग सोन्यातील अन्य महाभूते कमी करत सोन्यातील फक्त शुद्ध पृथ्वी महाभूत शिल्लक ठेवण्यासाठी जे संस्कार सोन्यावर केले जातात, ती सोन्याची शुद्धी !

    उंचावरून खाली पडणारे पाणी शुद्ध असते. थोडसं संयुक्तिक वाटणार नाही पण समजण्यासाठी सांगतो, चहा "चढवला" कि त्याची चव बदलते ना ? चढवणे म्हणजे लांऽऽब करणे. उंचावरून खाली ओतणे, या उंचावरून ओतण्यामुळे त्यातील घन द्रवता बदलत जाते.चहाची चवही बदलते. तसेच आहे. पाणी उंचावरून ओतून घुसळण्याच्या प्रक्रियेतून अशुद्ध द्रव्ये घनीभूत होतात. नंतर ती गाळून वेगळी करता येतील.

    घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी मिक्सरमधून काही काळ फिरवून बघा. वेळ असेल तर ताकाच्या रविने घुसळा...
    रविचे घुसळणे आणि मिक्सरमधून घुसळणे यातही खूप फरक आहे, पण पाणी घुसळून पहा तर खरं, पाण्यातील अशुद्धी कश्या तळात जमा होतात त्या !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    03.01.2017

  • मन की बात – परतफेड

    एखाद्याने आपल्याकडील शिगोशिग भरलेल्या भांड्यातून वाटीभर दुध मित्राला देणं आणि त्या मित्राची कुवतच वाटीची असताना, त्या पहिल्या ‘एखाद्या’ मित्राच्या अडचणीच्या वेळेस दुधासहीत अख्खी वाटीच त्याला देऊन टाकणे, यातील त्या ‘देण्या’ला परतफेड म्हणावं की आणखी काही हे माझ्या लक्षातच येत नाहीय..

  • गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा

    गायत्री मंत्रातील सर्व अक्षरांचा महिमा वाचा....

    ''ॐ'' या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो.

    ''भू:'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळयावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो.

    ''भूव:'' च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो.

    ''स्व:'' या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळयावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो.

    ''तत्'' च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सूप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते.

    ''स'' च्या उच्चाराने डाव्या डोळयातील सफलता नांवाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते.

    ''वि'' चे उच्चारण केले असता डाव्या डोळयामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते.

    ''तु'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नांवाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते.

    ''र्व'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिध्द होते.
    'रे'' चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तिची जागृती होते.

    ''णि'' च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते.

    ''यं'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिध्दि होते.

    ''भर'' या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठत असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते.

    ''गो'' चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुध्दि' शक्तीची सिध्दि होते.

    ''दे'' च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते.

    ''व'' चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिध्दि करतो.

    ''स्य'' याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगडया जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते.

    ''धी'' च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ति ' सिध्द होते.

    ''म'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तिची जागृती होते.

    ''हि'' च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिध्द होते.

    ''धी'' या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिध्दि होते.

    ''यो'' च्या उच्चारणाने डाव्या भूजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्निहित' शक्ति जागृत होते.

    ''यो'' च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते.

    ''न:'' या अक्षराच्या उच्चारणांने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारीणी' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिध्दि होते.

    ''प्र'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते.

    ''चो'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिध्दि होते.

    ''द'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नांवाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते.

    ''यात्'' या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिध्द होते.