(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा

    गायत्री मंत्रातील सर्व अक्षरांचा महिमा वाचा....

    ''ॐ'' या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो.

    ''भू:'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळयावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो.

    ''भूव:'' च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो.

    ''स्व:'' या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळयावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो.

    ''तत्'' च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सूप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते.

    ''स'' च्या उच्चाराने डाव्या डोळयातील सफलता नांवाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते.

    ''वि'' चे उच्चारण केले असता डाव्या डोळयामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते.

    ''तु'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नांवाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते.

    ''र्व'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिध्द होते.
    'रे'' चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तिची जागृती होते.

    ''णि'' च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते.

    ''यं'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिध्दि होते.

    ''भर'' या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठत असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते.

    ''गो'' चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुध्दि' शक्तीची सिध्दि होते.

    ''दे'' च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते.

    ''व'' चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिध्दि करतो.

    ''स्य'' याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगडया जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते.

    ''धी'' च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ति ' सिध्द होते.

    ''म'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तिची जागृती होते.

    ''हि'' च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिध्द होते.

    ''धी'' या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिध्दि होते.

    ''यो'' च्या उच्चारणाने डाव्या भूजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्निहित' शक्ति जागृत होते.

    ''यो'' च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते.

    ''न:'' या अक्षराच्या उच्चारणांने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारीणी' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिध्दि होते.

    ''प्र'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते.

    ''चो'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिध्दि होते.

    ''द'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नांवाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते.

    ''यात्'' या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिध्द होते.

  • दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

    ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.

    पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
    कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
    मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
    कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||

    यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

  • दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

    ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.

    पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
    कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
    मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
    कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||

    यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

  • बुद्धी नसली तरी मन मात्र हवंच

    माणसाला एकवेळ बुद्धी नसली तर फारसं काही बिघडणार नाही पण मन मात्र हवंच हवं..

  • १० गोष्टी आरोग्याच्या

    सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते.

    सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते.

    दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे .

    अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.

    दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे.

    हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते.

    ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते . कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे.

    रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.

    दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.

    दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते.

    दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे.

    रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.

    सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मन की बात – ‘राम मंदीर’ रेल्वे स्टेशन

    राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. कारण आताच काही दिवसांपूर्वी गोरेगांच्या प्रसिद्ध राम मंदीर परिसरात मंदीरा पेक्षा प्राचिन शिव मंदीराचे अवशेष सापडले

  • शिंका येणे

    सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे.

    ऍलर्जीमुळे "सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो?

    सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला ओलावा आणण्यास "सायनसेस‘ एक ते दीड लिटर स्राव तयार करतात; परंतु सायनसची वाट किंवा तोंड (नाकात सूज आल्यामुळे) बंद झाल्यास सायनसमधील स्राव बाहेर पडू शकत नाही. स्राव साठल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन सायनसचे "इन्फेक्शसन‘ होते. ही सूज मूलतः ऍलर्जीमुळे येते, त्यामुळे डोके दुखणे, चेहेरा व डोके जड होणे, थकवा येणे, दिवसभर निरुत्साही वाटणे, कामावरील तसेच अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व शारीरिक चलनवलन कमी होणे ही लक्षणे आढळतात.

    अनेक वर्षांचा त्रास असल्यास त्याचे परिवर्तन परत परत होणाऱ्या अथवा ऱ्हिनोसायन सिटीस मध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये सर्दी दाटून पोलिप तयार होतात व सर्व प्रकारचे वास येणे बंद होते, औषधांमुळे सायनस इन्फेक्श न दूर न झाल्यास दुर्बिणीद्वारा अगदी अलगदपणे ही सायनसची तोंडे उघडता येतात; पण काही कालावधीनंतर ऍलर्जीचा कायम स्वरूपी उपचार न केल्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात. सर्दीच्या योग्य उपायांमुळे सायनस मोकळे राहते व परत परत सायनसच्या इन्फेक्शतनची शक्यचता कमी होते.

    ऍलर्जी म्हणजे काय?

    प्रतिकारशक्तीचे मुख्य काम म्हणजे विविध जंतूविरुद्ध शरीराचे संरक्षण करणे. याकरिता आपल्या प्रतिकारशक्तीने शरीराला धोका निर्माण करणाऱ्या व धोका न निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. ऍलर्जी म्हणजे निसर्गामधील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक ठरू शकतो. कारण या घटकांना प्रतिपिंड (antibody) तयार होऊन हिस्टामाईन नावाचे द्रव्य तयार होते.

    ते कसे शोधून काढायचे?

    तपासणीसाठी त्वचा सर्वांत उपयोगी पडते. ऍलर्जीची औषधे चालू नसल्यास त्वचेची चाचणी रक्ताच्या तापसणीपेक्षा चांगले निष्कर्ष देते. ऍलर्जी वरील कायमस्वरूपी उपचाराला "इम्युनोथेरपी‘ असे म्हणतात.

    इम्युनोथेरपी म्हणजे काय?

    या उपायांमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी होण्याकरता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.

    इम्युनोथेरपीमध्ये ऍलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते. मग शरीराचा बाह्य ऍलर्जीनिक द्रव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक ते पाच वर्षे ज्या रुग्णांनी हा उपचार केलेला आहे, त्या रुग्णांमध्ये याचे दीर्घकाळ फायदे आढळून येतात. प्रत्येक रुग्णामध्ये हा उपाय पूर्णतः लागू होईलच असे नाही; पण हा उपचार केल्यास ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो किंवा औषधाची गरज कमी भासते. जे रुग्ण ठराविक द्रव्याची ऍलर्जी असूनसुद्धा त्यांना टाळू शकत नाहीत किंवा ज्यांना औषध घेऊनसुद्धा ऍलर्जीचा त्रास होत आहे. त्यांनी हा उपचार अवलंबावा यामुळे ते दैनंदिन जीवन सुखाने जगू शकतील. खाद्य पदार्थांच्या किंवा औषधांच्या ऍलर्जीसाठी मात्र हा उपाय अतिशय अवघड आहे. ऍलर्जीवर काम करणारा प्रतिबंधात्मक उपाय हा विशष उपचार केंद्रात (स्पेशल क्लिननिक)मध्ये केला जातो. नाक, सायनस, श्वारसनलिकेच्या ऍलर्जीमध्ये हा नक्कीच उपयोगी ठरतो. जिभेच्या खाली याची लस देता येते. हळूहळू लसीचे प्रमाण वाढवले की ऍलर्जीचा त्रास कमी होतो. त्रास देणारी द्रव्ये शरीरात असूनसुद्धा प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ (antigen) व प्रतिपिंड यांचा त्रास होत नाही. हिस्टामिन हे द्रव्य तयार न झाल्याने ऍलर्जीचे परिणाम दिसत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733
    संदर्भ:- सकाळ / डॉ. विनया चितळे

  • नववर्षाच्या संकल्पांशी प्रामाणिक आहात ?

    सकाळी लवकर उठायचे......

    रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम व योगासने करायची...

    रोज आंघोळ करायची........

    रोज किमान दोन किलोमीटर तरी चालायचे.....

    आहारावर व खाण्यावर नियंत्रण ठेवायचे, तेलकट, तुपकट & गोड पदार्थ(?) कमीच करायचे.....

    खर्च कमी व सेव्हीँग जास्त करायचे.......

    स्वदेशी वस्तुच जास्त वापरणार..........

    रोज एखादे चांगले काम करायचे............

    रोज रात्री फेसबुक व Whattsup वर कमी व निद्रेमध्ये जास्त रहायचे........

    जिमला नियमितपणे जायचे.......

    रोज सकाळी पेलाभर गरमलिंबुपाणी प्यायचे.....

    चांगले पुस्तक आणि कविता वाचतच झोपायचे....

    लिफ्टचा वापर कमी करत जिन्यानेच वर जायचे....

    रोज पाच ईँग्रजी शब्द पाठ करायचे.....

    रोज किमान 15 मिनिटे तरी वर्तमानपत्र वाचायचे.....

    गाडी चालवताना मोबाईल वापरायचाच नाही.....

    रोज सकाळी ऑफीसला जाताना एकाला तरी लिफ्ट द्यायची..

    रोज घरातले एक तरी काम करायचे.....

    आठवड्यातुन एकदा तरी घर आवरायला आईला मदत करायची......

    नातेवाईकांना महीन्यातुन एकदा तरी कॉल करायचा.....

    रोज आंघोळ झाल्यावर (?) एक जपमाळ करायची आणि एक आवडते स्तोत्र वाचायचे.".....

    हे असे अनेक संकल्प आपल्या सभोवतालची हिंदु माणस ख्रिस्तींच्या "न्यु ईयर"ला करतात. (सर्वधर्मसमभाव )

    पण या संकल्पाशी वर्षभर कितीजण प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात देवच जाणे.

    -- विवेक जोशी

  • देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी ११२ हा एकमेव नंबर

    देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय.

    पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.

    ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील ९११ आणि इंग्लंडमधील ९९९ या इमरजन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही ११२ हा एकच इमरजन्सी नंबर असणार आहे.

    तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे ११२ या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल. त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर ११२ नंबर सेव्ह करता येईल.

  • मन की बात – विश्वास

    गेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..