वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.
या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय
कारणे - तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे. उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बीअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे. आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. ४) उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे. मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे. ७) अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे. पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे. प्रेमभंग, करिअर समस्या, असमाधानी जीवन. वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र. या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी साधारण उपाय.
नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.
योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.
रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये.
रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.
अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.
झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाईल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.
झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे लळेश्रेलरश्र लश्रेलज्ञ सेट राहील.
चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
झोपण्याचा बिछाना व्यवस्थित अंधारमय खोलीत असावा.
नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-याची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.
वरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांविना मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे याची सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा -झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील "बेसल गॉंग्लिया' नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना अनेक स्नायूंचे कित्येक सेकंद टिकणारे आकुंचन होत राहते. परिणामी व्यक्तीचे श्व सन दीर्घ पूरक स्थितीत जाते म्हणजे श्वाचस आत घेण्याची क्रिया नेहमीच्या श्वावसोच्छ्वासापेक्षा लांबते. त्याच वेळी घशाचा आकार विस्तारतो. खालचा जबडा व जीभ खाली जाते. दीर्घ श्वासस घेण्याने फुफ्फुस व पोट यातील पडदा (डायफ्रॅम) पोटाकडे सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीत ऋण भार (negative pressure) तयार होतो. शरीरातील नीलांमधील रक्त छातीकडे (हृदयाकडे) जाते. त्यामुळे हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा सुधारतो. दीर्घ श्वीसनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे फुफ्फुसातील बंद कोष उघडले जातात.
आपल्या नेहमीच्या किमान 40 टक्के फुफ्फुसातील कोष कार्यान्वित होत नसतात. अशा न उघडलेल्या कोषातून प्राणवायूची देवाणघेवाण होत नाही. प्राणवायू कमी असणारे रक्त तसेच हृदयाकडे परत जाते व रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. मधूनच दीर्घ श्वेसन झाले तर हा दोष टळतो. अनेकदा हॉस्पिटल्समध्ये अति दक्षता भागात रुग्णांना कृत्रिम श्वास होणाऱ्या "व्हेंटिलेटर' र्(ventilator) मशिनवर ठेवले जाते. या वेळी रुग्णाला जांभई येत नाही. त्यामुळे बंद असणाऱ्या कोषातील "अशुद्ध' (म्हणजे प्राणवायू कमी असणारे) रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तात मिसळते. परिणामी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घसरते. तसे होऊ नये म्हणून जास्त दबावाने प्राणवायू देणयाची प्रथा आहे. कधी कधी खूपच जास्त दबावाखाली प्राणवायू वापरावा लागतो. हायपर बॅरिक ऑक्सि न चेंबर(hyper baric oxygen chamber) जांभई येताना चेहऱ्यावरचे स्नायू व हाताचे स्नायूदेखील कार्यान्वित होतात.
या क्रियांनीदेखील रुधिराभिसरणाला चालना मिळते. शिवाय स्नायूंच्या आत असणाऱ्या काही मज्जा-स्वीकारांना (sensory receptors) चालना मिळते. यांच्यामधून मज्जारज्जूत व मेंदूत जाणाऱ्या चेतनांमुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. ही झोपेची पूर्वतयारी आहे. हाताच्या स्नायूंचे हे काम मेंदूच्या हालचाल केंद्राच्या (motor cortex) ताब्यात नाही. एखाद्या व्यक्तीला पक्षाघात (hemiplegia) झालेला असला तर ती व्यक्ती आपला (उजवा किंवा डावा) हात स्वेच्छेने हलवू शकत नाही. कारण या हालचाल केंद्राचा व हात हलविण्यास जबाबदार असणाऱ्या मज्जारज्जूतील पेशींचा संबंध दुरावलेला असतो. अशा व्यक्तीला जांभई आली तर मात्र हात उचलला जातो, ताणला जातो. हीदेखील बेसल गॉंग्लियामधून देखरेख केलेली एक प्रतिक्षिप्त क्रियाच असते. असा लुळा पडलेला हात जांभईच्या वेळी हलताना पाहून पाहणाऱ्याला नवल वाटते.
उत्क्रांत होत असताना अनेक श्वानपदांना आपल्या संरक्षणासाठी वास घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या प्रमाणात श्वा स घेण्याने बरीच हवा नाका -घशात जाते. या भागात नेहमी होणारी हवेची हालचाल संथ गतीने व कमी घनफळाची असते. त्यातील वाढीमुळे वास घेण्याची क्षमता वाढते. झोप येण्यापूर्वी आपल्या आसपास धोकादायक श्वावपदाचे अस्तित्व जाणणे प्राणिमात्राच्या जीवन-मरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. हा गुणधर्म सर्व प्राण्यांत दिसतो व मानवातदेखील उतरलेला आहे. झोप येण्यापूर्वी जांभया येऊ लागतात. ही क्रिया अनैच्छिक प्रतिक्षिप्त असते. कंटाळा येणे ही मानसिक प्रक्रिया झोप येणे या शारीरिक क्रियेशी संबंधित आहे.
ज्या वातावरणात मन रमू शकत नाही (कंटाळवाणे व्याख्यान) तेव्हा मनाला तेथून दूर जावेसे वाटते. पण सांस्कृतिक आणि इतर कारणांनी शरीर तेव्हा दूर जाऊ शकत नसले तर मन त्या वातावरणातून दूर एखाद्या कोषात गेल्याप्रमाणे लक्ष काढून घेते. म्हणजेच मनाची झोप सुरू होते. मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या जांभया येऊ लागतात. क्वचितच जांभया येणे हे एखाद्या मेंदूच्या विकाराचे लक्षण असते. फेफरे (epileptic fit) येणाऱ्या रुग्णाला फिट येण्यापूर्वी जांभया येऊ लागणे शक्या असते. मेंदू-ज्वर या आजारातदेखील रुग्णाला सारख्या जांभया येतात. अफू हा एक मादक पदार्थ आहे. त्याचे नियमाने सेवन करणाऱ्या व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. अशा व्यक्तीला अफू मिळाली नाही किंवा मादक पदार्थांचे परिणाम नष्ट करण्याची औषधे दिली तर सतत जांभया येऊ लागतात. जांभई येणे हा जरी वैश्विणक अनुभव असला तरी त्याबद्दल संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अजून मिळालेली नाही. व्यवहारात असे दिसते की कोणत्याही कारणाने रात्री झोप न मिळाल्यास दिवसा सारख्या जांभया येतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात. काही लोक यामुळे उठून बसतात किंवा काहीजण कुस बदलून झोपतात. कुस बदलल्यामुळे बहुधा हा अडथळा थांबून श्वास सुरळीत होतो.
घोरण्याबरोबर अनेक आजारांशी नाते आढळून येते. घोरणा-या व्यक्तींना अतिरक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा आघात झाल्याने पक्षाघात होऊ शकतो. घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता, इ. निरनिराळी कारणे यामागे असतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते व घोरणे सुरु होते. लठ्ठपणामध्ये स्नायूंमध्ये चरबी साठून स्नायू दुबळे होतात. हे आजार नसतील तर उतारवयातील घोरण्यापासून ही व्यक्ती मुक्त असू शकते. घोरण्यामुळे श्वास अडून आचके येत असतील तर डॉक्टरकडे नक्की दाखवले पाहिजे. यासाठी काही तपासण्या करून घोरण्याचे कारण आणि प्राणवायू प्रमाणाची कमतरता निश्चित करता येते. छातीच्या डॉक्टरकडून तपासणी केल्यास रात्रभराचा घोरण्याचा आलेख व कार्डिओग्राम (ईसीजी) काढता येतो. यावरून निश्चित निदान करता येते. यातील बहुतेक लोकांना जीभ जडावल्यामुळे घोरण्याचा त्रास होत असतो. कारणाप्रमाणे यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. जीभ जागच्या जागी रहावी म्हणून प्लॅस्टिकची आधारपट्टी किंवा शस्त्रक्रियेने घोरणे दुरुस्त करता येते. योग्य आहार, व्यायाम, प्राणायामाचे काही प्रकार (उज्जायी व भस्त्रिका) वजन कमी करणे, कुशीवर झोपणे, या साध्या साध्या उपायांनी घोरण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो.
यातून उपाय न झाल्यास व त्रास जास्त असल्यास डॉक्टरकडे अवश्य गेले पाहिजे. डॉक्टरकडे जाण्या आधी काही उपाय करून पहिले पाहिजेत. उताणे झोपण्या एवजी एका कुशीवर झोपावे. विशेषतः डाव्या कुशीवर झोपणे हितकारक असते. त्यामुळे घशातले स्नायू एका बाजूला पडतात. आणि घोरण्याची गरज पडत नाही. झोपण्यापूर्वी नाकपुडीमध्ये एक स्प्रे फवरला जातो. त्यामुळे सुद्धा तात्पुरता दिलासा मिळू शकतो. झोपण्यापूर्वी चार तास आधी मद्यपान न करणे हाही एक घोरण्यावरचा सोपा उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक धुम्रपान करण्याने सुद्धा घोरणे वाढते. तेव्हा सिगरेटच्या संख्येत घट करणे हा घोरण्यावरचा एक उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक वजन असणे हेही घोरण्याच्या बाबतीत धोकादायक असते. तेव्हा वजन मर्यादित असणे हा एक चांगला उपाय आहे. घोरण्यावरचा आणखी एक उपाय म्हणजे थोड्याश्या उंच उशा वापरणे. घोरणार्याण व्यक्तीने, टाळूच्या विरुद्ध दिशेला जीभेचे टोक मागे वळवण्याचा प्रयत्न करावा. जीभ टाळूवर घासून खालच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा. घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या बाजूने दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करावा. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनचे मेडीकल डिरेक्टर बारबार फिलीप्स यांच्यानुसार, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या शरीराला उभे करण्याचे काम हाडे करीत असतात. मानवी पायामध्ये २६ हाडे असतात. मनगटासह मानवी हातामध्ये ५४ हाडांचा समावेश असतो. मांडीचे हाड हे सर्वात लांब आणि मजबूत हाड असते. कानाच्या मधल्या भागात जे हाड असते ते सर्वात लहान आणि पातळ हाड असते. हाताची हाडे ही सर्वाधिक वेळा मोडणारी हाडे आहेत. हाडांविषयीची ही माहिती आणि शरीर उभारणीसाठी असणारे त्यांचे महत्त्व लक्षात घेता हाडांचे आरोग्य सांभाळणे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल; परंतु आपण त्यांची काळजी न घेता त्यांना गृहित धरत असतो त्यांची काळजी घेऊन ती मजबूत राखली पाहिजेत. आपले वय जसजसे वाढते तसे हाडांची घनता कमी होत जाते ती ठिसूळ होऊ लागतात. घनता कमी झाल्यामुळे ऑस्टोपोरोसीस होण्याची शक्यता वाढते. आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी गरजेचे कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा शरीराला होणे गरजेचे आहे. मजबूत हाडांसाठी मुख्यत्वे सहा जीवनसत्त्व मिळण्याची गरज आहे.
‘डी’ जीवनसत्त्व आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेट यांची निर्धारित पातळी राखण्यासाठी शरीराला ‘डी’ जीवनसत्त्वाचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे असते. ‘डी’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात, पण ‘डी’ जीवनसत्त्व आहे त्या परिस्थितीत शरीरात शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी अॅोसिड ‘डी’ जीवनसत्त्व शरीरात शोषून घेण्यासाठी गरजेचे असते. ‘डी’ जीवनसत्व कॅल्शियम शोषून घेत असते. त्यामुळे आपल्या आरोग्यदायी हाडांसाठी शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी याच ‘डी’ जीवनसत्त्वाची गरज असते. त्यामुळे कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आपल्या आहारातून ‘डी’ जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा शरीराला होणे गरजेचे असते.
‘सी’ जीवनसत्त्व शरीरातील उतींच्या जाळ्यात पांढर्याि रंगाचा प्रथिन घटक असतो. त्यामुळे हाडे तयार होण्याची प्रक्रिया होत असते. शरीराला आवश्यक असणार्या् या प्रथिन घटकाच्या निर्मितीसाठी ‘सी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. नवीन कठीण हाडांच्या निर्मिती करणार्याळ ऑस्टिओ ब्लास्ट पेशींचे काम नीट सुरू राहण्यासाठीसुद्धा ‘सी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
‘बी 12’ जीवनसत्त्व हे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ‘बी 12’ या जीवनसत्त्वाची कमतरता असणार्या् व्यक्तींना हाडांशी निगडित आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मजबूत हाडांसाठी ‘बी 12’ जीवनसत्त्वयुक्त असा आहार घ्या.
‘ए’ जीवनसत्त्व आपल्या पार्श्वजभागाचे म्हणजेच माकड हाड मोडण्याची शक्यता कमी करण्याचे काम ‘ए’ जीवनसत्त्व करते. आपण जर मल्टि व्हिटामिन आणि मिनरल सप्लीमेंट म्हणजे विविध जीवनसत्त्व आणि पूरक खनिजद्रव्यांचे सेवन करत असाल तर त्यामध्ये ए व्हिटामीनचे प्रतिदिन प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा अधिक नाही ना याची खात्री करूनच ते घ्या. ज्या जीवनसत्त्वाच्या पूरक औषधांमध्ये बीटा कॅरोटीनच्या रुपात २० टक्के ‘ए’ जीवनसत्त्व किंवा कॅरोटीनचे मिश्रण असणारे जीवनसत्त्वाचा डोस घेत असाल तर फारच उत्तम. आपल्या व्हिटामिनवरील माहितीचा कागद वाचून मगच डोस सुरू करा. आपल्या पूरक आहारामध्ये एकत्रितपणे दिवसभरात १०० टक्क्यांहून अधिक ‘ए’ जीवनसत्त्वाचे प्रमाण नाही ना याकडे आवर्जून लक्ष द्या.
‘ई’ जीवनसत्त्व आपल्या हाडांचं संरक्षण करण्याचे काम ‘ई’ जीवनसत्त्व करते. निकोटिनचे सेवन करत असल्यास त्यामुळे होणारे हाडांचे नुकसान भरून निघण्यासाठी ‘ई’ जीवनसत्त्व उपयोगी ठरते. दाह होणार्यात ऑस्टोपोरोसिस या आजारामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व खूप फायदेशीर असते. स्त्रियांमध्ये मेनापॉजनंतरच्या काळात हाडांमधील खनिजांचे प्रमाण किंवा घनता कमी होते. हाडांतील खनिजांचे प्रमाण ‘ई’ जीवनसत्त्व वाढवू शकते, असे निष्कर्ष काही अभ्यासातून समोर आले आहेत.
‘क’ जीवनसत्त्व हाडांमधील खनिजांची घनता किंवा हाडांची घनता वाढवण्यासाठी ‘क’जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हाडे तुटण्यापासूनही प्रतिबंध होतो. आपल्या रक्तातील कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडांमध्ये जमा करत असल्याने नवीन हाडे तयार होण्याच्या क्रियेला ‘क’ जीवनसत्त्वाची मदत मिळते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. मनोज शिंगाडे
कुठल्याही त्रासदायक गोष्टीला आपण डोकेदुखीची उपमा देतो, याचे कारण हेच, की डोकेदुखी चालू झाली तर माणूस अक्षरशः हतबल होतो. त्याची कार्यशक्ती, विचारशक्ती, इतकेच नव्हे, तर आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेण्याचे त्याचे सामर्थ्यही रसातळाला जाते. अर्धशिशी किंवा मायग्रेन ही अशाच प्रकारची वेदना आहे. अशा प्रकारची डोकेदुखी- मज्जातंतूंच्या दाहामुळे होत असली तरी हा दाह का होतो, याचे अचूक कारण वैद्यकीय शास्त्राला अजून तरी ज्ञात नाही. या विकारामध्ये डोके मध्यम किंवा अति ठणकणे (काही लोकांमध्ये डोक्या ची एकच बाजू, तर ४० टक्के लोकांमध्ये डोके पूर्ण ठणकते.) या वेदनेबरोबरच उलटी होणे, मळमळणे, प्रकाश सहन न होणे, आवाज सहन न होणे, शांत अधाऱ्या खोलीत झोपून राहावेसे वाटणे, अस्वस्थता वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. कुठलाही उपाय न केल्यास असा त्रास साधारणतः २ ते ४८ तासांपर्यंत राहू शकतो आणि नंतर त्याची तीव्रता आपोआपच कमी होत जाते. डोके दुखल्यानंतर थकवा, चिडचिडेपणा जाणवू शकतो व नंतर काही दिवस वेदना झालेला डोक्यााचा भाग दुखरा जाणवतो. अर्धशिशीचे अचूक कारण जरी माहीत नसले तरी वातावरणातील घटक, ऊन, हवा, वारा आणि आनुवंशिक घटकही कारणीभूत असतात, असे दिसून आले आहे. भावनातिरेक व नैराश्य, हीही भर घालणारी महत्त्वाची कारणे आहेत. याखेरीज पौगंडावस्थेत जेव्हा हॉर्मोनल बदल शरीरात घडून येतात तेव्हाही हा त्रास होऊ शकतो. स्त्रियांमध्ये ही व्याधी पुरुषांपेक्षा जास्त आढळते. सतत डोके दुखरे राहणे, ठणकणे, आवाज, प्रकाश अजिबात सहन न होणे, कोणत्याही कारणामुळे - झोप जास्त झाली म्हणून किंवा जागरण झाले म्हणून - अशा प्रकारचा त्रास होणे, यामुळे माणसाच्या जीवनमानावर काय परिणाम होतो, याची आपल्याला चांगलीच कल्पना येऊ शकते. वेदनाशामक औषधांनी दुखणे तात्पुरते थांबते; पण प्रवृत्ती मात्र जात नाही आणि वर्षानुवर्षे तोच त्रास होत राहतो. मात्र काही चाचण्या करूनही अर्धशिशीच आहे आणि इतर कोणत्याही प्रकारच्या व्याधीमुळे होणारी डोकेदुखी नाही, हे निश्चिूत करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक चाचण्या होऊनही रोगाचे निदान किंवा मूळ कळत नाही. डोकेदुखी तर पाठलाग करते. अशा वेळी होमिओपॅथी रुग्णाच्या मदतीला येते. रुग्णाला त्रास तर होतोच आहे, परंतु निदान तर होत नाही किंवा रोगाचे मूळ कारणही समजत नाही, अशी परिस्थिती अनेक वेळा येते. अशा वेळी परिणामकारक उपचार उपलब्ध करून देणे हा होमिओपॅथीचा विशेष आहे. मायग्रेन ही अशाच प्रकारची व्याधी- ज्यामध्ये वेदनेचे मूळ कारण कळत नाही, पण अशा व्याधीमध्ये रुग्णाच्या शारीरिकतेचा आणि मानसिकतेचा पूर्ण अभ्यास करून रामबाण उपाययोजना करता येते. अशा वेळी साधारणतः तीन ते चार महिने एकसंध उपचार घेणे गरजेचे ठरते. होमिओपॅथीतील नक्साव्हीमिका, बेलाडोना, ब्रायोनिया ही आणि यासारखी औषधे उपयुक्त आहेत. हळूहळू डोके दुखण्याची तीव्रता आणि वारंवारता कमी होते. डोके दुखण्याची प्रवृत्तीही कमी कमी होत जाते. कुठल्याही कारणाने डोके दुखेल, ही भीती हळूहळू नाहीशी होऊन रुग्णाचा आत्मविश्वा स वाढतो आणि डोके धरून चिंतातुर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर हळूहळू हास्य फुलायला लागते. होमिओपॅथी मूळ किंवा कारण न कळणाऱ्या रोगांसाठी वरदान आहे. सर्व उपचार पद्धतीबाबत आपला दृष्टिकोन आपण व्यापक, सजग ठेवायला हवा आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी जरूर घ्यायला हवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. अपर्णा पित्रे
आपण नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती.
माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर केला जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे.
नॅचरोपॅथीचे डॉक्टर रोग्याच्या जीवन पध्दतीकडे जास्त लक्ष देत असतात. नॅचरोपॅथी मध्ये फिजीकल, फिजीकोलॉजीकल, तसेच स्पिरिच्यूअल घटक आजारामध्ये लक्षात घेतले जातात.
नॅचरोपॅथीमध्ये रोग्यावर उपचार करताना अनेक अल्टरनेटिव्ह थेरेपीचा वापर करतात उदा. होमिओपॅथी, हर्बल रेमिडीज, पारंपारीक चायनीज औषध उपचार, डाएट आणि न्युट्रिशन, योग, अॅक्युप्रेशर, हायड्रोथेरेपी, मॅगनेट थेरेपी, मसाज आणि व्यायाम.
नॅचरोपॅथी चे डॉक्टर अधिकृत नॅचरोपॅथी मेडिकल स्कुल मध्ये शिक्षण घेतलेले असतात. पहिले वर्ष सामान्य वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण दिले जाते त्यानंतर शेवटच्या वर्षात नॅचरल हिलींग टेक्निकवर शिक्षण दिले जाते.
निसर्गोपचार ही आरोग्याची अशी एक नैसर्गिक उपचार पध्द्ती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेते.
पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी, रोगांसाठी आणि उपचारांसाठी ज्या पध्दती उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक निसर्गोपचाराची पध्दत उत्तम आहे. यात जीवन जगण्याच्या सगळ्या तत्वांचे एकीकरण झाले आहे आणि हीच एक पध्दत अशी आहे की जी मानवाला त्याच्या आजच्या वाढत्या रोगराई पासून आणि त्यापासून निर्माण होणा-या धोक्यातून बाहेर काढू शकते. जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या तत्वांचा या पध्दतीत वापर केला जातो.
तुम्ही तुमचे आरोग्य विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला योग आणि नैसर्गिक आरोग्याच्या मदतीने उभे करावे लागते. येथे आरोग्याची बांधणी करावी लागते विकत नाही घेता येत. औषधांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्यांचे जे इतर परिणाम होतात, ते शरीराला हानिकारक असतात. सामान्य जनतासुध्दा आता या मुद्यावर सावधपणे विचार करत आहे. निसर्गोपचार पध्द्ती ही सर्वश्रेष्ठ उपचार पध्द्ती आहे हे आता ते मान्य करु लागले आहेत. या उपचार पध्दती बरोबर पातांजली योगसूत्रांचा वापर केला पाहिजे. ती योगसूत्रे या प्रमाणे - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामुळे तुम्हाला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल. आत्मविश्वास संपादन करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी यांचा उपयोग होईल.
डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई
9820584716
शहद जीने का मिला
करता हैं थोडा थोडा
जानेवालो के लिये
दिल नही तोड़ा करते
आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल.जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात.यातील शब्द फक्त प्रियकर/प्रेयसी(मितवा) साठी नाही.थोडे बारकाई ने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट जीवनात प्रत्येक ठिकाणी लागू पडते.
जे हातचे गमावले त्याबद्दल माणसाला हुरहुर नि हळहळ वाटावी आणि जे हातात आहे त्याचे योग्य मोल मात्र त्याला करता येऊ नये.हा निसर्गाचा मनुष्याला एकप्रकारचा शापच आहे.
बस एक परिक्षा,नाही आले अपेक्षित मार्क्स,नाही आलो आपण मेरिट लिस्ट मध्ये,सोबतच्या मित्रांसोबत नाही झालो आपण क्लास वन.म्हणून काय प्रयत्न सोडून द्यायचे?एवढ्याशा गोष्टीने माघार घ्यायची?बस हरलो आता आपण,आपली लायकी नाही नाही ही परिक्षा पास होयची असा न्यूनगंड करुन घ्यायचा?
आशाभंगासारखे जगात दुसरे दु:ख नाही हे जरी खरे असले तरी जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंदही आहे आणि स्वप्नभंगामुळे होणारा विषादही आहे.पण भावनांवर ताबा नसेल तर आपण कधीच सुखी होणार नाहीत.
रॉबर्ट केनडी म्हणतात,ज्यांच्या अंगी मोठ्यात मोठे अपयश पचविण्याची ताकद असते, त्यांनाच मोठ्यात मोठे यश मिळविता येते.आणि तुमचा दृष्टीकोण तर चांगला आहे.समाजसेवेसाठी तुम्ही या क्षेत्राकडे वळला आहात.थॉमस जेफरसन नेहमी म्हणत,"योग्य मानसिक दृष्टीकोण असलेल्या मनुष्याला त्याच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार नाही.
त्यामुळे विद्यार्थी मित्रहो,या दु:खातून बाहेर या.अजून खुप काही करण्यासारखे आहे आयुष्यात.आनंदाने जीवन गाणे गात-गात पुढे-पुढे जा.मनुष्य जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही.
शेवटी एकच सांगेल,ना तर मी तुम्हांला पेटून उठायला सांगणार आहे,ना लढायला सांगत आहे.बस्स तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे.त्यासाठी जगा.स्वत:वर प्रेम करा. आपल्या स्वप्नांवर प्रेम करा.मग बघा तुम्ही कसे कामाला लागतात..
नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करु नका.ती तर अशिक्षित मुलांना ही मिळते.गरज म्हणून अभ्यास करा,आवड आहे म्हणून नको.आपली आवड तर नेहमी बदलत राहते.आज पूजा तो कल कोई और दूजा.जसे शरीराला रोज अन्नाची गरज आहे.तसे आपल्याला अभ्यासाची गरज आहे.
महान विचारवंत सॉक्रेटिस म्हणतात," जेव्हा तुम्हांला एखाद्या गोष्टीची नितांत गरज असते.तेव्हा ती मिळविण्यासाठी तुम्ही काहीही करु शकतात.आयुष्यात कोणतेही ध्येय असू दे,ते मिळविण्यासाठी दुर्दम्य इच्छा असेल तर ते ध्येय कितीही कठिण असले तरी अप्राप्य कधीच नसते..
आपल्या अभ्यासांच्या पुस्तकांवर आजच लिहून ठेवा,'Im your Big Fan',पहा मग ते पुस्तक तुमच्यावर किती प्रेम करते.
धन्यवाद..
-- दीपक गायकवाड
तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहितीये?
तुम्हाला जर आज उचलून कुणी एखाद्या निर्जन बेटावर नेऊन सोडले तर तारीख फार फार तर महिनाभर लक्षात राहील तुमच्या. त्यातही एखादाच जरी दिवस चुकला तरीही पुढचं सगळंच चुकणार, हे निश्चित. पण तिथीचं तसं नाही. तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर असलात तर महिनाभराने कदाचित तिथीही विसरुन जाल. पण जर तुमचा खगोलशास्त्राचा जुजबी अभ्यास असेल तर चंद्राची कला आणि पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, केवळ एवढ्याच निरीक्षणावरुन तुम्ही तिथी, महिना आणि पक्ष, तिन्ही ठरवू शकता. अगदी बिनचूक. आज मोठमोठ्या शहरांमध्ये दुर्बिणीद्वारे आकाशदर्शनाचं फॅड आलंय. मी ह्या खगोलशास्त्र प्रसाराच्या क्षेत्रात तब्बल ६ वर्षे काम केलंय मित्रांनो. जे ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांनी रांगा लावल्या असतील, ते ज्ञान प्राचीन काळापासून प्रत्येक हिंदूला अगदी नकळत्या वयातच शिकवले जायचे. केवळ आणि केवळ कालगणनेसाठी!! आजसुद्धा खेड्यापाड्यांमध्ये अशी कित्येक वृद्ध मंडळी तुम्ही पाहिली असतील, जी कोणतेही घड्याळ वापरत नाहीत आणि तरीही केवळ सूर्याच्या अथवा चंद्राच्या स्थितीवरुन अचूक वेळ सांगतात. ही आहे हिंदूंची कालमापनपद्धती. जे तिथीला मानत नाहीत आणि ज्ञान केवळ ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते अशी फेकाफेक करतात, त्यांनी एकवार आपल्या आजोबांना अथवा आजीला याबद्दल चौकशी करावी. ते सांगतील ही कालमापनपद्धती प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात कशी वापरायचा ते. आणि ती सगळ्या जातीवर्णांच्या अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचवली गेली होती, यावरुनच हिंदूंना संशोधनाच्या दृष्टीने कालगणना किती अत्यावश्यक वाटत असे हे समजते.
प्रत्यक्षात इंग्रजांनी आमचं उपरोल्लिखित रोजच्या आयुष्याला पूरक असं सकस शिक्षण बंद केलं आणि त्याऐवजी त्यांच्या कारभाराला सोयीचं असं कारकूनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. याचाच परिणाम आजही दिसतो की, एखादी व्यक्ती शिकलेली असली म्हणजे तिला अक्कल असेलच याची आजही खात्री देता येत नाही. यांच्यापेक्षा आमच्या रुढार्थाने कमी शिकलेल्या सिंधूताई सपकाळ जास्त सुशिक्षित वाटतात की मग!! असो. तर त्याचसोबत इंग्रजांनी आमची विज्ञाननिष्ठ कालमापनपद्धती नष्ट करुन सगळीकडेच त्यांची अवैज्ञानिक आणि अपूर्ण कालमापनपद्धती लागू केली. मी मुद्दामच विज्ञाननिष्ठ आणि अवैज्ञानिक असे दोन शब्द वापरतोय. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. विज्ञानानुसार काळ ही एक मिती आहे. आणि म्हणूनच ती नेहमीच सापेक्ष असते. त्यामुळेच आपण काळ मोजण्यासाठी जितकी अधिक परिमाणं आणि संदर्भ लावू तितका तो अचूक येतो. इंग्रजांच्या मुळात कॅलेंडरमध्येच ग्रेगोरियन आणि ज्युलियन असे घोळ. त्यातून दिवसांचा होणारा बेहिशोब कसाबसा सावरण्यासाठी दर महिन्याआड १ दिवस वाढवणं आणि फेब्रुवारीत कधी १ तर कधी २ दिवस कमी करणं अशी बनवाबनवी आहेच. इतके करुनही ह्या कॅलेंडरमध्ये महिना, तारीख आणि वर्षच तेवढे समजते आणि घड्याळात केवळ तास, मिनिटे व सेकंद. याउलट हिंदू पंचांगाच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय. पंच अंग म्हणजे पाच अंगे. कोणकोणती पाच अंगे? तर तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. प्रत्येक दिवसाला ही पाच परिमाणे लावली जातात, तेव्हा कळणारा काळ हा इंग्रजी कॅलेंडरपेक्षा केव्हाही जास्तच अचूक असतो. शिवाय प्रहर, घटीका, पळे इ. तर वेगळेच!!
लक्षात घ्या, इथे फक्त रोजच्या जीवनातलं कालमापन तेवढं घेतलंय. याहून खोलात गेलो तर फारच धक्कादायक निष्कर्ष निघतात. भागवतपुराण हे अतिशय प्राचीन आहे. आपल्या सवयीप्रमाणे सारे काही शक्यतो बायबलच्या नंतरचे ठरवायचे ह्या अट्टाहासापायीदेखील पाश्चिमात्त्यांना त्याचा काळ सहाव्या शतकाच्या पुढे ओढता आलेला नाही. ह्या भागवतपुराणाच्या ३ऱ्या स्कंधाचा ११वा अध्याय वाचा. कालमापनाची परिमाणे दिली आहेत त्यात. सगळ्यात सूक्ष्म परिमाण सांगितलेय परमाणू. सगळ्यात मोठे सांगितलेय ते श्रीहरिचा एक निमेष अर्थात हरिनिमेष. संपूर्ण अध्यायच सूक्ष्मापासून जडापर्यंत काळ कसा मोजायचा हे स्पष्ट करण्यासाठी वाहिला आहे. मी यावर पूर्वी गणित केले होते. जोडीला एक संगणकतज्ञ मित्र त्याच्या अत्याधुनिक संगणकासह मदतीला होता. गंमत काय झाली? सगळ्यात सूक्ष्म काळ मोजताना आणि सगळ्यात मोठा काळ मोजताना, दोन्ही वेळेस त्याचा अत्याधुनिक संगणक ताण सहन न होऊन अक्षरश: बंद पडला!! याचाच दुसरा अर्थ असा की, गोऱ्या चमडीला ज्याकाळी चमडी झाकण्यासाठी झाडाच्या साली गुंडाळण्याइतकीसुद्धा अक्कल आली नव्हती, त्याकाळापासून आपण अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्मापासून मोठ्यातमोठ्या काळापर्यंत अचूक कालमापन करतो आहोत. अहो, येत्या गुढीपाडव्याला युगाब्द किती सुरु होतोय माहितीये? ५११९! यावरुन दिसते की, आज जे कॅलेंडर वापरतो ना आपण, त्याच्या किमान ३००० वर्षे आधीपासून आपण रोजच्या आयुष्यात कालगणना करतोय.
-- विनय
मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. त्यावर बरीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा ब्रिगेड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिेगेडने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. कारण काही असो. कृती निषेधार्ह आहे.
मुळात मूर्तीभंजनाची परंपरा अरबस्तानातून आली आहे. जे आपल्याला पटत नाही, जे आपले नाही किंवा ज्यांचे आपण विरोधक आहोत (जे आपले विरोधक आहेत, असा अर्थ नव्हे) ते ते सर्व नष्ट झाले पाहिजे अशी ही धारणा आहे. अरबस्तानातून आलेल्या आक्रमकांनी भारतातील मंदिरे पाडली, मुर्त्या फोडल्या, ग्रंथ जाळून टाकले. ही त्यांची परंपरा आहे. कारण त्यांना चर्चा अमान्य आहे. ख्रिस्ती साहित्यातील एक कथा वाचली होती (कोणत्या पुस्तकात किंवा नियतकालिकात ते आठवत नाही). अरबस्तानातील काही आक्रमक ख्रिस्त्यांच्या देशात गेले. तेथील एका चर्चवर त्यांनी आक्रमण केले व फादरला विचारले की "सांग कोणाचा ग्रंथ महान आहे, तुझा की आमचा? जर तू म्हणालास, तुझा ग्रंथ महान आहे तर आम्ही तुला मारुन टाकू आणि जर तू म्हणालास, आमचा ग्रंथ महान आहे, मग तू आमचा ग्रंथ शिरोधार्थ न मानता तुझा ग्रंथ शिरोधार्थ मानलास म्हणून तुला मारुन टाकू". ही मूर्तीभंजकांची मानसिकता आहे. त्यांना चर्चा नकोय, त्यांना केवळ भंजन करायचे आहे. जो आपल्या विचारांचा नाही त्याच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा त्यांच्यात नाही. ती परंपरा हिंदूंमध्ये आहे. म्हणूनच आपलं मस्तक गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांसारख्या महापुरुषांसमोरही आपसुक झुकलं जातं. ही भारतीय परंपरा आहे. भारतीय परंपरा तोडण्यावर भर देणारी नसून जोडण्यावर आणि उभारण्यावर भर देणारी आहे. म्हणून आपल्यात मूर्त्या घडवल्या जातात. श्रद्धेचा विषय सोडा. परंतु मूर्ती घडवणे ही कलाकृती आहे. त्या कलेचा आणि कलाकाराचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे.
१८९६ रोजी चापेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीचा पुतळा विटंबित केला होता. परंतु त्यामागची भावना उदात्त होती. त्या काळी इंग्रजांचे शासन होते आणि आपल्या कृतीतून इंग्रजांच्या साम्राज्याविषयीचा राग व्यक्त करायचा होता. तसेच इंग्रजांना दाखवून द्यायचे होते की भारतीय तरुण तुमच्या क्रूर शासनाविरोधात पेटून उठले आहेत. या भावनेने चापेकर बंधूंनी राणीच्या पुतळ्याला काळे फासले. ते राज्यच आपले नव्हते. आता लोकशाही आहे. कोणतेही सरकार असले तरी आपले भारतीयांचे राज्य आहे. स्वा. सावरकरांनी इंग्रजांचा निषेध म्हणून विदेशी कपड्यांची होळी टिळकांच्या नेतृत्वाखाली केली. हा सुद्धा चीड व्यक्त करण्याचा मार्ग आहे. कारण आपल्या देशात परकीयांचे राज्य होते आणि ते राज्य उलथवून टाकणे हे कोणत्याही देशभक्ताचे परमकर्तव्यच होते. पुढे अशीच होळी गांधीजींनी केली. ती खुप गाजली देखिल. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेले सावरकर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतः म्हणाले की आता पुढे क्रांती ही बंदूकीच्या गोळीने नव्हे तर मतदानाच्या पेटीत आपले मत टाकून करायची आहे. हे लोकशाहीचे महत्व सावरकरांनी सांगितले आहे. त्याच सावरकरांच्या अंदमानातील काव्यपंक्ती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी खोडल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेस आणि अय्यर सुद्धा मूर्तीभंजकांच्या परंपरेत अगदी शोभून दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेड ही त्या मानसिकतेची अनुयायी आहे. चर्चा करण्यापेक्षा भांडण, तंटे करायचे, मारामार्या, तोडफोड करायची. कारण असे केल्याने कोणाला उत्तर देणे बंधनकारक राहत नाही आणि त्यांची कृती सुद्धा पूर्ण होते. संभाजी महाराजांची बदनामी केली असे ब्रिगेड म्हणत आहे, त्या ब्रिगेडला गोविदाग्रंजांनी शिवरायांचा रचलेला सुंदर पाळणा माहित नसावाच. असो
१९१० च्या सुमारास लिहिलेले राजसंन्यास हे नाटक कोणाच्याही लक्षात नव्हते. वादासाठी मान्य केले की गडकरींनी संभाजी महाराजांचा अपमान केला. पण त्याचा आता काय संबंध? हा वाद उपटून काढण्याला काहीच अर्थ नाही. राम गणेश गडकरींना हे जग सोडून जवळ जवळ ९८ वर्षे झालीत. त्या नाटकाचा प्रयोगही आता होत नाही. त्यात ते अपूर्ण राहिलेले नाटक आणि जर निषेध करायचाच होता, तर त्यावर सविस्तर लेख लिहून लोकांचे प्रबोधन करता आले असते. मुळात प्रबोधन या शब्दाचीच एलर्जी ह्यांना असावी. कारण प्रबोधन करण्याआधी स्वतःला बोध व्हाया लागतो. असो.
माझे फेसबुकवरील मित्र डॉ. सुबोध नाईक यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, १९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या विधानसभेत शिवाजी महाराज युगपुरुष नव्हते असे कॉंग्रेसने सांगितले होते. मग आता गोविंदाग्रजांची मूर्ती हटवणारे ब्रिगेडी कॉंग्रेसचे काय करतील? नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर म्हटले की "संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.. ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम" मग आता नितेशरावांचे वडील ज्या कॉंग्रेसमध्ये आहेत, त्या कॉंग्रेसने शिवरायांचा अपमान केला होता. या विरोधात मराठाचा अभिमान वगैरे बाळगणारे नितेशराव कोणती कार्यवाई करणार आहेत? आपल्या वडीलांना राजांचा अपमान करणार्या कॉंग्रेसचा राजीनामा देण्यास भाग पाडतील का? पण असे काही होणार नाही. कारण ह्यांचा पंथ आणि परंपरा मूर्तीभंजनाची आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सर्व गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या आहेत. हे जरी भारतीय असले तरी ही मानसिकता भारतीय नाही. ही वाळवंटाची मानसिकता आहे. ती वाळवंटातून आलेली आहे आणि नतद्रष्टांनी पोसली आहे. संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यकर्त्यांना अटक होईलही. पण ही गलिच्छ मानसिकता, ही राक्षसी परंपरा कशी आणि कधी नष्ट होणार? मुळात ती नष्ट होण्याच्या मार्गातच आहे. कारण सज्जन आता जागरुक होत आहेत. त्यामुळे दुर्जनांची कोंडी होत आहे. गोविंदाग्रजांचा पुतळा हटवला या कृतीला प्रत्यूत्तर म्हणून गोविंदाग्रजांचे सहित्य अधिक वाचले आणि खपले जाईल ही आशा आणि खात्री मला आहे. गोविंदग्रजांनी त्यांच्या कवितेत "भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा" असं म्हटलंय. पण बुद्धी नसलेले काही जीव महाराष्ट्रात राहतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. तर अरबस्तानातील मूर्तीभंजनाची परंपरा चलवणार्या भारतीय ब्रिगेड्यांचे मी एक कलाकार म्हणून निषेध करतो आणि त्यांनी कितीही मूर्त्या फोडल्या तरी आम्ही विचारांची लढाई विचारांनीच आणि लोकशाही मार्गानेच लढणार, अशी प्रतिज्ञा घेतो. २३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरींची पुण्यतिथी आहे. आपण सर्व साहित्यप्रेमींनी आपापल्या भागात आणि आपापल्या क्षमतेने ही पुण्यतिथी जागवायला हवी. या दिनानिमित्त गडकरींचे स्मरण करुया, त्यांचे साहित्य वाचूया, विकत घेऊया, साहित्य वाटप करुया किंवा त्यांची नाटके सादर करुया. आपल्याला जे शक्य होईल ते करुया. या भ्याड कृतीचा, या मूर्तीभंजनाच्या परंपरेचा निषेध करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने अचानक रु. 1000 व रु. 500 च्या नोटा चलनामधून बाद करत असल्याची घोषणा केली आणि देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती या पूर्वी देशात कधीच निर्माण झाली नव्हती. या मूळे सर्वसामान्य लोकांची पंचाईत तर झालीच पण बँकांवर प्रचंड ताण पडला आणि काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी, पैसे भरण्यासाठी व पैसे काढण्यासाठी लोकांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागू लागल्या. एटीएम मशीन्स बंद असल्यामूळे बँकांवरचा ताण आणखीच वाढला. रोख पैशांचा तुटवडा, बँकांना होणारा मर्यादीत कॅशचा पुरवठा, सतत बदलणारी रिझर्व्ह बँकेचे नियम आणि धोरणे या मूळे गोंधळात अधीकच भर पडली. पण या कठीण काळात अनेक बँकांनी उत्कृष्ट काम केले. या मधील एक बँक आहे पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची दत्तवाडी ब्रॅन्च!
या बँकेतही लोकांची अभूतपूर्व गर्दी होत होत होती. स्टाफला रोज 12- 12 तास काम तर करावे लागत होतेच पण जेवायला सुद्धा फुरसत मिळायची नाही. अर्था तास लंच पिरीयड असताना 10 ते 15 मिनीटांमध्ये घाईघाईने लंच उरकून यावे लागे व ते सुद्धा आळिपाळीने लंचला जाऊन. रोजच नवीन संकटे, नवीन समस्या, नवीन अडथळे असायचे. लोकांचे वेडेवाकडे प्रश्न, त्यांचा रोष, त्यांची नाराजी, संताप, कुचकट बोलणे याला तोंड द्यावे लागायचे. पण बँकेच्या सगळ्याच स्टा॑फने ही परिस्थिती खंबीरपणे आणि उत्कृष्टपणे हाताळली. मी अनेक वेळा बँकेचे मॅनेजर निळकंठ जमादार यांना हात जोडून व विनम्रपणे लोकांना सहकार्य करण्याची विनंती करताना पाहीले. बँकेच्या ऑ॑फीसबॉयपासून मॅनेजरपर्यंत सर्वजणच लोकांच्या मदतीला तत्पर असायचे. बँकेच्या टोकन सिस्टीमचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला. टोकन घेतल्यावर किती वेळाने नंबर येईल हे सांगण्यासाठी विशेष स्टाफची नियुक्ती करण्यात आली होती. बर्याँच वेळाने नंबर येणार असेल तर लोक घरी जाऊन किंवा इतर कामे करून बँकेत परत येत असत. त्यामूळे बँकेतल्या गर्दीवर नियंत्रण रहात असे. मी पुण्यातल्या इतर बँकांमध्ये अशा प्रकारची सिस्टीम बघीतली नाही. जेष्ठ नागरीकांची पण खास काळजी घेण्यात येत होती. त्या मूळे नोटबंदीच्या या कठीण काळातही या बँकेचे कामकाज सुरळितपणे पार पाडले. लोकांनीही उत्तम प्रतीसाद दिला आणि सहकार्य केले. कोणताही गैरप्रकार झाला नाही. यासाठी बँकेचे निळकंठ जमादार, संगीता पटवर्धन, महादेवी स्वामी, सुजाता जमादार, मंजुशा नथी, ज्योती नातू, निवृत्ती चहाणे, सुनील सुखात्मे, स्वाती मोने, दिलिप देवकाते, सपना रहाटे, विजय, अनिल दानवे, पुर्वा जोशी या सर्व कर्मचार्यांदचे योगदान आहे.
आपण अनेक वेळा बँकेच्या कर्मचार्यांोना नावे ठेवत असतो किंवा तक्रारी करत असतो. पण त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल मात्र घेत नसतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दत्तवाडी शाखेतील वरील कर्मचार्यां नी जे उत्तम काम केले याची दखल घेऊन त्यांचे नक्कीच अभीनंदन व कौतुक करणे आवश्यक आहे. माझी खात्री आहे की हे कर्मचारी यापूढेही याच सेवाभावाने काम करतील.
-- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
Copyright © 2025 | Marathisrushti